बुधवार, ३० मे, २०१८

गुलामला जाणीव कसी करून देणार?.

गुलामला जाणीव कसी करून देणार?.
अन्याय अत्याचार सहन करण्याची सवय लागली की धनधाकड शरीर असलेला मानव,प्राणी चाबूकाचा गुलाम होतो. मालकाच्या हातात चाबूक दिसला की प्राणी घाबरतो तसाच माणूस पण घाबरतो. हा निसर्गाचा नियम आहे.त्याला तथागत बुद्धांनी प्रथम आवाहन देऊन मोडून काढले होते.त्यांनी शेठ सावकार शेतकरी यांच्या कडे काम करणाऱ्या गुलामांना मानवा सारखे वागविण्याची विनंती केली होती.त्यामुळे दोघांच्या वागण्यात बदल झाला आणि गुलामानी जास्त मेहनतीने काम केल्यामुळे उत्पादनात भर पडली होती. गुलाम शेतकरी, सावकार यातील भेद मिटला होता.
भारतात आज ही मागासवर्गीय जातीच्या माणसाला माणुस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारल्या जातो.त्यावर माणुसकीहीन अन्याय अत्याचार केल्या जातात.त्यावर कडक कारवाई करणारा अट्रोसिटी हा कायदा होता. अट्रोसिटी हा एक असा कायदा आहे की ह्या कायद्यामुळेच जातीय अत्याचार थोड्याफार प्रमाणात कमी होण्यास मदत होत होती. पण दि. २० मार्च, २०१८ रोजी विद्यमान सर्वोच्च न्यायालयाने ह्या कायद्याबद्दल करून खूप चुकीचा निर्णय घेतला आहे. परत, काही धनदांडगे जमीनदार जातीयवादी सक्रिय होऊन जातीय अत्याचाराच्या घटना वाढतील आणि राजकीय आशीर्वाद असल्यामुळे गुन्हे कसे पचवायचे हे तर यांना चांगलंच ठाऊक झाले आहे. तरी समाजातील गटं-तटं, राग, द्वेष, तिरस्कार, अहंकार आणि स्वार्थ काही कमी होत नाही.आणि समाज एकत्र करण्याचा प्रयत्न करीत नाही.ही खुप खेदाची व क्रांतिकारी विचाराला मूठमाती देणारी परिस्थिती आहे.
देशात लोकशाही पद्धतीने निवडून आलेले १३१ मागासवर्गीय खासदार आहेत.विशेष म्हणजे एक खासदार भारत देशाचा सर्वोच्च पदी म्हणजे राष्ट्रपती पदी आहे एक ओबीसी खासदार देशाचा प्रधानमंत्री आहे.तरी एस सी,एस टी, ऍक्ट मध्ये नुसता बदल नाही तर निष्कीर्य करून टाकला.त्यामुळे गंभीर आरोप असलेल्या आरोपीला अटकच होणार नाही.ही घटना साधी नाही तर लोकशाही ने दिलेल्या संविधानिक मूल्याचा आपल्या सोयी नुसार ब्राम्हणशाहीने केलेला सरळ सरळ खुनच आहे.तरी मागासवर्गीय खासदार, प्रधानमंत्री, राष्ट्रपती आपल्या सामाजिक जबाबदारीशी प्रामाणिक न राहता वैचारीक गुलाम म्हणून इनामदारी ने आपले कर्तव्य पार पाडत आहेत.आपण गुलाम आहोत यांची त्यांना संपुर्ण जाणीव आहे.मग या वैचारिक गुलामला जाणीव कशी करून देणार?.हा आज देशातील मागासवर्गीय समाजा समोरचा मोठा प्रश्न आहे.या मागासवर्गीय लोकांना लोकप्रतिनिधी म्हणून कोणी निवड केली?.ब्राम्हणशाहीचे व्यवस्थापन करणाऱ्या आर एस एस च्या भटा ब्राम्हणांनीच नां?.
मागासवर्गीय बहुजन समाजातील पक्षाच्या वतीने स्वाभिमानी ओबीसी प्रधानमंत्री किंवा राष्ट्रपती झाला असता काय?.मग बहुसंख्य हिंदुत्ववादी, मनुवादी विचारधारा मानणाऱ्या पक्षांनी ओबीसी प्रधानमंत्री व मागासवर्गीय राष्ट्रपती कोणत्या गुणवंते नुसार निवडल्या गेले तर एकच गुणवत्ता आहे ती म्हणजे वैचारिक गुलाम. ही मोहनचंद गांधी यांच्या यरोडा जेल पुणे येथील आमरण उपोषणाला बसल्या नंतर झालेली उत्पत्ती आहे.त्यालाच पुणे करार म्हणतात.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या स्वाभिमानी समाजाला वाचविण्यासाठी मजबुरी मुळे केलेला समझोता केला होता.त्याचं गुलामांचा वापर करून आज देशातील लोकशाही संपविण्याचे काम मनुवादी करीत आहेत.
सर्वश्रेष्ठ संविधानिक पदी ओबीसी,मागासवर्गीय गुलाम बसविल्यामुळे कोणतेही मानसिक गुलाम नेतृत्व स्वतःच्या किंवा संविधानाच्या चौकटीत काम करू शकत नाही.तो गुलाम स्वतःसह सर्व ओबीसी, मागासवर्गीय समाजाला कायमस्वरूपी गुलाम बनविण्यासाठी काम करीत राहील. भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी होणार नाही यासाठी प्रथम समता, स्वतंत्र,बंधुभाव, एकता सर्वधर्मसमभाव ही चौकट मोडावी लागेल.ती तोडण्यासाठी संविधानात दिलेले मूलभूत अधिकार,सनदशीर कायदे कानून,कलम बदलल्या शिवाय मनुवादी, हिंदुत्ववादी विचारांची अंमलबजावणी होणार नाही हे सर्व काम ओबीसी, मागासवर्गीय गुलामांच्या हातुन सहीने आज देशात होत आहे.त्याला सर्वच ओबीसी, मागासवर्गीय, बहुजन समाज मूक पणे साथ देतो किंवा तो ही त्यांची मानसिक गुलामी सहन करण्यासाठी तयार होत आहे. त्यामुळे त्यांच्या सर्व नाशाला तोच जबाबदार असेल. आर एस एस प्रणित भाजपा एकमेव पार्टी नाही तर तिला ४६ छोट्या छोट्या प्रादेशिक पक्षाचा पाठिंब्यामुळे ती मजबूत होत आहे.हे ४६ पक्ष मागासवर्गीय, बहुजन समाजाला मानसिक गुलाम बनविण्यासाठी कुराडीच्या दांड्याचे काम करीत आहेत.हे स्वार्थासाठी आंधळे, बहिरे आणि मुके झाले आहेत.त्यात रामदास,उदीतराज, रामविलास हे लक्षवेधी गुलाम आहेत.या गुलामला जाणीव कशी करून देणार?.आर एस एस ने सर्व साम, दाम, दंड,भेद नीती वापरून या पक्षांना सहयोगी गटबंधन, ठगबंधन आणि राजकीय सौदेबाजी केली आहे.त्यामुळे हे सर्व पक्षाचे नेतृत्व करणारे नेते गुलाम झाले आहेत.शिवसेना व शिवसेना पक्ष प्रमुख यांची एकूण भाषणे ऐकली तर मोठा प्रश्न पडतो हीच का ती वाघाचे तोंड घेऊन मराठी, महाराष्ट्र आणि महाराजांचा आदर्श सांगणारी सेना?.की मनुवादी हिंदुत्ववादी गुलाम ?.मराठी माणसाला महाराष्ट्राला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना गुलाम बनविणारी सेना. ओबीसी मागासवर्गीय, बहुजन समाजाला गुलाम बनविणारे नेतृत्व मग ते कोणाचे ही असो ते गुलाम झाले आहे.त्यामुळेच असा गुलामांना गुलामगिरीची जाणीव कशी करून देणार?.
हे संत,महापुरुषांच्या,महात्माच्या क्रांतिकारी विचारावर श्रद्धा ठेवणाऱ्या संस्था, संघटना, कार्यकर्ते आणि नेते यांनी गांभीर्याने विचार करून मार्ग काढला पाहिजे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे करारावर सही केली तेव्हा जी खंत व्यक्त केली होती,जर माझा समाजाची राख रांगोळी होऊन तो जिवंत राहत नसेल तर मी जिवंत राहून काय उपयोगाचे ?.
ओबीसी,मागासवर्गीय, बहुजन समाजाची आजची परिस्थिती तशीच आहे.८५ टक्के समाज असूनही त्यांच्यावर ३ टक्के लोकसंख्या असलेला समाज त्यांना गुलाम बनवीत आहे.कारण ओबीसी, मागासवर्गीय, बहुजन समाजात एकी नाही.एकमेकांवर विश्वास नाही.म्हणून त्यांना गुलामी स्वीकारावी लागत आहे.
वाघ कधीही जंगलात शिकार एकटाच करतो, पण कळपात राहतो.माणसात जसा अहंकार, स्वाभिमान असतो तसाच प्राण्या मध्ये असतो.दोन मित्र गैरसमजा मुळे शत्रु बनतात तसेच प्राण्यात सुद्धा होते.संकट समयी माणुस जसा माणुस म्हणून धाऊन जातो तसाच प्राण्यांच्या संकट समयी प्राणीच धाऊन जातो.एकदा एक वयस्कर वाघ शिकार करण्यासाठी फिरत असतांना पंचवीस तीस कुत्रे त्याला घेरतात व त्यांच्यावर जोर जोराने भुंकून हल्ला करतात.तो आवाज ऐकून दुसरा वाघ त्या वाघाच्या मदतीला धावून जातो.तो फक्त दाहडतो तर सर्व कुत्रे पळून जातात.वयस्कर वाघ उभा राहतो आणि सावरतो तो पर्यंत मदतीला धावून आलेला वाघ निघून जातो.इतर प्राणी हे सर्व पाहत होते,त्यांनी त्या वाघाला विचारले तुम्ही एकमेकांशी बोलत नाही.मग त्यांला वाचविण्यासाठी का गेला?.तेव्हा ते वाघाने उत्तर दिले आमची आपसात नाराजी,गैरसमज जरी असले तरी एकूण प्राणी समाजात असा समज जाऊ नये की कुत्रे ही वाघाला मारून टाकतात. देशात ८५ टक्के ओबीसी, मागासवर्गीय बहुजन समाजाच्या रक्षणासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक वेळी धाऊन आले.आणि आज ही ओबीसी, मागासवर्गीय, बहुजन समाजाच्या रक्षणासाठी आंबेडकरी विचारांचे लोक परिणामाची पर्वा न करता लिहण्यासाठी, बोलण्यासाठी, लढण्यासाठी पुढाकार घेतात.गुलामला गुलामगिरी ची जाणीव करून देतात. मग आता सर्वश्रेष्ठ पदी बसलेल्या गुलामला जाणीव कशी करून देणार?.

सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडुप, मुंबई

आंबेडकरी चळवळीचे राजकीय वारसदार बना!.

आंबेडकरी चळवळीचे राजकीय वारसदार बना!. 
आदरणीय बाळासाहेब उर्फ प्रकाश यशवंतराव आंबेडकर आज आंबेडकरी चळवळीचे खरे रक्ताचे वारसदार आहेत. पण आपण खऱ्या अर्थाने वैचारिक चळवळीचे वारसदार आहेत. परंतु राजकीय वारसदार आज ही होऊ शकले नाहीत. कारण तुम्ही जिथून सुरुवात केली होती.ती परिस्थिती आज ही जशीच्या तशीच आहे. सम्यक समाज आंदोलन या सामाजिक जनआंदोलनातून आपण सुरवात केली होती.त्या जनआंदोलनाचे आपण नेते होता.पण त्यात मोठे योगदान देणारे नेते अर्जुन डांगळे आणि अविनाश महातेकर हे होते.याच्या मुळेच मुंबईसह राज्यात गांव तिथे बौध्द महासभेची शाखा, गांवागांवात जाऊन जनजागृती करण्याचा यशस्वी प्रयत्न झाला होता. त्यातून अनेक निष्ठावंत कार्यकर्ते तयार झाले.खूप मोठी जनजागृती झाली होती.असे लिहले तर चुकीचे होणार नाही.त्यामुळेच राजकीय समीकरण बदलली होती. तो बदल समाजवादी, डाव्यांनी उचलून धरल्यामुळे सतत प्रसिद्धी मिळत होती. तेच हवा निर्माण करीत होते.हे सर्वच मान्य करतात.तो बदल काही अर्थाने पूर्ण झाला असे म्हणता येत नाही.आणि अपूर्ण राहिला असे ही म्हणता येत नाही.मागासवर्गीय समाजातील लोक बहुजन म्हणूनच जवळ आले.विशेष बुलढाणा,अकोला जिल्ह्यातील बौद्ध समाजावर होणारे हल्ले,अन्याय,अत्याचार करणारे कोण आहेत हे पाहिल्यावर, आपले एकूण संघटन,बौद्ध महासभा,भारिप बहुजन महासंघ आणि डाव्या चळवळीशी असलेला घरोबा कुठे तरी कमी पडतो असे वाटते.त्याचे सत्यशोधक पद्धतीने आत्मपरीक्षण करून त्यातील काही प्रश्न आपल्या वाढदिवसा निमित्य आपल्या भक्त आणि शिष्या समोर मांडण्याचा हा प्रयत्न करतो. कारण आंबेडकरी चळवळीत अनेक बुद्धिवादी लेखक, पत्रकार,साहित्यिक आहेत.पण त्याच्या मध्ये एका गोष्टीचा अभाव आहे.तो म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यात नाही.सत्य मांडल्यावर समाज काय म्हणेल?.सत्ताधारी नाराज होतील.याची त्यांना भिती वाटते. म्हणून ते सत्याला सत्य म्हण्यास लिहण्यास घाबरतात.हे आपणच (विचारवंतां कडून अपेक्षा -आंबेडकर चळवळ संपली आहे.पण नंबर ३६ ) म्हटले आहे.त्यामुळे हा नियम मला लागू नाही.कारण मी प्राध्यापक,वकील , इंजिनियर,साहित्यिक,विचारवंत नाही. एक असंघटीत कामगार व कार्यकर्ता आहे.आणि अब्राम्हणी सत्यशोधक मासिकातून लिहता लिहता वृत्तपत्रात लिहायला लागलो.क्रांतिकारी विचारांच्या चळवळीची दिशा व दशा यावर सत्य शोधक नजरेतुन चिंतन आणि परीक्षण करून लिहायला लागलो.
    भूमिहीन शेत मजुरांचे प्रश्न सोडविण्या करिता त्यांना आपण गायरान,पडीत,वनविभागाच्या जमीन ताब्यात घेऊन कसायला लावून शेतमजुरांचे अल्पभूधारक शेतकरी केले. त्याच्या त्या कसलेल्या जमिनी नांवावर करण्यासाठी "भूमिहीन हक्क संरक्षण समिती स्थापन" केली होती. त्यामुळे बाबासाहेबाच्या लढ्यातील एका सेनापतीच्या अर्धवट राहिलेल्या लढ्याला आपण एक वेगळी दिशा देण्याचे काम हाती घेतले होते. "कसेल त्याची जमीन नसेल त्याचे काय?."  या घोषणेने राज्यच नव्हे तर संपूर्ण देश ढवळून निघाला होता.तोच धागा पकडून आपण राजकारण नको समाजकारण हवे त्याच्या समाज परिवर्तनातून राजकारण करू असाही आपला संकल्प होता.त्यामुळे राज्यातील नव्हे तर देशातील मागासवर्गीय,शोषित, पिडीत, आदिवाशी समाज तुम्हाला अंधार नष्ट करणारा नवा सूर्य प्रकाश म्हणत होती.सूर्याची किरण वरून खाली येतात.इथे प्रकाश खालून वर गेला.आणि बरेच काही विसरला.असे भूमि कसणारे हक्कदार म्हणतात.काही लढता लढत मेले. त्या आंदोलनातील लोक काल पण आपल्या सोबत होते आणि आज ही तुमच्या सोबत असतील ते केवळ बाबासाहेबांचे नातु म्हणून. 
पण कर्मवीर दादासाहेब गायकवाड भूमिहक्क समितीचे पुढे काय झाले?.मराठवाडा, विदर्भातील पडीत,गायरान, वनविभाग शेत जमीनी नांवावर झाल्या काय?.आपली राजकीय शक्ती वाढली असली तरी बुलढाणा, अकोला, वाशीम जिल्ह्यातील बहुसंख्येने शेतजमिनी नांवावर आज ही झाल्या नाही त्यांचे दावे अपात्र ठरविण्यात आले.अनेक गांवात वन हक्क समितीचे गठन होत नाही.त्यामुळेच नाहरकत पत्र, ठरावाचे पत्र ग्रामसभा देत नाही.त्याबाबत आता आपली आपल्या पक्षाची कोणतीच ठोस भूमिका का नाही.एस सी,एस टीच्या शे पाचशेच्या मतदानाच्या साठी पाच दहा हजार मतदान असलेल्या बहुजन समाजातील लोकांनां आपणास नाराज करायचे नाही हेच राजकारण त्यामागे आहे की नाही?.म्हणूनच प्रदिप भाई,अंभोरे, जगदीश इंगळे,नरसिंग गायकवाड,कडूदास कांबळे यांना भूमी मुक्ती मोर्च्या, बहुजन मुक्ती मोर्च्या सारख्या अनेक संघटनानां हे भूमिहीन,शेतकऱ्यांचे जन आंदोलन करावे लागत आहे.१९८२/८४ पासुन शेतजमीन कसणाऱ्या भूमिहीन शेतकाऱ्यांच्या जमिनीची नोंद सातबाऱ्यावर होत नाही.गांवातील बौद्धांचे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जागरूकता बहुजनास सहन होत नाही.म्हणून अन्याय, अत्याचार व लक्षवेधी हत्याकांड  होत आहेत. म्हणजेच आपण जिथून सुरुवात केली होती.ते समस्या आज ही कायमस्वरूपी अस्तित्वात आहे. यांचा आपणास राजकीय सोयी साठी सोयीस्कर विसर करावा लागत असेल तर सामाजिक आंदोलन राजकिय दृष्ट्या यशस्वी कसे होईल असा माझा प्रश्न आहे.तो तुमच्या भक्तांना कार्यकर्त्यांना चुकीचा वाटत असे.तर त्यांनी आपल्या तालुक्यातील, जिल्ह्यातील असंघटित कष्टकरी शेतमजूर, भूमिहीन लोकांचा सर्वे करावा.
आदरणीय ऍड बाळासाहेब आंबेडकर भारिप बहुजन महासंघाचे राष्टीय अध्यक्ष झाल्यावर " माझा पक्ष,माझी सत्ता " घोषणा दिली.आणि मी आंबेडकरी चळवळीतील राजकीय निळ्या आकाशातील चमकणारे तारे आहोत.हे दाखवून दिले.ज्या डॉ बाबासाहेबाच्या रक्ताचे आपण वारसदार आहेत.त्या बाबासाहेबानी आपले आयुष्य अस्पुष्य समाजाला धार्मिक,सामाजिक,शैक्षणिक आणि राजकीय अधिकार मिळवून देण्यासाठी खर्ची केले.त्यासाठी त्यांनी अनेक राजकीय सामाजिक शैक्षणिक संस्था,संघटना, पक्ष निर्माण केल्या. त्याची सुरवात त्यांनी "बहिष्कृत हितकारणी सभा " स्थापन करून केली.पुढे त्याचा विस्तार करत "समाज समता संघ " उभा केला.राजकीय क्षेत्रात आपले हक्क प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी 'स्वतंत्र मजूर पक्ष ' स्थापन केला. भारतदेश हा कृषी प्रधान आहे ७०% लोक शेतीवर मजुरी करून जगतात.त्यातील ८५% समाज हा बहुजन समाजातील आहे.म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,विमुक्त भटक्या जाती, इतर मागासवर्गीय,आदिवाशी समाजातील लोक आहेत.हे सर्व भारिप बहुजन महासंघाचे अधिकृत सभासद असणारच. त्याच्या साठी बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करून राजकीय हक्क्चे व्यासपीठ निर्माण केले होते. तो पक्ष ते विचार आज कोणा कडेच जिवंत नाहीत.देशातील मागासवर्गीय कामगार कर्मचारी यांनी स्वतःच्या ट्रेंड युनियन काढून त्या 
​स्वतंत्र मजदूर युनियन Independent Labour Union (ILU).​
 
संलग्न कराव्यात आणि राष्ट्रीय ट्रेंड युनियन निर्माण करून सरकारवर कायमस्वरूपी दबाव ठेवावा हेच मागासवर्गीय समाजाचे कामगारांचे मुख्य उद्धिष्ट असले पाहिजे होते.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले ल्या गोष्टीकडे कार्यकर्ते नेते पूर्णपणे दुर्लक्ष करतात. बाबासाहेबांनी दाखविलेल्या मार्गाने न जाता नवीन मार्ग शोधतात त्यात आपली मोठी शक्ती खर्च होतेच पण मतभेदांमुळे आंबेडकरी चळवळीतील सर्व समाज विखुरलेल्या जात आहे.यात आपली निर्णायक भूमिका आणि जबाबदारी असली पाहिजे होती.ती आपण पार पाडतांना दिसत नाही.
बाळासाहेब मागासवर्गीय बहुजन समाज हा सर्वात मोठा असंघटीत कामगार आहे.आज त्याची संख्या सरकारी ९३% आहे.त्याचा विकास आणि कल्याण करण्यासाठी अनेक योजना आहेत.त्याची आपणास संपूर्णपणे माहिती असणारच.पण आपण म्हणता की सरकारी योजना मागासवर्गीय समाजाला अपंग बनवितात.मग डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मागासवर्गीय समाजाच्या उन्नतीसाठी, कल्याणासाठी विकासासाठी राज्य व केंद्रात ज्या योजना कायदेशीर रित्या बनवुन देशाला अर्पण केला.त्या चुकीच्या होत्या काय?.डॉ बाबासाहेब आंबेडकर याचे स्वप्न होते की माझा समाज सत्ताधारी जमात व्हावा.महाराष्टातील आजची राजकीय वर्तमान स्थिती पाहता रिपब्लिकन पक्षातील फुट एकजातीय आहे.केवळ सर्व बौद्ध समाज एकत्र आला तर राजकीय टक्केवारी पाहता सत्ताधारी बनू शकत नाही.पण सर्व बौद्ध समाजातील आंबेडकरी गट एकत्र आले तर एकच गट मजबूत होऊ शकतो.त्याची एकी पाहून इतर मागासवर्गीय आदिवाशी भटक्या समाजातील लोक या पक्ष कडे आकर्षित होऊ शकतात.त्यासाठी एक विश्वास पात्र नेत्याची गरज आहे. आणि ते फक्त बाळासाहेब आंबेडकर असु शकतात.त्यासाठी त्यांना दूरदर्शी व धोरणी,मुत्सद्दी पण दाखवावा लागेल. विद्यार्थी दसे पासून ज्यांनी आंबेडकरी चळवळीत अन्याय अत्याचार विरोधात संघर्ष केला.आणि सत्ते जवळ गेले त्यांना जर आपण बांडगुळ म्हणणार असाल तर?.असे लोक प्रत्येक जिल्ह्यात आहेत. मागासवर्गीय समाजात आंबेडकरी चळवळी त्यांना मान्यताप्राप्त नेता म्हणून मानले जाते त्यांना आपण चॅनल मीडिया प्रिंट मीडिया समोर ओळखत नाही असे सांगता. पण चळवळीतील जेष्टनेत्याच्या श्रद्धांजली सभेत त्यालाच उभे राहण्यासाठी हात देता.त्यांच्या मातोश्रीच्या अंत्यसंस्कार यात्रेत सहभागी होता.हे कौतुकास्पद आहेच  यांचा समाजात प्रचंड परिवर्तन घडविणारा संकेत जातो. यासाठी बाबासाहेबांनी सांगितलेल्या कथेचे पारायण सर्व गटाच्या प्रमुखना करावे लागेल.२१ जानेवारी १९४९ रोजी औरंगाबादला झालेल्या कार्यकमात बाबासाहेब आपल्या अनुयायांना उदेशून सांगतात.जो पर्यंत तुम्ही तुमची मजबूत संघटना जगाला इतर समाजाला दाखवत नाही तो पर्यंत तुमच्यावर असे अनेक प्रकारचे अन्याय अत्याचार होतच राहतील.म्हणून दुसऱ्यावर अवलबून राहू नका.स्वताची ताकद निर्माण करा.मग पहा तुम्हाला कोण त्रास देतो. तुमच्यावर हल्ला करण्यासाठी त्यांना शंभर वेळ विचार करावा लागेल.बाळासाहेब आज जो तो नेता संस्थापक राष्टीय अध्यक्ष आहेत.त्यांना त्याची मर्यादा आपण दाखवू शकता.प्रत्येक नेत्याला त्याचा मतदार संघ वाटून द्या इतर जिल्ह्यात मतदार संघात ढवळाढवळ करण्याचीही कोणालाही गरज नाही.आपण लिहता की आंबेडकरी चळवळीचा व आंबेडकरी विचाराचा माणूस मोठ्या प्रमाणत मुंबई,नांदेड, विदर्भातील बुलढाणा,अकोला,भंडारा,गोंदिया, चंद्रपूर,नागपुर,गडचिरोली,असे काही आंबेडकरी जिल्हे आहेत. तिथे आंबेडकरी विचारधारेची माणस घडविण्याची गरज आहे.(आंबेडकरी चळवळ संपली आहे,पान ४१/४२ )
      ऍड बाळासाहेब आंबेडकर उर्फ  प्रकाश आंबेडकर यांच्यावर लिहणे म्हणजे खूप मोठी जोखीम असते .त्याच्या भक्तांना त्याच्या बाबत खरे लिहणे पसंत पडत नाही.प्रकाश यशवंत आंबेडकर हे आंबेडकरी चळवळीतील एक तरुण तडपदार नेतृत्व म्हणून प्रसिद्ध आहेत, पण त्याच बरोबर ते अत्यंत अभ्यासू, दूरदर्शी व धोरणी,मुत्सद्दी नि परिवर्तनवादी म्हणून ही त्यांची ख्याती आहे असे म्हणतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ते नातू असल्यामुळे सर्व समाज त्यांचा खूप आदर करतात. पण त्या पलिकडे जाऊन एक स्वतंत्र व्यक्तीमत्व म्हणून त्यानी स्वत:ची ओळख निर्माण करत राजकारणात व समाजकारणात मोठी मजल मारली. खरं तर बाबासाहेबांच्या घरात जन्माला आल्यावर नावाचा जो फायदा मिळतो तो मिळालाच पण त्याच बरोबर मोठ्या माणसाच्या घरात जन्मास येण्याचे तोटे ही असतात.प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू असल्यामुळे उगीच लोकांच्या अपेक्षाही उंचावल्या अन त्यात काही वावगं ही नाही.मात्र त्यातून सावरत त्यानी स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करत अकोल्यात वेगळा राजकीय आदर्श घालून दिला.एकमेव नेता असा आहे कि ज्याचा स्वताचा मतदार संघ आहे.बाकी सर्व आंबेडकरी चळवळीतील राजकीय नेते उंटावरचे शहाणे आहे.जे स्वताला संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घेतात पण वीस वर्षात स्वताचा मतदार संघ बांधू शकले नाहीत.म्हणूनच बाळासाहेब आंबेडकर यांनी आंबेडकरी चळवळीचे राजकीय वारसदार बनावे.करीता मित्रांना शत्रू न बनविता मित्रच राहु द्या मित्र शत्रु झाल्यास काय होते हे एका गोष्ठीतुन पाहता येईल. एकदा कुत्र्यात व गाढवात पैज लागते की जो लवकरात लवकर मुंबईत जाईल तो सिंहासनावर बसेल. ठरल्याप्रमाणे दोघेही तयार झाले.कुत्र्याला वाटले मीच जिंकेल कारण गाढवापेक्षा मी जास्त धावू शकतो.पण कुत्र्याला पुढे काय होणार यांची नक्की माहिती नव्हती.शर्यत सुरू झाली कुत्रा जोरात धाऊ लागला.पण थोडेसे पुढे गेला नसेल तर लगेच गल्लीतील कुत्र्यांनी त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला.असेच प्रत्येक गल्लीत प्रत्येक चौकात घडत राहिले कसा बसा कुत्रा धावत धावत सिंहासना जवळ पोहचला तर बघतो तर काय ?. गाढव त्या आधीच पोहचले होते.त्यामुळे त्याने शर्यत जिंकून ते राजा झाला होता.निराश झालेला कुत्रा तेव्हा म्हणतो माझ्याच लोकांनी मला मागे ओढलं नसते तर आज गाढव सिंहासनावर बसले नसते.हीच परिस्थिती मागासवर्गीय बहुजन समाजातील नेत्यांची कार्यकर्त्यांची झाली आहे.म्हणूनच आपल्या माणसांना विश्वासात घ्या,पुढे जाण्यासाठी सहकार्य करा.त्यांना प्रोत्साहन द्या,नाहीतर बाहेरची गाढव आपल्यावर राज्य करीत राहतील.म्हणूनच 
बाळासाहेब आपल्या कडून सर्व समाजाची खूप अपेक्षा आहे.आपण समाजाचे ऐक्य घडवू शकतात.पण आपला अभिमान आडवा येतो. आपण  स्वाभिमानी आहात, स्वाभिमानी असावे पण समाज हिता करिता अभिमान आणि स्वाभिमान. समान अंतरावर ठेवल्यास बाबासाहेबाचे खरे रक्ताचे नाही तर वैचारिक वारसदार आपणच ठरू शकता. फक्त आपल्याला वीस पावले मागे येऊन पन्नास पावले पुढे जाता येईल.आपण पंधरा वीस आमदाराची अपेक्षा करता. ऐक्य झाल्यास पन्नास साठ आमदार आपण सहज निवडून अनु शकता.त्याकरिता आपल्या समोर आंबेडकरी जिल्ह्याची अभ्यासपूर्ण माहिती आहे.त्याचा योग्य वापर करा आणि आंबेडकरी चळवळीतील समाजाचे ऐक्य घडवा.आणि आंबेडकरी चळवळीचे राजकीय वारसदार बना!.आपल्या वाढदिवसा निमित्त सर्व वाचकास  हार्दिक शुभेच्छा 

आपला 

शुक्रवार, १३ एप्रिल, २०१८

कांशी तेरी नेक कमाई तुने सोती कोम जगाई

कांशी तेरी नेक कमाई तुने सोती कोम जगाई 
भारतीय राजकारणात जातीला आणि त्यांच्या समूहाला जे नांव दिल्या जाते तेच त्याचे हुकमी पत्ते असते.छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वजाती धर्मातून जे तडपदार तरुण गोळा केले त्यांना त्यांनी नांव दिले होते मावळे.हेच मावळे शिवाजी महाराजा च्या नेतृत्वात संघटीत झाले.स्वकियाशी ३२आणि परकीयाशी १२ लढाया लढून त्यांनी रयतेचे राज्य स्थापन करून स्वराज निर्माण केले, महात्मा जोतीराव फुलेंनी सर्व ब्राम्हण सोडून सर्व समाजाला ब्राम्हणेतर म्हणून संघटित केले आणि सत्यशोधक समाज निर्माण केला. देशातील पहिली असंघटीत बांधकाम व गिरणी कामगार संघटना बांधली.त्यांना कामगार म्हणून मान्यता मिळवून रावबहादूर नारायण मेंघाजी लोखंडे सारखा तडपदार वैचारिक संघर्ष करणारा नेता दिला.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मूक नायक समाजाला प्रबुद्ध मानव बनविले आणि सामाजिक,शैक्षणिक,आर्थिक परिवर्तन घडवून राजकीय परिवर्तन घडविण्याची ताकद मागासवर्गीय समाजात निर्माण केली.म्हणूनच देश भरात मागासवर्गीय समाजाचे लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत ते राष्ट्रपती पर्यंत निवडून जातात. कांशी तेरी नेक कमाई तुने सोती कोम जगाई पण ते गुलामी स्विकारतात त्याला नाईलाज आहे. 
कांशीराम यांचा जन्म १५ मार्च १९३४ ला झाला.मृत्यू ९ ऑक्टोंबर २००६ ते भारतीय राजकारणातील व ​सामाजिक क्षेत्रातील विशेष तदन म्हणून ओळखल्या जात होते.त्यांनी भारतीय वर्ण व्यवस्था मोडून काढण्यासाठी सर्व मागासवर्गीय समाजात प्रचंड प्रबोधन करून जनजागृती केली.बहुजन समाज हि देशात ओळख निर्माण केली राजकीय परिवर्तन केले.दलित शोषित संघर्ष समिती डीएसफोर च्यामुळे उतरभारतात मागासवर्गीय समाजाची ओळख बहुजन समाज झाली. ​१९७१ ला त्यांनी अखिल भारतीय पिछडा और अल्पसंख्याक समुदाय कर्मचारी महासंघ म्हणजे All India Backward and Minority Communities Employees Federation (BAMCEF) १४ एप्रिल १९८४ बहुजन समाज पार्टी BSP ची स्थापना केली.सर्व समस्यांची गुरुकिल्ली हि सत्ता असते सत्ता सर्व कुलुपाची चाबी असते. डॉ बाबासाहेब आंबेडकर ते मायावती व्हाया मान्यवर कांशीराम यांची ही चळवळ १९३२ ते १९८२ प्रबोधन करून संघर्ष करीत संघटित झाली,म्हणूनच २००७ ला उतर प्रदेशात पूर्ण बहुमताने निवडून आली होती आणि देशात एक नवा प्रेरणादायी इतिहास लिहला गेला होता.देशातील पहिला  मागासवर्गीय महिला व देशातील सर्वात मोठ्या राज्याची मुख्यमंत्री बनली.आणि त्याच बरोबर २००७/२००८ यावर्षी २६ करोड रुपये इन्कमटॅक्स भरणारी पहिली एक राजकीय दलित महिला नेता ठरली होती.ते केवळ मान्यवर कांशीराम यांच्या वैचारिक संघटना कौशल्यावर.जी बसपा देशातील बहुजन समाजाला सांगत होती " बाबा तेरा मिशन अदूर बी एस पी करेगी पुरा !." ती बसपा २०१२ च्या विधान सभा आणि लोकसभा निवडणुकीत चारीमुंड्य चीत झाली. त्यामुळे देशातील मागासवर्गीय समाज आपल्या १९३२ च्या परिस्थिती वर आला.ज्या हिंदुत्वाच्या विरोधात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्ष सुरु केला होता त्याच जाग्यावर मायावती येऊन थांबल्या आहेत.कारण मान्यवर कांशीराम यांनी आपल्या जीवनभर चमचा युगाचा धिक्कार केला.सत्ता आल्यावर कसे चमचे तयार होतात त्याचा वापर समाजाला तोडणारे हत्यार म्हणून कसा सारखा होतो हे मायावतीच्या कार्यकाळात दिसून आला.त्यासाठी आपण प्रथम कांशीरामजीची हत्यार आणि चमचा ही मांडणी समजून घेणे जरुरी आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे करारावर प्रतिकीर्या देताना सांगितले होते कि संयुक्त मतदार संघ म्हणजे एक गलिच्छ उपनगर ज्या नगराचा उमेदवार ठरविण्याचा अधिकार उच्च वर्णीय लोकांना आहे.आणि त्याचा समाजाचा सत्यानाश करण्यासाठी वापर करने म्हणजेच कांशीरामजी च्या शब्दात चमचा.चमचा हा घराघरात वापरल्या जाणारे हत्यार आहे.जे स्वत कोणतेही काम करू शकत नाही.पुणे करारा नंतर राजकारण्यांनी असेच चमचे मागासवर्गीय समाजात अल्पसंख्याक पीडित शोषित आदिवाशी समाजात निर्माण केले.चमचा चा वापर नेहमी आपल्या फायद्या साठीच होतो.त्यामुळे तो कोणाचे नुकसान स्वत करीत नाही कोणाच्या सांगण्या वरून करतो.कांशीराम यांच्या बसपा ची बहुजन हिताय बहुजन सुखाय घोषणा जेव्हा मायावतीने सर्वजण हिताय केली तेव्हा सत्ता आल्यावर चमचा आणि हत्यार कसे वापल्या जाते हे दिसून येते.मायावती सत्ता चालविण्यास,समाजाच्या आणि राज्याच्या हिताचे निर्णय घेण्यास समर्थ आहे.उतर प्रदेशात स्मारक आणि स्वताच्या प्रतिमा लावण्यास राज्य शासनाचा निर्णय असल्या मुळे सुप्रीम कोर्ट भी मायावतीला रोखू शकले नाही.पण मायावतीने राज्यात कांशीराम आणि मायावतीचे पुतळे उभे करण्या पेक्षा बहुजन समाजातील मुलामुलींना शिक्षणा वर भर दिला असता तर आजचे चित्र वेगळे असते.केवळ अनेक विद्यालयाला महाविद्यालयाला महापुरुषाच्या नांवे देऊन वैचरिक समाज क्रांती होत नाही. जिल्ह्याचे नांव सर्व महापुरुष संत महामाताच्या नांवे केले. त्यामुळे मागासवर्गीय समाजात विशेष चमार समाजात काय बदल झाला?.हे कांशीरामजीचे तत्वज्ञान मायावतीने मातीमोल करून ठेवले त्यामुळे चमचा युग काय करू शकते २०१२ च्या निवडणुकीने दाखवून दिले. 
मुझे पढे लिखे लोगोने धोका दिया असे.डॉ बाबासाहेब आंबेडकर खेदाने मत व्यक्त केले होते.पण त्याच पढे लिखे लोकांना संघटीत करून बामसेफ संघटना बनविली आणि त्याच्या कडून पैसा व बुद्धी प्रशासकीय अनुभव समाजास मिळवुन दिला.त्यातूनच त्यांनी डीएस फोर DS4 दलित शोषित समाज संघर्ष समिती द्वारे समाजात जनजागृती केली.त्याची सुरुवात ही सायकलवरून झाली.पुण्याला असताना त्याची एक दिवस इराणी हॉटेल समोर ठेवलेली सायकल चोरी गेली.त्यामुळे खूप कोध्रीत झाले.त्यांनी हॉटेल मालकावर खूप राग काढला तेव्हा मालकाने आपले लोक कामाला लावले तेव्हा ते खूप खुश झाले. कार्यकर्त्याना सांगितले सायकल हि माझ्या साठी एकमात्र साधन आहे.ते केवळ साधनच नाही तर बहुजन मिशनचे सर्वात महत्वाचे साधन आहे.यावरच त्यांनी भारत भर सायकल यात्रा काढली.कांशीराम जी यांनी आपल्या पन्नास वर्षात बहुजन समाजात जनजागृतीसाठी चाळीस दिवसात चार हजार किलोमीटर सायकलवरून यात्रा केली.देशातील नव्हे तर जगातील कोणत्याही समाज सुधारक,राजकिय नेत्याने असे धाडस केलेले नाही.कांशीराम जी यांनी पहिली सायकल यात्रा पेरियार ई व्ही रामास्वामी नायकर यांच्या जयंती दिनी म्हणजे सतरा सप्टेंबर १९८८ ला कन्याकुमारी वरून सुरवात केली.दुसरी कोहिमा ,तिसरी कारगिल,चौथी पुरी,पांचवी पोरबंदर वरून काढली आणि २७ मार्च १९८९ दिल्ली विशाल रैलीत बदल करून बहुजन समाजाची शक्ती दाखवून दिली.  
कांशीराम जी ने रात्र दिवस मेहनत करून वाढविलेली बसपा मायावतीने चमच्या लोकांच्या सल्ल्याने देश भरातील कॅडर बेस कार्यकर्ते संपवले.मायावतीचे सर्व निर्णय अचूक असतील तर चाळीस मंत्री भष्टाचार कसे करतात. आमदार,मंत्रीमंडळ, कैबिनेटचे सर्व निर्णय जर मायावती घेत असतील तर पक्ष संघटनेत चमचे कसे निर्माण होतात. कांशीरामजीने मायावतीवर जो विश्वास दाखविला त्याला तडा गेला आहे.मिशनरी कार्यकर्त्यांना चमचा समजून पक्षातुन बेदखल करून बसपाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे.काही चमच्यांना त्याच्या समाजाच्या विरोधात उभे केले जाते.तर मिशनरी कार्यकर्त्यांना त्यांच्या समाजाच्या हिता साठी उभे केले जाते.चमचा आपल्या समजतील सच्या नेत्याला कमजोर बनवितो तर मिशनरी कार्यकर्ता आपल्या समाजातील सच्या नेत्याला मजबूत बनवितो.कांशीरामजीची संघटन कौशल्य आणि मायावतीचे संघटन कौशल्य यातील फरक आज प्रत्येक राज्यात दिसून येत आहे.त्यामुळे कांशी तेरी नेक कमाई तुने सोती कोम जगाई या घोषणाचा 
​असर आज कमी झालेला वाटत असला तरी हाच मागासवर्गीय समाज देशभरातील विविध क्षेत्रात सत्तेत भागीदार झालेला आहे तो मान्यवर कांशीराम यांच्यामुळे त्यांना त्यांच्या जयंती दिना निमित्य त्यांच्या क्रांतिकारी विचाराला कोटी कोटी प्रमाण  
सागर रामभाऊ तायडे,भांडूप मुंबई - ९९२०४०३८५९

हाच का सम्राट अशोकाचा भारत?.

हाच का सम्राट अशोकाचा भारत?.

 सम्राट अशोकाला भारताच्या इतिहासात सर्वांत महान सम्राटांचे स्थान दिले आहे. प्राचीन भारताच्या परंपरेत चक्रवर्ती सम्राटांची पदवी ज्यांनी जनमानसावर तसेच भारताच्या मोठ्या भूभागावर राज्य केले अशाच महान सम्राटांना दिली जाते. भारताच्या इतिहासात असे अनेक चक्रवर्ती सम्राट होउन गेले ज्यांचे उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये रामायण,महाभारत इत्यादी आहेत प्राचीन चक्रवर्ती सम्राटांच्या पंक्तीतील अशोक हा शेवटचा चक्रवर्ती सम्राट झाला त्यानंतर कोणीही त्या तोडीचा राज्यकर्ता भारतात झाला नाही.म्हणूनच मान्यवर कांशीराम आपल्या कॅडरबेस कार्यकर्त्यांना नेहमी सांगत होते बहुजन ​समाज पार्टीला सम्राट अशोकाचा भारत निर्माण करायचा आहे.अशोकने भारताच्या बहुतांशी भागावर राज्य केले​.​बसपाला मानणारा बहुसंख्य बहुजन समाज भारताच्या कोण्या कोण्यात बसलेला आहे.उत्तर भारतातील बहुसंख्य ओबीसीनी मुंबईत व नागपुरात धम्मदिक्षा घेतली,ज्यात मौर्य समाजाचे मोठे योगदान आहे,मौर्य समाज हा सम्राट अशोकाच्या रक्ताचा वारसदार आहे असे म्हणतात ​पण तो मोठ्या संख्येने हिंदुत्व मानसिकतेने पछाडलेला होता आणि आहे.उत्तर प्रदेश च्या एका पोटनिवडणुकीत समाजवादी पार्टीचा मागासवर्गीय उमेदवार ?.
लडाक ​,जम्मू, काश्मीर मध्ये बसपाचा आमदार, खासदार निवडून येण्या मागे सम्राट अशोकाचा भारत ही विचारधारा 
होती
.पाकीस्थान,अफगाणीस्तान पूर्वेकडे बांग्लादेश ते दक्षिणेकडील केरळ पर्यंत अशोकाच्या साम्राज्याच्या सीमा होत्या. कलिंगाच्या युद्धातील महासंहारा नंतर कलिंग काबीज झाला, जे कोणत्याही मौर्य राज्यकर्त्यास पूर्वी जमले नव्हते. ते सम्राट अशोकाने करून दाखविले. त्याच्या राज्याचे केंद्रस्थान ज्याला आताचे बिहार म्हणजे तेव्हाचा मगध होता, बिहारची राजधानी पाटणा म्हणून ओळखली जाणारी तेव्हाची पाटीलपुत्र ही त्याची राजधानी होती.याचे एतिहासिक पुरावे आज पटना शहरात पाहण्यास मिळतात.कलिंगाच्या युद्धात  झालेल्या प्रचंड मनुष्य हानी पाहून सम्राट अशोकाने हिंसेचा त्याग केला व बौद्ध धर्माचा स्वीकार केला व नंतरच्या आयुष्यात त्याने स्वतःला बौध्द धम्मचा प्रचार आणि प्रसार करण्या करिता समर्पित केले अशोकाच्या काळातील अशोकाच्या संदर्भातील अनेक शिलालेख भारताच्या काना कोपर्‍यात सापडतात त्यामुळे अशोकाबाबतची उपलब्ध ऐतिहासिक माहिती भारताच्या प्राचीन काळातल्या कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तीपेक्षा अधिक आहे.
अशोकाने कलिंगचे युद्ध पार पडल्यानंतर जिकलेल्या रणांगणाची व शहरांची पहाणी करायची ठरवले. त्यावेळेस त्याने फक्त सर्वत्र पडलेले प्रेतांचे ढीग, सडण्याचा दुर्गंध, जळलेली शेती, घरे व मालमत्ता पाहिली. ते पाहून अशोकाचे मन उदास झाले व यासाठीच का मी हे युद्ध जिंकले, व हा विजय नाही तर पराजय आहे, असे म्हणून स्वतःला त्या प्रचंड विनाशाचे कारण मानले. हा पराक्रम आहे की दंगल, व बायका मुले व इतर अबलांचा हत्या कशासाठी व यात कसला प्रराक्रम असे स्वतःलाच प्रश्न विचारले. एका राज्याची श्रीमंती वाढवण्यासाठी दुसर्‍या राज्याचे अस्तित्वच हिरावून घ्यायचे? ह्या विनाशकारी युद्धानंतर शांती,अहिंसा, प्रेम,दया ही मूलभूत तत्त्वे असलेला बौद्ध धम्माचा मार्ग अशोकाने अवलंबायचे ठरवले. त्याने स्वतः बौद्ध धर्माचा प्रसारक म्हणूनही काम करायचे ठरवले. यानंतर अशोकाने केलेले कार्य त्याला इतर कोणत्याही महान सम्राटांपेक्षा वेगळे ठरवतात. ज्यात क्रूरकर्मा राज्यकर्त्याचे महान दयाळू सम्राटात रुपांतर झाले अशीकलिंगाचे युद्ध ही इतिहासातील एक अतिशय वेगळी घटना समजली जाते. बौद्ध धर्माचा जगभर झालेल्या प्रसारास खूप मोठ्या प्रमाणावर अशोकाने केलेले कार्य जबाबदार होते असे बहुतेक इतिहासकार मानतात.तरी उत्तर भारतातील मागासवर्गीय ओबीसी बौद्ध धम्मा​कडे न जाता स्वतःला जास्तच सवर्ण समजत होते.जेव्हा अन्याय अत्याचार आणि भीषण हत्याकांड झाली तेव्हाच त्यांना आपण कोण आहोत आणि आपले पूर्वज कोण होते यांची आठवण होते.त्यांनी लोकसंख्येच्या बळावर राजकीय परिवर्तन घडविणे अपेक्षित असते.मान्यवर कांशीराम यांनी बौद्धधम्माची दिक्षा जाहीर पणे घेतली असती तर उत्तर भारत सम्राट अशोकाचा भारत झाला असता.त्यांची चूक उत्तर भारतातील ओबीसी नी सुधारली आता मायावतीने कोणाचा आदर्श घ्यावा हे ठरविले पाहिजे. किती दिवस आर एस एस प्रणित भाजपा​ला धर्मपरिवर्तनाच्या धमक्या देणार?.आणि राजकारण करणार करीत राहणार?.सम्राट अशोकाचा भारत बौद्धमय करण्यासाठी मागासवर्गीय ओबीसी तयार आहे हे देशातील धम्मदिक्षा सोहळ्यावरून दिसत आहे.
इतिहास सांगतो वैशाली (बिहार) येथील अशोक स्तंभ अशोकाच्या ह्या कार्यात त्याला देवीपासून झालेल्या मुलांची मोठी मदत झाली.अशोकाचा मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा ह्यांनी भारताबाहेर श्रीलंकेत जाउन तेथील राजाला बौद्ध धम्माची ​शिकवण दिली यामुळे भारतापुरते मर्यादित राहिलेला हा ​धम्म भारताबाहेर पसरण्यास सुरुवात झाली. असे मानतात की अशोकाने बौद्ध धर्मीयांसाठी हजारो स्तूपांची व विहारांची निर्मिती केली. त्यांतील काही स्तूपांचे अवशेष आजही पहावयास मिळतात. यातील मध्यप्रदेशात सांची येथील स्तूप प्रसिद्ध आहे, हा स्तूप अशोकाने बांधला आहे.​
मायावतीने असेच बुद्ध सम्राट अशोक,महात्मा ज्योतिबा फुले,राजर्षी शाहू महाराज डॉ भिमराव बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक वारसा सांगून ऐतिहासिक वास्तू जिल्हे,विद्यापीठ निर्माण केले पण धम्मदिक्षा घेतली काय?.सम्राट अशोकाने आपल्या कारकिदीतील पुढील वर्षांमध्ये अहिंसा हे राष्ट्रीय धोरण बनवले, जंगलामध्ये चैनीसाठी होणारी प्राण्यांची शिकारीवर बंदी आणली, प्राण्यांवर होणार्‍या कोणत्याही प्रकारची हिंसकतेवर ही बंदी आणली तसेच शाकाहाराला प्रोत्साहन देण्यात आले. शिक्षा मिळालेल्या कैद्यांना अशोकाने सहिष्णूपणे वागवले. गुणी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी अनेक विद्यापीठे तसेच, शेतकर्‍यांसाठी पाण्याचे कालवे बांधले. त्याच्या राज्यात सर्व प्रकारच्या जातीधर्माच्या लोकांना सहिष्णुरीत्या वागवले जाई. तसेच अशोकाने आपले एकेकाळी ज्याच्यांशी युद्धे केली त्यांच्याशीही मैत्रीपूर्ण संबध वाढवले. सम्राट अशोकाने अनेक समाजोपयोगी कार्ये केली.अशोकाने आपल्या कारकीर्दीत राज्यात अनेक रुग्णालये व महामार्गाचे जाळे निर्माण केले, रस्त्यांच्या कडेला वृक्षांची लागवड ही अशोकाचीच कल्पना आहे, असे मानतात. आपण सम्राट असल्याच्या अधिकाराचा फायदा त्याने समाजोपयोगी कार्यासाठी केला. त्यानंतर अशोकाला धम्मअशोक असे म्हणू लागले. अशोकाने धम्माची प्रमुख आचारतत्त्वे विशद केली, अहिंसा, सर्व जातिधर्मांबद्दल सहिष्णुता, वडिलधार्‍या माणसांना मान देणे,संत​,महात्मा​, शिक्षकांना योग्य तो मान देणे, दासांना माणुसकीने वागवणे. अशा आचार तत्त्वांना जगात कोणताही समाज नाकारू शकणार नाही. अशोकाच्या इतिहासकारांनुसार त्याने कलिंगाच्या युद्धानंतर कोणतेही प्रमुख युद्ध छेडले नाही परंतु त्याला शेजारी राष्ट्रांशी ग्रीक राज्ये, चोल साम्राज्ययाच्याशी त्याला नेहमी युद्धाची शक्यता वाटत होती. परंतु अशोकाने पूर्वायुष्यातील केलेल्या मोहिमांमुळे व मगधच्या सामर्थ्यामुळे अशोकने बौद्ध धर्म स्वीकारला तरी त्याच्या शेजारी राज्यांनी त्याला छेडण्याचे साहस केले नाही. तसेच बौद्ध धर्म स्वीकारला, अहिंसा हे राष्ट्रीय धोरण बनवले तरी मगधाचे सैनिकी सामर्थ्य अबाध्य ठेवले. अशोकाला ग्रीक जगताची माहिती होती असे कळते. तसेच चंद्रगुप्त मौर्याने केलेल्या ग्रीकांविरुद्धच्या मोहिमांमुळे मौर्य साम्राज्याची कीर्ती ग्रीस,  इजिप्तपर्यंत पोहोचली होती असे कळते.मग सम्राट अशोकाचा भारत बौद्धमय होण्यास वेळ का लागतो. राजकीय गणिते मांडत राहिल्यास अशोकाचा भारत बौद्धमय होईल काय?. हे देशभरातील भव्य धम्मदिक्षा सोहळे केवळ ढोंग आहेत असे म्हणल्यास चूक ठरणार नाही. आज देशात लोकशाही मार्गाने सत्ता काबीज करून लोकशाहीचा सरळ खून करण्याचे कारस्थान उघड उघड होत आहे.लोकशाहीची सर्व मूल्य पायदळी तुडवून ठोकशाही,हुकूमशाही निर्माण होतांना दिसत आहे.सम्राट अशोक ते छत्रपती शिवाजी,संभाजी महाराज यांना ज्या मनूस्मृती संपविले त्याचं पद्धतीने आज लोकशाही संपत आहे.म्हणूनच विचारावेसे वाटते हाच का सम्राट अशोकाचा भारत?.
 सागर रामभाऊ तायडे भांडुप मुंबई ९९२०४०३८५९.

रामराज्याची सुरवात झाली!.

रामराज्याची सुरवात झाली!.
रामराज्यात शूद्र अतीशुद्रानां,महिलांना शिक्षण घेण्याचा ,ज्ञान व धन,संपत्ती संचय करण्याची बंदी होती.त्यामुळेच शंभूक मारल्या गेला,कारण त्याने शिक्षण व ज्ञान घेतल्यामुळे ब्राह्मणाचा मुलगा मेला होता.म्हणूनच मागासवर्गीय समाजाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता. भारत स्वतंत्र होऊन ७२ वर्ष होत आहेत तरी ग्रामीण भागातील मागासवर्गीय समाजाला स्वतंत्र पणे  जगण्यास मनाई केली जाते.सुवर्ण समाजाने त्यांच्या शेतात काम करण्यास सांगितले असता मागासवर्गीय समाजाच्या तरुणाने विरोध केल्यामुळे आठ दहा सुवर्ण तरुणांनी त्याला केवळ मारहाण केली नाही तर त्यांचे हात पाय मोडून काढले व त्यांची मोबाईल वर शूटिंग करून सोशल मीडियावर शेयर करण्याचे धाडस केले. गुजरात मध्ये एक मागासवर्गीय समाजाच्या तरुणांनी मोलमजुरी करून घोडी विकत घेतली आणि त्यावर तो बसुन गावांत जात होता ते गांवातील सुवर्ण समाजाला सहन झाले नाही त्यांनी त्याला घोडी सह मारून टाकल्याची बातमी सोशल मीडियावर देशभरात फिरत आहे,एकूण देशभरातील मागासवर्गीय समाजावर होणारे अन्याय,अत्याचार हल्ले व हत्याकांड त्यांची कायदेशीर नोंद घेऊन गुन्हे दाखल करणारा 
ऑट्रोसिटी कायदाच रद्द करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला म्हणजेच भारतीय संविधाना नुसार मागासवर्गीय समाजाची कवचकुंडले काढून घेतल्या गेली. त्यामुळे येत्या काळात राम राज्यात जे घडत होते तेच आता घडत आहे म्हणजेच रामराज्याची सुरुवात झाली!.
जगात भारत एकमेव असा देश आहे,जिथे जीवंत माणसा पेक्षा मेलेल्या माणसा वर जास्त प्रेम केल्या जाते.जिवंत पणी त्यांचे सन्मान पूर्वक आदर तिथ करण्यास वेळ नसतो,पण जेव्हा ती व्यक्ति मृत्यु पावते. त्यानंतर भटा ब्राम्हणाच्या सांगण्या वरील त्यांची खुप भक्तिभावाने फोटो लावून सेवा केली जाते,त्याच पद्धतीने या देशातील नागरिकाचे आहे, रामायण आणि महाभारत हे दोन महान कथानक, या दोन महानाट्यतील पात्र दर पांच वर्षांनी बदलत असतात. रामराज्य येणार आणि कंसराजा बनणार असे जनतेला आश्वासन दिल्या जाते.पण रामाने कधीच राज्य केले नाही. कंसाने भिती पोटी बहिण रुखमणी सह राज्यातील कोणत्याही समाजातील जन्म झालेल्या मुलाला जिवंत ठेवले नाही. त्यानुसारच या देशाची जनता ही दर पांच वर्षांनी आपली भूमिका बदलत असते. राजकारणी लोक पक्ष बदलला कि विचारधारा बदलतात. पण व्यवहार आणि व्यवसाय बदलत नाही.देशात साठ वर्ष काँग्रेसने राज्य केले.तेव्हा विरोधी पक्ष कशी भूमिका घेऊन जनतेला सरकार विरोधात उतरविण्याचे काम करीत होती. पण त्यांच्या जनांदोलनात पाहिजे तो दम नव्हता.जनता जास्त मनावर घेत नव्हती तेव्हा त्यांनी रामायणातील राम बाहेर काढला आणि महाभारत घडविले.त्याला थोडे यश प्राप्त झाले.२ चे ८९, ८९चे १२०,१२० चे .१४५ याघडीला १४५चे ३२० खासदार रामायण महाभारता घडविल्यामुळे आले आहेत.ते धर्म,अधर्माच्या लढाईतील कृष्णलीला भागवत गीता नुसार निर्णय घेतात.काळा धन,भ्रष्टाचार, दहशतवादी संपविण्या करीता त्यांनी पांचशे,हजारच्या नोटबंद करून जनतेला रामायण महाभारताची आठवण करून दिली.गेल्या काही दिवसात ती सोशल मिडिया वर फिरत आहे.प्रत्येक घराघरात माणसाला पैसे काढण्यासाठी रांगेत उभे राहावे लागले.आपलेच स्वकष्टाचे पैसे काढताना खूप त्रास सहन करावा लागला. तेव्हा राजकीय लोकांनी रांगेचा फायदा ही प्रसिद्ध महाभारता नुसार घेतला.त्यांचे ते अनुभव बेशरम पणे जनतेला कोणी किती आणि कसे पैसे काढले ते सांगतात गांधारी मी माझ्या शंभर कौरवांना ATM च्या रांगेत उभे करून प्रत्येकी "दोन हजार प्रमाणे" एकुण दोन लाख रुपये काढले. "कुंती" अगं हे तर काहीच नाही. माझ्या पांडवांनी तर द्रौपदी बरोबर लग्न दाखवून एका लग्नाला "अडीच लाख" या प्रमाणे एकुण "साडे बारा लाख" काढले...आहेस कुठे?. हे आहे महाभारत.आज प्रत्येक भारतीय यांचाच नक्की विचार करीत असेल की आपलेच पैसे कसे काढावे.हेच का ते रामराज्य. 
महाभारतात हजारो निरपराध बालकाचा बळी घेणारा कंस आणि गोद्रा हत्याकांडा सह संपूर्ण गुजरात राज्यात निरपराध लोकांचा बळी घेऊन देशाच्या प्रधान सेवक झालेला नरेंद्र मोदी यांची तुलना होऊ शकते काय?. महाभारत घडवून सत्ता परिवर्तन झाले.रामाने कधी राज्य केले नाही तरी राम वनवासातून आल्यावर राम राज्य येईल त्यावेळेस जनतेला वाटत होते तसेच भारतीय नागरिकांना काँग्रेसचे राज्य गेल्या अच्छे दिन येतील या आशा होत्या त्या किती पूर्ण झाल्या यांचा वाचकांनी विचार करावा.
धर्म अधर्माच्या लढाईत मनुवादी भाजपा नेहमी दुतोंडी असते.सत्तेवर नसतांना गोवंश हत्याला कडाडून विरोध करत होती.पण सत्तेवर आल्यावर भारत देश जगातील इतर देशा पेक्षा बीफ एक्सपोर्ट करणारा नंबर एकचा देश कसा काय झाला?. पाकिस्तान जेव्हा जेव्हा भारताच्या सीमेवरील जवानावर हल्ले करीत होते, तेव्हा तेव्हा सत्ताधारी लोकांचा डरपोक म्हणुन उल्लेख करीत होते. आमच्या हाती सत्ता द्या एका तासात पाकिस्तान जगाच्या नकाशा वरून नष्ट करू असे ५६ इंच छाती फुगवुन सांगत होते.आता सत्ता धारी होऊन किती दिवस झाले.?.काय घडले रामायण आठवत नाही.विदेशात जेव्हा सर्व देशाचे पंतप्रधान एकमेकांना भेटून मनमोहन सिंह आणि नवाज शरीफ हात मिळवीत होते.तेव्हा ते नालायक होते.मोदी जेव्हा नवाज शरीफच्या जन्म दिनाचा केक,बिर्याणी खाण्यासाठी न बोलविता पाहुणे म्हणुन जातात ते कोणत्या धर्मात बसते?. हे रामायण आहे की महाभारतात ?.
भारतात सर्वात मोठी सार्वजनिक सेवा म्हणजे भारतीय रेल्वे सेवा,२००४ ते २०१४.रेल्वे भाडे केवळ एक रुपया वाढले तर देशभरात भाजपाने चक्क जाम करून दाखविला.आता सत्तेवर आल्यावर चार वर्षात सत्तर टक्के रेल्वे भाडे वाढविल्याचे बोलले जाते.हे माहित असूनही जनता आंधळी आणि सरकार बहिरे झाले आहे.दोघाची तोंड बंद आहेत.भाजपा विरोधी पक्षात एफ डी आय,जी एस टी, आधार कार्ड,मनरेगा,कोयला खान लिलाव सारख्या अनेक योजनेला प्रचंड विरोध करून जन आंदोलन करीत होती.आता मात्र त्याचं योजन किती महत्वपूर्ण आहेत यांचे गुणगान करीत आहेत.हेच काय ते एकवचनी राम भक्त ?.
दिल्लीच्या निर्भया नांवाच्या एका ब्राम्हण मुलीवर बलात्कार झाला म्हणुन देशभरात तीन महिने जन आंदोलन करीत होती.आता भाजपा प्रणित राज्य सरकारच्या मध्ये प्रदेशात दररोज बारा आणि दिल्ली नऊ बलात्कार होत असतांना देशभक्त रामभक्त डोळे,कान आणि तोंड बंद करून शांत बसले आहेत. हेच का कृष्णाची पवित्र भागवत गिता आदर्श मानणारी भाजपा.
अंतर राष्ट्रीय बाजार भावाने सर्वच देशाला पेट्रोल कच्चा तेल प्रति बैरल भावाने विकले जाते.काँग्रेस सरकारच्या मनमोहन सिंह यांनी १२५ ते १४० डालर प्रति बैरल तेल खरीदी करून देशात ७० ते ७५ रुपये लिटर पेट्रोल विकल्या जात होते ते आजच्या सत्ताधाऱ्यांनी बैलगाडी मोर्चा कडून विरोध केला होता. आताचे सरकार ४० ते ५० डालर प्रति बैरल कच्चे तेल खरीदी करून देशात ७० रुपये प्रती लिटर पेट्रोल विकल्या जात आहे.या मुळे अंतर राष्ट्रीय पातळीवर सरकार कोणत्या विचारांचे आहे ते त्यांच्या देशातील जनतेशी किती प्रामाणिक आहे.यांची नोंद जागतिक पातळीवर जरूर घेतल्या जात असेल.तेव्हा विदेशी पत्रकार ,साहित्यिक अभ्यासक यह राम कोण था?.और रामराज्य क्या है?..क्या इसी तरहा देशवाशी के साथ व्यवहार चालता था!
मनुवादी विचारांच्या भाजपा प्रणित राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोणता ही घोटाळा केल्यास जनतेने त्याला माफ करावे. म्हणजे शिवराज सिहं चा व्यापम व खान घोटाळा, वसुंधरा राजेंचा ललित मोदी घोटाळा, रमण सिंह यांचा पस्तीस हजार करोड़चा अन्न वितरण घोटाला झाला तरी त्यांच्या कडून कोणी राजीनामा मांगीतला नाही. काँग्रेस मधील कोणी ही घोटाळा केल्यास दुसऱ्या दिवसा पासुन राजीनामा मांगण्याची मोहीम चालविल्या जात होती.हाच फरक राम राज्यात होता काय?.रामायण महाभारताचा कोणता आदर्श आज भारतीयांना घेतला आहे.तरुणांना नोकरी देणार,धनगर, मराठा समाजाला आरक्षण देणार,शेतकऱ्यांना हमीभाव देणार हे सांगुण केंद्र व राज्य सरकारने रामराज्याची सुरुवात झाली केली आहे.
सागर रामभाऊ तायडे.भांडूप,मुंबई-९९२०४०३८५९.

भारतला हिन्दुस्थान कधीच बनु देऊ नका

भारतला हिन्दुस्थान कधीच बनु देऊ नका.
जगाच्या नकाशावर हिंदुस्तान कुठे आहे?.हे आर एस एस प्रणित भाजपाच्या केंद्रीय सरकारने दाखवुन द्यावे.राज्यात केंद्रात भाजपा सरकार आल्या पासुन त्यांनी सर्व ठिकाणी हिंदुस्थान हिंदुस्थान हा शब्द प्रयोग करण्याचा झपाटा लावला आहे.त्यामुळे देशभरात बजरंग दल हिंदू वाहिनी, हिंदू जनजागृती समितीचे अंधभक्त गुंडागर्दी करणारे तरुण मागासवर्गीय समाजावर नहाक अन्याय अत्याचार करीत आहेत.तर काही ठिकाणी एकाच पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न करून जातीय दंगली घडविण्याचे षड्यंत्र करीत आहेत.ते स्वतःला किती ही हिंदू म्हणून घेत असले तरी हिंदूंचा खरा अर्थ चोर गुलाम,फारशी शिवी आहे हा इतिहास आहे आणि तो संशोधन करून सिद्ध झालेला आहे. त्यामुळे भारत हा कधीच हिंदुस्थान नव्हता यांचा इतिहास हिंदू म्हणून घेणाऱ्यांनी वाचावा.
आर एस एस प्रणित भाजपा केंद्रीय सरकार पुढच्या २०१९ नंतर आले तर भारतातील सर्व चित्र बदलले जाईल.ते खरे राम राज्य असेल, आणि राम राज्य निर्माण करण्यासाठी प्रथम इंग्रजांनी जे जे निर्माण केले ते नष्ट करावे लागेल. इंग्रजांनी भारतीयांना काय दिले?.इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केले आणि कायम स्वरूपी भारतीयांना उपभोगाच्या योजना सोडून गेले.इंग्रज आले नसते तर भटा ब्राम्हणांनी देशात मंदिर बांधुन दरवर्षी महाकुंभ मेळा भरविला असता. म्हणुन इंग्रजांचे राज्य चांगले होते कि साडे तीन टक्के ब्राम्हणाचे प्रशासकीय राज्य चांगले आहे.हे जरा आजच्या सुशिक्षित तरुणांनी डोळसपणे तपासुन पाहिले पाहिजे. आता प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे त्यात गूगल इंजन आहे.ते सुरू करून पहा. 
भारतात सर्व प्रथम रेल्वे इंग्रजांनी सुरु केली.भारतात टेलिफोन दुरभाष्य यंत्रणा इंग्रजांनी सुरु केली,भारतात उद्योग धंदे उभारून त्यात भारतीयांना रोजगार उपलब्द करून दिला.शिक्षण घेण्यासाठी शिक्षण संस्था निर्माण करुन सर्वाना शिक्षण घेण्याची समान संधी उपलब्ध करून दिली.वर्णव्यवस्थेत सर्वाना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता तो इंग्रजांनी भारतीय लोकांना विशेष बहुजन समाजाला दिला,(म्हणजेच मागासवर्गीय एस सी,एस टी, व्ही जे एन टी, ओ बी सी,आदिवासी, अल्पसंख्याक समाज) भारतात डाक विभाग,सार्वजनिक हॉस्पिटल,महाविद्यालय निर्माण करुन हजारो लोकांना रोजगार नोकरी दिली आणि जनतेला सेवा मिळवुन दिली. भारतात मनोरंजन आणि खेळाला प्रतिष्ठा इंग्रजांनी मिळवुन दिली.गाणे,बजावणे, नाचणे हा फक्त मागासवर्गीय समाजाचा जन्म सिद्ध अधिकार होता,तो इंग्रजांनी मोडुन त्याला कला क्रिडा कौशल्य असे गुणवत्ता असलेले नांव दिले,म्हणुन आज माधुरी,ममता,शिल्पा,सोनाली,मृणाल स्पृशा, स्मुर्ती, सुषमा,रेखा,जया,हेमा सर्व क्षेत्रात उगड्या नागड्या दिसतात. 
भारतात ''पुरातत्व विभाग'' इंग्रजांनी सुरु केला त्यामुळे भारताची प्राचीन सभ्यता और प्राचीन बौद्ध/जैन धर्म धर्माचा शोध लागला.भारतात कापसा पासुन कपडा बनविण्याचा कारखाना इंग्रजांनी सुरु केला.समुद्राच्या किनाऱ्यावर बंदरे बनवुन भारताचा मोठा विकास इंग्रजांनी केला.त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर मोठया मोठया शहराचा विकास इंग्रजांनी केला.भारतात लोकशाही पद्धतीने निवडणुका आणि समान नागरिक अधिकार इंग्रजांनी सुरु केला.बाल विवाह,सती प्रथा इंग्रजांनी कायदे करुन बंद केले आणि विधवा विवाह इंग्रजांनी सुरु केले.भारतात सावित्री बाई आणि ज्योतिराव फुले यांनी महिला आणि अस्पृश्य स्त्रीया करीता शाळा खोलून स्वता शिकविले त्याला इंग्रजांनी योग्य आर्थिक मदत केली.जाहीर सत्कार केला.भारतात दळण वळणा करीता रोड रस्ते,ब्रिज पूल प्रथम इंग्रजांनी बनविले.ग्रामपंचायत,पंचायत समिती,जिल्हा परिषद,सह सर्व प्रशासकीय व्यवस्थेत सहभागी करुन घेण्याचे काम इंग्रजांनी केले,इंग्रज भारत सोडुन १९४७ साली गेले. तेव्हा एका डॉलर ची किंमत एक रुपया होती आज एका डॉलर ची किंमत 64 रुपये आहे.म्हणजे भारतात इंग्रजांनी भारताचा विकास आणि कल्याण केला.पण वर्णव्यवस्था मानणाऱ्या ब्राम्हणानी भारताची शासन प्रशासन व्यवस्था हाती घेतल्यावर देशात मंदिर निर्माण करुन देव आणि धर्माचे थोतांड मांडून स्वर्ग ,नरकाचे चित्र उभे करून भारतीयांवर राज्य केले.म्हणुन त्यांना भारत नको आहे त्यांना हिंदुस्थान हवा आहे. हा धोखा घटनाकारांनी ओळखला होता म्हणून त्यांनी घटनेत तशी कायम तरतूद निर्माण करून ठेवली आहे. राज्यात,केंद्रात कोणतेही सरकार आले तरी भारत म्हणजे इंडिया हाच शब्द वापरावे लागेल.भारताला हिंदुस्तान लिहण्याचा व बोलण्याचा प्रयत्न या देशातील भट ब्राम्हण दररोज करतात.पण जागरूक अधिकारी कर्मचारीवर्ग त्याची योग्य वेळी दाखल घेतात म्हणून भारत हिंदुस्थान होत नाही आणि होणार नाही.भारतातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आपण पहिला भारतीय आहेत आणि भारतीय राहू नंतर जात,धर्मं,पंथ,राज्य येईल याची काळजी घ्यावी.भारतात जो प्रर्यंत भारतीय संविधान आहे तो पर्यंत सर्व जाती धर्माचे पंथाचे राज्याचे लोक, सुरक्षित राहतील जेव्हा संविधान नसेल तेव्हा हा देश हिंदुस्थान होईल त्या नंतर कोणीच सुरक्षित नसेल.म्हणून भारताला भारत इंडियाच राहूद्या हिंदुस्थान होऊ देऊ नका.
आज देशभरात जे काही चालले ते खूप भयानक आहे.आर एस एस चा प्रमुख शत्रु डॉ बाबासाहेब आंबेडकर आहे. त्यांनी बनविलेली राज्य घटना जो पर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत राम राज्य म्हणजेच भटा ब्राह्मणांचे वर्णव्यवस्था असलेले राज्य येणार नाही म्हणूनच देशभरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा समाज प्रत्येक राज्यात टार्गेट केला जात आहे. या समाजाला चिरडून टाकले की इतर मागासवर्गीय आपोआप गुलाम बनतील ही आजच्या हिंदुस्थानची परिस्थिती आहे.
अन्याय अत्याचारा विरोधात उभा ठाकणारा,बोलणारा, लिहणारा म्हणजे आंबेडकरी विचाराचा एकमेव माणूस किंवा समाज होय यांची जाणीव भटा ब्राम्हणांना आहे.ते  ओळखण्यासाठी जास्त डोके चालविण्याची गरज नाही.फक्त डोळे उघडे ठेवून पाहिल्यास लगेच दिसते. रोडवर जाणाऱ्या शंभर मोटरसायकल पहा त्यात ज्याच्या गादीवर अशोक चक्र दिसलं तर लोक लगेच म्हणतात, हा आंबेडकरी विचाराचा व बौद्ध तरुण आहे! कोणत्याही फोर व्हीलर गाडीवर अशोक चक्र दिसलं तरलोक म्हणतात,हे बौद्धाचं कुटूंब आहे! घरावर निळा झेंडा व दरवाजा वर अशोक चक्र दिसलं तर लोक म्हणतात,हे बौद्धाचं घर आहे!मग राष्ट्रध्वजावर(तीरंगा)अशोक चक्र पाहून कोणीच का म्हणत नसेल,की "हा भारत बौद्धांचा देश आहे"  आणि त्याला अडीच हजार वर्षाचा तथागत गौतम बुद्धाचा जम्बु दीप प्रबुद्ध भारत यांचा ऐतिहासिक इतिहास आहे.पण हिंदुस्थान कोणाचं होता त्याला कोणता इतिहास आहे हे कोणी सांगत नाही.म्हणून भारतला हिन्दुस्थान कधीच बनु देऊ नका.आज रात्र नव्हेतर दिवस सुध्दा वैऱ्याचा आहे.तेव्हा उठा जागे व्हा भविष्यात स्वाभिमानाने जगण्यासाठी!. भारत माता की जय बोलणाऱ्यास विचार हिंदुस्थानची माता पिता कोण ?. 
आपला 
सागर रामभाऊ तायडे - ९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई

शिवराय ते भिमराय समता मार्च महाड​ चवदार तळे ​

शिवराय ते भिमराय समता मार्च महाड
​ चवदार तळे ​
छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांना देव करून त्यांचा फक्त जयजयकार करण्याचे काम भटा ब्राम्हणांनी चालविले आहे.त्यात मराठा व महार बौद्ध समाज अलगत अडकत चालला आहे.या दोन्ही महापुरुषांच्या क्रांतिकारी विचारला आणि कार्यप्रणालीला मूठमाती देऊन जातीजातीत बंदिस्त करण्याचे काम वस्ती पातळीवर जोरात सुरू आहे. चवदार तळे महाडच्या सत्याग्रहातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या खांद्याला खांदा लावुन उभे राहिलेले सहकारी गंगाधरपंत सहस्त्रबुद्धे, अनंतराव विनायकराव चित्रे,सुरबा नाना टिपणीस, प्रधान बंधु, संभाजी तुकाराम गायकवाड, सुभेदार विश्राम सवादकर, आर बी मोरे,शिवराम जाधव,सी ना शिवतरकर, पा न राजभोज,एन टी जाधव हे मुख्य सहकारी होते.यांना ही त्यांच्या जाती बांधवांनी संघटनांनी ब्रहिस्कृत केले होते.त्यावेळी दर्याखोऱ्यातील सर्व जाती पातीच्या मावळ्यांना एकत्र करून रायगड ते महाड चवदार सत्याग्रहाची किती झळ पोहचली होती.शिवरायांच्या रयतेच्या राज्यात जातीव्यवस्था तीव्र नव्हती.नंतरच्या काळात पेशव्यांनी शुद्रा अतिशूद्रांचे जिने हराम केले.त्यात सार्वजनिक ठिकाणी पिण्याचे पाणी मिळत नव्हते.म्हणूनच महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह झाला.हा चवदार तळ्याचा इतिहास नव्याने सांगण्याचे काम विचारांचा जागर व त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी विविध संस्था संघटनांच्या किर्याशील कार्यकर्त्यानी संकल्प जाहीर केला आहे.१९ मार्च १९२७ ला महाड मध्ये काय घडले होते त्यात कोण कोण सहभागी जाते.त्यांची आठवण म्हणून २०१८
​​ 
ला रायगड पाचाड ते महाड चवदार तळे समता मार्च निघत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १९ व २० मार्च १९२७ रोजी महाडच्या चवदार तळ्यावर समताधिष्ठित बहुजन समाजासाठी सत्याग्रह केला. यंदा या सत्याग्रहाला ९० वर्ष पूर्ण होत आहेत.त्या निमित्ताने दरवर्षा प्रमाणे या ही वर्षी लाखो लोक महाडला दर्शनासाठी येतील आणि जातील. 
महाडचा रणसंग्राम हा केवळ पाण्यासाठी नसून तो मानवी मूलभूत हक्कांसाठी होता. बाबासाहेब त्या वेळी सांगत होते चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने आम्ही काही अमर होऊ अशातला भाग नाही. आज पावेतो चवदार तळ्याचे पाणी प्यायलो नव्हतो तर तुम्ही-आम्ही काही मेले नव्हतो. चवदार तळ्यावर जावयाचे ते केवळ त्या तळ्याचे पाणी पिण्याकरीता जावयाचे नाही. तर इतरां प्रमाणे आम्ही ही या समाजातील माणसे आहोत हे सिद्ध करण्या करीताच त्या तळ्यावर आपणास जावयाचे आहे. असे अंगावर शहारे आणणारे उद्धगार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९ मार्च १९२७ रोजी चवदार तळ्याच्या ऐतिहासिक सत्याग्रह आंदोलनाच्या वेळी काढले होते. त्याला २० मार्च २०१८ ला ९​१​ वर्षे पूर्ण होत आहेत.पण त्या महाड रण संग्राम सत्याग्रहचा आंबेडकर अनुयायीनी कोणता आदर्श घेतला?. यांचे आत्मचिंतन आणि परीक्षण करण्याची तयारी आंबेडकरी चळवळीतील नेत्यात आणि अनुयायात नाही.म्हणूनच १९ मार्च २०१८ ला रायगड पाचाड ते महाड चवदार तळे समता मार्च निघत आहे.२० मार्चला लाखो लोक दरवर्षी येतात, पण १९ मार्चला काय झाले होते यांची माहिती घेत नाही.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचाराचा जाहीरपणे खुन करणे हा आंबेडकर अनुयायीचा जन्म सिद्ध अधिकार आहे असेच ते वागतात.१४ एप्रिल १८९१ ते ०६ डिसेंबर १९५६ या काळात जे जे ऐतिहासिक कार्य डॉ भिमराव आंबेडकर यांच्या हातून घडले.त्या त्या दिवसाला आंबेडकरी अनुयायी लाखोच्या संख्येने एकत्र येऊन जाहीर पणे क्रांतिकारी विचाराचा त्याच ठिकाणी खून करून तो उत्सव म्हणुन खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतात.कारण तो दिवस त्याच्या साठी खूप महत्वाचा असतो.कारण त्याच दिवसी गल्लीबोळातील नेत्याचा ८x१० चा बॅनर, होडींग आणि १०x १२ चा स्टेज बांधून जनतेला आपली शक्ती दाखविण्याची सुवर्ण संधी मानतात.ती गमवायला कोणीच तयार नाही.या दिवसाचे त्या काळाचे महत्व आज आमच्यासाठी काय आहे. हे आम्हाला विचारण्याचे, सांगण्याचे धाडस कुणी करू नये.आम्हाला आंबेडकर अनुयायी,भक्ता एवढे तुम्हाला त्याचे महत्व कळणार नाही. आमच्या रक्तात आंबेडकरी चळवळ असते.जन्मताच आम्ही आंबेडकरवादी असतो.२० मार्चला लाखो लोक महाडला जातात आणि काय करतात?.२० मार्च १९२७ चे गांभीर्य कोणत्या गटाच्या नेत्याकडे असते.किंवा नगरा नगरातील मंडळ ,महिला मंडळाकडे असतो?.मनसे, राष्ट्रवादी यांच्या दादा,भाऊ,नाना,काका यांच्या कडून बस घेऊन महाड चवदार तळ्याला जाऊन दर्शन,भोजन करणारे सत्याग्रहा चा अर्थ जाणतात काय?.त्यातुन त्यांनी गेल्या वीस पंचवीस वर्षातून कोणती प्रेरणा घेतली?.
महाराष्टातील खेड्या पाड्यातील गांवकुसा बाहेर राहणारी महार फक्त महार माणस महाडला पाणी पिण्यासाठी जाणार नव्हते.तरी बाबासाहेबांनी महाराना पिण्याचे पाणी खुले करण्यासाठी महाडचा सत्याग्रह केला. आणि महाडचे चवदार तळे अजरामर झाले.ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या सत्याग्रहामुळे.महाडच्या चवदार तळ्याच्या ऐतिहासिक सत्याग्रहाला आज २० मार्च २०१६ ला ९१ वर्ष पूर्ण होत आहेत.डॉ बाबासाहेब आंबेडकरानी आजच्याच दिवसी २० मार्च १९२७ साली चवदार तळ्याचा सत्याग्रह केला आणि तळ्याचे पाणी सर्व मानवजाती साठी खुले केले.केवळ महार जाती साठी चवदार तळे नव्हते.डॉ बाबासाहेबाच्या क्रांतिकारी विचाराने चवदार तळाच्या पाण्याला हात लावताच आग लागली. ती महाड मध्ये सुरु झालेली आग राज्यातून देशभर पसरली.ते क्रांतिकारी वैचारिक संघटन कैशल्य आज कोणत्याही नेत्या कडे नाही.त्या ऐतिहासिक घटनेला ९१ वर्ष पूर्ण होत असले तरी नेहमी सारखे कार्यकार्माचे आयोजन महाडला सर्वच गटा कडून करण्यात येईल प्रत्येक कोणा कोपरयात एका एका गटाचा स्टेज असणारच, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समताधिष्ठित समाजनिर्मिती करण्यासाठीच अहोरात्र प्रयत्न केले. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी महाड मुक्कामी चवदार तळे सत्याग्रह आंदोलन केले.बाबासाहेबांनी म्हटल्या प्रमाणे हा केवळ पाणी प्राशन करण्याचा हेतू नाही तर समाजात सर्वच माणसे सारखी.अमुक वरच्या जातीचा-तमुक खालच्या जातीचा असा जातीभेद कशाला? बाबासाहेबांच्या मते, राजकीय, धार्मिक, सामाजिक व आर्थिक बाबतीत समतेचे तत्त्व लागू करणे म्हणजे समाजरचनेतील नीतीच्या पायावर उभे राहण्यासारखे आहे. परंतु घुबडाला सूर्यप्रकाश सहन होत नाही.त्याप्रमाणे सामाजिक विषमतेमुळे ज्यांना जाती श्रेष्ठता मिरवायला मिळते त्यांच्या जातीभेदावर कुऱ्हाड पडलेली पाहून साहजिकच त्यांचा संताप तीव्र होतो.आज ही खेड्या पाड्यातील वातावरण त्याची साक्ष देते.त्यातून आंबेडकरी चळवळी नेते अनुयायी काही शिकायला तयार नाही.
आज देशात जातीभेदाचा जो काही प्रकार अनुभवयास मिळत आहे. तो अत्यंत निंदनीय आणि संतापजनक आहे. जातीपातीच्या या विषारी झाडाला केवळ उच्चवर्णीयां कडूनच खतपाणी घातले जाते, असे म्हणणे चुकीचे ठरेल.जोपर्यंत एका समाजाकडून दुसऱ्या समाजात रोटी-बेटी व्यवहार होत नाही तोपर्यंत समताधिष्ठ समाजाची निर्मिती अशक्य आहे, असे बाबासाहेबांनी सांगितलेले असताना ही अनेक वेळा बौद्ध आणि नवबौद्ध समाजातील लोकांचा विवाहाच्या वेळी जातीलाच अग्रक्रम असतो. महाडच्या रणसंग्राम भूमीच्या संपूर्ण कोकणात मातृसंस्था आणि पंचायत यातील गावकी भावकी च्या कथा तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या तथागत बुद्धाच्या धम्माच्या चैकाटीत न सुटणाऱ्या आहेत. एकीकडे बाबासाहेबांचे स्वप्न साकार करायचे असा टेंभा मिरवायचा आणि दुसरीकडे वेळ येताच जाती-पातीला खतपाणी घालायला लावणारी कामे करायची अशी दुटप्पी भूमिका बाबासाहेबांना मानणाऱ्या सुशिक्षित वर्गाने सोडून द्यायला हवी.त्या पेक्षा खेड्यातील अज्ञानी अशिक्षित असंघटीत माणूस आंबेडकरी चळवळी करिता लाख मोलाचा ठरतो. आंबेडकरी चळवळीला मानणाऱ्या समाजाने स्वतःचे आत्मपरिक्षण करून बाबासाहेबांनी केलेल्या महाडच्या रणसंग्रामतून योग्य बोध घ्यावा. आज महाड चवदार तळे म्हणजे पिकनिक झाली आहे.हे आंबेडकरी चळवळीतील जागृत अनुयायी यांनी लक्षात घेण्याची वेळ आली आहे, म्हणुन महाड रण संग्राम आजच्या तरुणांना आदर्श वाटत नाही,पिकनिक पॉईंट झाला आहे.​
म्हणूनच शिवराय ते भिमराय समता मार्च १९ मार्च २०१८ ला रायगड पाचाड ते महाड चवदार तळे समता मार्च निघत आहे.मराठी साहित्य संमेलनात क्रांतिकारी विचार मांडून वैचारिक खळबळ निर्माण करणारे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख,माजी मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष सकाळ समूहाचे मुख्य संपादक उत्तम कांबळे, प्रा.अंजली मायदेव कर्वे इन्स्टिट्यूट पुणे,फारूक अहमद सुराज्य सेना प्रामुख्याने उपस्थित राहतील.१९ मार्च १९२७ च्या सत्याग्रहात ज्यांनी सहभाग नोंदविला होता त्यांचे नातु पणतू पण सहभागी होतील.त्यात उल्का महाजन,मधुकर गायकवाड, मिलिंद टिपणीस,श्रीप्रकाश अधिकारी, आरिफ करंबेळकर, सुभाष वारे, युवराज मोहिते,अनिता पगारे,ललित बाबर,सुरेश सावंत,अविनाश कदम,भूषण सिसोदे,नागेश जाधव,कालीदास रोटे प्रदिप शिंदे असे विविध संस्था संघटनेचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.आणि एक नवी वैचारिक चर्चा घडविण्याचा प्रयत्न करणार आहे.आपण सहभागी होऊ शकत नसलो तरी यावर व्यापक चर्चा घडवुन शिवराय ते भिमराय समता कशी प्रस्थापित करता येईल यांचा विचार करूया. कोणती ही दळणवळणाची साधन नसतांना ज्यांनी या सत्याग्रहात सहभाग घेऊन यशस्वी संघर्ष केला त्या सत्यगृहींना कोटी कोटी प्रणाम!!!.
सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९ भांडूप,मुंबई.