मंगळवार, १ जुलै, २०२५

 जनसुरक्षा विधेयकविरोधी समितीच्या वतीने ३० जूनला मुंबईत विराट मोर्चा


मुंबई,ता.१ : ‘महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४’ हे घटनाविरोधी आणि लोकशाहीस बाधक विधेयक असून,जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे.त्यामुळे हे विधेयक रद्द करावे, या मागणीसाठी राज्यभर व्यापक लढा उभारण्याचा निर्धार भाकप, माकप,भाकप माले शेकाप,सकप,लाल निशाण पक्षांसह विविध डाव्या व लोकशाहीवादी पक्ष - संघटनांनी केला आहे.याअंतर्गत २२ एप्रिल रोजी जनसुरक्षा विधेयकाविरोधात राज्यातील सर्व तहसील कार्यालये,जिल्हाधिकारी कार्यालये याठिकाणी निदर्शने करण्यात आली होती.राज्यातील सर्व‌ जिल्ह्यात व एकूण ७८ ठिकाणी या विधेयकाचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले.
  महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४ या विषयावर सविस्तर अभ्यास करून या विधेयकाला विरोध करण्यासाठी जनसुरक्षा विधेयक विरोधी समिती  तातडीने कृती कार्यक्रम हाती घेतला. राज्यात विभागीय मेळावे घेऊन या विधेयकाला विरोध का करायचा,याबाबत जनतेपर्यंत माहिती पोहोचवून जनमत तयार करण्यात आले. 
आता ३० जून रोजी मुंबई येथे सुरू होणाऱ्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.तसेच समाज माध्यमांमधून याबाबत प्रचार - प्रसार करुन,सर्व आमदारांच्या घरावर व कार्यालयावर जाऊन हे विधेयक रद्द करावे म्हणून विधानसभा,विधान परिषदेत भूमिका मांडण्याबाबत दबाव निर्माण करण्यात येणार आहे.सदर विधेयक मंजूर करण्यापूर्वी विधीमंडळाच्या संयुक्त समितीकडे पाठविण्यात आले.या समितीने जाहीर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन त्या नुसार आजपर्यंत दिलेल्या तारखेला या विधेयकाला प्रत्यक्ष व दिलेल्या संकेतस्थळावर सुचना व विरोध नोंदवण्यात आला आहे.राज्य भरातून १२००० पेक्षा अधिक हरकती दाखल करण्यात आलेल्या आहेत.एवढ्या मोठ्या प्रमाणावर हरकती दाखल होण्याचे हे पहिलेच उदाहरण आहे.यावरून जनसामान्यांच्या मनात काय आहे हे लक्षात येते.परंतु सदर विधीमंडळाच्या संयुक्त समिती ने कोणालाही प्रत्यक्ष म्हणणे मांडण्याची संधी दिलेली नाही.हे लोकशाही प्रक्रियेला साजेसे नाही.याचा आम्ही निषेध करतो.
आमचे हरकतीचे मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत 
या कायद्याचे नाव “महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम” असे ठेवले असले तरी ते जनतेची सुरक्षा करण्यासाठी नव्हे तर सत्ताधा-यांची सुरक्षा करण्यासाठी आणण्यात आले आहे.२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनसंघटना,कामगार संघटना यांनी भाजपच्या विरोधात भूमिका घेऊन संविधान रक्षणासाठी ज्या परिणामकारक रीतीने काम केले,त्या लोकशाही ताकदीला नेस्तनाबूत करण्यासाठी आणण्यात आलेले हे विधेयक आहे.सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी करणारे व हुकूमशाही व्यवस्था मजबूत करणारे हे विधेयक आहे.या विधेयकाच्या उद्देशात अर्बन नक्षलवादाला आळा घालण्यासाठी हे विधेयक आहे असा उल्लेख असला तरी अर्बन नक्षलवादी म्हणजे कोण याची व्याख्या करण्यात आलेली नाही.हे विधेयक काही मूलभूत लोकशाही मूल्यांविरुद्ध आहे. यातील काही तरतुदीनुसार.“बेकायदेशीर कृत्य" याचा अर्थ,एखाद्या व्यक्तीने किंवा संघटनेने केलेले, –
(एक) जे सार्वजनिक सुव्यवस्था, शांतता व प्रशांतता यांस धोका किंवा संकट निर्माण करते असे ; किंवा
(दोन) जे सार्वजनिक सुव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करते किंवा ज्याचा हस्तक्षेप करण्याकडे कल आहे असे ; किंवा
(तीन) जे न्यायदानात किंवा विधिद्वारा स्थापित संस्थांमध्ये व कर्मचारी वर्गामध्ये हस्तक्षेप करते किंवा ज्याचा हस्तक्षेप करण्याकडे कल आहे असे किंवा
(चार) जे राज्य शासनाच्या किंवा केंद्र सरकारच्या दलांसह,कोणत्याही लोकसेवकाला, असा लोकसेवक आणि अशी दले कायदेशीर अधिकारांचा वापर करीत असताना, फौजदारीपात्र बलप्रयोगाद्वारे किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग दाखवून किंवा अन्यथा, दहशत निर्माण करण्यासाठी रचलेले आहे असे ;किंवा 
(पाच) हिंसाचार,विध्वंसक कृतींमध्ये किंवा लोकांमध्ये भीती व धास्ती निर्माण करणा-या अन्य कृतींमध्ये गुंतलेले किंवा त्याचा प्रचार करणारे,किंवा अग्निशस्त्रे,स्फोटके किंवा अन्य साधने यांचा वापर करण्यात गुंतलेले किंवा त्यास प्रोत्साहन देणारे किंवा रेल्वे, रस्ते,हवाई किंवा जल यामार्गे होणा-या दळणवळणांमध्ये व्यत्यय आणणारे असे ; किंवा
(सहा) प्रस्थापित कायद्याची व कायद्याद्वारे स्थापन केलेल्या संस्थांची अवज्ञा करण्यास प्रोत्साहन देणारे किंवा तसे करण्याचा उपदेश देणारे असे ; किंवा
(सात) वर नमूद केलेली कोणतीही एक अथवा अधिक बेकायदेशीर कृत्ये करण्यासाठी पैसे किंवा वस्तू गोळा करणारे असे,कोणतेही कृत्य. मग ते कृती करून केलेले असो अथवा एकतर तोंडी किंवा लेखी शब्दांद्वारे किंवा खुणा करून अथवा दृश्य सादरीकरणाद्वारे किंवा अन्यथा केलेले असो, असा आहे ;
तसेच
(आठ ) “बेकायदेशीर संघटना" याचा अर्थ, जी संघटना, कोणतेही बेकायदेशीर कृत्य करण्यामध्ये गुंतलेली आहे किंवा तिच्या उद्दिष्टांनुसार-कोणतेही माध्यम, साधन किंवा अन्यथा यामार्फत प्रत्यक्षपणे अथवा अप्रत्यक्षपणे बेकायदेशीर कृत्य करण्यास अपप्रेरणा देते किंवा सहाय्य करते किंवा मदत करते, किंवा त्यास प्रोत्साहन देते,अशी कोणतीही संघटना,असा आहे.
या विधेयकानुसार जो कोणी बेकायदेशीर संघटनेचा सदस्य असेल किंवा अशा कोणत्याही संघटनेच्या बैठकामध्ये भाग जाईल किंवा त्यांना देणगी देईल किंवा स्वीकारेल अशा लोकांना तीन वर्ष कारवास किंवा तीन लाख रुपये दंडाची शिक्षा होऊ शकेल.
या विधेयकाच्या द्वारे  प्रशासनाला अतिरेकी अधिकार दिले जात आहेत. कोणत्याही व्यक्तीवर संशय आल्यास,त्याच्यावर कठोर कारवाई करता येईल,ज्यामुळे सरकारी यंत्रणा जनतेच्या मुलभूत अधिकारांवर गदा आणू शकेल.विरोधी विचारसरणी किंवा सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्या व्यक्ती किंवा संघटनांना सहजपणे 'अन्याय्य' ठरवून त्यांच्या हालचालींवर निर्बंध आणता येऊ शकतात.हा प्रकार लोकशाहीत असलेल्या वैचारिक मतभेदांचा आदर न करणारा आहे.
 काही प्रकरणांमध्ये सरकारला न्यायपालिकेच्या भूमिकेत हस्तक्षेप करण्याचेही स्वातंत्र्य दिले गेले आहे,ज्यामुळे स्वायत्त आणि स्वतंत्र न्यायपालिकेचा पाया कमकुवत होईल.सरकारच्या धोरणांवर टीका करणे किंवा शांततापूर्ण आंदोलन करणे यांना ‘अन्याय्य कृत्ये' ठरवले जाऊ शकते,जे लोकशाहीत अभिप्रेत असलेल्या खुल्या चर्चेच्या तत्वा विरोधी आहे.
 विधेयकात काही तरतुदी अशा आहेत की ज्यामुळे मूलभूत हक्क जसे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य,संघटन स्वातंत्र्य आणि न्यायसंगत सुनावणीचा अधिकार यावर परिणाम होईल
थोडक्यात म्हणजे हे विधेयक लोकशाही तत्त्वांना बाधा आणणारे आणि सत्ताधारी प्रशासनाला जास्त अधिकार प्रदान करून नागरिकांच्या हक्कांची गळचेपी करण्याचा धोका निर्माण करणारे आहे.म्हणून या विधेयकाच्या विरोधात ३० जून २०२५ रोजी मुंबई मधे जोरदार आंदोलन करण्यात येणार आहे.त्यात जागरूक नागरिक,कामगार कर्मचारी,अधिकारी, शेतकरी,शेतमजूर सर्व भारतीय संविधान प्रेमीनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.असे कळकळीचे आवाहन जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समिती ने केले आहे.
सागर रामभाऊ तायडे यांस कडून 

शुक्रवार, ६ जून, २०२५

तळतळाट! तळतळाट!!

 तळतळाट! तळतळाट!!

गुलाम बनलेल्या कंत्राटी कामगारांनो जागे व्हा,जागे व्हा,


तुमच्या कष्टाचा,मेहनताना, पगार मागा घाणीचे काम करणाऱ्या,लाखो कंत्राटी कामगार माझ्या माता बंधू बहिणींना युवा-युवतीना किमान वेतन कायद्यानुसार किमान वेतन न देणाऱ्या,त्यांना भर पगारी चार सुट्ट्या न देणाऱ्या,त्यांचा ईपीएफ व इ एस आय सी न भरता त्यांचा अर्ध्यापेक्षा जास्त पगार हडप करणाऱ्या त्यांना पगार स्लिप न देणाऱ्या संबंधित शेण खाणाऱ्या,त्यांच्या लेकरा बाळाचा तळतळाट घेतलेल्या,घेणाऱ्या भ्रष्टाचाराने झिंगाट झालेल्या अधिकाऱ्यांचा मी जाहीर निषेध करीत आहे,महाराष्ट्रातील कोणत्याच यंत्रणेकडे, कामगारांचे हजेरी पत्रक,त्यांना किमान वेतनानुसार बँकेतून पगार दिलेल्या बँक रिसीट,त्यांचा ईपीएफ व ई एस आय सी भरलेल्या रिसीट,नाहीत कामगारांना पगार स्लिप दिले गेले नाही,दिली जात नाही,मनुष्यबळ पुरविण्याचा व मनुष्यबळाकडून काम करून देण्याचा शासकीय परवाना नाही तसेच कंत्राटी कामगार काम करणाऱ्या यंत्रणेकडे शासकीय परवाना नाही कंत्राटी कामगारांच्या पगार हडप प्रकरणाला व त्यांच्या शोषणाला सर्व महानगरपालिकेचे आयुक्त,तथा,मुख्य नियुक्ता,व लेखा अधिकारी,व सर्व नगरपरिषद नगरपंचायत चे मुख्याधिकारी,तथा,मुख्य नियुक्ता,व लेखा अधिकारी जबाबदार आहेत मी सदरच्या पत्रात नमूद केलेली कागदपत्रे नसताना दरमहा कंत्राटदारांना बिले कोणत्या नियमातून दिलेली आहेत एकूणच वरील शासन यंत्रानेकडे ही कोणतीही कागदपत्रे नसताना सन 2015 ते आजतागायत लाखो कोटी रुपये कोणाच्या घशात गेले? याबाबत मायबाप सरकार एस आय टी स्थापन करून या कंत्राटी कामगार शोषण घोटाळ्याची चौकशी का करीत नाही? सर्वच पक्षांना राज्यकर्त्यांना कंत्राटी कामगारांची व त्यांच्या कुटुंबीयांची मते हवी असतात मते घेतात मग विधानसभेत विधान परिषदेत सरकार दरबारी या कामगारांच्या शोषणाचा प्रश्न का उपस्थित केला नाही? मायबाप सरकार या शोषणाचे निर्मूलन का करीत नाही? मा कामगार मंत्री महोदय यांच्याकडील मा कामगार आयुक्त यांची यंत्रणा वरील मुख्य नियुक्तावर,व कंत्राट दारावर फौजदारी खटले का दाखल करीत नाहीत? तसेच या संपूर्ण लाखो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार घोटाळ्यावर मा प्रधान सचिव साहेब नगर विकास विभाग-2 मंत्रालय मुंबई व मा आयुक्त व संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय बेलापूर नवी मुंबई यांनी आजतागायत वरील आयुक्त,मुख्याधिकारी, लेखा अधिकारी, यांच्यावर आर्थिक अनिमित्तते प्रकरणी फौजदारी गुन्हे का दाखल केले नाहीत? व करीत नाहीत? भारत देशातील स्त्री-पुरुष कामगारांचे शोषण होऊ नये म्हणून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कायदेच आपणास मान्य नसतील कंत्राटी कामगारांच्या शोषणाचे निर्मूलन करायचेच नसेल तर आशा राज्यकर्त्या बाबत शोषित कुटुंबीयांनीच विचार करावा हीच अपेक्षा तूर्त एवढेच...
धन्यवाद! 
जय शिवराय! क्रांतिकारी जय भिम!! जय संविधान!!! भारत माता की जय!!!!
आपला नम्र 
ज्येष्ठ नागरिक भाऊसाहेब रघुनाथ कांबळे:-9921887402
तथा संस्थापक अध्यक्ष जनहितार्थ जन आक्रोश सोशल असोसिएशन (महाराष्ट्र राज्य) रा,भीम नगर कुर्डूवाडी तालुका माढा जिल्हा सोलापूर

सोमवार, १० मार्च, २०२५

आंबेडकरी विचारांचा क्रांतिकारी कामगार नेता "मूर्ती छोटी किर्ती मोठी"

 आदरणीय जे एस पाटील राष्ट्रीय अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन (आय एल यु) यांच्या ६७ व्या वाढदिवसाच्या निमित्याने विशेष लेख

आंबेडकरी विचारांचा क्रांतिकारी कामगार नेता "मूर्ती छोटी किर्ती मोठी"

मी १९८२ पासून असंघटीत नाका कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या सत्यशोधक कामगार संघटनेचे काम करत आलो आहे.त्या असंघटीत कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी मुंबईसह राज्यातील सर्व संघटनांना अनेकदा एकत्र करून कृतिसमिती,सुरक्षा परिषद बनवल्या,इंटक आयटक सिटूच्या राष्ट्रीय नेत्या बरोबर अंतर राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळाली होती.त्यामुळे त्यांची आणि आंबेडकरी चळवळीतील नेत्याची काम करण्याची पद्धत जवळून पहिल्या गेली.पण समस्या काय आहे.ते सोडविण्यासाठी काय केले पाहिजे.याचे कोणताही अभ्यासपूर्ण नियोजन न करता मोर्चा,आंदोलन करून आंबेडकरी विचारांचा जय जय कार करून स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी तडजोडी करणारे सामाजिक,धार्मिक आणि राजकीय नेते पायलीचे पंधरा पाहायला अनुभवाला मिळाले.पण क्रांतिकारी विचारांची अंमलबजावणी करणारे शोधावे लागतील,संविधानाच्या चौकटीत राहून पंचशिलेचे पालन करणारे व कामगार कर्मचारी व अधिकारी वर्गाला संघटनेच्या माध्यमातून शिस्तबद्ध पद्धतीने काम करण्यासाठी प्रशिक्षित कार्यकर्ते पदाधिकारी बनविणारे एकमेव  आंबेडकरी विचारांचा क्रांतिकारी कामगार नेता "मूर्ती छोटी किर्ती मोठी" म्हणजेच आदरणीय जे एस पाटील राष्ट्रीय अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन (आय एल यु) व महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे मुख्य सल्लागार,मागासवर्गीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी अहोरात्र संघर्ष करणारे नेते म्हणून राज्यातच नव्हे तर देशातील प्रत्येक राज्यात आंबेडकरी विचारांचा क्रांतिकारी कामगार नेता अशी त्यांची लक्षवेधी ओळख निर्माण झाली आहे.
      सुरक्षित नोकरी करणारे आरक्षण लाभार्थीच नव्हे तर समाजातील सर्व क्षेत्रातील तळागळातील संघटीत असंघटीत कामगारांचे आशास्थान सन्मानीय जे.एस.पाटील साहेब आहेत. उत्तर भारतात बहुजन समाजात मान्यवर कांशीराम यांनी प्रबोधन करून प्रचंड राजकिय जागृती निर्माण केली होती.त्यामुळेच मागासवर्गीयांमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय महत्वकांक्षा निर्माण झाल्या होत्या.आपल्या राजकीय मूल्यांबाबत उघडपणे भरभरून बोलणारा बहुजन समाज मुख्यतः कर्मचारी-कामगार वर्ग हा फुले-आंबेडकरवादी कामगार चळवळीच्या माध्यमातून संघटित होण्याबाबत मात्र अगदीच उदासीन असल्याचे उत्तर व दक्षिण भारतात दिसून येतो
    बहुसंख्या बहुजन समाजातील कामगार,कर्मचारी आणि अधिकारी वर्ग हा मोठ्या प्रमाणात गोळवलकर,गांधीवादी,साम्यवादी कम्युनिस्ट विचारांच्या ट्रेंड युनियन मध्ये किर्याशील सभासद असल्याचे दिसून येते.प्रत्येक कामाच्या ठिकाणी असलेली ब्राम्हणवाद्यांची मक्तेदारी,त्यांच्या प्रस्थापित संघटना व मागास-बहुजन कामगारांवर पिढ्यानपिढ्या लादलेली सामाजिक विषमतेची व्यवस्था ही बहुजन समाजामध्ये फुले-आंबेडकरवादी कामगार चळवळीत संघटित होण्याविषयी भीती निर्माण करते.ही भीतीच सर्वप्रथम दूर करण्याचे लक्षवेधी प्रबोधन आदरणीय जे.एस.पाटील यांनी केले आहे.त्यामुळेच उत्तर भारतात व दक्षिण भारतात स्वतंत्र मजदूर युनियनची पाळेमुळे घट्ट होतांना दिसत आहेत.
       भारतातील ब्राम्हणवाद दरवर्षी शोषण करण्याची माध्यमे बदलत असतो.व्यवस्थेचे परिवर्तन मान्य नसल्याने शोषितांसाठी वरवरचे बदल तो स्वतः घडवून आणतो.बहुजन कामगारांनी आपले हक्क प्राप्त करून घेण्यासाठी स्वतंत्र 'ट्रेड युनियन' स्थापन न करता ब्राम्हणवाद्यांचेच नेतृत्व स्वीकारावे म्हणूनच वेल्फेअर असोसिएशन,फेडरेशनचा फार्स ब्राम्हणवाद्यांनी निर्माण केले आहेत. हे सर्वप्रथम स्पष्टपणे मांडण्याचे काम माननीय जे.एस.पाटील यांनी केले आहे,त्यामुळेच ते देशातील आंबेडकरी विचारांचा क्रांतिकारी कामगार नेता "मूर्ती छोटी किर्ती मोठी" म्हणून एकमेव नेतृत्व पुढे येत आहे. 
      फुले-शाहू,आंबेडकरवादी विचारांची देशव्यापी ट्रेड युनियन निर्माण होईल व ती राष्ट्रीय पातळीवरील ट्रेंड युनियन महासंघानां आव्हान निर्माण करील असे कोणालाही वाटले नव्हते, मान्यताप्राप्त प्रस्थापित ट्रेंड युनियनच्या विरोधात म्हणजेच ब्राम्हणवादाला थेट आव्हान आज आंबेडकरी विचारांचा क्रांतिकारी कामगार नेता देत आहे.त्याला सर्व मागासवर्गीय ओबीसी आदिवासी अल्पसंख्याक यांनी मोठ्या प्रमाणात साथ मिळत आहे.म्हणूनच  महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून सुरु झालेला हा संघर्ष आज स्वतंत्र मजदूर युनियनच्या माध्यमातून एक देशव्यापी कामगार चळवळ बनली आहे.
    आंबेडकरी विचारांचा क्रांतिकारी कामगार नेता "मूर्ती छोटी किर्ती मोठी" जे एस पाटील यांच्या कुशल संघटक,वकृत्व आणि नेतृत्वाने,मिशनरी बाण्याने,मोठ्या जिद्दीने राष्ट्रीय पातळीवर स्वतंत्र मजदूर युनियन उभी राहत आहे.देशभरातील मागासवर्गीय,ओबीसी आदिवासी अल्पसंख्याक समाजातील कामगार कर्मचारी जागरूक होऊन स्वतःच्या ट्रेंड युनियन स्थापन करून आय एल यु शी संलग्न करीत आहेत.एखादया क्षेत्रात करिअर करायचंय म्हणून काम करणारे अनेक इंजिनियर लोक भेटतील पण आंबेडकरी विचारांची क्रांतिकारी राष्ट्रीय पातळीवर ट्रेंड युनियन उभी करण्यासाठी जीवाचे रान करणारा इंजिनियर एखादाच भेटेल. प्रशासनाच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात कामगार,कर्मचाऱ्यांना संघटित करून संघर्ष करण्यास तयार करणारा अधिकारी कुठेही भेटणार नाही.कामगारांना संघटित करून युनियन बनविली म्हणून बदली झाली,तर सुवर्ण संधी म्हणून नवीन ठिकाणी नव्या जोमाने काम करणारा इंजिनियर अधिकारी अशी ओळख निर्माण करणारा माणूस सेवा निवृत्तीनंतर घरी बसून नातवांना खेळवत बसला असतात.पण सेवा देत असतांना कामगार कर्मचाऱ्यांचे संघटना बांधणी करून प्रशिक्षित कार्यकर्ता पदाधिकारी निर्माण करणारा माझ्या दृष्टीने एकमेव नेता "मूर्ती छोटी किर्ती मोठी" म्हणजेच जे एस पाटील साहेब असावे.
      मी अनेक राजकीय सामाजिक नेते पाहिले,जे स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी संघटना पक्ष बांधणी करतात,तेव्हा ते तोंडात साखर डोक्यावर बर्फ व पायाला भिंगरी लावून फिरतात.तेव्हा कुठे त्यांचे थोडे फार नांव राहते.इथे पाटील साहेबांचे उलटे आहे,पायाला जरूर भिंगरी आहे,पण तोंडात साखर नाही,रोखठोक शब्दांत शिस्तबद्ध पध्दतीने काम करण्याची तंबी आहे,डोक्यावर बर्फ नाही तर सकारात्मक विचारांची प्रचंड ऊर्जा आहे.भावनिकता बिलकुल नाही,आंबेडकरी विचारांची क्रांतिकारी भाषे सोबत सनदशीर मार्गाने आचरणाचे हमी हवी आहे. भारतीय संविधानात दिलेल्या प्रशासकीय कामाचा दर्जा वेळोवेळी दिली जाणारी जबाबदारी तिचा तिमाही,सहामाही,वार्षिक सर्वसाधारण सभेत मजूर केलेला अहवाल सादर करण्यात कोणतीही सबब चालत नाही,प्रशिक्षण शिबिरात वेळेवर न येणाऱ्याला प्रवेश नाही.म्हणजेच नाही,असे कडक शिस्तीचे आंबेडकरी विचारांचे क्रांतिकारी नेते सर्वच क्षेत्रात निर्माण झाले असते तर आंबेडकरी समाज हा शासन कर्ती जमात शंभर टक्के झाला असतात.
    हजारो लोकांना गोळा करून संघटना स्थापन करून चालविण्या ऐवजी शंभर लोक रीतसर सभासद बनवून केलेलं काम निश्चितच ध्येय गाठण्यासाठी परिपूर्ण असते.त्यासाठी क्रांतिकारी विचारांची देवाणघेवाण नियमितपणे झाली पाहिजे.समस्या निर्माण होणार नाहीत यासाठी आदरणीय जे एस पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र मजदूर युनियन काम करते. त्यात देशभरातील संघटित असंघटित कामगार संघटना संलग्न होत आहेत,राष्ट्रीय पातळीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व क्षेत्रातील कामगार,कर्मचाऱ्यांनी संघटित व्हावे आंबेडकरी विचारांचा क्रांतिकारी कामगार नेत्याचे हात मजबूत करावे,आदरणीय जे एस पाटील यांच्या (६ ऑक्टोबर १९५५)  वर्ष पूर्ण करून ६८ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत.त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने २०१७ पासून मी त्यांचा सोबत त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहे.त्या अनुभवावर हा लेख लिहला आहे
   लाखो कामगार कर्मचारी अधिकारी वर्गाला प्रेरणा देणारे एकमेव व्यक्तिमत्त्व आहे. त्यांची साधी राहणी,उच्च विचार आणि शुद्ध आचरण हे कौतुकास्पद आहे. कोणत्याही पोस्टरवर,होडिंग वर फोटो टाकून प्रचार प्रसिद्ध करण्यास सक्त मनाई करणारे नेते शोधून सापडणार नाहीत,अशा कडक शिस्तीच्या प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केलेल्या शिस्तबद्ध पद्धतीने ट्रेंड युनियनचे राष्ट्रीय नेतृत्व करणाऱ्या आंबेडकरी विचारांचा क्रांतिकारी कामगार नेता "मूर्ती छोटी किर्ती मोठी" आदरणीय जे एस पाटील साहेब यांना जे निर्माण करून ठेवले ते एकाही आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांनी ६० वर्षात केले नाही.त्यांनी व्यक्तिगत आर्थिकदृष्ट्या खूप प्रगती केली असेल.पण संघटनेची संस्थेची साधन संपतीचे काय?.स्वताचे मालकी हक्काचे एक कार्यालय किंवा सभागृह नाही.मात्र जे.एस पाटील यांच्या कुशल त्यागी जिद्धी नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे बांद्रा मुंबईत म्हाडा कार्यालयासमोर सुप्रभात बिल्डींग मध्ये करोडो रुपयाचे कार्यालय आहे.नागपूर मध्ये मध्यवर्ती ठिकाणी निलकमल कॉम्प्लेक्स महाजन मार्केट सीताबर्डी येथे मध्यवर्ती कार्यालय व १०० लोक बसतील एवढे सभागृह आहे.प्रेरणा नगर, हजारी पहाड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर कामगार प्रशिक्षण केंद्र तीन माजली इमारत आहे.त्यात एक हजार लोकांचे सभागृह,पाचशे,तीनशे लोकांचे वातानुकूलित सभागृह आणि दोन व्ही आय पी,सूट,सहा,आठ लोकांसाठी स्पेशल खाटची व्यवस्था,पाहुण्यांसाठी दोन खाटांचे आठ रूमची व्यवस्था आहे.कामगार कर्मचारी अधिकारी नागपुरात कामा निमित्याने आला तर हॉटेल लॉज वर राहण्याची गरज नाही.असेच प्रशिक्षण केंद्र तीन माजली इमारत औरंगाबाद तयार होत आहे.एका महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या बळावर हे निर्माण झाले आहे.स्वतंत्र मजदूर युनियन संलग्न युनियनचा काही प्रमाणात त्यात सहभाग आहे.सर्व क्षेत्रातील कामगार कर्मचारी अधिकारी वर्गाने अशा पद्धतीने काम केल्यास प्रत्येक तालुक्यात,जिल्ह्यात स्वताच्या मालकीचे कार्यालय व सभागृह उभे राहू शकते.हे केवळ आणि केवळ जे.एस.पाटील रमेश रंगारी सारखी इंजिनियर प्रशासकीय अधिकारी संघटीत झाल्या मुळे शक्य झाले.त्यात अनेकांचे मोलाचे योगदान आहे.आज वयाची ६७ वर्ष पूर्ण झाल्यावर ही जे एस पाटील घरात न बसता मागासवर्गीय कामगार कर्मचारी अधिकारी आणि विशेष असंघटीत कामगारांना संघटीत करण्यासाठी शारीरिकदृष्ट्या कोणते ही कारण न सांगता राज्यात आणि देशात स्वतंत्र मजदूर युनियन मजबूत करण्यासाठी फिरतात. म्हणूनच मी आंबेडकरी विचारांचा क्रांतिकारी कामगार नेता "मूर्ती छोटी किर्ती मोठी" असे लिहतो.त्यांच्या त्या जिद्धीला ६७ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मानाचा मुजरा आणि लाख लाख शुभेच्छा.
सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडुप मुंबई
अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य,


चल हल्ला बोल! महाविहार ताब्यात घेवू!!

चल हल्ला बोल!

महाविहार ताब्यात घेवू!! 


   जगातील बौध्द धम्मीयांचे जागतिक विश्‍वासस्थळ (मी येथे श्रध्दास्थान हा शब्द इतक्यासाठीच वापरत नाही की श्रध्दाला पुरावा नावाचा प्रकार नसतो पण विश्‍वासाला पुरावे असतात. एखाद्या व्यक्तीवर विश्‍वास असेल तर त्या व्यक्तीचा मनोभावे आदर केल जातो. उदा.भ.बुध्द,सम्राट अशोक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर इत्यादी व अशी कित्येक. आजही हयात असणार्‍या एखाद्या व्यक्तीवर विश्‍वास ठेवला जातो.कारण ती व्यक्ती विश्‍वासाला पात्र असते.पण श्रध्देला पुरावे नसतात.आजही नालायक मधला नालायक असलेल्या राजकारणी असो अथवा अन्य कोणी किंवा दगडाची मुर्ती असो त्यांच्यावर श्रध्दा व्यक्त करणारे लोक आहेत. ही श्रध्दा पुढे अंधश्रध्दात परिवर्तीत होते. पण ज्यावेळी एखाद्या व्यक्तीवरचा विश्‍वास उडतो तेव्हा लोक त्या व्यक्तीपासून दूर होतात.) असलेले मगध राज्यातील सद्या बिहार राज्य (विहार शब्दाचा अपभ्रंश) गया येथील महाबोधी महाविहारात घुसखोरी झालेली आहे. ब्राम्हणी तथा सनातन वैदिक धर्मियांनी महाविहार आपल्या ताब्यात ठेवले आहे. याबाबत खाली पाहूच. दोन हजार वर्षापुर्वी मगध राज्यात सम्राट अशोक राजा यानी बौध्द स्वराज्याची निर्मिती केल्यानंतर सम्राट अशोकांनी बौध्दांच्या स्वराज्याचा झेंडा अटकेपार रोवला.आफगाणिस्तानापर्यंत स्वराज्याचा विस्तार केला.आजही आफगाणिस्तान हे जंक्शन आहे.तेथून चारी दिशेला जाण्यासाठी वाटा मिळतात.कदाचित म्हणूनच धम्म प्रसाराच्या दृृष्टीने सम्राट अशोक राजा यानी आफगाणिस्तानला आपली उपराजधानी बनवले असावे.तेथे मोठ्या प्रमाणात विहार बांधली असावीत. आफगाणिस्तानमधील बामियान प्रांतामधील डोंगर उतार्‍यावरील सुळ्या दगडात कोरलेली 150 फूट बुध्द मुर्तीं (चंगेझ खान,औरंगाजेब व तालिबान्यांनी मुर्ती तोडली) आजही भग्न अवस्थेत आहे. ह्यू-एन-त्सँग (चीन) हे बुध्दांची, धम्माची व धम्म संस्कृतीची माहिती जाणून घेण्यास इ.स. 629 ते 645  या दरम्यान भारत भेटीवर आले असता त्यानी 150 फूट मुर्ती पाहिली होती. त्यावेळी मुर्तीला साधा तडा गेला नव्हता. तेथेच त्यानी एका संघारामात एक हजार फूट लांबीची महानिर्वाण मुद्रेतील भ.बुध्दांची मुर्तीसुध्दा पाहिली होती. सांगण्याचे तात्पर्य इतकेच की त्या काळी मगध राज्यापासून ते आफगाणिस्तानापर्यंत बौध्द धम्माचे उपासिका व उपासक वास्तवाला होते. 
   सम्राट अशोक राजा यानी 84 हजार बौध्द स्तूप बांधले. त्यातील एक बौध्द स्तूप म्हणजे महाबोधी महाविहार होय. बुध्दांच्या जीवनात जी चार ठिकाणं अविस्मरणीय ठरली ती चार ठिकाणं म्हणजेच 1.बुध्दांचे जन्म ठिकाण 2.बुध्दांना ज्या ठिकाणी बुध्दत्व प्राप्त झाले. 3.बुध्दांनी ज्या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन केले. म्हणजेच एक प्रकारे बौध्द धम्म स्थापनचे ठिकाण व 4.बुध्दांना महानिर्वाण प्राप्त झाले ते ठिकाण. या चारी अविस्मरणीय ठिकाणांवर सम्राट अशोक राजा यानी बौध्द स्तूप बांधली. त्यापैकीच बुध्दांना ज्या ठिकाणी बुध्दत्व प्राप्त झाले त्या गयातील महाबोधी महाविहार एक होय. सम्राट अशोक राजा हे कोणी ब्राम्हण किंवा ब्राम्हण्यवादी किंवा ब्राम्हणी धर्मातील सदस्य नव्हते. ते बौध्द होते. त्यानी बौध्द धम्माची दीक्षा घेतल्याचे भक्कम पुरावे आहेत. जगाने मान्य केले आहे की, महाबोधी महाविहार हे बौध्दांचे जागतिक वंदनास्थळ आहे. म्हणूनच जगातील बौध्द तथागतांच्या मुर्तीला पंचाग प्रणाम करायला येतात.जगात कुठेही बौध्द जन्माला येवो तो म्हणतो मला एकदा का असेना बुध्दांना ज्या ठिकाणी बुध्दत्व प्राप्त झाले तेथे सम्राट अशोक राजा यानी उभारलेल्या महाबोधी महाविहारात जावून वंदना व महाविहारातील बुध्द मुर्तीसमोर पंचाग प्रणाम करण्यास गेलेच पाहिजे. 
     महाविहार उभारल्यापासून ते आजवर तेथे जगातील बौध्द हे वंदनासाठी येत आहेत. त्यात खंड नाही. जगात प्रामुख्याने तीनच धर्माचे जागतिक धार्मिक स्थळ आहेत. 1.ख्रिश्‍चन धर्मियांचे व्हॅटकिन सिटी (रोम, इटली) 2. मुस्लीमांचे मक्का मदिना (सौदी अरेबिया) व तिसरे बौध्द धम्मीयांचे बुध्दगया (बिहार राज्य, भारत). या तीन धर्मिंयांचीच लोकसंख्या सर्वाधिक आहे. पृथ्वीच्या चारी बाजूला या तीन धर्माचेच अनुयायी, उपासक दिसतात. इ स.399 ते 414 या काळात बौध्द धम्माचा अभ्यास करण्यासाठी भारत भेटीवर आलेले फा हियान (चीन) यानी बुध्दगयाला भेट दिली. तेथील काही आठवणी त्यानी आपल्या प्रवास वर्णनात करताना ते लिहितात, ‘ज्या ठिकाणी बुध्दांना बुध्दत्व प्राप्त झाले, त्या ठिकाणी तीन संघाराम आहेत. त्या सर्वांत भिक्खू राहतात. त्या भिक्खूंना स्थानिक लोक आश्रय देतात आणि त्याना काहीही उणे पडू नये अशारितीने सढळ हाताने दान करतात. तेथे धम्मातील विनयाच्या नियमाचे कडकरित्या पालन केले जाते आणि बुध्दांच्या काळी जसे आदरणीय भिक्खू शिष्टाचार पाळीत त्याचप्रमाणे बसण्या-उठण्यात आणि सभेत पाळावयाचे शिष्टाचार हे भिक्खू पाळतात.’ याच भिक्खूंकडे महाबोधी विहाराच्या देखभालाची जबाबदारी असावी. तसेच तेथील लोक हे भिक्खूना सढळ हाताने मदत करतात याचा अर्थ ते बौध्द अनुयायी असले पाहिजेत.  चौथ्या शतकात गया हा परिसर बौध्दमय होता. मग आता तेथे ब्राम्हणी धर्माचे वर्चस्व कसे? महाबोधी महाविहार ब्राम्हणांच्या ताब्यात कसे? हे प्रश्‍न सहाजिकच पडणार.
   सम्राट अशोक राजा यांच्या महानिर्वाणानंतर पुढे त्यांच्या मौर्य घराण्यातील सात राजानी मगधचे सिंहासन सांभाळले. शेवटचा राजा बृहद्रथ मौर्य हे फारच दयाळू, मायाळू व धम्माबाबत संवेधनशील होते. कदाचित त्यामुळे व ब्राम्हणांचा राग हा सम्राट अशोकांवर असावा. दि. 6 जून 1950 रोजी श्रीलंकाची राजधानी कोलंबो येथील कार्यक्रमात बोलताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘सम्राट अशोकाच्या काळात कुलदेवतापूजेची निंदा करण्यात आली. अशोक म्हणतो, मी बौध्द धर्माच्या मार्गाचे अनुकरण करीत असल्यामुळे मला दुसर्‍या कोणत्याही देवी देवतांची पूजा करण्याची गरज नाही आणि त्याने आपल्या प्रशासनाधिकार्‍यांना आदेश देवून कुलदेवतांच्या मुर्ती काढून टाकल्या. हा ब्राम्हणांवर फार मोठा प्रहार होता. कारण यामुळे त्यांच्या उपजिविकेला व धूर्त प्रचाराला फार मोठा धक्का बसला आणि ते त्याचा बदला घेण्यास सिध्द झाले.’ दिडशे वर्षापुर्वी ब्रिटीशांनी ब्राम्हणी धर्मातील रूढी परंपरा विरोधात कायदे करण्यास सुरूवात केली, प्रबोधनासाठी शैक्षणिक संस्था उघडल्या, प्रसार माध्यमांना चालना दिली तेव्हा ब्राम्हण्यवाद्यांनी राष्ट्र स्वातंत्र्याच्या नावाखाली धर्मावर आलेले ब्रिटीशरूपी संकट दूर करण्यासाठी हाती शस्त्र घेवून मैदानात उतरले. हे अलिकडचे उदाहारण. मौर्यांच्या सैन्य दलात सेनापती असलेल्या पुष्यमित्र शुंगाने राजा बृहद्रथ याना कपटकारस्थान करून ठार मारले आणि सत्ता आपल्या हातात घेतली. हयू-एन-त्सँग हे राजा शशांक याने बोधीवृक्षाचे नुकसान केल्याचे सांगतात.याचा अर्थ 6 व्या शतकात होवून गेलेला राजा शशांक हा ब्राम्हणी धर्माचा समर्थक होता.पण त्याला बौध्द धम्माचा र्‍हास करता आला नाही. मात्र पुष्यमित्र शुंग त्याचा बाप निघाला.या पृथ्वीतलावर एक बौध्दच काय पण भिक्खूही दिसता कामा नये यासाठी भिक्खूंची मुंडकी तोडून आणणार्‍यांना घसघशीत रोख इनाम जाहीर केले. त्याने शस्त्राच्या धाकानेच बौध्दांना आपल्या धर्मात ओढले. जे कट्टरवादी होते त्याना ठार मारले, तर काहींना आपल्या धर्मात गुलाम केले.जे आज अस्पृश्य,भटके,आदिवासी,बलुतेदार म्हणून जगत आहेत. ज्यांची वस्ती आजही गावकुसाबाहेर आहे. शुंगाच्या काळातच ब्राम्हणी धर्माचे शंकराचार्य पीठ निर्माण झाले. सम्राट अशोक राजा यानी  धम्म प्रसारासाठी चार धम्म पीठांची स्थापना केली,तसे जम्बुद्विप भारतात चार शंकराचार्य पीठ उभारलीत.चार शंकराचार्य पीठानी आपल्या धर्माचे देवालयं उभारणीसाठी बौध्द स्तूपांचा वापर केला.आजही बहुतांशी प्राचीन हिंदू देवालयं आहेत,ती बौध्द विहारं असल्याचे दिसते.त्यातील बुध्द मुर्तींचे स्त्री देविकामध्येही रूपांतरित केल्याचे दिसते. अन्यथा 84 हजार बौध्द स्तूपांपैकी बहुतांशी स्तूपं कुठे गेली? जमीनीत तर गाडली नाहीत. 
   आजच्या विषयाकडे जावूया,वरील वाचन केले तर महाबोधी महाविहार हे बौध्द धम्मीयांच्य मालकीचे आहे हे कुणालाही नाकारता येणार नाही.पण शंकराचार्याच्या पीठानंतर महाबोधी विहार विदेशी आर्यांनी म्हणजेच ब्रामहवृंदांनी आपल्या ताब्यात घेतले. महाविहारात जगभरातील बौध्द आदरपुर्ती पूजासाठी येत होते हे आठराशे वर्षापुर्वी ह्यू-एन-त्सँग सांगत असतील तर त्या बौध्द उपासकांकडून महाविहारात मोठ्या प्रमाणात दान केले जात असावे.आजही महाबोधी विहारात देश-विदेशातील बौध्द मोठ्या प्रमाणात दान करतात.बौध्द धम्मात दहा पारमितामध्ये दान पारमिता असल्याने बौध्द अनुयायी दान पारमिताला अन्ययसाधारण महत्व देतात. ‘दान जेथे ब्राम्हण तेथे’ हे सूत्र आजही हिंदू देवालयामध्ये दिसून येते.पंढरपुरातील विठ्ठल मंदिर असो,आंध्रातील तिरूपती मंदिर असो अथवा ओडिसा राज्याच्या पुरीतील जगन्नाथ मंदिर असो अथवा उत्तराखंडातील केदारनाथ मंदिर असो ही सारी मंदिर बौध्द विहार म्हणून प्रसिध्द होती.तेथे हजारोच्या संख्येने बौध्द वंदनासाठी येत होते.दान करत होते.त्या विहाराचं मंदिरात रूपांतर केल्याचे पुरावे बौध्द असतात.
     भारतात ब्रिटीश साम्राज्य होते तेव्हा काही ब्रिटीश अधिकार्‍यांनी धम्माच्या संस्कृतीची ओळख असलेल्या अनेक विहार,स्तूप, शिलालेखांची खोज केली.त्यापैकीच एक अजंठा वेरूळची लेणींचा शोध घेतला.ब्रिटीश अधिकारी अलेक्झांडर कलिंघम यानी महाबोधी महाविहार हे बौध्दांचे असल्याचे सांगितले.कलिंंघमच्या काळी बिहार राज्यासह बहुतांशी भारत हा बौध्द धम्माच्या दृष्टीने शून्यवत होता.त्यामुळेच महाबोधी विहाराच्या मालकीसाठी संघर्ष करण्यासाठी बौध्द कमी होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी 1956 ला धम्माची दीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या बरोबर लाखो बहुजनांनी धम्म दीक्षा घेतली आणि त्यानंतर आजपर्यंत भारतात रोज कुठे ना कुठे धम्म दीक्षा समारंभ होताना दिसतात.भिक्खूंच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे.त्यामुळे भिक्खू व बौध्दांना भारतातच नव्हे,तर जम्बुद्विप भारतात धम्माची वारसास्थळं असून ती आपणासकडे यावीत अशी मागणी करत आहेत.त्यापैकीच एक असलेले महाबोधी महाविहार. 
    स्वतंत्र भारत झाल्यानंतर महाबोधी महाविहार बौध्दांच्या ताब्यात दिले पाहिजे अशी मागणी केली जात आहे.संविधान लिहिले बौध्द महाउपासकाने.पण बौध्दांच्या हाती सत्ता नसल्याने संविधानाची अंमलबजावणी करणारे निघाले कर्मठ सनातनी.बुध्दगया मंदिर कायदा-1949 कायदा झाला.त्या कायद्यामध्ये महाबोधी महाविहाराल मंदिर असे संबोधले.तसेच त्या कायद्यानुसार महाबोधी महाविहाराच्या देखभालीसाठी एका समिती असण्याची तरतूद केली.त्या समितीमध्ये एकूण 9 सदस्यांपैकी पाच सदस्य हिंदू व चार बौध्द असतील. म्हणजे सर्वाधिक सदस्य हिंदूच असल्याने तेच संख्येच्या जोरावर निर्णय घेणार.चार बौध्द देखील त्यांचीच आहेत. ते केवळ नावालाच बौध्द आहेत. हे लक्षात घेवून भिक्खू संघाने गेल्या काही दिवसापुर्वी महाविहाराच्या आवारातच महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन सुरू केले.17 दिवस आंदोलन सुरू राहिल्यानंतर बिहार पोलीसांनी रात्री अपरात्री येवून आंदोलन करणार्‍या भिक्खूंना जबदरस्तीने उचलून गाडीत घालून अज्ञातस्थळी नेले.बिहार राज्यातील सत्तेत भाजपचीही भागिदारी आहे.सद्या भाजपला या देशाला हिंदु राष्ट्र करायचा आहे.मग बिहारमधील भाजप सत्ताधीश महाबोधी विहार बौध्दांकडे देणे शक्य नाही.कारण ब्राम्हण्यवादी लोक एखाद्याचा धर्म कसा हायजॅक करण्यात, इतर धर्म कसे नालायक आणि आपलाच धर्म कसा लायक हे सांगण्यात पटाईत आहेत. 
      बौध्द धम्माला संपविण्यासाठी नानाविध षडयंत्र केलीत. पहिल्यांदा त्यानी बौध्द धम्मातील उत्सवावर आघात केला. धम्मातील उत्सव जेव्ह आहेत तेव्हा आपले उत्सव सुरू केले. दोन्ही उत्सवामध्ये 180 अंशाचा फरक राहणार नाही याची काळजी घेतली.त्यानंतर त्यानी बुध्दांना ब्रम्हदेव विष्णूचा नववा अवतार केला.अवतार पॅटर्न हा ब्राम्हण्यवाद्यांचाच. बौध्द स्तूप व विहारांचे मंदिरात रूपांतर केले.बौध्द लेण्याना पांडव लेणी करून टाकले व त्या ठिकणी पिंड बसवून शंकराचं ध्यानस्थ ठिकाण केले. ब्राम्हण्यवाद्यांनी जरा देखील बौध्द धम्माबद्दल सहानुभूती दाखवली नाही. परकीय मुस्लीमांना बुध्द मुर्ती फोडण्यास प्रोत्साहन दिले. सम्राट अशोक काळातही ते कुरघुड्या करत होते. पण सम्राट अशोक राजा यानी त्याना आसरा दिला. त्यांना बरोबरची स्थान दिले. त्याना संरक्षण दिले. हेच अंगलट आले. आजच्या राजकारणातीलही उदाहरण घेतले, तर काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता येत होती. तेव्हा काँग्रेस सत्ताधार्‍यांनी आपल्या धर्माचे म्हणून आरएसएसने स्थापन केलेल्या भाजप,विश्‍व हिंदू परिषदच्या लोकांना जवळ केले.पण आता भाजपची सत्ता येताच भाजप नेत्यांकडून ‘काँग्रेसमुक्त भारत’ ची घोषणा केली आहे. काँग्रेससह इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांविरोधात ईडी,सीबीआय, इन्कम टॅक्स लावून त्याची तोंडे बंद केली जात आहे. विरोधकांची ताकद कमी करायची हाच नियम सर्व क्षेत्राासठी लागू आहे. सम्राट अशोक राजा यानी सम्यक ऐवजी टोकाचा मानवतावाद दाखवला. दि. 6 जून 1950 रोजी श्रीलंकाची राजधानी कोलंबो येथील कार्यक्रमात बोलताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘सम्राट अशोक वाजवीपेक्षा जास्त सहनशील होता. यामुळे मी त्याला दोष देत आहे.सम्राट अशोकांने आपल्या कारकिर्दीत बौध्द धर्माशिवाय अशा अनेक धर्माना प्रचाराची मुभा देवून ठेवली होती की,जे बौध्द धर्माचे कट्टर दुश्मन होते. यामुळे बौध्द धर्माच्या विरूध्द असणार्‍या अधर्मांना आपली शक्ती वाढविण्याची पुरेपूर संधी प्राप्त झाली व हाच बौध्द धर्माला पहिला आघात होय असे मला वाटते.’ पुंद्रवर्धन या जैन साधकाने महावीर समोर भगवान बुध्द नतमस्तक झालेले चित्र काढले होते ते सम्राट अशोक राजा याना समजल्यावर त्यानी पुंद्रवर्धनला पकडण्याचा हुकूम काढला. इतकेच नव्हे तर त्याच्या पंथातील सुमारे 18 हजार आजीवकांना ठार करण्यचे फर्मान काढले. काही काळाने पाटलीपूत्र येथे आणखीन एका जैन साधकाने असेच चित्र काढल्यानंतर त्या साधकाला व त्याच्या कुटुंबाला जिवंत जाळण्याची आज्ञा केली होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्यात तथ्थ असेल, तर हाच कठोरपणा सम्राट अशेक राजा यानी ब्राम्हण्यवाद्याबद्दल ठेवला असता तर आज एससी,एसटी एनटी, व्हीजेएनटी,ओबीसी, एसबीसी या प्रवर्गात जितक्याही जाती आहेत त्या जातीचे लोक बौध्द असते. त्याना सनातनी धर्मात जाण्याचा प्रसंगच उदभवला नसता,त्यांच्या डोक्यात काल्पनिक व अवतारी देव नावाची कल्पनाच मान्य झाली नसती,असे म्हणावे लागेल.सम्राट अशोक राजाशिवाय इतर बौध्द राजा म्हणजेच 6-7 शतकापर्यंत राजा हर्षवर्धन पर्यंत राजांनी देखील विदेशी आर्यांचे लाड केले असावेत तसेच त्यांच्या सनातनी धर्माला आश्रय दिला असावा.त्याशिवाय त्यांचे बळ वाढले नसावे.
    गेल्या दहा वर्षापासून देशात पुन्हा ब्राम्हण्यवादाने उचल घेतली आहे. महाबोधी विहार हे बौध्दांचे आहे आणि राहणार आहे.आयोध्यातील राम मंदिराची देखभाल करण्यासाठी जसा हिंदूंना जैन,मुस्लीम,ख्रिश्‍चन, शीख,बौध्द चालत नाही,तर मग महाबोधी विहारात ब्राम्हण कसे? विहाराच्या आवारात श्राध्दपक्ष, होमहवन विधी का केला जात आहे? याला काँग्रेस पक्षाचे सरकार जबाबदार आहे. सन 2014 पुर्वीपर्यंत 1999 व 1977 चे काँगे्रसत्तर सरकार वगळता स्वतंत्र भारतात काँग्रेस पक्षाचेच सरकार केंद्रात होते. काँग्रेसचे सरकार असतानाही बौध्द भिक्खूंनी महाबोधी विहार बौध्दांच्या ताब्यात देण्याची मागणी केली.पण काँग्रेसमध्येही ब्राम्हण्यवादी होते. आता तर ब्राम्हण्यवाद्यांचीच सत्ता केंद्रात आहे. ते कदापीही महाबोधी विहार बौध्दांच्या ताब्यात देणार नाहीत. त्यासाठी बौध्दांनीच एकजूठ होवून महाबोधी विहारमुक्तीचे आंदोलन हाती घेतले पाहिजे. प्रसंगी सरकारवर ‘चल हल्ला बोल’ चा नारा दिला पाहिजे. टिळक,गोडसे,आपटे,सावरकर अशी कित्येक नाव सांगता येतात की त्यानी आपल्या देव व धर्मासाठी प्राणाची तमा केली नाही.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी बौध्द धम्म का दिला याचा प्रत्येकांनी निट विचार केला पाहिजे.जर बौध्दच असू तर घरात धम्माचेच संस्कार घडवून पाहिजे.सर्व घरांतील धम्म संस्काराची मिळून संस्कृती होते आणि त्या संस्कृतीचा समाज होतो.अर्थात बौध्द समाज.डॉ.बाबासाहेब आंबेडकर याना मारणार्‍या वस्तीच्या दर्शनी बाजूला बौध्दवाडी,बौध्द समाज डॉ.आंबेडकर नगर भीमनगर,बुध्द नगर,सिध्दार्थनगर,पंचशील नगर वगैरे पाट्या वाचायला मिळतात, पण त्या वस्त्यां खर्‍याच बौध्द संस्कारमय झाल्या आहेत का? नसतील तर महाबोधी महाविहार ब्राम्हण्यवाद्यांच्या ताब्यातून मुक्त होण्याचेही कोणी स्वप्न पाहू नये.वल्गना करू नये.बौध्द पध्दतीने केवळ लग्न,गृहप्रवेश,मरणोत्तर विधी वगैरे घरातील समारंभ केले आणि इतरवेळी हिंदू धर्मातील सणवार,रूढी, परंपरा जपण्याने म्हणजे कोणी बौध्द होवू शकते का?
देवदास बानकर ९२२५८०६९९०,संपादक दैनिक मुक्तनायक
मधील ‘जे आहे ते’ या सदरातील संपादकीय लेख.कोल्हापुरातून गेले 17 वर्षे अखंडपणे नियमित सुरू असलेले पश्‍चिम महाराष्ट्रातील एकमेव सर्वाधिक खपाचे व लोकप्रिय दैनिक मुक्तनायक.

बुधवार, ५ मार्च, २०२५

4 मार्च हा राष्ट्रीय सुरक्षा दिवस

 

4 मार्च हा राष्ट्रीय सुरक्षा दिवस



भारतातील लोक असे समजतात कि सुरक्षा देणे आणि राखणे हे फक्त सरकारचे काम आहे.आपली काहीच जबाबदारी नाही.म्हणूनच आपण कुठे ही कधी कसे ही वागू शकतो. देशात दरवर्षी 4 मार्च हा राष्ट्रीय सुरक्षा दिवस (National Safety Day ) साजरा केला जातोय.याचा मुख्य उद्देश हा लोकांमध्ये सुरक्षेप्रति जागरुकता निर्माण करणे हा आहे. तो खऱ्या अर्थाने नगरा नगरात,सोसायटयात साजरा झाला पाहिजे. मुलामुलींना लहान पणापासून स्वताची सुरक्षा कशी करावी हे माहिती असायला हवी. आपत्कालीन परिस्थितीत आपण कसे वागले पाहिजे आणि काय केले पाहिजे.हे माहिती असणे खूप आवश्यक असते. एखाद्या हॉलमध्ये सभागृहा मध्ये कार्यक्रम सुरु असतांना आग लागली.तर कोणत्या दरवाजाने बाहेर पडायला पाहिजे हे माहिती असणे आवश्यक असते. तसे लिहलेले असते.तरी आपण नेहमी प्रमाणे शॉटकट मारण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच गोंधळ होऊन चेंगराचेंगरी होते.सुरक्षा नियम सर्वच ठिकाणी लिहलेले असतात.पण पालन करायचे कि नाही हे प्रत्येकावर अवलबून असते.रेल्वे स्टेशन,बस डेपो मध्ये चढताना उतरतांना जो तीस सेकंद एक मिनिटाचा जिवघेणा खेळ असतो.चढनाऱ्यांनी प्रथम प्रवाशांना उतरू दिले तर गोंधळ बिलकुल होत नाही. पण प्रत्येकाला घाईघाईने जाणे असते.त्यातच नियमांचे पालन होत नाही.मग 'नि' कडून टाकल्या जातो आणि उरतो 'यम' म्हणजेच अपघात.
आज प्रत्येक आई वडीला समोर मुलीची सुरक्षा कशी करावी हा मोठी समस्या आहे.जिथे केंद्रीय मंत्र्यांची मुलगी सुरक्षित नाही,शिक्षण आरोग्य यांची सुरक्षा बाबत नंतरच्या लेखात लिहतो. आज 4 मार्च हा राष्ट्रीय सुरक्षा दिवस आणि त्याचे महत्व ,गरज लक्षात घेऊ या.त्यांचे लक्षवेधी छायाचित्रे सोबत देतो. त्या बाबत फक्त विचार करावा.
   देशभरात चार मार्च हा राष्ट्रीय सुरक्षा दिवस म्हणून साजरा केला जातोय. सध्या हा दिवस एका सप्ताहाच्या स्वरूपात सर्वत्र साजरा केला जातोय. देशातील नागरिकांमध्ये सुरक्षेप्रति जागरुकता निर्माण करणे आणि देशातील दुर्घटना थांबवणे हा या दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे.राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा करताना आज देशभर विविध कार्यक्रम साजरे केले जातात. पण ते फक्त कामाच्या ठिकाणीच होतात.घरात परिसरात,विभागात होणे सुद्धा आवश्यक आहेत.काम करताना घ्यावयाची काळजी, मोठ्या औद्योगिक ठिकाणी काम करताना टाळावयाच्या गोष्टी, तसेच इतर अनेक दुर्घटना टाळण्यासाठी काय करावं लागतं यासाठी सुरक्षा अधिकारी मार्गदर्शन करतात.अपघात कुठे ही होऊ शकतात.घरात जुना चढताना उतरतांना,मोरीत अंगोळ करतांना बाहेर पडतांना पाणी पडलेले असेल याची कल्पना नसणे.दक्षता आणि सुरक्षा प्रत्येक ठिकाणी आवश्यक आहे.
  देशाच्या सीमेवर लाखो जवान आपल्या जीवाची पर्वा न करता देशाच्या सुरक्षेची काळजी घेत असतात. त्यांनाही आजचा दिवस समर्पित केला जातो.राष्ट्रीय सुरक्षा काऊन्सिल ने देशात राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा करण्याची शिफारस केली होती. या दिवसाची सुरुवात 1972 साली करण्यात आली. भारतात 4 मार्च 1966 साली नॅशनल सेफ्टी काऊन्सिलची स्थापना करण्यात आली होती. त्यामुळेच या दिवशी राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.नॅशनल सेफ्टी काऊन्सिल एक अशासकीय पद्धतीने आणि ना नफा ना तोटा या तत्वावर काम करते. दरवर्षी राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा करताना एक थीम आयोजित केली जाते.या वर्षीची थीम 'सडक सुरक्षा' (Road Safety) अशी आहे. भारतात रस्त्यावरील दुर्घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून दरवर्षी हजारो लोक त्याला बळी पडतात. त्यामुळे वाहणे चालवताना वाहतूकीचे आवश्यक नियम पाळणे,काळजी घेणे गरजेचं असतं. त्याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी या वर्षी रोड सेफ्टी या थीमवर भर देण्यात आला आहे. दरवर्षी राष्ट्रीय सुरक्षा दिवस/आठवडा ची थीम ठरविली जाते. 'आपत्तीपासून शिका आणि सुरक्षित भविष्यासाठी तयार व्हा' (LEARN FROM DISASTER AND PREPARE FOR A SAFER FUTURE) 
      राष्ट्रीय सुरक्षा दिवस 2025 : राष्ट्रीय सुरक्षा, आरोग्य व पर्यावरण विकसित करण्यासाठी आणि जनमानसात सुरक्षेसंबंधी जागरूकता आणण्यासाठी 4 मार्च ते 11 मार्च या काळात राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह मोहीम भारतात संपूर्ण देशभर राबवली जाते.भारतात 4 मार्च हा दिवस राष्ट्रीय सुरक्षा दिवस म्हणून साजरा केला जातो.औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी "राष्ट्रीय सुरक्षा परिषद" च्या वतीने हा सप्ताह साजरा केला जातो. औद्योगिक क्षेत्रात या सप्ताहाचे महत्व मोठे असते. 4 मार्च 1966 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने सुरक्षा दिन सुरू केला.हा सुरक्षा सप्ताह आरोग्य संघटना आणि औद्योगिक सदस्यांसह सरकारी आणि गैर-सरकारी संघटना एकत्र येऊन साजरा करत असतात. दरवर्षी या सप्ताहामध्ये एक घोष वाक्य निश्चित केलेले असते.या सप्ताहामध्ये राष्ट्रीय सुरक्षा परिषदेतर्फे सेमिनार,वादविवाद स्पर्धा,निबंध स्पर्धा,सुरक्षा पुरस्कार,बॅनर प्रदर्शने,नाटके आणि गाण्यांचा खेळ,प्रशिक्षण कार्यक्रम,कार्यशाळा, चित्रपट प्रदर्शनांसह विविध सार्वजनिक कार्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील मोहीमा आयोजित केल्या जातात.अनेक उद्योगात कारखान्यात जी कामे केली जातात,त्या संबंधात सुरक्षेविषयी प्रात्यक्षिके दाखवली जातात. सुरक्षाविषयक कामकाजावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम आखले जातात.विविध क्षेत्रातील औद्योगिक कर्मचाऱ्यांना रसायन आणि विद्युत सुरक्षितता,जोखीम हाताळणी,अग्निशामक नियंत्रण, प्रथमोपचाराचे ज्ञान इत्यादीची माहिती आणि प्रशिक्षण दिले जाते. आपत्तीविषयक सखोल माहिती देऊन त्याचे व्यवस्थापन शिकवले जाते.
     तत्कालीन राष्ट्रपति डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या द्वारे या सुरक्षा दिवसाचा प्रारंभ करण्यात आला आणि तेव्हा पासून समाजातल्या सर्व स्तरांवर हे अभियान दरवर्षी राबवण्यात येऊ लागले.या अभियानामुळे औद्योगिक दुर्घटनांच्या दरातही घट झालेली दिसून आली आहे. लोकांना स्वतःच्या सुरक्षे संबंधी चे अधिकार आणि कर्तव्य यांची जाणीव व्हावी हा या सुरक्षा सप्ताहाचा एकमेव उद्देश्य आहे.सध्याच्या घडीला गेल्या वर्षभरात जगभराने सोसलेल्या कोरोनाच्या जीवघेण्या संकटांमुळे औद्योगिक सुरक्षे सोबतच व्यक्तिगत सर्वांगिण स्वच्छता,आपला परिसर आणि समाजाबद्दलची आपली जागरूकता,स्वतःच्या आरोग्याची तसेच आपल्या समाजाच्या आरोग्याविषयीची काळजी या गोष्टींचाही सुरक्षा सप्ताहामध्ये विचार होणे गरजेचे आहे असे मला  आम्हाला वाटते पाहिजे.या भारताचे आम्ही नागरिक दक्ष,स्व सुरक्षेकडे देऊ आम्ही नेमाने लक्ष.

सागर रामभाऊ तायडे.९९२०४०३८५९,भांडूप मुंबई.

सेवा निवृत सेफ्टी अधिकारी 

गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०२४

 क्रांतिकारी आंबेडकरी विचारांचा प्रशिक्षित कार्यकर्ता नेता हवा!.



असंघटीत कामगार सर्वात जास्त कोणत्या जाती धर्माचे आहेतहे जग जाहीर आहे.पण त्याच बरोबर संघटीत कामगार आणि कर्मचारी कोणत्या जाती धर्माचे आहेत, यांची राज्य,केंद्र सरकार कडे रीतसर नोंद आहे.कामगार असंघटीत असो अथवा संघटित कामगार यांनीच जगात सामाजिक, राजकीय क्रांत्या घडविल्या हा इतिहास आहे.मग जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही असे म्हटल्या जाते हे शंभर टक्के सत्य आहे. मानवाला दुःख मुक्त करण्याचा संदेश देणारे जगात पाहिले मानव महापुरुष, महासंत तथागत गौतम बुद्ध होत,त्यांनी अडीच वर्षा पूर्वी सांगितले होते,गुलामला माणसा सारखे वागवा. सावकार, शेतकरी,राजे,महाराज्यांनी गुलामाला माणसा सारखी वागवणुक दिली. त्यामुळे त्यांच्या वार्षिक उत्पन्नात प्रचंड भर पडली आणि बदल घडला,त्याच प्रमाणे भारतीय कामगार संघटनेचा इतिहास महात्मा फुलेचे सहकारी रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या पासून सुरू होतो.त्यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन या कामगार संघटनेची स्थापना १८८४ मध्ये केली म्हणून त्यांना कामगार चळवळीचे जनक आम्ही म्हणतो.कारण त्यांनी गिरण्यातील कारखान्यातील असंघटीत कामगार कर्मचाऱ्यांना देशात प्रथम संघटित केले.आणि संघर्ष करून अनेक अधिकार मिळवुन दिले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३४ ला स्वतंत्र मजदूर युनियनची Independent Labour Union,(ILU).स्थापना केली, हे सर्व क्षेत्रातील संघटित असंघटीत कामगारांचे राष्ट्रीय फेडरेशन असेल.असी त्यांची संकल्पना होती,१९३४ ते १९३६ पर्यंत त्यांनी अतिशय दुर्लक्षित अज्ञानी,असंघटीत सफाई कामगार, दगड फोडणारे खाण कामगार, कोळसा खाणीत काम करणारे कामगार यांची खाणीत जाऊन पाहणी केली, मुंबईतील सफाई कामगार कर्मचारी यांची १९३७ साली म्युनिसिपल कामगार संघ ही ट्रेड युनियन स्थापन केली.
मुंबई ही भारताची औधोगिक आणि आर्थिक राजधानी आहे.म्युनिसिपल कामगार संघ मुंबईतुन राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका मध्ये मागासवर्गीय समाजाची आंबेडकरी विचारधारा असणारी ट्रेंड युनियन असायला पाहिजे होती.देशभरातील सर्व महानगरपालिका,नगरपालिकेतील कामगार कर्मचारी हे आय एल यु चे सभासद होऊन आय एल यु हे देशव्यापी आंबेडकरी विचारधारेचे ट्रेंड युनियन महासंघ असता.पण तसा प्रयत्न झाला नाही असे म्हणता येत नाही,प्रयत्न झाला पण तो एक खांबी नेतृत्वात झाला.ज्या क्षेत्रातील जो तज्ञ असेल त्यांनीच त्याचे नेतृत्व केले पाहिजे.केवळ तज्ञ असुन चालत नाही,त्यात कुशल वक्तृत्व कौशल्य,संघटन कौशल्य आणि सर्वांना सोबत घेऊन अचूक निर्णय घेण्याचे कौशल्य आवश्यक असते.परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या कोणत्याही संस्था,संघटना,पक्षात लोकशाही नुसार सभासद नोंदणी होऊन तिमाही,सहामाही,वार्षिक बैठका होत नाहीत,त्यांचे रीतसर रिकार्ड ठेऊन त्रिवार्षिक, पंचवार्षिक निवडणूका होत नाही.एकच नेता धार्मिक,सामाजिक,शैक्षणिक,आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात नेतृत्व करतो,तोच नेता त्यांच्याशी प्रामाणिक,लाचारी पत्कारून चमचागिरी करीत असतो त्यालाच कार्यकर्ता पदसिद्ध पदाधिकारी बनतो.तो संस्था,संघटना आणि पक्ष वाढीसाठी काहीच करू शकत नाही,तो फक्त साहेबाला खुश ठेऊ शकतो.कुशल संघटक,कुशल वक्ता आणि कुशल नेतृत्व असणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांचे प्रवेशद्वार बंद असते. कौशल्य, गुणवत्ता दाखवुन नेतृत्व मिळाल्यास संस्था, संघटना आणि पक्ष मोठे होतात.जिल्ह्यात राज्यात दुसऱ्या तिसऱ्या फळीतील नेता निर्माण होणार नाही यांची काळजी घेणारे नेते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ संस्था, संघटना आणि पक्ष वाढविण्यासाठी असमर्थ ठरले म्हणून त्यांनी स्वतःच्या संस्था, संघटना आणि पक्ष काढून स्वतःच संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष झाले.त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या सामाजिक,शैक्षणिक, धार्मिक आणि राजकीय संस्था, संघटना आणि पक्षात लोकशाही मार्गाने सभासद होऊन काम करून निवडणूका घेण्यासाठी भाग पाडावे त्याकरिता निःपक्षपाती,निस्वार्थी,निर्भीड पणे विचारधारे वर प्रामाणिक पणे काम केल्यास सर्वच समाजाचा राज्याचा देशाचा विकास आणि कल्याण निश्चितच झाला असता. 
आम्हाला बाबासाहेबांचे शब्द कधीच आठवत नाही. बाबासाहेब म्हणतात मी जेवढी गरिबी अनुभवली असेल, तेवढी देशातील कोणत्याच नेत्याने अनुभवली नसेल, मी गरिब असून कधीही गरिबीचे कारण सांगून माझा स्वाभीमान व माझे आंदोलन कमी होऊ दिले नाही, ऐवढी गरिबी असूनही मी कधीही पैशासाठी, पदासाठी विकलो गेलो नाही आणि तेच ध्येय प्रत्येक कामगार कर्मचारी यांनी डोळ्यासमोर ठेवून काम केल्यास.सत्ता कोणाची ही असो प्रशासन आपलेच असेल.आणि आपल्या रक्ताच्या माणसासांठीच काम करेल.
असा कामगार कर्मचारी आणि अधिकारी निर्माण झाला पाहिजे. हेच कामगार,कर्मचारी आणि अधिकारी वर्गांचे ट्रेंड युनियन जाळे आर एस एस ने देशभर नव्हे जगभर निर्माण केले. आज ग्रामपंचायत ते सचिवालय पर्यंत त्यांचेच कामगार कर्मचारी अधिकारी कसे काम करतात त्यांचे अनेक उदाहरण दररोज वृतपत्रात नियमित वाचायला मिळतात. मागासवर्गीय समाजावर अन्याय अत्याचार करणारे आरोपी गावात,शहरात मोकाट फिरतात पोलिस अधिकारी कारवाई करण्यास असमर्थ का असतात?. कारण कायद्या पेक्षा बाहेरील शक्ती मोठी असते.तिच्या दडपणाखाली कामगार,कर्मचारी,अधिकारीवर्ग काम करतो.म्हणुन त्यांचे स्वरक्षण करणारी यंत्रणा म्हणजे शासन प्रशासन असते.त्यांच्यावर ज्या विचारधारेच्या युनियनचे प्राबल्य आणि नेतृत्व असते.त्यांच्या दडपणाखाली हे सर्व प्रशासन काम करते.
मागासवर्गीय कामगार कर्मचारी विचाराने एकत्र आल्यास काय होऊ शकते त्यांचे हे उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत कामगार कर्मचारी संघटना. ही ३९ वर्षापूर्वी स्थापन झाली आहे, त्यांनीच देशव्यापी विद्युत फेडरेशन २००० ला बनविले.त्यांच्याच प्रयत्नाने स्वतंत्र मजदूर युनियन २००३ ला नव्याने स्थापना झाली.आज महाराष्ट्रातील असंघटित कामगारांना सोबत घेवून स्वतंत्र मजदूर युनियन देशभरात बावीस राज्यात आणि सतरा क्षेत्रात आदरणीय जे एस पाटील यांच्या त्यागी कुशल नेतृत्वाखाली लक्षवेधी वाटचाल करीत आहे. 
आरक्षण पदोन्नती आणि नवीन भरती ह्यात मागासवर्गीय समाजाच्या कामगार कर्मचाऱ्यांना जाणूनबुजून दूर ठेवण्यासाठी विविध फंडे वापरले जात आहेत.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार कर्मचारी अधिकारी यांच्या शिक्षणाकरिता १९५६ ला एक संस्था स्थापन केली होती. त्यात विषय ठेवले होते राजकारण, अर्थकारण,बजेट व कामगार क्षेत्र,यावरून बाबासाहेब कामगार क्षेत्राला किती महत्व देत होते हे कळून येते. आम्हाला जो इतिहास घडवावयाचा आहे तो सर्व क्षेत्रातील कामगार कर्मचारी यांना प्रशिक्षण देऊन घडवावा लागेल. 
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना ही इंजिनियर रमेश रंगारी आणि जे एस पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाली होती.या कर्मचारी संघटनेच्या आपल्या २२ पतसंस्था आहेत.स्वतंत्र मजदूर युनियनचा प्रत्येक कार्यकर्ता हा प्रशिक्षक  असला पाहिजे.त्यांनी कामगार कर्मचारी यांना आय एल यु चे धेय्य धोरणे कार्यप्रणाली समजावून सांगितली पाहिजे. आज अनेक संघटनेचे कार्यकर्ते,वरिष्ठ इंजीनिअर व अधिकारी संघटनेचे कार्यकर्ते स्वताच्या संघटना युनियनचे ध्येय धोरणे समजून सांगण्यास असमर्थ आहेत.म्हणूनच ते इंटक,आयटक,सिटू,भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली काम करतात. त्या पदवीधरांना स्वार्थासाठी ट्रेड युनियनच्या विचारांशी काही देणेघेणे नाही. पदोन्नती मधील आरक्षणाचा गंभीर प्रश्न असतांना आजच्या घडीला अडीच तीन लाख कर्मचारी अधिकारी पदोन्नती आरक्षणाला विरोध करणाऱ्या संघटना युनियनचे सभासद व आर्थिक देणगीदार आहेत.त्या आर्थिक बळावर ते सर्वोच्य न्यायालयात दिवसाला पंचवीस लाख रुपये घेणारा वकील उभा करीत आहेत.त्यांच्या वकीला समोर आपल्या वकिलाना जास्त वेळ बोलण्याची संधी न्यायमूर्ती देत नाही.तिथे ही उच्चवर्णीय समाजाची विषमतावादी व्यवस्था योग्य त्या पद्धतीने काम करते.याची जाणीव बहुसंख्य आरक्षण लाभार्थी मागासवर्गीय कामगार कर्मचारी आणि अधिकारी वर्गांना नाही.ते अजूनही वेगवेगळ्या संघटना युनियन मध्ये विभागलेले आहेत.काय फरक आहे विषमतावादी आणि समतावादी विचारांच्या ट्रेड युनियन मध्ये हे समजून घेणे आजच्या परिस्थितीत अतिशय आवश्यक आहे.
कामगार कायदा १९२६ व सोसायटी कायदा १८६० जो सरकारी कर्मचारी अधिकारी यांना माहिती असला पाहिजे.कामगार क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या संघटना व त्यांची देशपातळीवरील सभासद संख्या आणि त्या संघटनेचे राजकिय स्वरूप. स्वतंत्र मजदूर युनियन व राष्ट्रीयपातळीवरील ट्रेड युनियन,संघटनेमधील फरक.
स्वतंत्र मजदूर युनियन (ILU) शी संलग्न असलेल्या संघटित व असंघटित कामगार कर्मचारी संघटना आणि त्यांची सभासद संख्या.तिच्या वाढीसाठी उपाय योजना.  नगरपालिका व जिल्हापरिषद येथे असलेल्या संघटनेतील आपल्या कामगारांना क्रांतिकारी आंबेडकरी विचारांच्या संघटनेचा पर्याय उपलब्द करून देण्यासाठी जनसंपर्क जनजागृती देण्यावर भर असला पाहिजे.असलेल्या संघटनांना आय.एल.यु शी संलग्न करून घेण्यासाठी वैचारिक प्रबोधन.असंघटित कामगारांच्या अडचणी व त्यावर उपाय. बाबासाहेबांचे कामगारापुढे दिलेले मनमाड व दिल्ली येथील भाषणाचे सार समजावून सांगून यातून जे कामगार कर्मचारी अधिकारी कार्यकर्ते म्हणून तयार होतील त्यांचे विभागीय पातळीवर एक दिवसाचे प्रशिक्षण शिबीर घेतल्या गेल्यास संघटनेकडे प्रशिक्षित कार्यकर्ता नेता नेतृत्व करण्यास सक्षम होईल.
उच्चशिक्षित उच्चपदस्थ अधिकारी सेवा निवृत्तीनंतर काय करतात?.आर एस एस वर टिका करने सोपी आहे, पण त्यांच्या विचारांचा प्रशिक्षित वाहक तयार करून घरदार कुटुंब सोडून पूर्णवेळ समाजात काम करणारा स्वयंसेवक आपण पाहत नाही.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता सैनिक दलाची संकल्पना त्यांनी शंभर टक्के अमलात आणली. आपण मात्र चर्चाच करतो. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी विचारांची राष्ट्रीय पातळीवरील ट्रेड युनियन स्वतंत्र मजदूर युनियन मान्यताप्राप्त करण्यासाठी आदरणीय जे.एस.पाटील निवृत्तीनंतर ही पायाला भिंगरी बधून देशभर संघटन बांधणीसाठी फिरत आहेत. लॉक डाऊन सारखी परिस्थिती असतांना ही राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मिटिंगा घेतल्या.शासन कर्ती जमात बनण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना प्रशिक्षित कार्यकर्ता नेता हवा होता. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना त्यागी जिद्दी अभ्यासू कार्यकर्त्याची नेत्याची गरज होती.ती पूर्ण करण्याची जबाबदारी जे एस पाटील साहेब स्वतंत्र मजदूर युनियनच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.देशातील सर्व मागासवर्गीय कामगार कर्मचारी अधिकारी यांनी प्रामाणिकपणे सहकार्य केल्यास २०२२/२३ ला शंभर टक्के आपण यशस्वी झाल्या शिवाय राहणार नाही. म्हणूनच शासन करती जमात बनायचे असेल तर प्रशिक्षित कार्यकर्ता व नेताची आवश्यकता आहे.
सागर रामभाऊ तायडे९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य

कुठे थांबायचे नक्की झालं तो संतुष्ट

 कुठे थांबायचे नक्की झालं तो संतुष्ट



    कौन बनेगा करोडपती हा बौद्धिक,मनोरंजनाचा कार्यक्रम मला अतिशय आवडतो. आपल्या बुद्धीत भर पडते.जेंव्हा जेंव्हा माझं उत्तर बरोबर येतं तेव्हा मला खूप आनंद होतो.परवाच्या भागात फास्टेस्ट फिंगर मध्ये अव्वल ठरलेले नीरज सक्सेना हाॅट सीटवर आले.एकदम शांत रीतीने बसले.किंचाळत,डान्स करत,रडत,हात उंचावत, अमिताभला जोरात मिठी मारत यातलं त्यांनी काहीही केलं नाही.ओळख सांगायची तर ते सायंटिस्ट आहेत.पीएचडी आहेत व कोलकत्यातील एका विद्यापीठाचे कुलगुरू आहेत.अतिशय प्रसन्न,साधं व्यक्तिमत्त्व.डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलामांसोबत काम करायला मिळालं हे जीवनातील भाग्य ते समजतात. त्यांनी सांगितलं की प्रथम मी माझाच विचार करत होतो परंतु कलामांच्या सान्निध्यात राहून मी माझ्याबरोबर दुसऱ्यांचा व राष्ट्राचा विचार करू लागलो. 
    नीरजजी खेळू लागले. एकदा ऑडियन्स पोल घेतलं परंतु दुगुनास्त्रमुळे त्यांना ती लाईफ लाईन पुन्हा मिळाली.सर्व प्रश्नांची उत्तरं त्यांनी सफाईदारपणे दिली.त्यांच्या बुद्धीमत्तेची चुणूक पाहून थक्क व्हायला झालं.तीन लाख वीस हजार जिंकून,बोनस तेवढीच रक्कम मिळविली मग ब्रेक झाला. ब्रेक नंतर अमिताभ बोलू लागले.चलिए डाॅक्टरसाब अब आप के सामने आ रहा है ग्यारह वा प्रश्न..ए रहा प्रश्न..इतक्यात नीरजजी म्हणाले..सर मैं क्विट करना चाहता हूँ.. अमिताभ बच्चन यांना आश्चर्य वाटले. इतकं चांगलं खेळणारे,तीन लाईफ लाईन जीवित असताना.करोड रुपये सहज जिंकतील असं असताना खेळ सोडत आहेत का?विचारलं..आज तक ऐसा कभी हुआ नही. 
नीरजजी शांतपणे म्हणाले.माझ्या शिवाय आणखी खेळाडू वाट पहात आहेत व ते माझ्या पेक्षा लहान आहेत.त्यांनाही संधी मिळाली पाहिजे तसं तर मला खूप पैसे मिळाले आहेत.मला वाटतं "जो प्राप्त है पर्याप्त है." अधिक की आशा नही है.अमिताभ बच्चन अवाक् झाले.सर्वत्र शांतता पसरली.एक सेकंद स्तब्धता होती.नंतर सर्वांनी खूप वेळ उभं राहून टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक केलं.अमिताभ म्हणाले..खूप काही शिकायला मिळालं. नतमस्तक व्हावे अशी व्यक्ती आज पहायला मिळाली.खरं तर एवढी संधी समोर असताना केवळ दुसऱ्यांना संधी मिळावी व जे मिळालं तेवढं खूप आहे असा विचार करणारी पहिलीच व्यक्ती माझ्या पाहण्यात आली.मनातून मी त्यांना नमस्कार केला. 
   आज जगात केवळ पैसा कमविण्यासाठी माणूस धडपडत आहे. कितीही पैसा कमवला तरी समाधान नाही.हाव कमी होत नाही.कमीच पडतो.या पैशा मागे लागून घर,झोप,न नाती,प्रेम,मैत्री या साऱ्या गोष्टींना तो मुकत आहे. पैशाचा हव्यास संपत नाही.अशा वेळी डॉ.नीरज सक्सेना सारखी देव माणसं येतात व बोध देऊन जातात. या कलियुगात अशा समाधानी,अल्पसंतुष्ट माणसांचं दर्शन दुर्लभ झालेलं आहे.त्यांनी खेळ सोडल्यानंतर एक मुलगी हाॅट सीट वर येऊन बोलू लागली.तीन मुली झाल्या म्हणून वडिलांनी आई सहित आम्हाला बाहेर काढलं.आम्ही एका आश्रमात राहतो. 
    मी विचार केला की नीरजजींनी खेळ सोडला नसता तर शेवटचा दिवस असल्याने कुणालाही संधी मिळाली नसती.आज त्यांच्या त्यागाने एक गरीब मुलीला चार पैसे मिळण्याची संधी प्राप्त झाली.जगात इस्टेटीतला एक पैसा सोडायची तयारी नसते. त्यासाठी भांडणे.खून खराबा होताना आपण पाहतो.स्वार्थ बोकाळलाय सर्वत्र.परंतु हे उदाहरण अपवाद आहे.देव माणसात असतो.ते नीरजजी सारख्या दुऱ्याचा, देशाचा विचार करणाऱ्या माणसात.मी आयुष्यात कधीच या थोर माणसाला विसरणार नाही. आज माझ्या आवडीच्या विषयावर म्हणजेच अनोख्या व्यक्तिमत्त्वाविषयी लिहायला मिळालं याचा आनंद आहे. 
   गरज भागली की माणसानं थांबावं व दुसऱ्यांना संधी द्यावी.स्वार्थाचा त्याग करावा.सर्व सुखी होतील.हा धडा शिकायला मिळाला.मला नेहमीच अशा व्यक्तिंविषयी आदर वाटतो व समाजाच्या उन्नतीसाठी परखडपणे लिहावं लागतं.काही लोक खूप अभ्यासपूर्ण लक्षवेधी प्रेरणादायी लिहतात पण नांव टाकायला घाबरतात.लोक काय म्हणतील.हीच भीती मनात असते.त्या लोकांचे लेख मला नेहमी आवडतात त्यांना मी संकलनात ठेवतो.एकमेकाशी जुळले की प्रसिद्धीला देतो.लेख प्रसिद्ध झाल्यावर अनेक लोक मनतात माझ्या मनातील आपण अक्षरक्षा मांडले.सायंटिस्ट पी.एच.डी असलेले  डॉ.नीरज सक्सेना असा निर्णय घेऊ शकतात.
  राज्य व केंद्र शासन प्रशासकीय सेवेतील उच्च पदावरील अधिकारी सेवा निवृत झालेवर संतुष्ट राहत नाही.किंवा राजकारणात सक्रिय असलेले नेते साठ,सत्तर,एन्शी झाले तरी आमदार खासदार की च्या चार,पांच टर्म पूर्ण झाल्या तरी कुठे थांबायला तयारच नसतात.त्यामुळेच अनेक पक्षाचा नवीन जन्म होतो.त्यामुळेच समाजात असंतुष्ट लोकांची वेगवेगळी जमात तयार होते. त्यातून एकाच कुटुंबातील वेगवेगळे पक्ष,संघटना, संस्था निर्माण होऊन देशाचा राज्याचा जिल्ह्याचा तालुक्याचा विकास होण्या ऐवजी भकास होण्यासाठी संघर्ष आणि स्पर्धा लागते. म्हणूनच प्रत्येक क्षेत्रातील समजदार सुसंस्कारित मानसांनी कुठे थांबावे हे नक्की केले पाहिजे आणि संतुष्ट राहिले पाहिजे. 
संकलन :- सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडुप,मुंबई.