मंगळवार, ११ जानेवारी, २०२२

राष्ट्रमाता जिजाऊ जयंती सेल्फी काढुन साजरी करुया

 राष्ट्रमाता जिजाऊ जयंती सेल्फी काढुन साजरी करुया



12 जानेवारीला आपल्या घरातील माँ जिजाऊंचा फोटो दिसला पाहिजे आणि घरातील कँलेंडर हातात घेऊन सेल्फी काढुन जयंती साजरी करुया.आपल्या घरातल्या कँलेडरचा फोटो आणि घरात असणारया महापुरुषांचा फोटो पाठवा.
(एकाच फोटोत आपल्या घरात असणारया माँ जिजाऊंचा आणि अन्य महापुरुषांचे आणि घरातील कँलेडर हातात घेऊन फोटो पाठवा.
"माझा देश माझे संविधान" सोशल मिडिया प्रस्तुत ही स्पर्धा घेण्यात येत आहे याविषयी थोडक्यात दरवर्षी आपल्या घरी किंवा आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी एक कँलेंडर घेत असतोच.पण तो कँलेंडर कोणता आहे?. त्या कँलेंडर मधुन आपण काय घेतो?तो कँलेडर कोणत्या विचाराचा आहे?हे ही तेवढेच महत्वाचे आहे.हा शुभ दिवस,तो अशुभ दिवस याबरोबर राशी भविष्य असते,पंचाग असते हे कशाला पाहिजे? आपण आणि हे सगळे तयार करणारे कालनिर्णय वाले साळगावकर आपल्यात हळुहळु ज्योतिषी पणा रुजवले आहे. शुभ दिवस अशुभ दिवस रुजवला जात आहे तिथी पाहणे आपल्याच महापुरुषांचे जन्मतारीख चुकीच्या लावणे असे आहे.सर्व प्रथम महात्मा फुलेनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली, त्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होऊ लागली.त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही तारखेनुसार साजरी करायची कि तिथीनुसार जयंती साजरी करायाची.
पण काही सनातन्या प्रवृत्तीने शिवाजी महाराजांची जयंती ही तिथीनुसार साजरी करायची ठरवली आणि त्यानुसार मागील कित्येक वर्षे हे कालनिर्णय,महालक्ष्मी वाले त्यांनी तयार केलेल्या या कँलेडर वर तिथीनुसार शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात यावी अशा पध्दतीने त्यांच्या कँलेंडर मध्ये उल्लेख असतो, आणि आपण त्याचे कँलेडर घेऊन त्यानांच मोठे करतो त्यांनी फक्त लक्ष्मीचे व्रत करणारी पुस्तके आणि हे कँलेडर पासुन आपल्याला मुर्ख बनवले, कोट्यावधी रुपये कमवले आज ही आपल्या लोकांच्या घरात महालक्ष्मी,आणि कालनिर्णय दिसतो. तो कँलेडर तुम्ही घेऊ नका.आपल्या विचारांचे कँलेडर घ्या.उदा प्रबुध्द भारत कँलेंडर,धम्मयान कँलेडर घ्या.किंवा इतर बरेच कँलेडर आहे हे समतेच्या विचारांचे कँलेडर आहेत. आणि या माध्यमातुन का होईना आपण आपल्या लोकांच्या व्यवसायाला चालना देऊ शकतो. आणि आपण घेतलेले कँलेडर ही आपल्या विचारांचे असतील,त्यामध्ये तिथी,पंचाग, राशी भविष्य नसतील, हे बघा. आणि नंतरच खरेदी करावे.
याबरोबर जनजागृतीसाठी सुशिक्षिंतानी ही स्पर्धेसाठी पुढे यावे.सर्वाचे फोटो
"माझा देश माझे संविधान" या फेसबुक पेज वर नावे आणि फोटो अपलोड केला जाईल.
माझे घर माझे कँलेडर या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नियम 
1) कालनिर्णय,महालक्ष्मी आणि अन्य सनातनी विचारांचे (ज्यात पंचाग राशीभविष्य,शुभ अशुभ आहेत) असे कोणतेही कँलेडर घेऊ नये.2) समतेच्या विचारांचे कँलेडर आपण घ्यावेत.3) फोटो काढताना कँलेडर आपल्या हातात घेऊन आपल्या घरातील महापुरुषांचे फोटो ही आले पाहिजेत,असा फोटो काढावा4)कँलेडर बरोबर फोटो काढताना घरातील एक किंवा एकापेक्षा जास्त व्यक्ती जरी फोटोत आल्या तरी चालतील,पण कँलेडरचे किमान नाव दिसावे आणि घरातील महापुरुषांचे फोटो दिसावे हे महत्वाचे आहे5) एका घरातील एकच फोटो पाठवावा,6) 12 जानेवारी माँ जिजाऊचा जन्मदिवस या दिवशीच पाठवावा.7) विजेते 26 जानेवारीला घोषित करण्यात येईल.8) विजेत्याला आँनलाईन किंवा आँफलाईन सर्टिफिकेट मिळेल. 9) या स्पर्धेसाठी कँलेडर 2022 चा पाहिजे.10) फोटो 9067047333 या नंबर वर whatsapp करावे फोटो सोबत आपले नाव आणि पत्ता पाठवा,
चला बदलाची सुरवात आपल्यापासुन करुया आपण आपल्यानाच साथ देऊ या आपण आपली प्रगती करु या.राष्ट्रमाता जिजाऊ जयंती सेल्फी काढुन साजरी करुया
आपलाच
यश भालेराव 9067047333 पुणे

ओबीसीना शाळा कॉलेज नको मंदिर पाहिजे,आरक्षण नको धर्म पाहिजे.

 ओबीसीना शाळा कॉलेज नको मंदिर पाहिजे,आरक्षण नको धर्म पाहिजे.



ओबीसींचे राजकीय आरक्षण संपवून 11 लाख ओबीसी लोकप्रतिनिधी संपविले गेले.या सामाजिक अपघाताची,आघाताची ज्याच्या मनात आणि गावात जाणीवच होत नाही ते मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी आहोत हेच ज्यांना माहीत नाही त्या भारताच्या 52 टक्के लोकसंख्येला म्हणजेच अर्ध्या भारताला ओबीसी म्हणतातमंडळ आयोगाने महाराष्ट्रातील ओबीसी जातींची संख्या 360,तर देशात ओबीसी जातींची संख्या 3,744 इतकी नोंद केल्याचे गुगल सांगते.ही माहिती अनेक ओबीसी कार्यकर्ते नेते आणि समाजकारण राजकारण करणाऱ्या ओबीसी बांधवानी समजून घेतली पाहिजे.
ओबीसी बांधवाना हे राजकीय आरक्षण संपल्याचे संकट समजत नाही ?.म्हणून ओबीसीना शाळा कॉलेज नको मंदिर पाहिजे,आरक्षण नको धर्म पाहिजे.
भारतात देवा देवीकांच्या जन्म मृत्यू च्या गोष्टी कथा प्राथमिक शिक्षण घेतांना सांगितल्या व शिकविल्या जातात.त्यांचे संस्कार लहानपानापासून मुलामुलीवर होतात.देवाची मनोभावो पूजा अर्चा केली तर देव कसे चमत्कार करून प्रसन्न होतात हे शिकविल्या जाते.गणेशोत्सवात दररोज होणारी आरती व नवरात्रीच्या देवीच्या आरती बहुसंख्य मुलामुलींना तोंडपाठ असतात. पण त्यांचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न ते कधी करीत नाही. रामानंद सागर यांनी रामायण, महाभारत टीव्हीवर आणल्या पासुन तर विद्यार्थी शिक्षकांनाच उलट सुलट प्रश्न विचारतात. त्यात इंग्रजी माध्यमाच्या स्कुल मध्ये थोडे विज्ञान थोडे सांस्कृतिक म्हणून जनरल नॉलेज म्हणून रामायण महाभारतातील पात्रराची वेशभूषा व ठराविक डॉयलाग बोलण्याची स्पर्धा घेतली जाते.
सोशल मीडियावर नेहमीच हुशार विद्यार्थी व शिक्षक यांच्यात रामायण, महाभारत किंवा राजकीय नेत्याच्या बाबत लक्षवेधी पोस्ट खुप शेयर होत राहतात.
आजचा विद्यार्थी हा स्मार्टफोन,कॉम्प्युटर,गुगल,यूट्यूब वर पाहिजे ते शोधणारा असणारा असल्यामुळे प्रथम तो माहिती घेतो नंतर इतरांशी चर्चा करण्यासाठी भिडतो. स्मार्टमोबाईल वर ऑन लाईन शिक्षण घेणारा विध्यार्थी त्यामुळे स्मार्ट झाला आहे. शिक्षकांनी सांगितले तर चुपचाप ऐकून घेणारा विध्यार्थी आज नाही.त्याला जे पटले नाही तर प्रश्न विचारण्याचे धाडस तो करतोच.तर विद्यार्थी व शिक्षक यांच्यात झालेला प्रश्न उत्तर कसा घडतो वाचा.गांवात मंदिर बांधले तर सर्वांची समस्या सुटू शकते.गावातील माणसांवर कोणते ही संकट देव येऊ देणार नाही.त्यासाठी त्याची मंदिरात जाऊन पूजा अर्चा करून दान धर्म केला पाहिजे.शाळा कॉलेजमध्ये मध्ये गेलेली मुलमुली वाईट मार्गाने जातात त्यांच्यावर धर्माचे संस्कार होत नाही. आरक्षणामुळे मागासवर्गीय समाजांच्या लोकांना नोकरीत प्राधान्य मिळत असते. त्यामुळे धर्मसत्ता धोक्यात आली आहे.म्हणूनच आर एस एस प्रणित केंद्र सरकारने एस सी,एसटी,ओबीसी यांचे सर्वच आरक्षण दोन मार्गाने संपविले.एक राम मंदिर बनवून दुसरे खासगीकरण करून मंदिराच्या कामासाठी दान व श्रम त्याग करणारे हे बहुसंख्य ओबीसी नेते कार्यकर्ते आणि समाजच होता.म्हणूनच आरक्षण नको धर्म पाहिजे. सर्व हिंदू जागे झाले तर हा देश हिंदुराष्ट्र बनेल.ही घोषणा यशस्वी करण्यात ५२ टक्के ओबीसी आणि बहुसंख्य बहुजन समाज जबाबदार आहे.हेच ५२ टक्के ओबीसीचे आरक्षण गेल्यावर शेतकऱ्याच्या आंदोलना पेक्षा मोठे व तिव्र आंदोलनची अपेक्षा होती.पण गर्वसे कहो हम हिंदू है म्हणणारे ओबीसी पेटून उठलेच नाही. 
दोन महादेव अवतार घेऊन देवा धर्माच्या रक्षणासाठी अठरा अठरा तास काम करीत आहेत. शिक्षण देणारे शाळा कॉलेज नको. मंदिर पाहिजेत ते सर्वाना समान न्याय देतील म्हणूनच आरक्षण बंद झाले पाहिजे आणि धर्माचे रक्षण झाले पाहिजे.शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.विज्ञानाच्या चौकटीत ते घेतले तर तो श्रद्धा व अंधश्रद्धा,आणि ज्ञान व अज्ञान यातील फरक समजु शकतो.मग त्यांना माझ्या सारखे  नेहमी प्रश्न लिहून विचारतात.मंदिर नाही शाळा पाहिजे!.धर्म नाही अधिकार पाहिजे!!.

गावागावात शाळेच्या कामासाठी गावकरी एकत्र येऊन मदत करीत नाही.ते म्हणतात ते सरकारी काम आहे आपले नाही.पण मंदिर बांधण्यासाठी सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येऊन सढळ हस्ते मदत करतात.त्यात त्यांची चढावळ लागते.धर्मानुसार त्याचा आर्थिक फायदा कोणाला होतो.तिथे कोणी अधिकार सांगितला तर काय होते?. सुशिक्षित पदवीधर सामाजिक कार्यकर्ते यांचे उत्तर मागत नाहीत.मागासवर्गीय समाजाची शिक्षणामुळे प्रगती झाली, देव दर्शन, उपवास पकडून नवस फेडला म्हणून नाही.म्हणूनच मागासवर्गीय समाजाला रोखण्यासाठी मराठ्यासह सर्वाना आरक्षण पाहिजे. त्यासाठी आज देशभरात ब्राम्हणी प्रिंट,चॅनल मीडिया जाती जातीत भांडणे लावत आहे.धर्मा नुसार सर्व हिंदू आहेत.मग मंदिराच्या उत्पन्ना वर सर्वच समान अधिकार का नाही?. राज्य व केंद्रातील सरकार यावर ठोस निर्णय का घेऊ शकत नाही?.
शाळा,कॉलेज काढले तर मुलामुलींना लहान पणापासून अज्ञान व विज्ञान कळेल,आज पर्यत धर्माने सांगितले ते मुलामुलींनी ऐकले तेच शाळा कॉलेज मध्ये शिकविल्या गेले.रावणाला दहा तोंड होती,पण तो आईच्या पोटातुन कसा बाहेर आला यांचे शाळा कॉलेज मध्ये उत्तर मिळत नाही.पुढे असे सांगितल्या जाते रावण महापंडित होता!.मग आज पर्यत एकही पंडितांच्या मुलाचे नांव रावण का नाही?.शाळा कॉलेज मध्ये मुलामुलींना गणेशोत्सव साजरा करण्यात येतो त्यात नियमितपणे आरती म्हटली जाते.बुद्ध हा विष्णुचा अवतार आहे.मग कोणत्या शाळा कॉलेज, व हिंदूंच्या मंदिरात बुद्ध मूर्ती का नाही लावल्या जात नाही?.कोणत्याही भटा ब्राम्हणाने स्वतःचा मुलाचे किंवा इतर हिंदू धर्मातील लोकांच्या मुलाचे नांव गौतम,सिद्धार्थ, तथागत का ठेवले नाही. वाल्मिकी ऋषी सर्वात श्रेष्ठ होते त्यांनी रामायण,महाभारत लिहले.मग कोणीच हिंदू धर्मातील आपल्या मुलांचे नांव वाल्मिकी का ठेवत नाही.असे प्रश्न सोडविण्यासाठी मंदिर नाही शाळा पाहिजे!. धर्म नाही अधिकार पाहिजे!!.पण ५२ टक्के ओबीसी व इतर हिंदू समाज शाळा कॉलेज नको मंदिर पाहिजे,आरक्षण नको धर्म पाहिजे म्हणतात.सार्वजनिक शिक्षण,हॉस्पिटल आणि उद्योग धंदे यांचे खासगीकरण यशस्वीपणे होत असल्यामुळे सर्वत्र आनंदी आनंद आहे. ओबीसीना शाळा कॉलेज नको मंदिर पाहिजे,आरक्षण नको धर्म पाहिजे.असे माझ्या सारख्यांना लिहावे लागते.यामुळे काही फरक पडेल असे वाटत नाही.पण आम्ही संविधान प्रेमी सत्यशोधक विचारांच्या लोकांनी काही केलेच नाही असे होऊ नये म्हणून लिहत आहे.
सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडूप मुंबई.
अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना.स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य  

सुशिक्षित महिलांची अशिक्षित कहानी

 सावित्रीबाई फुले मृत्यू- १० मार्च स्मृतिदिना निमित्याने विशेष लेख 

सुशिक्षित महिलांची अशिक्षित कहानी



जगात विज्ञानने एवढी अफाट प्रगती केली.तरी भारतात 
त्यांची नोंद घेतली जात नाही.या देशात अज्ञान अंधश्रद्धा यालाच खुप महत्व आहे.त्यात महिला वर्गाचे प्रमाण जास्त आहे.म्हणुन त्यांना महिलांना कायम त्यात गुंतवून ठेवण्या करीता घराघरात दूरदर्शन म्हणजे टीव्ही चोवीस तास मेंदूला योग्य खाद्य देण्यास तयार आहेत.प्रत्येक घरात टीव्हीच्या रिमोटवर ताबा सांगुन वर्चस्व गाजवणाऱ्या महिलाच (त्यांच्या भीतीनं पुरूषही) काय पाहतात? तर "तुझ्यात जीव रंगला", "खुलता कळी खुलेना","माझ्या नवऱ्यांची बायको", "नागिन" किंवा बालाजी चा टुकार कौटुंबिक कलह ! "बायकांनी बायकांसारखंच रहायचं" हे यात ठासून शिकवलं जात.म्हणजे इथली सामाजिक,धार्मिक व्यवस्थाच नाही तर प्रचार,प्रसार माध्यमे देखिल स्त्रियांना एकाच साच्यात बांधण्याच्या प्रयत्नात आहेत. आई कुठे काय करते?. रंग माझा वेगळा, सुख म्हणजे काय असते?.फुलला सुगंध मातीचाह्या मालिका करमणूक म्हणून तरी आपण काय पाहतो आणि त्याचा काय परीणाम होतोय हे सुध्दा लक्षात येत नाहीये.ज्या स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे आहेत किंवा मोठ्या पदावर आहेत त्यांचाही कल स्त्रियांनी स्त्रियांचे प्रश्न सोडवावेत असाच असतो असा विचार खरं तर खुप संकुचित आहे. 

आम्ही तर म्हणतो, स्त्रियांनी आता फक्त स्त्रियांचेच नाही तर सर्वच स्तरावरील प्रश्न सोडवायला सिध्द व्हायला हवंय आणि तितक्या त्या नक्कीच सक्षम आहेत. 
हे राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्रीबाई, ताराबाई,
लक्ष्मीबाई झिलकरी, अहिल्याबाई यांनी जो इतिहास घडविला त्यांच्या पराक्रमाची 
इतिहासात 
नोंद आहे.पण भारतातील 
चॅनलवाले ते 
दाखविण्याचे, प्रिंट मीडिया वाले लिहण्याचे धाडस करीत नाही.कोण ती शिक्षणाची देवता शारदा,सरस्वती कोणत्या गावात, तालुक्यात,जिल्ह्यात जन्मली.त्यांच्या आई,वडिलाची नांवे काय होती ?.त्यांचे प्राथमिक,माध्यमिक शिक्षण कुठे झाले?.हे आजच्या सुशिक्षित महिलांना सांगितले पाहिजे.त्याच पद्धतीने धन,संपती पैसा याची देवता लक्ष्मी देवी. कोणत्या गावात, तालुक्यात,जिल्ह्यात जन्मली ?. त्यांच्या आई,वडिलाची नांवे काय होती ?.त्यांचे प्राथमिक,माध्यमिक शिक्षण कुठे झाले?. तिने धन,संपती पैसा कसा निर्माण केला.तिच्या करिता आज महिला वर्ग दरवाजे खुले ठेवतात.झाडू मारणे आणि दिवाबत्ती याची वेळ ठरलेली आहे.त्याबाबत ही मिडिया सत्य काही दाखवीत नाही.आज महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत तांचे कारण शिक्षण आहे.

भारतात ज्या महिलेने पहिले स्वत शिक्षण घेऊन मुलीना शिक्षण देण्यासाठी पाहिली शाळा काढली. ती १ मे १८४७ रोजी.सावित्रीबाई फुले (जन्म ३ जानेवारी १८३१,जन्म स्थळ-नायगाव,सातारा- मृत्यू- १० मार्च १८९७ पुणे येथे झाला.) त्या पहिल्या महिला शिक्षिका, शिक्षण प्रसारक, समाज सुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाची सुरुवात महात्मा ज्योतीराव फुले यांनी आपल्या पत्नीला शिक्षण देऊन केली. महिलांना शिक्षण कोणामुळे मिळाले, हे मान्य न करता शिक्षणामुळे सर्व क्षेत्रातील महिला ते आपले पारंपारिक रीतीरिवाज अंधश्रद्धा,अज्ञान दूर करून घेण्यास तयार नाही.कोणत्याही धर्माच्या नियमानुसार एक महिला कधी मस्जिदची मौलाना बनू शकत नाही,एक महिला कधी मंदिराची पुजारी बनू शकत नाही,एक महिला कधी चर्चची फादर बनू शकत नाही, पण शिक्षण घेऊन एक महिला राष्ट्रपती,पंतप्रधान, खासदार,मंत्री,आमदार, कलेक्टर, सचिव, सरपंच सगळ बनू शकते.कारण जे धर्म देऊ शकत नाही ते भारतीय संविधानाने त्यांना फुकट दिल आहे. तरी काही महिला धर्म ग्रंथांना श्रेष्ठ मानून त्यांच्या अलिखित नियमांचे पालन करतात.त्यांना प्रोत्साहन देणारी आणि आज देशाला पुन्हा मागे घेऊन जाणारी शक्ती सत्तेवर आली आहे.संविधानातील मुल्यांना हरताळ फासला जात असताना विज्ञानवादी मानसिकतेच्या स्त्रियांनी ठाम निर्णय ठाम भुमिका घेऊन नेतृत्व हातात घ्यायला हवं, तेव्हा आपण म्हणू की सावित्रीचा वारसा खऱ्या अर्थाने पुढं नेला जात आहे.फक्त चळवळीत, संस्था,संघटना,राजकारणात असणाऱ्या स्त्रियांनीच नाही तर गृहीणींनी सुध्दा येणाऱ्या काळात हातात स्मार्टफोन फोरजी नेटवर्क ठेवून आपण कुठं असणार आहोत हे आजच ठरवून मार्गक्रमण करायला हवं. निर्णय प्रक्रीयेत सामावून घेण्यात किंवा समान संधीच्या संघर्षात स्त्रिया अजुन कीती मागे आहेत याचा सडेतोड अभ्यास आतातरी ठळकपणे झाला पाहीजे.
शिक्षण घेऊन आघाडीवर असणाऱ्या बहुसंख्य महिला आज मानसिक वैचारिक गुलाम आहेत.आणि महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या कष्ट, त्याग आणि जिद्दीला बेईमान झाल्या आहेत. म्हणूनच अशा सर्व महिलांना मनुवादी मनुस्मृती नुसार वागणूक दिली पाहिजे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी यांच्या वर खूप दया दाखवली. त्यांना भारतीय संविधानात मान, सन्मान समान अधिकार दिला.आज त्या मोकळ्या वातावरणात जीन पॅन्ट टीशर्ट घालून, बॉब कट करून वावरत असतात.तरी त्या गुरुवार उपास धरल्या शिवाय राहत नाही. असा महिलांना काय म्हणावे?. माझ्या सारख्या चळवळीतील कार्यकर्त्या समोर मोठा ग्रहण प्रश्न आहे.परिवर्तनाच्या प्रवासातील त्या प्रत्येक रणरागिणीने सावित्रीबाई स्मृतीदिना निमित्ताने क्रांतीकारी सलाम केला पाहिजे.तिचे उपकार मान्य केले पाहिजे.
पुणे परिसरात १८९६-९७ सालांदरम्यान प्लेगच्या  साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंना ही प्लेग झाला. त्यातून १० मार्च १८९७ रोजी त्यांचे पुणे येथे निधन झाले.

सावित्रीबाईनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथांना आश्रय मिळवा हेही त्याचे कार्यक्षेत्र होते. सामजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे. त्यामुळेच १८७६–७७ च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले. पुढे १८९७ मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतः च्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले. दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाच्या बळी ठरल्या. प्लेग मुळेच त्यांचे निधन झाले.

आजच्या सुशिक्षित महिला ज्या कोण्या देवीच्या उपासक असतील तर त्यांनी त्यांचा जन्म कोण्या आई वडिलांच्या पोटी कुठे,कधी झाला प्राथमिक शिक्षण,माध्यमिक शिक्षण कुठे झाले.तालुखा जिल्हा,राज्य कोणते होते.त्यांच्या पराक्रमात कोण कोण सहभागी होते.आई,वडील,भाऊ,बहिण, नवरा,मुलगा,मुलगी शेवटी त्यांचे निधन कुठे,कधी,कसे झाले.याची सविस्तरपणे माहिती सांगितली, लिहली पाहिजे.सुशिक्षित महिलांची अशिक्षित कहानी.सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांचे संपूर्ण जन्मा पासून मृत्यू पर्यंत माहिती उपलब्ध आहे. इतरांची अशी माहिती नसतांनाही त्यांचे डोळे बंद करून समर्थन करणे म्हणजेच अज्ञान आहे. सुशिक्षित प्रशिक्षण घेतलेल्या महिलांची कहाणी कशी असावी प्रेरणादायी, तरच तिच्या कार्याची इतिहासात नोंद झाली असेल.सुशिक्षित महिलांची अशिक्षित कहाणी झाली नाही पाहिजे.यासाठी अशिक्षित असो की सुशिक्षित महिलांनी १० मार्चला त्यांच्या स्मृतिदिनास विनम्र अभिवादन केले पाहिजे. हीच अपेक्षा.

सागर रामभाऊ तायडे.९९२०४०३८५९.भांडुप.मुंबई.

अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना,स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य 

बुधवार, २९ डिसेंबर, २०२१

डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि डिसेंबर महिना

 

जिवनातील संघर्ष कुठ पर्यंत करावा.

 

शनिवार, १८ डिसेंबर, २०२१

स्वच्छतेचे महत्व जाणणारे संत गाडगेबाबा

 स्वच्छतेचे महत्व जाणणारे संत गाडगेबाबा



उच्चशिक्षित कर्मचारी अधिकाऱ्यांना स्वच्छतेचे महत्व कळत नाही.ते साफसफाई करण्यासाठी त्यांना असंघटीत मागासवर्गीय समाजाचे कामगार लागतात.पण जेव्हा त्यांना न्याय,हक्क आणि अधिकार देण्याची वेळ येते तेव्हा हीच मंडळी त्यांना सन्मानाची वागणूक देत नाहीत.असा उच्चशिक्षित कर्मचारी अधिकाऱ्यांना अज्ञानाला सज्ञान करणारे गाडगेबाबा आज ही प्रेरणादायी असायला पाहिजेत. कोविड १९ महामारीत ज्यांनी जीवाची बाजीलावून स्वच्छता ठेवली.त्यांना नंतर कामावरून कमी करण्यात आले.त्यांना स्वच्छतेचे व ते ठेवणाऱ्यांचे महत्व कधी कळणार?.
समाज प्रबोधन करण्या करीता शिक्षणाची गरज नसते.समाजसेवा हे सुशिक्षित माणसाचे काम नाही.ते फक्त नोकरी करून पैसा कसा कमाविण्यासाठीच असते हे अनेकदा सिद्ध झाले आहे. आणि त्यासाठी त्यांना किती खोटे बोलण्याचे कैशल्य आत्मसात करावे लागते.ते  गरिबांना समजू शकत नाही.मग हेच उच्चशिक्षित गाडगेबाबाना कसे समजून घेतील.
भारत कृषिप्रधान देश आहे या देशातील कृषिचे मालक असणारे शेतकरी. आर्थिक शोषण होते म्हणूनच जास्त आत्महत्या करतात.कारण ते सुशिक्षित नाही लिहण्या वाचन्या पुरते त्याचे शिक्षण असते.म्हणुन त्याला ऐनवेली कृषि उत्पन्न बाजार समितीतील अडते व व्यापारी लुटतात. त्याच्या शेतातील उत्पादित मालाचा भाव पडतात. त्याच वेळी सुशिक्षित बँक अधिकारी आपले कैशल्य दाखवतात. त्यात कोणत्या ही धर्माची माणस मागे नसतात. का होते असे?. हा मोठा प्रश्न आहे.म्हणून संत गाडगेबाबा यांची आठवण येते.गाडगेबाबाचे शिक्षण आणि त्यांची समाज प्रबोधन करण्याची पद्धत म्हणजे किर्तन पाहिली तर ते उच्च शिक्षित वाटतात.पण ते उच्च शिक्षित नव्हते असे आजच्या तरुणांना सांगून पटणार नाही.
    सरकारच्या ग्राम स्वछता अभियानाच्या जाहिराती वर्षा तुन दोन वेळा येतात.एक जयंती दिनी दूसरी स्मुर्ती दिनी तेव्हाच सरकारला गाडगेबाबाची आठवण येते.गाडगेबाबाचे तत्वज्ञान मानव मुक्ति करणारे होते ते आजही सर्व समाजाला चिंता मुक्त करणारे आहे.ते समजुन घेण्यास सुशिक्षित समाज कमी पडतो.आज प्रत्येकजन आपला कुटुंबा पुरता विचार करतो.घर,परिसर,गांव स्वछ ठेवा हा मंत्र त्याकाळी गाडगेबाबानी सांगितला होता.आज कोणता ही सुशिक्षित माणूस असा विचार करीत नाही.पण गाड्गेबाबानी दहाकलमी कार्यक्रम राबविला तो किती लोकांना माहित आहे?. 
काय म्हणतात संत गाडगेबाबा १) भूकेलेल्यांना - अन्न,२) तहानलेल्याना - पाणी, ३) उघड्या नागड्या ना - वस्त्र,कपडा, ४) गरीब मुलामुलींना - शिक्षणासाठी मदत, ५) बेघरांना - आसरा, ६) बिमार लोकांना - औषधोपचार, ७) बेकारांना - रोजगार, ८) मुक्या प्राण्यांना - अभय, ९) गरीब मुलीमुलाचे - लग्न, १०) गोरगरीबना - शिक्षण, हा त्यांनी खेड्या पाड्यात राबविला.हेच कोणताही माणूस कुठे ही कधी ही जात,धर्म,प्रांत न पाहता राबवू शकतो.
   गाडगेबाबा यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६- मुत्यु २० डिंसेंबर १९५६ झाला.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबरच्या महापरी निर्वाणाने त्यांना खूप दुख झाले होते त्यांनी अन्नत्याग केला होता असे म्हणतात.संत गाडगेबाबा विज्ञानवादी होते.म्हणूनच ते  खेड्यापाड्यातील गावागावात मंदिरासमोर भजन करीत आणि विचारत बापो हो "ईश्वर देव कशात आहे?." देवा बाबत लोकात असणारी श्रद्धा,अंधश्रद्धा,अज्ञान,अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने समाज प्रबोधन करणारे कार्य करीत होते. "तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी " असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा.देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका. अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. ते ओबीसी समाजातील होते. पण त्यांना त्यांच्या समाजाने किंवा ओबीसीनी कधीच स्वीकारले नाही. त्यांचे तत्वज्ञान जाती धर्मासाठी कधीच नव्हते.ते खरे प्रबोधन करणारे संत होते.त्यांचा वैचारिक वारसा ओबीसी समाजाने ठेवला असता तर देशातील मंदिरे वसान पडली असती.आणि तीन टक्के समाज घरोघरी भिक्षा मागत फिरला असता.त्यांची हक्काची रोजगार हमी कायमची बंद पडली असती.हा ऐतिहासिक वैचारिक वारसा ओबीसी समाज कधी स्वीकारणार?. 
 माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिक ठिकाणी धर्मशाळा,अनाथालये,आश्रम आणि विद्यालये सुरू केली होती.तेव्हा ते शिक्षण सम्राट होऊ शकले असते. पण त्यांनी रंजले-गांजले, दीन-दुबळे,अपंग-अनाथ यांच्यात देव शोधला. या खऱ्याखुऱ्या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच,एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके  असा त्यांचा वेश असे.
दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष नेहमी असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी  जिवापाड प्रयत्न केले.हा आदर्श आज कोणताही समाज घ्याला तयार नाही.ज्यांनी घेतला त्यांचा आज सर्वच ठिकाणी दबदबा (वैचारिक) आहे.
   गाडगेबाबाना डॉ.बाबासाहेब आंबेडकर गुरु मानत तेव्हा त्यांनी सांगितले मी कुणाचा गुरु नाही आणि माझा कोणी चेला नाही.१४ फेबुवारी १९४९ ला गाडगे बाबांची प्रकृती ठीक नव्हती. महानंदसामी नावाच्या त्यांच्या चाहत्याने मुंबईत आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गाडगेबाबांची माहिती दिली. बाबासाहेब तेव्हा भारताचे कायदेमंत्री होते. (डॉ.बाबासाहेब आंबेडकर २०/११/१९४७ ते ३१/०३/१९४९ कायदेमंत्री होते ) आणी त्यांना संध्याकाळच्या ट्रेनने दिल्लीला रवाना व्हायचे होते. गाडगेबाबांचा निरोप मिळताच त्यानी सर्व कामे बाजूला ठेवली. आणि दोन घोंगड्या विकत घेऊन ते महानंदसामीसह रुग्णालयात गेले. कोणाकडून काही न घेणार्‍या गाडगेबाबांनी बाबासाहेबांकडून दोन घोंगड्या स्वीकारल्या. आणि म्हणाले डॉ.तुम्ही कशाला आले? मी एक फकीर. तुमचे एक एक मिनिट महत्त्वाचे आहेत. तुमचा किती मोठा अधिकार आहे. तेव्हा बाबासाहेब म्हणाले "बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे." या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू होते. कारण असा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत होते.तेव्हा पासून बाबासाहेबाला मानणारा समाज प्रत्येक ठिकाणी गाडगेबाबाचा आदर्श गुरु म्हणुन उल्लेख करू लागला.कोणते ही कार्यक्रम असो भाषणाची सुरवात बाबासाहेबाच्या आदर्श गुरुच्या विचाराला आणि प्रतिमेला वंदन केल्या शिवाय पुढे भाषण करीत नाही.हि पद्धत बहुजन आंबेडकरी चळवळीत निर्माण झाली आहे.त्यामुळे बाबासाहेबाच्या फोटो बरोबर गाडगेबाबाचा फोटो घराघरात असतो.उलट गाडगे बाबाच्या समाजाने आज ही बाबांना स्वीकारले नाही.९० टक्के लोकाच्या घरात गाडगेबाबाचा फोटो नसतो.लग्न कार्य किंवा कोणताही कार्यक्रमात त्याच्या नांवाचा उल्लेख नसतो.फोटोचा प्रश्नच नाही.म्हणजे ज्यासामाजातील एक संत सर्व समाजा करिता एवढा आदर्श निर्माण करतो त्याचा आदर्श त्याच्या समाजाने न घेणे हि खूप दुर्दव्य म्हणावे लागेल.काही संघटना जनजागृतीसाठी प्रयत्नशील आहेत.पण हिंदुत्वाची चौकट मान्य करूनच.गाडगेबाबा सारख समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. त्याचा उल्लेख टाळून संघटना संस्था चालवितात. त्यामुळेच त्यांना आताच्या केंद्र व राज्य सरकारने सर्वोच्य न्यायालया मार्फत लगाम लावला. 
   गाडगेबाबा आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत.तसाच प्रयत्न त्याच्या समाजातील संघटना नी करायला पाहिजे. ओबीसीना निवडणुकीत उभे राहण्याच्या अधिकारांचे आरक्षण नसेल.तर त्यांनी मतदान का करावे?. असे प्रश्न विचारण्याची त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे बहुजन समाजाच्या चळवळीत आदर्श संत म्हणून कायम आहेत आणि राहतील.ओबीसीनी त्यांचा वैचारिक वारसा स्वीकारावा आणि त्यांना २० डिसेंबर स्मृतिदिनी खरी मानवंदना द्यावी.आम्ही जीवावर उद्धार होऊन असे प्रबोधन करणारे लिहत असतो.सत्य असत्याची जाणीव करून देणे म्हणजेच प्रबोधन आहे असे तथागतांनी व महामानवानी आम्हाला सांगितले आहे.समाजाच्या हिताचे व कल्याणाचे विचार परखडपणे निर्भीडपणे निपक्षपातीपणे लिहणे,बोलणे मांडणे म्हणजेच प्रबोधन असते. संत महापुरुषांच्या जयंती दिनी,स्मृतिदिनी मी ते दरवर्षी करीत असतो त्यातून त्यांच्या क्रांतिकारी विचारांना प्रतिमेला त्रिवार अभिवादन असते.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.

शुक्रवार, १७ डिसेंबर, २०२१

एक ना धड भारा भर चिंद्या ही वृत्ती सोडून द्या.

 एक ना धड भारा भर चिंद्या ही वृत्ती सोडून द्या.



सुशिक्षित सुरक्षित नोकरी करून सुरक्षित ठिकाणी राहणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी इतर असंघटित कष्टकरी कामगार, शेतमजूर समाजासाठी काम करणाऱ्यांना कार्यकर्त्यांना चोर,एजंट, वसुली करणारा असे दूषणे लावू नये.कारण तो कोणतीही अपेक्षा ठेऊन काम करीत नाही. ती खरा बिन पगारी फुल अधिकारी समाजासाठी असतो, अन्याय,अत्याचार झाला तर प्रथम तोच आवाज उचलतो,पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांना जाब विचारतो. उच्च शिक्षित सुशिक्षित सुरक्षित नोकरी करणाऱ्यां कर्मचारी अधिकारी वर्गात ही हिंमत कधीच नसते. शिक्षणात व नोकरीत आरक्षण मिळाले म्हणूनच त्यांचा रोजगाराचा प्रश्न सुटला. म्हणजे त्याचे सर्वच प्रश्न निकाली निघाले. हा समज कर्मचारी अधिकारी वर्गाचा दृष्टिकोन त्यांच्या ज्ञानावर प्रश्नचिन्ह निर्माण करत असतो?.
सुशिक्षित सुरक्षित नोकरी करणारा कर्मचारी अधिकारी हा आंबेडकरी विचारधारेशी कधीच प्रामाणिक राहिला नाही, नोकरीत असतांना तो आंबेडकरी विचारधारेच्या विरोधी युनियनचा आर्थिक पाठबळ देणारा वार्षिक वर्गणीदार सभासद असतो. तसाच तो निवडणूकीच्या वेळी आंबेडकरी विचारांच्या पक्षाच्या गरीब उमेदवारांना मत न देता हिंदुत्ववादी विषमतावादी विचारांच्या उमेदवाराला मतदान प्रत्येक निवडणूक मध्ये करतो.
आंबेडकरवादी विचारधारेला आपली मते देऊन आपली स्वतंत्र ताकद निर्माण करण्याऐवजी मनुवादी विचारांच्या पक्षाला मते देऊन त्यांची राजकीय शक्ती मजबूत करतो.अशिक्षित किंवा कमी शिकलेले लोक कोणत्याही मुद्दयावर एकत्र येऊ शकतील, पण सुशिक्षीत लोकांना एकत्र करणे म्हणजे जीवंत बेडकांचं तराजूत वजन करण्यासारखं आहे. दुस-याला तराजूत टाकेपर्यंत पहिला उडी मारुन पळून जातो. कारण यातील प्रत्येक जण स्वत:ला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतो.तो पक्का स्वार्थी मतलबी झालेला असतो.तो समाज आणि चळवळीच्या कार्यकर्त्यांना नेहमीच कमी लेखतो.त्यामुळेच तो ज्या पदावर बसलेला असतो तेव्हा तो मनुवादी विषमतावादी विचाराचा विचार करुन आचरण करतो म्हणूनच तो गोगारीबांना त्यांच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना सन्मानाची वागणूक न देता तुच्छ पणे वागतो.मात्र तोहे विसरतो कि तो जी सुरक्षित नोकरी करतो ते याच असंघटीत कष्टकरी लोकांनी केलेल्या आंदोलना मुळे मिळाली आहे.
शिक्षणाची व नोकरीची संधी मिळाली ती यांच समाजच्या घाम गाळल्याने.तशीच राजकीय सत्ता हवी असेल तर त्यासाठी गोरगरिबांच्या घरा घरात जाऊन न बिकनेवाला मतदार बनवावा लागेल.कोणती सत्ता हवेतून मिळत नाही,सत्तेसाठी सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक,धार्मिक आणि आर्थिक दुष्ट्या सामाजिक बांधिलकी निर्माण करावी लागते. रोजगार,आरोग्य आणि शिक्षण ज्यांचं ताब्यात आहे ते सर्वच पक्षातील धन दांडगे,जात दांडगे आहेत.त्यांचं विरोधात जाऊन मतदान करणे म्हणजेच कुटुंबाचा व समाजाचा सत्यानाश करणे होय.याची जाणीव गोर गरीब कष्टकरी मजुरांना आहे.म्हणूनच तो खेडे सोडून शहरात रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात जात असतो. मान्यवर कांशीराम यांनी उतर भारतात प्रथम न विकणारा समाज बनविला म्हणूनच मायावती चारवेळा मुख्यमंत्री होऊ शकल्या.हाच प्रयोग महाराष्ट्रात श्रद्धय बाळासाहेब आंबेडकर यांनी करण्यास सुरुवात केली.मान्यताप्राप्त चारीही राजकीय पक्षाना घाम फोडला.याचे अभ्यासपूर्ण निरीक्षण झालेच पाहिजे.
 वंचित बहुजन आघाडीचा विधानसभेतील निकाल अनेकांना धक्कादायक वाटत असला तरी तो बहुजन समाजाला प्रेरणादायी होता.प्रत्येक मतदारसंघातील मतदान संख्याबळाने लोकप्रतिनिधी निवडून येणारा होता. गेल्या वेळी देगलूर-बिलोली मध्ये वंचित बहुजन आघाडीला तीस हजार मते मिळाली होती.मग पोट निवडणुकीत लाखोंच्या जाहीर सभा होऊन मतदान कमी कसे झाले?. हा संशोधनाचा विषय आहे.पक्ष संघटना बांधणीत दहा हजार पदाधिकारी पकडले तर प्रत्येक कुटुंबात चार किंवा पाच मतदार असतात.या हिशेबाने चाळीस पन्नास हजार मतदार हे हक्काचे होतात.इतर बहुजन हितचिंतक पकडले तर आकडा लक्षवेधी असला पाहिजे होता.परंतु तो केवळ एकरा हजार वर आला म्हणजेच गद्दार घरात भरपूर आहेत.हे सिद्ध होते.हक्काची घरची मते शाबूत ठेवण्यात क्रांतिकारी विचारांचा आंबेडकरवादी माणूस अपयशी का ठरतो.यांचे सत्य वास्तव समजून घ्यावे लागेल.
ओबीसी,आदिवासी,अल्पसंख्याक यांच्याकडे मत मागण्या पूर्वी आपली स्वतःची राजकीय ताकद निर्माण झाल्याशिवाय इतरांची मते मिळणार नाहीत.हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जय जयकर करणाऱ्यांनी समजून घेतले पाहिजे.त्यासाठी आपल्या वस्तीतील गद्दार,चमचे तितर पक्षी शोधून ठेचून काढले पाहिजेत.शिस्तबद्ध पद्धतीने पक्ष बांधणी झाली पाहिजे.एक ना धड भारा भर चिंद्या ही वृत्ती संपविल्या शिवाय समाजात संघ शक्ती निर्माण होणार नाही.
सुरक्षित नोकरी करणारा कामगार कर्मचारी आणि अधिकारी आंबेडकरी विचारांच्या ट्रेड युनियन चा सभासद होत नाही.विषमतावादी विचारांच्या ट्रेड युनियन चा सभासद असल्यामुळे पदोन्नती मधील आरक्षण जवळ जवळ संपल्याच्या मार्गावर आहे.  त्यामुळेच नोकरीतील आरक्षण संपल्यात जमा झाले आहे.त्याला सरकार नाही तर बहुसंख्य आरक्षणाचे लाभार्थी जबाबदार आहेत.राजकीय पक्षात जशी स्पर्धा आहे तशीच इथे ही कामगार चळवळीतील एक ना धड भारा भर चिंद्या ही मनोवृत्ती जबाबदार आहे.कामगार क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात स्वार्थीपणाची मनोवृती असल्यामुळेच बहुसंख्ये बहुजन कामगार कर्मचारी अधिकारी समाजात असून ही ते चळवळीच्या कामाचे नाहीत.त्यामुळेच आपण ८५ टक्के असून ही अपयशी ठरतो. 
सोशल मिडीयावर बहुमत असून ही कशी त्याची हार होते.त्याचे उत्तम उदाहरण चर्चेत आहे. एका वसतीगृहामध्ये उपमा रोज १०० विद्यार्थ्यांना दिला जायचा. १०० विद्यार्थ्यांपैकी ८० विद्यार्थ्यांनी उपमा नको म्हणून विरोध केला व दररोज वेगवेगळे टिफिन देण्याची तक्रार केली. पण,रोज २० विद्यार्थ्यांना उपमा खायला आनंद व्हायचा.८० विद्यार्थ्यांना उपमा वगळता दुसरे काहीतरी हवे होते.नेहमीच मुलांच्या तक्रारी येत असल्यामुळे सर्वांच्या आवडीचा पदार्थ देण्याचे ठरवले मग वॉर्डनने मतदानाची व्यवस्था केली. ज्या पदार्थाला बहुमत प्राप्त होईल, तो नाश्ता देण्याचे ठरविण्यात आले.उपमा हव्या असलेल्या २० विद्यार्थ्यांनी उपमाच हवा म्हणून तातडीने मतदान केले. उर्वरित ८० विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीनुसार मतदान केले.
पदार्थानुसार मतदान असे झाले.
१८ %: मसाला डोसा,१६%: आलू पराठा आणि दही,१४ %: रोटी आणि सबजी,१२ %: ब्रेड आणि बटर,१० %: नूडल्स,१० %: इडली सांबार, २० %:उपमा वरील प्रमाणे मुलांनी मतदान केले.याचा परीणाम असा झाला कि,मतदानाच्या पद्धतीनुसार आणि बहुमतानुसार, उपमाच सुरू ठेवण्यात आला.यातुन आपण कोणता धडा घेणार आहोत. जोपर्यंत ८० % लोकसंख्या स्वार्थी, विभाजित आणि विखुरलेली राहील, २० % लोक ८० % वर राज्य करतील.हाच ओबीसी,एस सी,एस टी,आदिवासी अल्पसंख्याक बहुजन समाज ८५ टक्के असूनही असाच विभागला जातो.सर्वच एकमेकांना दोषी ठरवतात.पण कोणत्या नियमाचे पालन करून एकसंघ बनत नाही.म्हणूनच एक ना धड भारा भर चिंद्या महापुरुषांच्या क्रांतिकारी विचारांच्या आपण कळत नकळत करत असतो आणि दोष मात्र मनुवादी विषमतावादी विचारधारेला देत असतो.हे कुठे तरी कडक कारवाई शिस्तबद्ध होऊन थांबली पाहिजे तरच येणारा काळ चांगला असेल अन्यता वर्णव्यवस्था दूर नाही.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई