शनिवार, २३ जून, २०१८

आंबेडकरी विचारधारा आणि ट्रेंड युनियन बांधणी

आंबेडकरी विचारधारा आणि ट्रेंड युनियन बांधणी
भारतात शोषितांच्या वंचितांच्या मानसन्मानसाठी न्याय हक्क व प्रतिष्ठे साठी झटणारा आणि संघर्ष करणारा एकच नेता होऊन गेला त्यांचे नांव डॉ बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या जीवनात त्यांनी जेवढा अन्याय अत्याचार आणि अपमान सहन केला तेवढा आज कोणीच सहन करू शकत नाही.तरी त्यांनी कधीच हार मानली नाही किंवा संघर्ष टाळला नाही.उपाशी अर्धपोटी राहून त्यांनी अभ्यास केला शिक्षण पूर्ण केले.पण नोकरी शोधली नाही.समाजासाठी संस्था, संघटना आणि पक्ष स्थापन केला.परंतु आज त्यांच्या सर्व संस्था, संघटना आणि पक्ष क्रांतिकारी विचारधारे पासुन दूर गेल्या व श्रेष्ठ कोण "व्यक्ती की संघटना" यात अडकल्या आहेत. त्यामुळे कितीही गंभीर समस्या आल्या तरी यांचा अहंकार काही कमी होताना दिसत नाही.
नेत्याला आपल्या कर्तृत्वावर आत्मविश्वास असावा लागतो.त्यासाठी गांव पातळीवर संघटना बांधणी असावी लागते.पण गांव तालुका, जिल्हा पातळीवर संघटना बांधणी नसताना आपल्याच कर्तुत्ववावर आपला आत्मविश्वास ठेऊन ते नेते आणि कार्यकर्ते आयुष्यात चळवळीला दिशा देऊ शकत नाही. सर्व समाजाला एकत्र करण्याचा त्यांचा प्रयत्न चांगला असला.तरी स्वतःच्या समाजातील गटबाजी कायमस्वरूपी ठेऊन इतर समाजा कडून अपेक्षा करणे चुकीचे आहे.संपूर्ण देशात व महाराष्ट्रात वातावरण प्रचंड असंतोषाचे विशेष मागासवर्गीय समाजा बाबत असतांना आपण एकजूट झालो नाही तर २०१९ ला कसे सामोरे जाणार?.
गोंदिया भंडारा पोटनिवडणुकीत आंबेडकरी चळवळीतील सर्व संघटना पक्ष कागदावर एकत्र येऊन प्रचार करीत होते.त्यात दोन महा अनुभवी असलेले नेते त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी प्रचंड ताकदीने एकमेकांना टार्गेट करीत होते.पण ग्रामीण भागातील समस्या गावात राहून सोडायच्या असतात.रोजीरोटी,उद्योग धंदे यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचे पाठबळ लागत असते.तिथे कामगार कर्मचारी अधिकारी सरकारी निमसरकारी संघटित पणे संघटने सोबत काम करीत असतात.त्यांचे उत्तम उदाहरण खैरलांजी हत्याकांड नंतरचे प्रशासकीय यंत्रणेतील कर्मचारी आणि अधिकारी मागासवर्गीय असूनही राजकीय दबावाखाली त्यांनी योग्य काम केले.त्या हत्यांकडातील राजकिय आशीर्वाद देणारे नेते तेव्हा पासुन विजय होत आहेत. त्यांनी पक्ष बदला तरी काही फरक पडत नाही.ते एकमेकांचे मावस भाऊ, आत्या भाऊ,सगे सोयरे आहेत. त्यामुळे त्यांचे संघटन गांव पातळीवर आहे.हे आपण विसरतो.मागासवर्गीय समाजाच्या लोक संख्येवर मतदानावर सर्व नेते हक्क सांगतात.पण त्यासाठी गांव पातळीवर कोणते काम करतात हे सांगत नाही. संत तुकडोजी महाराज यांनी ग्राम गिता या ग्रंथात दोन ओळीत संघटनेचे महत्व व्यापकतेने विषद केले आहे.ते म्हणतात,
"हत्तीस आवरी गवती दोर ! मुंग्याही सर्पास करती जर्जर !! रानकुत्रे संघटोनी हुशार ! व्याघ्रसिंहासी फाडती !! हे मी कुठे वाचले नाही.लाखनी,अडयाल पवनी येथे 78 वर्षाच्या जेष्ठ पत्रकार, अभ्यासक, यांच्या घरी व भंडारा येथे महसूल विभाग कॅन्टीनमध्ये चार जेष्टनेत्याच्या तोंडून ऐकले आहे.ज्यांनी बॅरिस्टर खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली 1978 ला जिल्हा परिषद अध्यक्ष व सभापती पद भोगून वीस वर्षाचा मागासवर्गीय समाजाच्या उन्नतीसाठी विविध प्रकारच्या निधीचा वापर कसा झाला.मागासवर्गीय समाजाच्या सरकारी नोकरी तील जागा ग्रामसेवक, शिक्षक, कोतवाल तशिलदार ते जिल्हाधिकारी कसा भरल्या यांची तपशीलवार माहिती गोळा केली.त्यासाठी संघटना लागते. प्रत्येक क्षेत्रातील कामगार कर्मचारी अधिकारी आणि ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर हा त्या त्या पातळीवर संघटित असतो.यावरुन मानवाच्या जीवनात संघटनेचे महत्त्व किती मोठे आहे.हे आपण समजू शकतो.मनुष्य हा समाजशील प्राणी आहे असे म्हणतात.समाजात राहूनच मानवाचा सर्वांगीण विकास होत असतो.त्याच्या व्यक्तीमत्वाला विविध कंगोरे फुटून त्याचे व्यक्तिमत्त्व बहरत असते.जो माणूस समाजशील नसतो तो कितीही बुद्धिवान,पैसेवान असला तरी एका विशिष्ट मर्यादेच्या पलिकडे समाजाला त्याचा उपयोग होत नाही. म्हणूनच प्रत्येकाच्या जीवनात संघटनेचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे.जी जी व्यक्ती कोणत्या तरी संघटने सोबत जुळलेली असते. त्या त्या व्यक्तींना लोक ओळखत असतात. इतरांपेक्षा जास्त मानसन्मान मिळत असतो. काही व्यक्ती संघटनेत खूप किर्याशील असतात. त्यांना जास्त प्रसिध्दी मिळते. संघटना जर काळानुरुप मोठी होत गेली, नावलौकीकास आली तर आपोआपच कार्यकर्त्यांचेही नाव व्हायला लागते. त्यांना प्रतिष्ठा, प्रसिद्धी, पद, पत, मिळायला लागते. काही कार्यकर्ताच्या डोक्यात मग या प्रसिद्धी व पैश्याची हवा चढायला लागते.ते स्वतःला संघटनेपेक्षा मोठे समजायला लागतात. त्यांच्यात प्रचंड अहंकार निर्माण होतो. माझ्या मुळेच ही संघटना आहे असे त्याला वाटू लागते. मीच या संघटनेला मोठे केले असा अहंगंड त्याच्यात निर्माण होतो.मग त्या व्यक्तीचे वागणे, बोलणे, चालणे पूर्णपणे बदलून जाते. ज्या कार्यकर्त्यांच्या प्रेमावर आणि श्रमावर तो "मोठा" झालेला असतो त्यांनाच तो तुच्छ समजायला लागतो. त्यांच्यासोबत बोलायला त्याला आता वेळ नसतो. त्यांचे फोन उचलण्यात त्याला कमीपणा वाटतो. आता त्याचे वागणूक "attitude" पूर्णतः बदललेले असतात.आणि इथूनच मग त्याच्या -हासाला सुरुवात होते.जगातील कोणत्याही संघटनेच्या व कार्यकर्त्या बाबतीत हे असेच घडत असते. संघटनेत काही वक्ते, लेखक, प्रचारक असतात. त्यांच्या माध्यमातून संघटनेची ध्येयधोरणे लोकांपर्यंत पोहचवायची असतात. वक्ते, लेखक हे संघटनेचे वैभव असतात. परंतु सभासद संघटनेचा प्राण असतो, आत्मा असतो. त्यामुळे "या" मंडळीं पेक्षा कार्यकर्ता अत्यंत महत्वाचा असतो. म्हणून एखादा वक्ता किंवा लेखक याला विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त महत्व देवू नये. सर्वांना महत्व दिल्या गेले पाहिजे. नाहीतर "ही" मंडळी डोक्यावर चढतात आणि स्वतःला संघटनेपेक्षा मोठी समजायला लागतात.मग आता त्या व्यक्तीची महत्वाकांक्षा प्रचंड वाढायला लागते. तो आता मर्यादेच्या पलिकडेचे स्वप्न पाहतो आणि आता आपण या संघटनेतून बाहेर पडलो तर ही संघटनाच संपून जाईल असा त्याचा भ्रम होतो.मग तो संघटनेच्या विरुध्द कारवाया करायला लागतो. बोलायला लागतो.कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न करतो.आणि संघटनेत फूट पाडण्याचा प्रयत्न करतो.परंतु सदस्य,सभासद  हुशार आणि निष्ठावंत असल्यामुळे त्याच्या कारस्थानाला बळी पडत नाही. उलट कार्यकर्ते त्यालाच जाब विचारतात. संघटनेने मोठे केले नसते तर तुला गावाच्या बाहेर कोणीही ओळखले नसते असे त्याला अधिकार वाणीने सांगतात. आतापर्यंत सामान्य कार्यकर्त्यांच्या मनात त्याच्याबद्दल असलेली इज्जत झिरो होऊन जाते. मागे वळून पाहिल्यावर त्याच्यामागे कोणीच दिसत नाही. मग त्याचे डोळे उघडते,पश्चात्ताप होतो, संघटनेचे महत्व समजते. आपल्यामुळे संघटना नाही तर संघटनेमुळे आपण होतो याची त्याला जाणीव होते. पण आता वेळ निघून गेलेली असते. काही क्षणासाठी मोठे लोक सोबत असतात पण आपले संरक्षण करणारा, आपल्यासाठी जीव देणारा कोणीच जीवाभावाचा सामान्य कार्यकर्ता मात्र आपल्यासोबत नाही याची त्याला जाणीव झाल्यावर त्याची रात्रीची झोप हराम होवून जाते. तो एकाकी पडतो. पैसे कितीही मिळाले तरी कार्यकर्त्यांचे प्रेम आणि आपुलकी मात्र त्याला कधीच मिळू शकत नाही. पण जो कार्यकर्ता संघटनेसोबत प्रामाणिक असतो त्याला त्याचे फळ एक दिवस निश्चितच मिळते. "फितुर" म्हणून त्याला कोणीही हिणवत नाही. प्रामाणिक म्हणूनच सर्वजण त्याच्याकडे पाहतात. म्हणून कोणत्याही संघटनेत काम करणा-या कार्यकर्त्यांनी आपल्या संघटनेसोबत एकनिष्ठ राहावे.संघटनेत रुसवे, फुगवे, नाराजी, वादविवाद चालतच असतात.पण ज्या संघटनेमुळे आपल्याला "सर्वकाही" मिळाले त्याच्यासोबत मात्र कधीच धोकेबाजी करु नये.नाहीतर इतिहासात त्यांची गद्दार म्हणून नोंद होते. आंबेडकरी
 क्रांतिकारी विचारधारा असणाऱ्या सर्व संस्था,संघटना आणि पक्ष आज कोणत्या मार्गाने जात आहेत.या कोणत्या प्रश्नावर एकत्र येऊ शकतात?.या सर्वांना एकाच ठिकाणी आणण्याचे काम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 1936 स्थापन केलेली स्वतंत्र मजदूर युनियन (आय एल यु ) ही राष्ट्रीय ट्रेंड युनियन करू शकते. जगातील कामगारांनो एक व्हा सांगणारे जाती धर्माच्या शोषणाच्या विरोधात बोलत नव्हते म्हणून मनुवादी, हिंदुत्ववादी संघटना पक्ष आज डोके वर काढत आहेत त्यांना मोठ्या संख्येने आर्थिक पाठबळ आणि मतदान याचं कामगार कर्मचारी अधिकारी वर्गाने केले.त्यांच्या मुळेच सर्व सरकारी उद्योग धंद्याचे खाजगी कारण कंत्राटी कारण होत आहे त्याला बारा राष्ट्रीय ट्रेंड युनियनने व त्यांच्या राजकीय पक्षांनी ठोस भूमिका घेऊन जबाबदारी पार पाडली नाही.त्यांचा सर्वात मोठा बळी मागासवर्गीय समाजातील कामगार कर्मचारी अधिकारी आणि विद्यार्थी ठरत आहे.म्हणूनच आंबेडकरी विचारधारा आणि ट्रेंड युनियन,संघटना यांची बांधणी होणे आवश्यक आहे. त्याकरिता स्वतंत्र मजदूर युनियन म्हणजे आय एल यु राष्ट्रीय ट्रेंड युनियन सर्वव्यापी झाली पाहिजे तरच संविधानाच्या चौकटीत देशात बहुजन हिताय बहुजन सुखाय होऊ शकते.
सागर रामभाऊ तायडे,भांडुप, मुंबई 9920403859,

पुस्तके दान करणारे लिंमचंद आलीकने

ज्ञान वृद्धी व क्रियाशील कार्यकर्ता घडविण्यासाठी 
पुस्तके दान करणारे लिंमचंद आलीकने

जगात वाचन संस्कृती जपणारे जागरूक वाचक खूप आहेत.म्हणूनच दरवर्षी लाखो पुस्तक ग्रंथ लिहिली जातात. व विकली जातात.त्याच प्रमाणे साप्ताहिक, पाक्षिक, मासिक आणि दैनिक नियमितपणे प्रसिध्द होत असतात. त्यांचा वाचक ही मोठा जागरूक वाचक असतो.दैनिक भंडारा पत्रिका विदर्भातील पांच सहा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकांच्या घराघरात जाते. त्यांचे संपादक राजेश चेटूले यांनी व त्यांच्या संपादकीय मंडळींनी गेल्या एक दीड वर्षा पासुन दर आठवड्यात माझा लेख छापून मला खूप प्रसिद्धी दिली. त्यातीलच आयुष्यमान लिंमचंद राजाराम आलीकने हे जागरूक वाचक आहेत.दार गुरुवारी किंवा शुक्रवारी लेख वाचून झाला की सकाळी साडेसात ते आठ च्या दरम्यान यांचा कॉल आल्या शिवाय राहत नाही.हे असे कसे लिहले?. ते तसे पाहिजे होते.हे माहिती कोणत्या पुस्तकातुन घेतली. अशी नियमितपणे परखडपणे प्रतिक्रिया व्यक्त करणारे लिंमचंद बाबा त्यांचे वय 78 वर्ष आहे.भद्रावती चंद्रपूरच्या ऑडनरी फॅक्टरीत काम करणारे कुशल गुणवंत कामगार होते.त्यांची शेतजमीन व घर सर्व गोसीखुर्द धरणात गेले.ते नोकरी निमित्ताने गावाबाहेर होते म्हणून त्यांची विस्थापित म्हणून नोंद झाली नाही.सर्व कायदेशीर नोंदी असलेले कागदपत्रे असतांना ही त्यांना न्याय मिळाला नाही.त्याविरोधात संघर्ष करण्यासाठी  निवृत्तीनंतर अडयाळला राहले.आज ही सनदशीर मार्गाने संघर्ष करीत आहेत. वयोमानानुसार अनेक आजार असणारच पण व्यायामाची नियमित सवय आणि विपश्यना करीत असल्यामुळे तरुणांना लाजवेल अशी जिद्द त्यांच्यात आहे.सामाजिक बांधिलकी आंबेडकरी चळवळीची दिशा आणि दशा याबाबतीत पत्रकार, लेखक, साहित्यिक विचारवंत यांना फोन करून नेहमी तळमळीने बोलतात. ते फक्त बोलत नाही तर त्यांनी या सर्व चळवळीशी बांधिलकी ठेवली आहे.त्यासाठी ते अनेक दैनिक,साप्ताहिक,पाक्षिक, मासिकाची वार्षिक वर्गणीदार बनले आहेत. "बंद दरवाज" हे मासिक कोणत्या चळवळीचे आणि कोणत्या संपादकाचे आहे आपणास माहिती आहे काय ?. विपश्यना वरील मासिक,बामसेफचे दैनिक मूलनिवासी नायक, मूलनिवासी संघटक,पैगाम,जनतेचा महानायक, प्रबुद्ध भारत यात लिहणाऱ्यां लेखकाशी मोबाईल वरून संपर्क ठेवतात.त्याच बरोबर अनेक समस्या वर अनेकांना कॉल करून प्रोत्साहन देण्यासाठी संपर्क साधतात.अशा लिंमचंद राजाराम आलीकने यांनी मला नियमितपणे कॉल करून भेटण्यासाठी येण्यास भाग पाडले.माझे वय झाले आहे. माझे कधीही निधन होईल आणि मी गेल्यावर मी जमा केलेली ही पुस्तके ग्रंथ रद्दीत विकल्या जातील. त्यापेक्षा तुमच्या सारख्यानां दिल्यास त्यांची योग्य दखल घेतली जाईल, ते तुम्ही वाचुन तुमच्या ज्ञानात भर पडेल व आणखी ताकदीने लिहणार ज्ञान वृद्धी व क्रियाशील कार्यकर्ता घडविण्यासाठी ही पुस्तके खुप उपयोगी पडतील आणि लाखो वाचकांचे प्रबोधन करणार म्हणूनच मला ही पुस्तके तुम्हाला दान करायची आहेत.ती त्यांनी मला 22 मे 2018 त्यांच्या घरी दान दिले.ती खालील प्रमाणे आहेत.
1) भारतीय इतिहासाचे साक्षीदार, लेखक डॉ कृष्णकांत कवडुजी डोंगरे,देणगी मूल्य 300 रुपये, (2) डॉ आंबेडकर जीवन और मिशन,लेखक एल आर बाली,संपादक भीम पत्रिका, देणगी मूल्य 200 रुपये, (3) भारत के आदीनिवासीयो का इतिहास, लेखक ऍड एच लाल दिल्ली हायकोर्ट देणगी मूल्य 200 रुपये, (4) बौद्ध कालिन भारत का इतिहास, लेखक मुंशी एन एल खोब्रागडे, देणगी मूल्य 50 रुपये, (5) क्रांती आणि प्रतिक्रांती,लेखक डॉ बाबासाहेब आंबेडकर देणगी मूल्य 50 रुपये, (6) अस्पृश्य मूळचे कोण?.आणि ते अस्पृश्य कसे बनले?.लेखक भिमराव रामजी आंबेडकर देणगी मूल्य 50, (7) शेतकऱ्यांचा आसूड आणि इशारा ,लेखक महात्मा ज्योतीराव फुले,देणगी मूल्य 50 रुपये, (8) इतिहास तज्ञ चंद्रनाग आणि बौद्ध स्थळाचा शोध व बोध,लेखक दीक्षित बाबुराव आवळे देणगी मूल्य 60 रुपये, (9) नाग बौद्धो की पावन धरोहर पवनी के स्तूप पर हिंदुओ का जगन्नाथ मंदिर द्वारा अतिक्रमण क्यो?.,लेखक हबीर अंगार ई, देणगी मूल्य 100 रुपये, (10) आत्मदर्शन लेखक सत्यनारायण गोयंका देणगी मूल्य 30 रुपये, (11) बौद्ध जीवन मार्ग,लेखक मधुकर ताकसांडे, देणगी मूल्य 10 रुपये, (12) जागे मंगल प्रेरणा, लेखक सत्यनारायण गोयंका देणगी मूल्य 35 रुपये, (13) समाधी मार्ग, लेखक धर्मानंद कोसंबी देणगी मूल्य 24 रुपये, (14) कल्याण मित्र, लेखक सत्यनारायण गोयंका देणगी मूल्य 35 रुपये, (15) आत्मकथन भाग 1,लेखक सत्यनारायण गोयंका देणगी मूल्य 35 रुपये, (16) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म देणगी मूल्य 60 रुपये, ही एकूण 1039 रुपयांची पुस्तके आयुष्यमान लिंमचंद राजाराम आलीकने राहणार सौंदड अडयाळ,तालुका पवनी जिल्हा भंडारा यांनी ही मला अभ्यासपूर्ण लिखाण करण्यासाठी दान दिली.
 पुस्तक काय करू शकतात.यासाठी विश्वरत्न ड़ाॅ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात.1 मंदिर बांधणे म्हणजे 1000 भिकारी तयार करणे.आणि 1 ग्रंथालय बांधणे म्हणजे.लाखो विद्वान तयार करणे. म्हणूनच वाचन का आवश्यक आहे.एखादे पुस्तक एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतं. एक पान एखाद्याचे आयुष्य बदलू शकतं आणि एक वाक्य एखाद्याच्या आयुष्याचं ध्येय ठरवू शकतं. एवढी ताकद वाचनात आहे. तेव्हा रोज एक तरी पान वाचत जा !.श्रीमंत माणसेच वाचन करतात असे नसुन वाचन करणारेच श्रीमंत होतात जसे शरीरासाठी दिवसातून दोन वेळा जेवण आवश्‍यक असते तसे उत्तम मेंदूसाठी दररोज दोन तास वाचन करणे आवश्यक असते. दररोज वाचनामुळे माणूस भानावर येतो.जगाचा आतापर्यंत जो विकास झाला आहे तो वाचनामुळे.पुस्तक वाचनारा माणूस कधीही व्यसन करत नाही.वाचनामुळे ज्ञानात भर पडते. वाचनासाठी फक्त आवड पाहिजे,माणूस एसटी,रेल्वेने  प्रवासात असला तरी उभ्या उभ्याने वाचन करतो.म्हणूनच वाचन करणारी माणस विचाराने आणि कृतीनेही श्रीमंत होतात.वाचन करणारा माणूस शांत असतो त्यामुळे त्याला रक्तदाब वाढणे, हृदय विकाराचा झटका येणे अशा गोष्टी संभवत नाहीत.वाचनामुळे भंग झालेली मनस्थिती शांत होते.वाचन करणारा माणूस लवकर झोपतो लवकर उठतो.
वाचन करणारा पुढे उद्योजक होतो तर वाचन न करणारा नोकरीवरच थांबतो.वाचन करणारा चार तासच काम करून करोडपती होतो तर वाचन टाळणारा बारा तास काम करून गरिबीतच मरतो.काही महाभाग तर नोकरी लागली की, जगातील मी एकटाच सिकंदर. आता मलाच सारे काही कळते,अशा नंदनवनात वावरून वाचनच बंद करतात.
वाचनामुळे माणूस नम्र होतो जे तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करते तेच खरे पुस्तक आणि जे कृती करायला लावते तेच खरे वाचन.जिथे वाचन होते तेथे विचार होतात आणि जेथे विचारांचे स्वातंत्र्य नाही तेथे गुलामी येते.वाचनामुळे ध्येय ठरवीता येते आणि गाठताही येते.तुमच्या ध्येयावरून तुमची लायकी पारखली जाते आणि तुम्ही किती मोठे ध्येय ठरविता ते तुम्ही कोणते पुस्तक वाचता यावर अवलंबून असते.ज्यांना आयुष्यात कोणतेही ध्येय नसतं तेच लोक पुस्तक वाचत नाहीत आणि ध्येयाविना जगणे म्हणजे बिगर पत्त्याचे पत्र पोस्टात टाकणे होय. पुस्तक चाळणे वेगळे आणि वाचनं वेगळं.जगात जेवढे लोक उपास मारीने मेलेत त्यापेक्षा जास्त लोक पुस्तक वाचन न झाल्यामुळे मेलेत. पुस्तकातून ज्ञान आणि ज्ञानातुन संपत्ती निर्माण होत असते. आयु लिंमचंद राजाराम आलीकने यांचा अनेक साहित्यिक विचारवंत, पत्रकार यांच्याशी संपर्क व ओळख असतांना माझी ओळख नसता, माझी ही पुस्तके दान देण्यासाठी निवड केली.आणि पुस्तके देऊन मला खूप सन्मानित केले.ते मी कोणत्याही शब्दात मांडू शकत नाही.पण त्यांनी दिलेल्या पुस्तकाचा ज्ञान वृद्धी व क्रियाशील कार्यकर्ता घडविण्यासाठी आणि जास्तीतजास्त वाचकाच्या प्रबोधनासाठी करीन.पण लिंमचंद राजाराम आलीकने सारखा विचार करणारी, दूरदृष्टी ठेवणारे माणस आंबेडकरी चळवळीत आहेत हे गर्वाने सांगावसे वाटते.
सागर रामभाऊ तायडे भांडुप मुंबई 9920403859.

राजर्षी शाहूमहाराज मराठा समाजाचे आदर्श होतील काय ?.

राजर्षी शाहूमहाराज मराठा समाजाचे आदर्श होतील काय ?.
   महाराष्ट्र राज्यात विशेष मराठा समाजात आज ही राजर्षी शाहूमहाराज यांचे महत्व पाहिजे त्या प्रमाणात नाही.मराठा सेवा संघ आणि त्याच्या ३२ कक्षा गेल्या २५ वर्षात शिवाजी शाहूमहाराज समजावून सांगत आहेत.आज 26 जून राजर्षी शाहू महाराज यांची जयंती.फुले-शाहू-आंबेडकर हे आधुनिक महाराष्ट्राचे, पुरोगामी महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत आहेत. परंतु महाराष्ट्राच्या एकूण समाजकारणावर जातवास्तवाचा मोठा प्रभाव असल्यामुळे महापुरुषांचा नामोल्लेख करताना ही अनेकांची अडचण होताना दिसते. महाराष्ट्रातील पुरोगामी विचारवंत काही वर्षापूर्वी ‘फुले-आंबेडकरांचा’महाराष्ट्र असा उल्लेख करायचे. हीच मंडळी कोल्हापुरात आल्यावर त्यात शाहूंचे नाव समाविष्ट करत. म्हणजे कोल्हापूरच्या बाहेर शाहूंना फुले-आंबेडकरांच्या बरोबरीने स्थान दिले जात नव्हते. राज्यकर्त्यांचेही यापेक्षा वेगळे काही नव्हते. परंतु कांशीराम-मायावती यांनी उत्तरप्रदेशातील सत्तेत असताना फुले-आंबेडकरांच्या बरोबरीने राजर्षी शाहूंना स्थान दिल्यामुळे, विशेष मराठा समाजातील सत्ता धारयांच्या गोटात उलटा पालट झाली.यानंतर महाराष्ट्राच्या पातळीवरही शाहूंचे नाव घ्यायला सुरुवात झाली आणि आज ते रूढ झाले. हे सगळे पुन्हा जाती-पातीच्या समाजकारणाशीच संबंधित आहे. महात्मा फुले यांना माळी समाजाने मना पासुन कधीच दैवत मानले नाही, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्व दलितांनी आपले दैवत बनविले पण किती मानले हा प्रश्न आहेच?. राजर्षी शाहू महाराज यांना स्वीकारणे मराठा समाजासाठी तेवढे सोपे नव्हते. आजही नाही. आजही मराठय़ांना शाहू महाराज अडचणीचेच वाटतात. देशात आरक्षण ही संकल्पनाच राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केली,कारण मराठा समाज हा देणारा होता. आपल्या संस्थानात मागासवर्गीय आणि आर्थिक दुर्बलांसाठी 50 टक्के आरक्षण लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय 1902 मध्ये त्यांनी घेतला होता. वेगवेगळ्या नावांनी काम करणाऱ्या मराठा संघटना आज शिवाजी महाराज,जिजाऊ यांची नावे घेतात, परंतु शाहू महाराज अनेकांना अडचणीचे वाटतात. कारण शाहू महाराजांना स्वीकारले, तर आरक्षणाचे समर्थन करावे लागते. आणि आरक्षणाचे समर्थन करून मराठय़ांचे संघटन करता येत नाही.म्हणून मराठा सेवा संघ आणि त्याचे 32 कक्ष मराठा समाजाला राजर्षी शाहु महाराज जास्त सांगताना दिसत नाही.
    सामाजिक बंधुभाव, समता, दलित बांधवांचा उद्धार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला व क्रिडा, आरोग्य आदी क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी ज्यांनी शर्थीचे प्रयत्न केले, ते आधुनिक भारताचे भाग्यविधाते, आरक्षणाचे जनक यशवंत जयसिंगराव घाटगे म्हणजेच छत्रपती शाहू महाराज, पारतंत्र्य, दुष्ट रूढी परंपरा, निरक्षरता, अज्ञान इत्यादी समस्यांनी ग्रासलेल्या काळात २६ जून १८७४ रोजी कोल्हापूर येथे त्यांचा जन्म झाला. शाहू महाराज नावाप्रमाणेच यशवंत राहिले. भारतमातेच्या पोटी अनेक थोरांनी, संता, महंता, राजे, महाराजे, समाज सुधारकांनी जन्म घेऊन भारतातील गोरगरीब दीन दुबळ्यांची मनोभावे सेवा केलेली आहे.पण राजर्षी शाहु महाराजा त्यांच्या पेक्षा काकन भर सरस आहेत.
    बहुजन हिताय बहुजन सुखाय हे सूत्र ध्यानात घूऊन शाहू महाराज राज्यकारभार पाहू लागले. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय याची फळे सर्व समाजाला चाखता यावीत म्हणून त्यांनी आपले सिंहासनच पणाला लावले. अज्ञान अंधश्रद्धा, निरक्षरता सामाजिक दुजाभाव, दारिद्रृय यात गुरफटलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी महाराजांनी आपला खजिना सताड उघड ठेवला.
छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक बंधूभाव,समता,दलित,बांधवांचा उद्धार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रीडा, आरोग्य इ. क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी त्यांनी खूप परीश्रम घेतले. समाजातील गोरगरीब, दीनदुबळे, मागासवर्गीय, उपेक्षित व आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांच्या सर्वागीण विकासाला प्राधान्य देणारे ते एकमेव राजे होते. सुरूवातीस कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा कायदा लागू केला. समता प्रस्थापित करण्याच्या ध्येयाने अस्पृश्यता निवारणाकरिता जातीभेद निर्मूलन, बलुतेदारी पद्धतीवर बंदी आणली. स्त्री शिक्षण, देवदासी प्रथेचे उच्चाटन, महिला संरक्षण कायदा, विधवा पूनविर्वाह कायदा, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन यासारख्या परीवर्तनवादी मुद्दे प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचे धाडस त्यांनी केले व त्यांची अंमलबजावणी होते की नाही ते स्वत: खात्री करून घेत असत. स्त्री हक्क स्वातंत्र्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन पत्नीला त्रास देणाऱ्या पतीसाठी शिक्षेच्या कायद्याची तरतूद केली. अनिष्ठ रुढी परंपरा उच्चाटनासाठी प्रयत्न केले. १९१७ मध्ये विधवा पूनर्विवाह कायदा व विवाहनोंदणी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली.शंभर वर्षापूवी शाहूराजांनी ज्या दूरदृष्टिने निर्णय घेतले, त्याच्या जवळपासही आजचे राज्यकर्ते जाऊ शकत नाहीत. मानवी जीवनाच्या विकासाचे असे एकही क्षेत्र नाही, ज्यासाठी महाराजांनी काम केले नाही.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे नेते असल्याचे त्यांनीच माणगावच्या परिषदेत जाहीर केले. सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. राधानगरी धरण बांधून सिंचनाची सोय केली. कुस्तीला प्रोत्साहन दिले. कोल्हापुरात प्रत्येक जातीसाठी स्वतंत्र वसतिगृहे सुरू करून उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांतिकारक कार्य केले. फासेपारध्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी राबवलेली बांधकाम योजना राज्यकर्त्यांना नेहमीच मार्गदर्शक ठरणारी आहे. हे सगळे करीत असताना समाजातील विशिष्ट वर्गाशी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. संघर्ष करतानाही त्यांनी विकासाची वाट आणि तळागाळातील घटकांप्रती असलेली बांधिलकी याचा कधी विसर पडू दिला नाही. प्रस्थापितांनी त्यांच्या बदनामीच्या कहाण्या रचल्या. परंतु नव्या पिढीतल्या इतिहास संशोधकांनी त्या कहाण्या म्हणजे हितसंबंध दुखावलेल्या मंडळींनी रचलेली कुभांडे असल्याचे सिद्ध केले आहे. 
बहुजन व मागासवर्गीय समाजातील मुला-मुलींना परिपूर्ण शिक्षण मिळाल्याशिवाय त्यांचा बौद्धिक, सामाजिक व आर्थिक विकास शक्य नाही हे महाराजांनी हेरले व ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावाला शाळांची निर्मिती केली व शिक्षण सक्तीचे केले, एवढे करून न थांबता त्यावरील शुल्क माफ केले. जे पालक आपल्या पाल्यांना रोज शाळेत पाठविणार नाही अशा पालकांना प्रतिमहिना एक रुपया दंड आकारण्याची कायदेशीर तरतुदही केली. तसेच त्यांनी वसतीगृहे उभे केलीत, गरिब विद्यार्थ्यांसाठी तर त्यांनी आपला राजवाडाच खुला केला. यामुळे बहुजन व दलित समाजातील विद्यार्थी-विद्यार्थीनींना शिक्षणाचे दरवाजे खुले झालेत.८ सप्टेंबर १९१७ रोजी सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा जाहिरनामा काढला. २१ मे १९१९ रोजी आर्थिक दृष्टय़ा दुर्बल विद्यार्थ्यांना फी माफीचा निर्णय घेतला. १ जानेवारी १९१९ रोजी आज्ञा देवून प्राथमिक शाळा व महाविद्यालयातील अस्पृश्य मुलांना स्पृश्य मुलांसारखीच समानतेची वागणूक द्यावी म्हणून शिक्षण खात्याला आदेश दिला. ३० सप्टेंबर १९१९ रोजी अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा बंद केल्यात. ६ जुलै १९०२ मागास जातींना नोकरीत ५० टक्के जागा राखीव ठेवण्याची घोषणा केली. २३ पेब्रुवारी १९१८ ला कुलकर्णी वतने बंद, तलाठी सुरू. आंतरजातीय विवाह कायदा १५ एप्रिल १९२० नाशिक येथे उदोजी मराठा विद्यार्थी वसतीगृहाचा कोनशिला समारंभ केला. १९ नोव्हेंबर १९२१ मध्ये रायगड येथे शिवस्मारकाचा पायाभरणी समारंभ प्रिन्स ऑफ वेल्सच्या हस्ते झाला. तसेच सिंधूदुर्ग जिल्ह्य़ातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा जिर्णोद्धार ही केला. १६ फेब्रुवारी १९२२ दिल्लीत भरलेल्या अखिल भारतीय अस्पृश्य परिषदेचे ते अध्यक्ष होते.आजच्या बहुसंख्य मराठा समाजाला हा इतिहास माहित नाही.आमच्या सारख्या आंबेडकरी चळवळी तील लोकांनी सांगितला तर तो त्यांना पचत नाही.
 आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा सेवा संघाच्या मराठा मार्ग मध्ये लिहले होते की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मराठा समाजाचे राजर्षी शाहु महाराज यांनी शिक्षणा साठी खुप मोठी मदत केली. म्हणून बाबासाहेब भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले.हे आंबेडकरी चळवळीच्या लोकांनी विसरु नये.त्याकरिता आंबेडकरी चळवळी तील जाणकार बुद्धिजीवी लोकांनी अज्ञानी अंधश्रद्धा मध्ये गुंतलेल्या मराठा समाजाच्या घरी जाऊन समाज प्रबोधन करावे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे आम्हाला शाहु महाराज सयाजी महाराज कबीर महात्मा ज्योतिराव फुले आणि तथागत बुद्ध कळाले. म्हणुन आमच्या सारखे लोक नेहमी मराठा समाजा बरोबर मंगल मैत्री करण्याचा प्रयत्न करतो.पण त्याचा अर्थ खेड्या पाड्या तील मराठा समाजातील लोक महार माजले त्यांना जास्त माझ आला असा काढतात.राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंती निमित्य सर्व मराठा समाजाला नम्र आवहान आहे की प्रथम शाहु महाराज समजून घ्या त्यानंतर आपले खरे शत्रु कोण व खरे मित्र कोण हे समजून येईल.हीच राजर्षी शाहु महाराज जयंती निमित्य सर्व बहुजन समाजाला विशेष मराठा समाजा ला विनंती.जयंती निमित्य सर्वाना हार्दिक शुभेच्छा!!!

बुधवार, ३० मे, २०१८

गुलामला जाणीव कसी करून देणार?.

गुलामला जाणीव कसी करून देणार?.
अन्याय अत्याचार सहन करण्याची सवय लागली की धनधाकड शरीर असलेला मानव,प्राणी चाबूकाचा गुलाम होतो. मालकाच्या हातात चाबूक दिसला की प्राणी घाबरतो तसाच माणूस पण घाबरतो. हा निसर्गाचा नियम आहे.त्याला तथागत बुद्धांनी प्रथम आवाहन देऊन मोडून काढले होते.त्यांनी शेठ सावकार शेतकरी यांच्या कडे काम करणाऱ्या गुलामांना मानवा सारखे वागविण्याची विनंती केली होती.त्यामुळे दोघांच्या वागण्यात बदल झाला आणि गुलामानी जास्त मेहनतीने काम केल्यामुळे उत्पादनात भर पडली होती. गुलाम शेतकरी, सावकार यातील भेद मिटला होता.
भारतात आज ही मागासवर्गीय जातीच्या माणसाला माणुस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारल्या जातो.त्यावर माणुसकीहीन अन्याय अत्याचार केल्या जातात.त्यावर कडक कारवाई करणारा अट्रोसिटी हा कायदा होता. अट्रोसिटी हा एक असा कायदा आहे की ह्या कायद्यामुळेच जातीय अत्याचार थोड्याफार प्रमाणात कमी होण्यास मदत होत होती. पण दि. २० मार्च, २०१८ रोजी विद्यमान सर्वोच्च न्यायालयाने ह्या कायद्याबद्दल करून खूप चुकीचा निर्णय घेतला आहे. परत, काही धनदांडगे जमीनदार जातीयवादी सक्रिय होऊन जातीय अत्याचाराच्या घटना वाढतील आणि राजकीय आशीर्वाद असल्यामुळे गुन्हे कसे पचवायचे हे तर यांना चांगलंच ठाऊक झाले आहे. तरी समाजातील गटं-तटं, राग, द्वेष, तिरस्कार, अहंकार आणि स्वार्थ काही कमी होत नाही.आणि समाज एकत्र करण्याचा प्रयत्न करीत नाही.ही खुप खेदाची व क्रांतिकारी विचाराला मूठमाती देणारी परिस्थिती आहे.
देशात लोकशाही पद्धतीने निवडून आलेले १३१ मागासवर्गीय खासदार आहेत.विशेष म्हणजे एक खासदार भारत देशाचा सर्वोच्च पदी म्हणजे राष्ट्रपती पदी आहे एक ओबीसी खासदार देशाचा प्रधानमंत्री आहे.तरी एस सी,एस टी, ऍक्ट मध्ये नुसता बदल नाही तर निष्कीर्य करून टाकला.त्यामुळे गंभीर आरोप असलेल्या आरोपीला अटकच होणार नाही.ही घटना साधी नाही तर लोकशाही ने दिलेल्या संविधानिक मूल्याचा आपल्या सोयी नुसार ब्राम्हणशाहीने केलेला सरळ सरळ खुनच आहे.तरी मागासवर्गीय खासदार, प्रधानमंत्री, राष्ट्रपती आपल्या सामाजिक जबाबदारीशी प्रामाणिक न राहता वैचारीक गुलाम म्हणून इनामदारी ने आपले कर्तव्य पार पाडत आहेत.आपण गुलाम आहोत यांची त्यांना संपुर्ण जाणीव आहे.मग या वैचारिक गुलामला जाणीव कशी करून देणार?.हा आज देशातील मागासवर्गीय समाजा समोरचा मोठा प्रश्न आहे.या मागासवर्गीय लोकांना लोकप्रतिनिधी म्हणून कोणी निवड केली?.ब्राम्हणशाहीचे व्यवस्थापन करणाऱ्या आर एस एस च्या भटा ब्राम्हणांनीच नां?.
मागासवर्गीय बहुजन समाजातील पक्षाच्या वतीने स्वाभिमानी ओबीसी प्रधानमंत्री किंवा राष्ट्रपती झाला असता काय?.मग बहुसंख्य हिंदुत्ववादी, मनुवादी विचारधारा मानणाऱ्या पक्षांनी ओबीसी प्रधानमंत्री व मागासवर्गीय राष्ट्रपती कोणत्या गुणवंते नुसार निवडल्या गेले तर एकच गुणवत्ता आहे ती म्हणजे वैचारिक गुलाम. ही मोहनचंद गांधी यांच्या यरोडा जेल पुणे येथील आमरण उपोषणाला बसल्या नंतर झालेली उत्पत्ती आहे.त्यालाच पुणे करार म्हणतात.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या स्वाभिमानी समाजाला वाचविण्यासाठी मजबुरी मुळे केलेला समझोता केला होता.त्याचं गुलामांचा वापर करून आज देशातील लोकशाही संपविण्याचे काम मनुवादी करीत आहेत.
सर्वश्रेष्ठ संविधानिक पदी ओबीसी,मागासवर्गीय गुलाम बसविल्यामुळे कोणतेही मानसिक गुलाम नेतृत्व स्वतःच्या किंवा संविधानाच्या चौकटीत काम करू शकत नाही.तो गुलाम स्वतःसह सर्व ओबीसी, मागासवर्गीय समाजाला कायमस्वरूपी गुलाम बनविण्यासाठी काम करीत राहील. भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी होणार नाही यासाठी प्रथम समता, स्वतंत्र,बंधुभाव, एकता सर्वधर्मसमभाव ही चौकट मोडावी लागेल.ती तोडण्यासाठी संविधानात दिलेले मूलभूत अधिकार,सनदशीर कायदे कानून,कलम बदलल्या शिवाय मनुवादी, हिंदुत्ववादी विचारांची अंमलबजावणी होणार नाही हे सर्व काम ओबीसी, मागासवर्गीय गुलामांच्या हातुन सहीने आज देशात होत आहे.त्याला सर्वच ओबीसी, मागासवर्गीय, बहुजन समाज मूक पणे साथ देतो किंवा तो ही त्यांची मानसिक गुलामी सहन करण्यासाठी तयार होत आहे. त्यामुळे त्यांच्या सर्व नाशाला तोच जबाबदार असेल. आर एस एस प्रणित भाजपा एकमेव पार्टी नाही तर तिला ४६ छोट्या छोट्या प्रादेशिक पक्षाचा पाठिंब्यामुळे ती मजबूत होत आहे.हे ४६ पक्ष मागासवर्गीय, बहुजन समाजाला मानसिक गुलाम बनविण्यासाठी कुराडीच्या दांड्याचे काम करीत आहेत.हे स्वार्थासाठी आंधळे, बहिरे आणि मुके झाले आहेत.त्यात रामदास,उदीतराज, रामविलास हे लक्षवेधी गुलाम आहेत.या गुलामला जाणीव कशी करून देणार?.आर एस एस ने सर्व साम, दाम, दंड,भेद नीती वापरून या पक्षांना सहयोगी गटबंधन, ठगबंधन आणि राजकीय सौदेबाजी केली आहे.त्यामुळे हे सर्व पक्षाचे नेतृत्व करणारे नेते गुलाम झाले आहेत.शिवसेना व शिवसेना पक्ष प्रमुख यांची एकूण भाषणे ऐकली तर मोठा प्रश्न पडतो हीच का ती वाघाचे तोंड घेऊन मराठी, महाराष्ट्र आणि महाराजांचा आदर्श सांगणारी सेना?.की मनुवादी हिंदुत्ववादी गुलाम ?.मराठी माणसाला महाराष्ट्राला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना गुलाम बनविणारी सेना. ओबीसी मागासवर्गीय, बहुजन समाजाला गुलाम बनविणारे नेतृत्व मग ते कोणाचे ही असो ते गुलाम झाले आहे.त्यामुळेच असा गुलामांना गुलामगिरीची जाणीव कशी करून देणार?.
हे संत,महापुरुषांच्या,महात्माच्या क्रांतिकारी विचारावर श्रद्धा ठेवणाऱ्या संस्था, संघटना, कार्यकर्ते आणि नेते यांनी गांभीर्याने विचार करून मार्ग काढला पाहिजे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे करारावर सही केली तेव्हा जी खंत व्यक्त केली होती,जर माझा समाजाची राख रांगोळी होऊन तो जिवंत राहत नसेल तर मी जिवंत राहून काय उपयोगाचे ?.
ओबीसी,मागासवर्गीय, बहुजन समाजाची आजची परिस्थिती तशीच आहे.८५ टक्के समाज असूनही त्यांच्यावर ३ टक्के लोकसंख्या असलेला समाज त्यांना गुलाम बनवीत आहे.कारण ओबीसी, मागासवर्गीय, बहुजन समाजात एकी नाही.एकमेकांवर विश्वास नाही.म्हणून त्यांना गुलामी स्वीकारावी लागत आहे.
वाघ कधीही जंगलात शिकार एकटाच करतो, पण कळपात राहतो.माणसात जसा अहंकार, स्वाभिमान असतो तसाच प्राण्या मध्ये असतो.दोन मित्र गैरसमजा मुळे शत्रु बनतात तसेच प्राण्यात सुद्धा होते.संकट समयी माणुस जसा माणुस म्हणून धाऊन जातो तसाच प्राण्यांच्या संकट समयी प्राणीच धाऊन जातो.एकदा एक वयस्कर वाघ शिकार करण्यासाठी फिरत असतांना पंचवीस तीस कुत्रे त्याला घेरतात व त्यांच्यावर जोर जोराने भुंकून हल्ला करतात.तो आवाज ऐकून दुसरा वाघ त्या वाघाच्या मदतीला धावून जातो.तो फक्त दाहडतो तर सर्व कुत्रे पळून जातात.वयस्कर वाघ उभा राहतो आणि सावरतो तो पर्यंत मदतीला धावून आलेला वाघ निघून जातो.इतर प्राणी हे सर्व पाहत होते,त्यांनी त्या वाघाला विचारले तुम्ही एकमेकांशी बोलत नाही.मग त्यांला वाचविण्यासाठी का गेला?.तेव्हा ते वाघाने उत्तर दिले आमची आपसात नाराजी,गैरसमज जरी असले तरी एकूण प्राणी समाजात असा समज जाऊ नये की कुत्रे ही वाघाला मारून टाकतात. देशात ८५ टक्के ओबीसी, मागासवर्गीय बहुजन समाजाच्या रक्षणासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक वेळी धाऊन आले.आणि आज ही ओबीसी, मागासवर्गीय, बहुजन समाजाच्या रक्षणासाठी आंबेडकरी विचारांचे लोक परिणामाची पर्वा न करता लिहण्यासाठी, बोलण्यासाठी, लढण्यासाठी पुढाकार घेतात.गुलामला गुलामगिरी ची जाणीव करून देतात. मग आता सर्वश्रेष्ठ पदी बसलेल्या गुलामला जाणीव कशी करून देणार?.

सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडुप, मुंबई

आंबेडकरी चळवळीचे राजकीय वारसदार बना!.

आंबेडकरी चळवळीचे राजकीय वारसदार बना!. 
आदरणीय बाळासाहेब उर्फ प्रकाश यशवंतराव आंबेडकर आज आंबेडकरी चळवळीचे खरे रक्ताचे वारसदार आहेत. पण आपण खऱ्या अर्थाने वैचारिक चळवळीचे वारसदार आहेत. परंतु राजकीय वारसदार आज ही होऊ शकले नाहीत. कारण तुम्ही जिथून सुरुवात केली होती.ती परिस्थिती आज ही जशीच्या तशीच आहे. सम्यक समाज आंदोलन या सामाजिक जनआंदोलनातून आपण सुरवात केली होती.त्या जनआंदोलनाचे आपण नेते होता.पण त्यात मोठे योगदान देणारे नेते अर्जुन डांगळे आणि अविनाश महातेकर हे होते.याच्या मुळेच मुंबईसह राज्यात गांव तिथे बौध्द महासभेची शाखा, गांवागांवात जाऊन जनजागृती करण्याचा यशस्वी प्रयत्न झाला होता. त्यातून अनेक निष्ठावंत कार्यकर्ते तयार झाले.खूप मोठी जनजागृती झाली होती.असे लिहले तर चुकीचे होणार नाही.त्यामुळेच राजकीय समीकरण बदलली होती. तो बदल समाजवादी, डाव्यांनी उचलून धरल्यामुळे सतत प्रसिद्धी मिळत होती. तेच हवा निर्माण करीत होते.हे सर्वच मान्य करतात.तो बदल काही अर्थाने पूर्ण झाला असे म्हणता येत नाही.आणि अपूर्ण राहिला असे ही म्हणता येत नाही.मागासवर्गीय समाजातील लोक बहुजन म्हणूनच जवळ आले.विशेष बुलढाणा,अकोला जिल्ह्यातील बौद्ध समाजावर होणारे हल्ले,अन्याय,अत्याचार करणारे कोण आहेत हे पाहिल्यावर, आपले एकूण संघटन,बौद्ध महासभा,भारिप बहुजन महासंघ आणि डाव्या चळवळीशी असलेला घरोबा कुठे तरी कमी पडतो असे वाटते.त्याचे सत्यशोधक पद्धतीने आत्मपरीक्षण करून त्यातील काही प्रश्न आपल्या वाढदिवसा निमित्य आपल्या भक्त आणि शिष्या समोर मांडण्याचा हा प्रयत्न करतो. कारण आंबेडकरी चळवळीत अनेक बुद्धिवादी लेखक, पत्रकार,साहित्यिक आहेत.पण त्याच्या मध्ये एका गोष्टीचा अभाव आहे.तो म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यात नाही.सत्य मांडल्यावर समाज काय म्हणेल?.सत्ताधारी नाराज होतील.याची त्यांना भिती वाटते. म्हणून ते सत्याला सत्य म्हण्यास लिहण्यास घाबरतात.हे आपणच (विचारवंतां कडून अपेक्षा -आंबेडकर चळवळ संपली आहे.पण नंबर ३६ ) म्हटले आहे.त्यामुळे हा नियम मला लागू नाही.कारण मी प्राध्यापक,वकील , इंजिनियर,साहित्यिक,विचारवंत नाही. एक असंघटीत कामगार व कार्यकर्ता आहे.आणि अब्राम्हणी सत्यशोधक मासिकातून लिहता लिहता वृत्तपत्रात लिहायला लागलो.क्रांतिकारी विचारांच्या चळवळीची दिशा व दशा यावर सत्य शोधक नजरेतुन चिंतन आणि परीक्षण करून लिहायला लागलो.
    भूमिहीन शेत मजुरांचे प्रश्न सोडविण्या करिता त्यांना आपण गायरान,पडीत,वनविभागाच्या जमीन ताब्यात घेऊन कसायला लावून शेतमजुरांचे अल्पभूधारक शेतकरी केले. त्याच्या त्या कसलेल्या जमिनी नांवावर करण्यासाठी "भूमिहीन हक्क संरक्षण समिती स्थापन" केली होती. त्यामुळे बाबासाहेबाच्या लढ्यातील एका सेनापतीच्या अर्धवट राहिलेल्या लढ्याला आपण एक वेगळी दिशा देण्याचे काम हाती घेतले होते. "कसेल त्याची जमीन नसेल त्याचे काय?."  या घोषणेने राज्यच नव्हे तर संपूर्ण देश ढवळून निघाला होता.तोच धागा पकडून आपण राजकारण नको समाजकारण हवे त्याच्या समाज परिवर्तनातून राजकारण करू असाही आपला संकल्प होता.त्यामुळे राज्यातील नव्हे तर देशातील मागासवर्गीय,शोषित, पिडीत, आदिवाशी समाज तुम्हाला अंधार नष्ट करणारा नवा सूर्य प्रकाश म्हणत होती.सूर्याची किरण वरून खाली येतात.इथे प्रकाश खालून वर गेला.आणि बरेच काही विसरला.असे भूमि कसणारे हक्कदार म्हणतात.काही लढता लढत मेले. त्या आंदोलनातील लोक काल पण आपल्या सोबत होते आणि आज ही तुमच्या सोबत असतील ते केवळ बाबासाहेबांचे नातु म्हणून. 
पण कर्मवीर दादासाहेब गायकवाड भूमिहक्क समितीचे पुढे काय झाले?.मराठवाडा, विदर्भातील पडीत,गायरान, वनविभाग शेत जमीनी नांवावर झाल्या काय?.आपली राजकीय शक्ती वाढली असली तरी बुलढाणा, अकोला, वाशीम जिल्ह्यातील बहुसंख्येने शेतजमिनी नांवावर आज ही झाल्या नाही त्यांचे दावे अपात्र ठरविण्यात आले.अनेक गांवात वन हक्क समितीचे गठन होत नाही.त्यामुळेच नाहरकत पत्र, ठरावाचे पत्र ग्रामसभा देत नाही.त्याबाबत आता आपली आपल्या पक्षाची कोणतीच ठोस भूमिका का नाही.एस सी,एस टीच्या शे पाचशेच्या मतदानाच्या साठी पाच दहा हजार मतदान असलेल्या बहुजन समाजातील लोकांनां आपणास नाराज करायचे नाही हेच राजकारण त्यामागे आहे की नाही?.म्हणूनच प्रदिप भाई,अंभोरे, जगदीश इंगळे,नरसिंग गायकवाड,कडूदास कांबळे यांना भूमी मुक्ती मोर्च्या, बहुजन मुक्ती मोर्च्या सारख्या अनेक संघटनानां हे भूमिहीन,शेतकऱ्यांचे जन आंदोलन करावे लागत आहे.१९८२/८४ पासुन शेतजमीन कसणाऱ्या भूमिहीन शेतकाऱ्यांच्या जमिनीची नोंद सातबाऱ्यावर होत नाही.गांवातील बौद्धांचे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जागरूकता बहुजनास सहन होत नाही.म्हणून अन्याय, अत्याचार व लक्षवेधी हत्याकांड  होत आहेत. म्हणजेच आपण जिथून सुरुवात केली होती.ते समस्या आज ही कायमस्वरूपी अस्तित्वात आहे. यांचा आपणास राजकीय सोयी साठी सोयीस्कर विसर करावा लागत असेल तर सामाजिक आंदोलन राजकिय दृष्ट्या यशस्वी कसे होईल असा माझा प्रश्न आहे.तो तुमच्या भक्तांना कार्यकर्त्यांना चुकीचा वाटत असे.तर त्यांनी आपल्या तालुक्यातील, जिल्ह्यातील असंघटित कष्टकरी शेतमजूर, भूमिहीन लोकांचा सर्वे करावा.
आदरणीय ऍड बाळासाहेब आंबेडकर भारिप बहुजन महासंघाचे राष्टीय अध्यक्ष झाल्यावर " माझा पक्ष,माझी सत्ता " घोषणा दिली.आणि मी आंबेडकरी चळवळीतील राजकीय निळ्या आकाशातील चमकणारे तारे आहोत.हे दाखवून दिले.ज्या डॉ बाबासाहेबाच्या रक्ताचे आपण वारसदार आहेत.त्या बाबासाहेबानी आपले आयुष्य अस्पुष्य समाजाला धार्मिक,सामाजिक,शैक्षणिक आणि राजकीय अधिकार मिळवून देण्यासाठी खर्ची केले.त्यासाठी त्यांनी अनेक राजकीय सामाजिक शैक्षणिक संस्था,संघटना, पक्ष निर्माण केल्या. त्याची सुरवात त्यांनी "बहिष्कृत हितकारणी सभा " स्थापन करून केली.पुढे त्याचा विस्तार करत "समाज समता संघ " उभा केला.राजकीय क्षेत्रात आपले हक्क प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी 'स्वतंत्र मजूर पक्ष ' स्थापन केला. भारतदेश हा कृषी प्रधान आहे ७०% लोक शेतीवर मजुरी करून जगतात.त्यातील ८५% समाज हा बहुजन समाजातील आहे.म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,विमुक्त भटक्या जाती, इतर मागासवर्गीय,आदिवाशी समाजातील लोक आहेत.हे सर्व भारिप बहुजन महासंघाचे अधिकृत सभासद असणारच. त्याच्या साठी बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करून राजकीय हक्क्चे व्यासपीठ निर्माण केले होते. तो पक्ष ते विचार आज कोणा कडेच जिवंत नाहीत.देशातील मागासवर्गीय कामगार कर्मचारी यांनी स्वतःच्या ट्रेंड युनियन काढून त्या 
​स्वतंत्र मजदूर युनियन Independent Labour Union (ILU).​
 
संलग्न कराव्यात आणि राष्ट्रीय ट्रेंड युनियन निर्माण करून सरकारवर कायमस्वरूपी दबाव ठेवावा हेच मागासवर्गीय समाजाचे कामगारांचे मुख्य उद्धिष्ट असले पाहिजे होते.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले ल्या गोष्टीकडे कार्यकर्ते नेते पूर्णपणे दुर्लक्ष करतात. बाबासाहेबांनी दाखविलेल्या मार्गाने न जाता नवीन मार्ग शोधतात त्यात आपली मोठी शक्ती खर्च होतेच पण मतभेदांमुळे आंबेडकरी चळवळीतील सर्व समाज विखुरलेल्या जात आहे.यात आपली निर्णायक भूमिका आणि जबाबदारी असली पाहिजे होती.ती आपण पार पाडतांना दिसत नाही.
बाळासाहेब मागासवर्गीय बहुजन समाज हा सर्वात मोठा असंघटीत कामगार आहे.आज त्याची संख्या सरकारी ९३% आहे.त्याचा विकास आणि कल्याण करण्यासाठी अनेक योजना आहेत.त्याची आपणास संपूर्णपणे माहिती असणारच.पण आपण म्हणता की सरकारी योजना मागासवर्गीय समाजाला अपंग बनवितात.मग डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मागासवर्गीय समाजाच्या उन्नतीसाठी, कल्याणासाठी विकासासाठी राज्य व केंद्रात ज्या योजना कायदेशीर रित्या बनवुन देशाला अर्पण केला.त्या चुकीच्या होत्या काय?.डॉ बाबासाहेब आंबेडकर याचे स्वप्न होते की माझा समाज सत्ताधारी जमात व्हावा.महाराष्टातील आजची राजकीय वर्तमान स्थिती पाहता रिपब्लिकन पक्षातील फुट एकजातीय आहे.केवळ सर्व बौद्ध समाज एकत्र आला तर राजकीय टक्केवारी पाहता सत्ताधारी बनू शकत नाही.पण सर्व बौद्ध समाजातील आंबेडकरी गट एकत्र आले तर एकच गट मजबूत होऊ शकतो.त्याची एकी पाहून इतर मागासवर्गीय आदिवाशी भटक्या समाजातील लोक या पक्ष कडे आकर्षित होऊ शकतात.त्यासाठी एक विश्वास पात्र नेत्याची गरज आहे. आणि ते फक्त बाळासाहेब आंबेडकर असु शकतात.त्यासाठी त्यांना दूरदर्शी व धोरणी,मुत्सद्दी पण दाखवावा लागेल. विद्यार्थी दसे पासून ज्यांनी आंबेडकरी चळवळीत अन्याय अत्याचार विरोधात संघर्ष केला.आणि सत्ते जवळ गेले त्यांना जर आपण बांडगुळ म्हणणार असाल तर?.असे लोक प्रत्येक जिल्ह्यात आहेत. मागासवर्गीय समाजात आंबेडकरी चळवळी त्यांना मान्यताप्राप्त नेता म्हणून मानले जाते त्यांना आपण चॅनल मीडिया प्रिंट मीडिया समोर ओळखत नाही असे सांगता. पण चळवळीतील जेष्टनेत्याच्या श्रद्धांजली सभेत त्यालाच उभे राहण्यासाठी हात देता.त्यांच्या मातोश्रीच्या अंत्यसंस्कार यात्रेत सहभागी होता.हे कौतुकास्पद आहेच  यांचा समाजात प्रचंड परिवर्तन घडविणारा संकेत जातो. यासाठी बाबासाहेबांनी सांगितलेल्या कथेचे पारायण सर्व गटाच्या प्रमुखना करावे लागेल.२१ जानेवारी १९४९ रोजी औरंगाबादला झालेल्या कार्यकमात बाबासाहेब आपल्या अनुयायांना उदेशून सांगतात.जो पर्यंत तुम्ही तुमची मजबूत संघटना जगाला इतर समाजाला दाखवत नाही तो पर्यंत तुमच्यावर असे अनेक प्रकारचे अन्याय अत्याचार होतच राहतील.म्हणून दुसऱ्यावर अवलबून राहू नका.स्वताची ताकद निर्माण करा.मग पहा तुम्हाला कोण त्रास देतो. तुमच्यावर हल्ला करण्यासाठी त्यांना शंभर वेळ विचार करावा लागेल.बाळासाहेब आज जो तो नेता संस्थापक राष्टीय अध्यक्ष आहेत.त्यांना त्याची मर्यादा आपण दाखवू शकता.प्रत्येक नेत्याला त्याचा मतदार संघ वाटून द्या इतर जिल्ह्यात मतदार संघात ढवळाढवळ करण्याचीही कोणालाही गरज नाही.आपण लिहता की आंबेडकरी चळवळीचा व आंबेडकरी विचाराचा माणूस मोठ्या प्रमाणत मुंबई,नांदेड, विदर्भातील बुलढाणा,अकोला,भंडारा,गोंदिया, चंद्रपूर,नागपुर,गडचिरोली,असे काही आंबेडकरी जिल्हे आहेत. तिथे आंबेडकरी विचारधारेची माणस घडविण्याची गरज आहे.(आंबेडकरी चळवळ संपली आहे,पान ४१/४२ )
      ऍड बाळासाहेब आंबेडकर उर्फ  प्रकाश आंबेडकर यांच्यावर लिहणे म्हणजे खूप मोठी जोखीम असते .त्याच्या भक्तांना त्याच्या बाबत खरे लिहणे पसंत पडत नाही.प्रकाश यशवंत आंबेडकर हे आंबेडकरी चळवळीतील एक तरुण तडपदार नेतृत्व म्हणून प्रसिद्ध आहेत, पण त्याच बरोबर ते अत्यंत अभ्यासू, दूरदर्शी व धोरणी,मुत्सद्दी नि परिवर्तनवादी म्हणून ही त्यांची ख्याती आहे असे म्हणतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ते नातू असल्यामुळे सर्व समाज त्यांचा खूप आदर करतात. पण त्या पलिकडे जाऊन एक स्वतंत्र व्यक्तीमत्व म्हणून त्यानी स्वत:ची ओळख निर्माण करत राजकारणात व समाजकारणात मोठी मजल मारली. खरं तर बाबासाहेबांच्या घरात जन्माला आल्यावर नावाचा जो फायदा मिळतो तो मिळालाच पण त्याच बरोबर मोठ्या माणसाच्या घरात जन्मास येण्याचे तोटे ही असतात.प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू असल्यामुळे उगीच लोकांच्या अपेक्षाही उंचावल्या अन त्यात काही वावगं ही नाही.मात्र त्यातून सावरत त्यानी स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करत अकोल्यात वेगळा राजकीय आदर्श घालून दिला.एकमेव नेता असा आहे कि ज्याचा स्वताचा मतदार संघ आहे.बाकी सर्व आंबेडकरी चळवळीतील राजकीय नेते उंटावरचे शहाणे आहे.जे स्वताला संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घेतात पण वीस वर्षात स्वताचा मतदार संघ बांधू शकले नाहीत.म्हणूनच बाळासाहेब आंबेडकर यांनी आंबेडकरी चळवळीचे राजकीय वारसदार बनावे.करीता मित्रांना शत्रू न बनविता मित्रच राहु द्या मित्र शत्रु झाल्यास काय होते हे एका गोष्ठीतुन पाहता येईल. एकदा कुत्र्यात व गाढवात पैज लागते की जो लवकरात लवकर मुंबईत जाईल तो सिंहासनावर बसेल. ठरल्याप्रमाणे दोघेही तयार झाले.कुत्र्याला वाटले मीच जिंकेल कारण गाढवापेक्षा मी जास्त धावू शकतो.पण कुत्र्याला पुढे काय होणार यांची नक्की माहिती नव्हती.शर्यत सुरू झाली कुत्रा जोरात धाऊ लागला.पण थोडेसे पुढे गेला नसेल तर लगेच गल्लीतील कुत्र्यांनी त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला.असेच प्रत्येक गल्लीत प्रत्येक चौकात घडत राहिले कसा बसा कुत्रा धावत धावत सिंहासना जवळ पोहचला तर बघतो तर काय ?. गाढव त्या आधीच पोहचले होते.त्यामुळे त्याने शर्यत जिंकून ते राजा झाला होता.निराश झालेला कुत्रा तेव्हा म्हणतो माझ्याच लोकांनी मला मागे ओढलं नसते तर आज गाढव सिंहासनावर बसले नसते.हीच परिस्थिती मागासवर्गीय बहुजन समाजातील नेत्यांची कार्यकर्त्यांची झाली आहे.म्हणूनच आपल्या माणसांना विश्वासात घ्या,पुढे जाण्यासाठी सहकार्य करा.त्यांना प्रोत्साहन द्या,नाहीतर बाहेरची गाढव आपल्यावर राज्य करीत राहतील.म्हणूनच 
बाळासाहेब आपल्या कडून सर्व समाजाची खूप अपेक्षा आहे.आपण समाजाचे ऐक्य घडवू शकतात.पण आपला अभिमान आडवा येतो. आपण  स्वाभिमानी आहात, स्वाभिमानी असावे पण समाज हिता करिता अभिमान आणि स्वाभिमान. समान अंतरावर ठेवल्यास बाबासाहेबाचे खरे रक्ताचे नाही तर वैचारिक वारसदार आपणच ठरू शकता. फक्त आपल्याला वीस पावले मागे येऊन पन्नास पावले पुढे जाता येईल.आपण पंधरा वीस आमदाराची अपेक्षा करता. ऐक्य झाल्यास पन्नास साठ आमदार आपण सहज निवडून अनु शकता.त्याकरिता आपल्या समोर आंबेडकरी जिल्ह्याची अभ्यासपूर्ण माहिती आहे.त्याचा योग्य वापर करा आणि आंबेडकरी चळवळीतील समाजाचे ऐक्य घडवा.आणि आंबेडकरी चळवळीचे राजकीय वारसदार बना!.आपल्या वाढदिवसा निमित्त सर्व वाचकास  हार्दिक शुभेच्छा 

आपला 

शुक्रवार, १३ एप्रिल, २०१८

कांशी तेरी नेक कमाई तुने सोती कोम जगाई

कांशी तेरी नेक कमाई तुने सोती कोम जगाई 
भारतीय राजकारणात जातीला आणि त्यांच्या समूहाला जे नांव दिल्या जाते तेच त्याचे हुकमी पत्ते असते.छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वजाती धर्मातून जे तडपदार तरुण गोळा केले त्यांना त्यांनी नांव दिले होते मावळे.हेच मावळे शिवाजी महाराजा च्या नेतृत्वात संघटीत झाले.स्वकियाशी ३२आणि परकीयाशी १२ लढाया लढून त्यांनी रयतेचे राज्य स्थापन करून स्वराज निर्माण केले, महात्मा जोतीराव फुलेंनी सर्व ब्राम्हण सोडून सर्व समाजाला ब्राम्हणेतर म्हणून संघटित केले आणि सत्यशोधक समाज निर्माण केला. देशातील पहिली असंघटीत बांधकाम व गिरणी कामगार संघटना बांधली.त्यांना कामगार म्हणून मान्यता मिळवून रावबहादूर नारायण मेंघाजी लोखंडे सारखा तडपदार वैचारिक संघर्ष करणारा नेता दिला.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मूक नायक समाजाला प्रबुद्ध मानव बनविले आणि सामाजिक,शैक्षणिक,आर्थिक परिवर्तन घडवून राजकीय परिवर्तन घडविण्याची ताकद मागासवर्गीय समाजात निर्माण केली.म्हणूनच देश भरात मागासवर्गीय समाजाचे लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत ते राष्ट्रपती पर्यंत निवडून जातात. कांशी तेरी नेक कमाई तुने सोती कोम जगाई पण ते गुलामी स्विकारतात त्याला नाईलाज आहे. 
कांशीराम यांचा जन्म १५ मार्च १९३४ ला झाला.मृत्यू ९ ऑक्टोंबर २००६ ते भारतीय राजकारणातील व ​सामाजिक क्षेत्रातील विशेष तदन म्हणून ओळखल्या जात होते.त्यांनी भारतीय वर्ण व्यवस्था मोडून काढण्यासाठी सर्व मागासवर्गीय समाजात प्रचंड प्रबोधन करून जनजागृती केली.बहुजन समाज हि देशात ओळख निर्माण केली राजकीय परिवर्तन केले.दलित शोषित संघर्ष समिती डीएसफोर च्यामुळे उतरभारतात मागासवर्गीय समाजाची ओळख बहुजन समाज झाली. ​१९७१ ला त्यांनी अखिल भारतीय पिछडा और अल्पसंख्याक समुदाय कर्मचारी महासंघ म्हणजे All India Backward and Minority Communities Employees Federation (BAMCEF) १४ एप्रिल १९८४ बहुजन समाज पार्टी BSP ची स्थापना केली.सर्व समस्यांची गुरुकिल्ली हि सत्ता असते सत्ता सर्व कुलुपाची चाबी असते. डॉ बाबासाहेब आंबेडकर ते मायावती व्हाया मान्यवर कांशीराम यांची ही चळवळ १९३२ ते १९८२ प्रबोधन करून संघर्ष करीत संघटित झाली,म्हणूनच २००७ ला उतर प्रदेशात पूर्ण बहुमताने निवडून आली होती आणि देशात एक नवा प्रेरणादायी इतिहास लिहला गेला होता.देशातील पहिला  मागासवर्गीय महिला व देशातील सर्वात मोठ्या राज्याची मुख्यमंत्री बनली.आणि त्याच बरोबर २००७/२००८ यावर्षी २६ करोड रुपये इन्कमटॅक्स भरणारी पहिली एक राजकीय दलित महिला नेता ठरली होती.ते केवळ मान्यवर कांशीराम यांच्या वैचारिक संघटना कौशल्यावर.जी बसपा देशातील बहुजन समाजाला सांगत होती " बाबा तेरा मिशन अदूर बी एस पी करेगी पुरा !." ती बसपा २०१२ च्या विधान सभा आणि लोकसभा निवडणुकीत चारीमुंड्य चीत झाली. त्यामुळे देशातील मागासवर्गीय समाज आपल्या १९३२ च्या परिस्थिती वर आला.ज्या हिंदुत्वाच्या विरोधात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्ष सुरु केला होता त्याच जाग्यावर मायावती येऊन थांबल्या आहेत.कारण मान्यवर कांशीराम यांनी आपल्या जीवनभर चमचा युगाचा धिक्कार केला.सत्ता आल्यावर कसे चमचे तयार होतात त्याचा वापर समाजाला तोडणारे हत्यार म्हणून कसा सारखा होतो हे मायावतीच्या कार्यकाळात दिसून आला.त्यासाठी आपण प्रथम कांशीरामजीची हत्यार आणि चमचा ही मांडणी समजून घेणे जरुरी आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे करारावर प्रतिकीर्या देताना सांगितले होते कि संयुक्त मतदार संघ म्हणजे एक गलिच्छ उपनगर ज्या नगराचा उमेदवार ठरविण्याचा अधिकार उच्च वर्णीय लोकांना आहे.आणि त्याचा समाजाचा सत्यानाश करण्यासाठी वापर करने म्हणजेच कांशीरामजी च्या शब्दात चमचा.चमचा हा घराघरात वापरल्या जाणारे हत्यार आहे.जे स्वत कोणतेही काम करू शकत नाही.पुणे करारा नंतर राजकारण्यांनी असेच चमचे मागासवर्गीय समाजात अल्पसंख्याक पीडित शोषित आदिवाशी समाजात निर्माण केले.चमचा चा वापर नेहमी आपल्या फायद्या साठीच होतो.त्यामुळे तो कोणाचे नुकसान स्वत करीत नाही कोणाच्या सांगण्या वरून करतो.कांशीराम यांच्या बसपा ची बहुजन हिताय बहुजन सुखाय घोषणा जेव्हा मायावतीने सर्वजण हिताय केली तेव्हा सत्ता आल्यावर चमचा आणि हत्यार कसे वापल्या जाते हे दिसून येते.मायावती सत्ता चालविण्यास,समाजाच्या आणि राज्याच्या हिताचे निर्णय घेण्यास समर्थ आहे.उतर प्रदेशात स्मारक आणि स्वताच्या प्रतिमा लावण्यास राज्य शासनाचा निर्णय असल्या मुळे सुप्रीम कोर्ट भी मायावतीला रोखू शकले नाही.पण मायावतीने राज्यात कांशीराम आणि मायावतीचे पुतळे उभे करण्या पेक्षा बहुजन समाजातील मुलामुलींना शिक्षणा वर भर दिला असता तर आजचे चित्र वेगळे असते.केवळ अनेक विद्यालयाला महाविद्यालयाला महापुरुषाच्या नांवे देऊन वैचरिक समाज क्रांती होत नाही. जिल्ह्याचे नांव सर्व महापुरुष संत महामाताच्या नांवे केले. त्यामुळे मागासवर्गीय समाजात विशेष चमार समाजात काय बदल झाला?.हे कांशीरामजीचे तत्वज्ञान मायावतीने मातीमोल करून ठेवले त्यामुळे चमचा युग काय करू शकते २०१२ च्या निवडणुकीने दाखवून दिले. 
मुझे पढे लिखे लोगोने धोका दिया असे.डॉ बाबासाहेब आंबेडकर खेदाने मत व्यक्त केले होते.पण त्याच पढे लिखे लोकांना संघटीत करून बामसेफ संघटना बनविली आणि त्याच्या कडून पैसा व बुद्धी प्रशासकीय अनुभव समाजास मिळवुन दिला.त्यातूनच त्यांनी डीएस फोर DS4 दलित शोषित समाज संघर्ष समिती द्वारे समाजात जनजागृती केली.त्याची सुरुवात ही सायकलवरून झाली.पुण्याला असताना त्याची एक दिवस इराणी हॉटेल समोर ठेवलेली सायकल चोरी गेली.त्यामुळे खूप कोध्रीत झाले.त्यांनी हॉटेल मालकावर खूप राग काढला तेव्हा मालकाने आपले लोक कामाला लावले तेव्हा ते खूप खुश झाले. कार्यकर्त्याना सांगितले सायकल हि माझ्या साठी एकमात्र साधन आहे.ते केवळ साधनच नाही तर बहुजन मिशनचे सर्वात महत्वाचे साधन आहे.यावरच त्यांनी भारत भर सायकल यात्रा काढली.कांशीराम जी यांनी आपल्या पन्नास वर्षात बहुजन समाजात जनजागृतीसाठी चाळीस दिवसात चार हजार किलोमीटर सायकलवरून यात्रा केली.देशातील नव्हे तर जगातील कोणत्याही समाज सुधारक,राजकिय नेत्याने असे धाडस केलेले नाही.कांशीराम जी यांनी पहिली सायकल यात्रा पेरियार ई व्ही रामास्वामी नायकर यांच्या जयंती दिनी म्हणजे सतरा सप्टेंबर १९८८ ला कन्याकुमारी वरून सुरवात केली.दुसरी कोहिमा ,तिसरी कारगिल,चौथी पुरी,पांचवी पोरबंदर वरून काढली आणि २७ मार्च १९८९ दिल्ली विशाल रैलीत बदल करून बहुजन समाजाची शक्ती दाखवून दिली.  
कांशीराम जी ने रात्र दिवस मेहनत करून वाढविलेली बसपा मायावतीने चमच्या लोकांच्या सल्ल्याने देश भरातील कॅडर बेस कार्यकर्ते संपवले.मायावतीचे सर्व निर्णय अचूक असतील तर चाळीस मंत्री भष्टाचार कसे करतात. आमदार,मंत्रीमंडळ, कैबिनेटचे सर्व निर्णय जर मायावती घेत असतील तर पक्ष संघटनेत चमचे कसे निर्माण होतात. कांशीरामजीने मायावतीवर जो विश्वास दाखविला त्याला तडा गेला आहे.मिशनरी कार्यकर्त्यांना चमचा समजून पक्षातुन बेदखल करून बसपाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे.काही चमच्यांना त्याच्या समाजाच्या विरोधात उभे केले जाते.तर मिशनरी कार्यकर्त्यांना त्यांच्या समाजाच्या हिता साठी उभे केले जाते.चमचा आपल्या समजतील सच्या नेत्याला कमजोर बनवितो तर मिशनरी कार्यकर्ता आपल्या समाजातील सच्या नेत्याला मजबूत बनवितो.कांशीरामजीची संघटन कौशल्य आणि मायावतीचे संघटन कौशल्य यातील फरक आज प्रत्येक राज्यात दिसून येत आहे.त्यामुळे कांशी तेरी नेक कमाई तुने सोती कोम जगाई या घोषणाचा 
​असर आज कमी झालेला वाटत असला तरी हाच मागासवर्गीय समाज देशभरातील विविध क्षेत्रात सत्तेत भागीदार झालेला आहे तो मान्यवर कांशीराम यांच्यामुळे त्यांना त्यांच्या जयंती दिना निमित्य त्यांच्या क्रांतिकारी विचाराला कोटी कोटी प्रमाण  
सागर रामभाऊ तायडे,भांडूप मुंबई - ९९२०४०३८५९

हाच का सम्राट अशोकाचा भारत?.

हाच का सम्राट अशोकाचा भारत?.

 सम्राट अशोकाला भारताच्या इतिहासात सर्वांत महान सम्राटांचे स्थान दिले आहे. प्राचीन भारताच्या परंपरेत चक्रवर्ती सम्राटांची पदवी ज्यांनी जनमानसावर तसेच भारताच्या मोठ्या भूभागावर राज्य केले अशाच महान सम्राटांना दिली जाते. भारताच्या इतिहासात असे अनेक चक्रवर्ती सम्राट होउन गेले ज्यांचे उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये रामायण,महाभारत इत्यादी आहेत प्राचीन चक्रवर्ती सम्राटांच्या पंक्तीतील अशोक हा शेवटचा चक्रवर्ती सम्राट झाला त्यानंतर कोणीही त्या तोडीचा राज्यकर्ता भारतात झाला नाही.म्हणूनच मान्यवर कांशीराम आपल्या कॅडरबेस कार्यकर्त्यांना नेहमी सांगत होते बहुजन ​समाज पार्टीला सम्राट अशोकाचा भारत निर्माण करायचा आहे.अशोकने भारताच्या बहुतांशी भागावर राज्य केले​.​बसपाला मानणारा बहुसंख्य बहुजन समाज भारताच्या कोण्या कोण्यात बसलेला आहे.उत्तर भारतातील बहुसंख्य ओबीसीनी मुंबईत व नागपुरात धम्मदिक्षा घेतली,ज्यात मौर्य समाजाचे मोठे योगदान आहे,मौर्य समाज हा सम्राट अशोकाच्या रक्ताचा वारसदार आहे असे म्हणतात ​पण तो मोठ्या संख्येने हिंदुत्व मानसिकतेने पछाडलेला होता आणि आहे.उत्तर प्रदेश च्या एका पोटनिवडणुकीत समाजवादी पार्टीचा मागासवर्गीय उमेदवार ?.
लडाक ​,जम्मू, काश्मीर मध्ये बसपाचा आमदार, खासदार निवडून येण्या मागे सम्राट अशोकाचा भारत ही विचारधारा 
होती
.पाकीस्थान,अफगाणीस्तान पूर्वेकडे बांग्लादेश ते दक्षिणेकडील केरळ पर्यंत अशोकाच्या साम्राज्याच्या सीमा होत्या. कलिंगाच्या युद्धातील महासंहारा नंतर कलिंग काबीज झाला, जे कोणत्याही मौर्य राज्यकर्त्यास पूर्वी जमले नव्हते. ते सम्राट अशोकाने करून दाखविले. त्याच्या राज्याचे केंद्रस्थान ज्याला आताचे बिहार म्हणजे तेव्हाचा मगध होता, बिहारची राजधानी पाटणा म्हणून ओळखली जाणारी तेव्हाची पाटीलपुत्र ही त्याची राजधानी होती.याचे एतिहासिक पुरावे आज पटना शहरात पाहण्यास मिळतात.कलिंगाच्या युद्धात  झालेल्या प्रचंड मनुष्य हानी पाहून सम्राट अशोकाने हिंसेचा त्याग केला व बौद्ध धर्माचा स्वीकार केला व नंतरच्या आयुष्यात त्याने स्वतःला बौध्द धम्मचा प्रचार आणि प्रसार करण्या करिता समर्पित केले अशोकाच्या काळातील अशोकाच्या संदर्भातील अनेक शिलालेख भारताच्या काना कोपर्‍यात सापडतात त्यामुळे अशोकाबाबतची उपलब्ध ऐतिहासिक माहिती भारताच्या प्राचीन काळातल्या कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तीपेक्षा अधिक आहे.
अशोकाने कलिंगचे युद्ध पार पडल्यानंतर जिकलेल्या रणांगणाची व शहरांची पहाणी करायची ठरवले. त्यावेळेस त्याने फक्त सर्वत्र पडलेले प्रेतांचे ढीग, सडण्याचा दुर्गंध, जळलेली शेती, घरे व मालमत्ता पाहिली. ते पाहून अशोकाचे मन उदास झाले व यासाठीच का मी हे युद्ध जिंकले, व हा विजय नाही तर पराजय आहे, असे म्हणून स्वतःला त्या प्रचंड विनाशाचे कारण मानले. हा पराक्रम आहे की दंगल, व बायका मुले व इतर अबलांचा हत्या कशासाठी व यात कसला प्रराक्रम असे स्वतःलाच प्रश्न विचारले. एका राज्याची श्रीमंती वाढवण्यासाठी दुसर्‍या राज्याचे अस्तित्वच हिरावून घ्यायचे? ह्या विनाशकारी युद्धानंतर शांती,अहिंसा, प्रेम,दया ही मूलभूत तत्त्वे असलेला बौद्ध धम्माचा मार्ग अशोकाने अवलंबायचे ठरवले. त्याने स्वतः बौद्ध धर्माचा प्रसारक म्हणूनही काम करायचे ठरवले. यानंतर अशोकाने केलेले कार्य त्याला इतर कोणत्याही महान सम्राटांपेक्षा वेगळे ठरवतात. ज्यात क्रूरकर्मा राज्यकर्त्याचे महान दयाळू सम्राटात रुपांतर झाले अशीकलिंगाचे युद्ध ही इतिहासातील एक अतिशय वेगळी घटना समजली जाते. बौद्ध धर्माचा जगभर झालेल्या प्रसारास खूप मोठ्या प्रमाणावर अशोकाने केलेले कार्य जबाबदार होते असे बहुतेक इतिहासकार मानतात.तरी उत्तर भारतातील मागासवर्गीय ओबीसी बौद्ध धम्मा​कडे न जाता स्वतःला जास्तच सवर्ण समजत होते.जेव्हा अन्याय अत्याचार आणि भीषण हत्याकांड झाली तेव्हाच त्यांना आपण कोण आहोत आणि आपले पूर्वज कोण होते यांची आठवण होते.त्यांनी लोकसंख्येच्या बळावर राजकीय परिवर्तन घडविणे अपेक्षित असते.मान्यवर कांशीराम यांनी बौद्धधम्माची दिक्षा जाहीर पणे घेतली असती तर उत्तर भारत सम्राट अशोकाचा भारत झाला असता.त्यांची चूक उत्तर भारतातील ओबीसी नी सुधारली आता मायावतीने कोणाचा आदर्श घ्यावा हे ठरविले पाहिजे. किती दिवस आर एस एस प्रणित भाजपा​ला धर्मपरिवर्तनाच्या धमक्या देणार?.आणि राजकारण करणार करीत राहणार?.सम्राट अशोकाचा भारत बौद्धमय करण्यासाठी मागासवर्गीय ओबीसी तयार आहे हे देशातील धम्मदिक्षा सोहळ्यावरून दिसत आहे.
इतिहास सांगतो वैशाली (बिहार) येथील अशोक स्तंभ अशोकाच्या ह्या कार्यात त्याला देवीपासून झालेल्या मुलांची मोठी मदत झाली.अशोकाचा मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा ह्यांनी भारताबाहेर श्रीलंकेत जाउन तेथील राजाला बौद्ध धम्माची ​शिकवण दिली यामुळे भारतापुरते मर्यादित राहिलेला हा ​धम्म भारताबाहेर पसरण्यास सुरुवात झाली. असे मानतात की अशोकाने बौद्ध धर्मीयांसाठी हजारो स्तूपांची व विहारांची निर्मिती केली. त्यांतील काही स्तूपांचे अवशेष आजही पहावयास मिळतात. यातील मध्यप्रदेशात सांची येथील स्तूप प्रसिद्ध आहे, हा स्तूप अशोकाने बांधला आहे.​
मायावतीने असेच बुद्ध सम्राट अशोक,महात्मा ज्योतिबा फुले,राजर्षी शाहू महाराज डॉ भिमराव बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक वारसा सांगून ऐतिहासिक वास्तू जिल्हे,विद्यापीठ निर्माण केले पण धम्मदिक्षा घेतली काय?.सम्राट अशोकाने आपल्या कारकिदीतील पुढील वर्षांमध्ये अहिंसा हे राष्ट्रीय धोरण बनवले, जंगलामध्ये चैनीसाठी होणारी प्राण्यांची शिकारीवर बंदी आणली, प्राण्यांवर होणार्‍या कोणत्याही प्रकारची हिंसकतेवर ही बंदी आणली तसेच शाकाहाराला प्रोत्साहन देण्यात आले. शिक्षा मिळालेल्या कैद्यांना अशोकाने सहिष्णूपणे वागवले. गुणी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी अनेक विद्यापीठे तसेच, शेतकर्‍यांसाठी पाण्याचे कालवे बांधले. त्याच्या राज्यात सर्व प्रकारच्या जातीधर्माच्या लोकांना सहिष्णुरीत्या वागवले जाई. तसेच अशोकाने आपले एकेकाळी ज्याच्यांशी युद्धे केली त्यांच्याशीही मैत्रीपूर्ण संबध वाढवले. सम्राट अशोकाने अनेक समाजोपयोगी कार्ये केली.अशोकाने आपल्या कारकीर्दीत राज्यात अनेक रुग्णालये व महामार्गाचे जाळे निर्माण केले, रस्त्यांच्या कडेला वृक्षांची लागवड ही अशोकाचीच कल्पना आहे, असे मानतात. आपण सम्राट असल्याच्या अधिकाराचा फायदा त्याने समाजोपयोगी कार्यासाठी केला. त्यानंतर अशोकाला धम्मअशोक असे म्हणू लागले. अशोकाने धम्माची प्रमुख आचारतत्त्वे विशद केली, अहिंसा, सर्व जातिधर्मांबद्दल सहिष्णुता, वडिलधार्‍या माणसांना मान देणे,संत​,महात्मा​, शिक्षकांना योग्य तो मान देणे, दासांना माणुसकीने वागवणे. अशा आचार तत्त्वांना जगात कोणताही समाज नाकारू शकणार नाही. अशोकाच्या इतिहासकारांनुसार त्याने कलिंगाच्या युद्धानंतर कोणतेही प्रमुख युद्ध छेडले नाही परंतु त्याला शेजारी राष्ट्रांशी ग्रीक राज्ये, चोल साम्राज्ययाच्याशी त्याला नेहमी युद्धाची शक्यता वाटत होती. परंतु अशोकाने पूर्वायुष्यातील केलेल्या मोहिमांमुळे व मगधच्या सामर्थ्यामुळे अशोकने बौद्ध धर्म स्वीकारला तरी त्याच्या शेजारी राज्यांनी त्याला छेडण्याचे साहस केले नाही. तसेच बौद्ध धर्म स्वीकारला, अहिंसा हे राष्ट्रीय धोरण बनवले तरी मगधाचे सैनिकी सामर्थ्य अबाध्य ठेवले. अशोकाला ग्रीक जगताची माहिती होती असे कळते. तसेच चंद्रगुप्त मौर्याने केलेल्या ग्रीकांविरुद्धच्या मोहिमांमुळे मौर्य साम्राज्याची कीर्ती ग्रीस,  इजिप्तपर्यंत पोहोचली होती असे कळते.मग सम्राट अशोकाचा भारत बौद्धमय होण्यास वेळ का लागतो. राजकीय गणिते मांडत राहिल्यास अशोकाचा भारत बौद्धमय होईल काय?. हे देशभरातील भव्य धम्मदिक्षा सोहळे केवळ ढोंग आहेत असे म्हणल्यास चूक ठरणार नाही. आज देशात लोकशाही मार्गाने सत्ता काबीज करून लोकशाहीचा सरळ खून करण्याचे कारस्थान उघड उघड होत आहे.लोकशाहीची सर्व मूल्य पायदळी तुडवून ठोकशाही,हुकूमशाही निर्माण होतांना दिसत आहे.सम्राट अशोक ते छत्रपती शिवाजी,संभाजी महाराज यांना ज्या मनूस्मृती संपविले त्याचं पद्धतीने आज लोकशाही संपत आहे.म्हणूनच विचारावेसे वाटते हाच का सम्राट अशोकाचा भारत?.
 सागर रामभाऊ तायडे भांडुप मुंबई ९९२०४०३८५९.