शुक्रवार, ५ एप्रिल, २०१९

उगवत्या सूर्याचा प्रकाश मेंदूत जाऊ द्या !.

.
उगवत्या सूर्याचा प्रकाश मेंदूत जाऊ द्या !.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हटल्या जाते.त्यांनी लिहलेल्या राज्यघटनेमुळे माणसाला माणसासारखे जगण्याचे स्वतंत्र व मूलभूत अधिकार मिळाले.सर्वात मोठा मताधिकार मिळाला पण त्यांचा वापर निर्भयपणे करता आला नाही.बंदुकीच्या नळीवर व तलवार,भाले यांच्या भीतीने देशभरातील गोरगरीब असंघटित कष्टकरी मजूर कामगार मागासवर्गीय आदिवासी अल्पसंख्याक समाज मालक सांगेल त्यालाच मतदान करीत होता.त्यावर चर्चा करण्याची कुणातच हिंमत नव्हती. उत्तर भारतात अनेकदा जमीनदार,सावकार, शेटजी भटजी यांनी ह्या सगळ्या समाजाची सामुदाहिक हत्याकांड घडविले होते.१९९० पर्यत ही हत्याकांड होत होती. मान्यवर कांशीराम यांच्या दलित शोषित समाज संघर्ष समिती (डी एस फोर) मुळे समाज संघटित झाला.त्यामुळेच बहुजन समाज पार्टी चा जन्म झाला.त्यातुनच सर्व बहुजन समाज राजकीय दृष्ट्या जागृत झाला.म्हणूनच १९९४ साली बहन मायावती देशातील सर्वात मोठ्या राज्याच्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या.हा इतिहास झाला.बाबासाहेबांनी संविधानात सर्व अधिकार दिले पण ते आज ही काही समाजाला घेता येत नाही.कारण भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी करण्यासाठी जी प्रामाणिक,निःपक्षपाती निर्भय यंत्रणा लागते ती आज ही आपल्या देशात नाही.मग निर्भयपणे हे मागासवर्गीय आदिवासी अल्पसंख्याक समाजाचे असंघटित कष्टकरी मजूर कामगार मतदान कसे करतील?. देशातील एकूण मागासवर्गीय आदिवासी अल्पसंख्याक समाजाची लोकसंख्या पाहूनच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १५ ऑगस्ट १९३४ स्वतंत्र मजूर (मजदूर) पक्षाची स्थापना केली होती. त्यातील पन्नास टक्के असंघटित कष्टकरी मजुर कामगार या पक्षात सहभागी झाले असते तर राज्यात व केंद्रात स्वतंत्र मजुर (मजदूर) पक्षाची सत्ता आली असती.मजुर हा स्वतंत्र नाही तो रोजीरोटी साठी कोणानां कोणाकडे बांधलेला आहे यांची जाणीव झाल्यावर मजूर पक्षाची भूमिका त्यांनी सोडून दिली.स्वतंत्र मजदूर युनियनची संकल्पना मांडली 12 व13 फेब्रुवारी1938 मनमाड येथे रेल्वे गॅंगमॅन कामगारांची दोन दिवसीय कामगार परिषद झाली तेव्हा त्यांनी सांगितले होते की मागासवर्गीय आदिवासी अल्पसंख्याक यांची स्वतःची कामगार कर्मचारी संघटना युनियन स्थापना करून ती स्वतंत्र मजदूर युनियनशी राष्ट्रीय पातळीवर संलग्न करावी. कामगारांचे मुख्य ध्येय हे शासन यंत्रणेवर नियंत्रण ठेवणे असावे.त्यातुन राजकीय परिवर्तन घडवून आणल्या जाते. 
परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या या महत्वपूर्ण गोष्टीकडे सर्वच आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी कार्यकर्त्यांनी दुर्लक्ष केले. फक्त राजकारणावर भर दिला त्यामुळेच बहुसंख्येने मागासवर्गीय आदिवासी अल्पसंख्याक समाज मतदार असूनही आपल्याच समाजातील पक्षाच्या उमेदवारांना मतदान करीत नाही.
कारण मागासवर्गीय आदिवासी अल्पसंख्याक समाजाच्या मूलभूत प्रश्नावर त्यांच्या रोजीरोटीसाठी कोणत्याही प्रकारची नियोजनबद्ध कृती आराखडा ह्या मतदारासाठी राबवित नाही.राज्य व केंद्र सरकारच्या योजनांची माहिती नाही. केवळ अन्याय अत्याचार झाल्यावर मोर्चे ,निदर्शने आंदोलन करणे हाच एकमेव कार्यक्रम कार्यकर्ते नेते राबवितात.पाच वर्षातुन एकदाच विधानसभा, लोकसभा निवडणूक येते तेव्हाच मागासवर्गीय आदिवासी अल्पसंख्याक जाती लोकसंख्या मतदारसंघ म्हणून लक्षात घेतली जाते. आणि त्यावर हक्क सांगणारा एकच पक्ष नसतो. तर सगळेच असतात. पाच वर्षात यांनी  मागासवर्गीय आदिवासी अल्पसंख्याक समाजासाठी कोणत्याही प्रकारचे काम केलेलं नसतांना यांच्याकडून मतदान मागण्याचा या पक्षांना काय अधिकार आहे.
बहुजन समाजात आंबेडकरी चळवळीमुळे कार्यकर्ते नेते झाले.बहुजन समाजातील अनेक बुद्धिजीवी लोकांना आंबेडकरी चळवळीने मोठे केले असे लिहले तर चुकीचे ठरणार नाही. ज्यांना त्यांच्या जातीत कुत्रं विचारत नाही ते सेना भाजपाचे नगरसेवक,आमदार खासदार झाले.पण त्यांची लायकी तीच जी मनुस्मृती नुसार आपल्या पायरीने वागण्याची.आता तर बहुजन समाजात बुद्धिजीवी खूप झाले.पण ते स्वतःपुरता विचार करतात.समाज व देशासाठी त्यांना कोणता ही धोका पत्कारायचा नाही.मग ते बुद्धिजीवी कसले?.
दोन हजार सतरा पासुन एक नेता धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक आणि राजकीय प्रगल्भता दाखवीत आहे. बुध्दीजीवी "माणूस" कोणताही निर्णय स्वत: ला योग्य वाटेल तेव्हाच स्विकारतो.त्यांच्यावर कोणी "कितीही" दबाब किंवा इतर "तंत्राचा"वापर जर केला तरी "बुध्दीजीवी"
माणूस त्यांचा निर्णय बदलत नाहीत.ते त्यांच्या निर्णयावर ठाम असतात.जो माणूस डोळे बंद करुन वाटेल त्या गोष्टी स्विकरतो त्या गोष्टीची "चिकित्सा" करत नाहीत.असा माणूस एक तर भक्त असतो किंवा बुध्दीजीवी नसतो. आजच्या घडीला उगवत्या सूर्याचा प्रकाश वंचित बहुजन समाजाच्या घराघरात नव्हे तर मेंदूत जाऊन राहिला. त्याने राजकारणातील चाणक्य गारद करण्याची क्षमता दाखवुन दिली.आर एस एस सारखी जहरेली संघटना प्रभावीपणे प्रबोधन करून संविधानाच्या चौकटीत आणण्याचा जिवापाड प्रयत्न करीत आहे. त्यामुळेच अनेकांना यावर बोलण्यासाठी घाम फुटत आहे.प्रिंट मीडिया चॅनल मीडिया यावर मनमोकळी चर्चा घडवू शकते.पण तेही लोकशाही मार्गाने संविधानाच्या चौकटीत काम न करता धर्माच्या नावाखाली रितीरिवाज परंपरा याला जास्त महत्व देत आहेत. असंघटित कष्टकरी मागासवर्गीय,आदिवासी अल्पसंख्याक समाज वंचित बहुजन समाज म्हणून जागरूक झाला.तर राजकीय घराण्यातील परंपरा आणि जातदांडग्याचे धनदांडग्याचे थंडगे उध्वस्त केल्या शिवाय राहणार नाहीत.मान्यवर कांशीरामजी उत्तर भारतात जो न बिकने वाला समाज तयार केला होता.तसाच महाराष्ट्रातील वंचित बहुजन समाज न बिकनेवाला समाज झाला तर वंचित बहुजन आघाडी राज्यात नव्हे तर देशात राजकीय परिवर्तन घडवू शकते फक्त उगवत्या सूर्याचा प्रकाश वंचित बहुजन समाजाच्या मेंदूत गेला पाहिजेे.त्यानुसार लोकशाहीची चौकट मान्य करूनच पक्ष, संघटना बांधणी वार्ड, बूथ पातळीवर झाली तरच लोकसभेत विधानसभेत लोकप्रतिनिधी निवडून आणता येतील. नाहीतर प्रत्येक कार्यकर्ता हा स्वतःला नेताच समजतो,बुद्धिजीवी लोक तर घराघरात आहेत.स्वता काही करणार नाहीत पण इतरांनी हे केले पाहिजे ते केले पाहिजे असे मोफत सल्ले देणारे खूप झालेत.म्हणूनच एक विचार करणारी गोष्ठ डॉ बाबासाहेब आंबेडकर दोनवेळा लोकसभा निवडणुकीला उभे राहीले आणि दोन्हीही वेळा पराजित झाले. कारण मागासवर्गीय आदिवासी अल्पसंख्याक समाज असंघटित कष्टकरी मजूर कामगार, शेतमजूर होता.त्यांच्या रोजीरोटीच्या आर्थिक नाळ्या धनदांडगे जातदांडग्याच्या हातात होत्या. त्यानां भविष्यातील परिणामाची पर्वा व काळजी केल्यामुळेच बाबासाहेब पराभुत झाले.हा इतिहास आहे. मग त्याला लोक समाजाने गद्दारी, बेईमानी केली व विरोधकांनी साम,दाम,दंड,भेद नीती वापरली म्हणतात. तो इतिहास खोडून काढण्यासाठी उगवत्या सूर्याचा प्रकाश मेंदूत जाऊ द्या. 
   मागासवर्गीय आदिवासी अल्पसंख्याक समाजातील अनेक नेते पार राष्ट्रपती,प्रधानमंत्री पदावर विराजमान झाले. पण समाजात त्यांची किंमत काय आहे?. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्तेपेक्षा देशाशी व समाजाशी नातं जोडले होते म्हणूनच ते आजही अमर आहेत, ते मागासवर्गीय आदिवासी अल्पसंख्याक समाजाला प्रेरणा देतात.त्याचं पद्धतीने प्रकाश आंबेडकर मागासवर्गीय आदिवासी अल्पसंख्याक बहुजन समाजाला आता राजकिय वंचित घटक म्हणून लढण्याची प्रेरणा देत आहेत. कांशीरामजी ने ते या अगोदर उत्तर भारतात करून दाखविले. वंचित बहुजन समाजात एक दोन जाती नव्हे ते सहा हजार जाती आहेत त्यातील राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या जातींना विविध पक्षांनी त्या त्या जातीतील गुलाम बनवून ठेवले आहेत. म्हणून ते त्या जातीचे लोकप्रतिनिधी नसुन पक्षाचे वैचारिक गुलाम आहेत.त्यांना सरळ करण्यासाठी उगवत्या सूर्याचा प्रकाश मेंदूत जाऊ द्या.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना दोन वेळा लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. तेंव्हाच स्वतःला आंबेडकरी म्हणवणारा हा समाज गद्दार म्हणून इतिहासात गणला गेला.ज्या बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी आयुष्य चंदनासारखे  झिजविले त्यांच्याशी हा समाज प्रामाणिक राहू शकला नाही. तो समाज दुसऱ्या कोणत्या व्यक्तीशी प्रामाणिक राहील याचा विचार करणे देखील सुद्धा मूर्खपणाचे ठरेल.अशी परिस्थिती असतांना प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रात वंचित बहुजन समाजाच्या लाखोच्या सभा घेऊन शक्तिप्रदर्शन दाखविले. त्यामुळेच आज त्यांच्या तोडीचा आंबेडकरी चळवळीत दुसऱ्या नेता नाही.म्हणूनच सर्व नेत्यांचे विसरून करा.समाज खरोखरच जागृत असेल तर प्रथम आपल्या नगरातील,वार्डातील, मतदारसंघातील गद्दार ठोकून काढा.कारण आपल्या सुरक्षित घरात साप,विंचू निघाला तर आपण काय करतो?. साधा विचार करा मच्छर,खटमल झुरळ झाले तर काय करतो?.२०१९ ची लोकसभा विधानसभा एकच नेता एकच आघाडी "वंचित बहुजन आघाडी" म्हणूनच उगवत्या सूर्याचा प्रकाश मेंदूत जाऊ द्या.राजकीय परिवर्तन घडवा.
सागर रामभाऊ तायडे, भांडुप मुंबई 9920403859.

गुरुवार, १६ ऑगस्ट, २०१८

सत्कार एक इंजिनिअर कामगार नेत्यांचा !.

सत्कार एक इंजिनिअर कामगार नेत्यांचा !.
शिक्षणात आरक्षणाची सवलत घेऊन उच्चशिक्षित झालेले लोक नोकरीत सुद्धा आरक्षणाचा सर्वात जास्त लाभ घेतात. पण आरक्षणाच्या कोणत्याही रस्तावरील आंदोलनात भाग घेत नाही.शासकीय नोकरी मिळाली की आपले घर व कुटुंबात रममाण होतात.स्वतःच्या जन्मभूमीत तालुक्यात जिल्ह्यात कोणत्याही संस्था संघटना मध्ये उच्चशिक्षित म्हणून सहभागी होत नाहीत. समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरोधात होणाऱ्या संघर्षमय लढ्यात भाग घेत नाही.असे उच्चशिक्षित सुरक्षित नोकरी करणारे लोक तेव्हा ही होते.त्याचा अनुभव स्वतः डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतला होता म्हणूनच ते खेदाने म्हणत होते की "मुझे पढे लिखे लोगोने धोका दिया". त्याला काही लोक अपवाद आणि लक्षवेधी असतात.
आयु नरेंद्र जारोंडे इलेक्ट्रिकल इंजिनिअर महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ मध्ये उपअभियंता होते. शासकीय नोकरी करून कुुुटुंबात रममाण होण्यापेक्षा समाजावर होत असलेल्या अन्याय दूर करण्यासाठी संपूर्ण आयुष्य सनदशीर मार्गाने संघर्ष करून आपण समाजाला काही देणे लागतो,ही वृत्ती जोपासणारा नेता म्हणजेच नरेंद्र जारोंडे 
आहेत.आजकाल असे नेते मिळणे दुर्मिळ झाले असतांना 
आपल्या सेवेत कसूर न करता कामगार,कर्मचारी हितासाठी लढणारा मागासवर्गीय कामगारांची चळवळ मजबूत पणे उभी करण्यासाठी तोंडात साखर,डोक्यावर बर्फ आणि पायाला भिंगरी लावणारे नेते म्हणजे नरेंद्र जारोंडे हे मागासवर्गीय कामगार कर्मचारी यांना प्रेरणा देणारे नेतृत्व 
जे महानिर्मिती मधून ३१ जुलै २०१८ ला डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर या पदावरुन निवृत्त झाले आहेत .त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा कार्यक्रम संघटनेने ५ ऑगष्टला संघटनेच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण केंद्र प्रेरणा नगर,हजारी पहाड,नागपूर येथे आयोजित केला होता.त्यात 13 राज्यातील कामगार,कर्मचारी व पदाधिकारी यांनी मोठया उत्स्फूर्तपणे भाग घेऊन सत्कार साजरा केला.
एक इंजिनियरचा तो भव्य सत्कार नव्हता.तर फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या चळवळीत विद्यार्थी दशेपासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा नेता असलेल्या नेत्यांचा तो सत्कार होता.विद्यार्थी दशेपासून ते निवृत्त होण्या पर्यंत त्यांनी जो संघर्ष केला.त्यात त्यांच्या पत्नीचे,मुलांचे योगदान खुप मोठे आहे.
नरेंद्र जारोंडे हे निवळ कामगार नेते नाहीत तर ते क्रांतिकारी आंबेडकरवादी विचारांचे प्रभावी लेखकही आहेत.त्यांच्या लेखनीची झलक त्यांनी दर वर्षी ऊर्जा श्रमिकच्या डायरीचे प्रकाशन करून त्या डायरीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे,व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट देवून कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्याचे काम केले.तसेच मागासवर्गीय विद्यार्थी व कर्मचारी संबंधी डायरीमध्ये शासनाचे नियम देवून कर्मचारी यांच्या ज्ञानात भरच पाडली आहे. त्यांनी देशव्यापी स्वतंत्र विद्युत एम्लाईज फेडरेशन मध्ये व देशव्यापी स्वतंत्र मजदूर युनियनच्या कार्यकारिणीमध्ये महत्वाची भूमिका पार पाडली. तसेच दर दोन वर्षांनी होणाऱ्या राज्यव्यापी द्विवार्षिक अधिवेशनामध्ये ऊर्जा श्रमिक मुखपत्र स्मरणिका प्रकाशित करून त्या स्मरणिकेमध्ये आंबेडकरवादी विचारवंताचे लेख प्रकाशित करुन आंबेडकरवादाला पुढे नेण्याचे काम केले.संघटनेचे मुखपत्र ऊर्जा श्रमिक हे मागील २५ वर्षापासून मान.नरेंद्र जारोंडे यांच्या संपादनाखाली चालू आहे.हे मुखपत्र नसते तर २२ पतसंस्था, कल्याण निधी, प्रशिक्षण संस्था, क्रांती ऊर्जा सार्वजनिक वाचनालय उभे झाले नसते.मा.नरेंद्र जारोंडे यांच्यामुळेच संघटनेने इंजिनियर रमेश रंगारी यांची १) आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ता २) बहुजन कामगार चळवळीची आवश्यकता व स्वतंत्र  मजदूर युनियन ३) बहुजन राष्ट्र ही तीन पुस्तके प्रकाशित केली आहेत.
स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष मान.जे.एस.पाटील यांच्या कडून प्रेरणा घेऊनच त्यांनी आपले कार्यक्षेत्र वाढवुन ठेवले आहे. नाही तर एका इंजिनियरचे कार्यक्षेत्र डिपार्टमेंट, डिव्हिजन आणि कॅबिन असते. त्यात ते बायको मूल प्लॉट बांगला व गाडी यांच्यातच निवृत्त होतात.आपण पाहत असाल काही लक्षवेधी उच्चशिक्षित अधिकारी निवृत्तीनंतर समाज,संस्था आणि संघटना मध्ये स्वतःचे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.त्यात आंबेडकर भवन होत्याचे नव्हते होते.परंतु जे एस पाटिल,रमेश रंगारी,नरेंद्र जारोंडे,संजय घोडके,सुदाम हनवते,जीवन गायकवाड, ज्ञानेश्वर खैरे,राजु गायकवाड सारखे अनेक इंजिनियर आणि अधिकारी आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची क्रांतिकारी विचारांची राष्ट्रीय ट्रेंड युनियन जिवंत ठेऊन मान्यताप्राप्त करून घेण्यासाठी देशभरातील मागासवर्गीय कामगार कर्मचारी अधिकारी यांना संघटित करीत आहेत.त्यात नरेंद्र जारोंडे किर्याशील असतांनाच निवृत्त झाल्यामुळे स्वतंत्र मजदूर युनियन (ILU) चे काम अश्वगतीने वाढणार आहे. शासकीय नोकरी करीता असतांना ते जेवढा वेळ कुटुंबाला देत नव्हते तेवढा वेळ संघटनेला देत होते.आता यापुढे नोकरी साठी जाणारा वेळ संघटना वाढी साठी ते देतील यात शंकाच नाही.कारण ते एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेले नेते आहेत. म्हणूनच नरेंद्र जारोंडे यांचे भावी आयुष्य निरोगी राहून त्यांच्या हातुन ऐतिहासिक मागासवर्गीय कामगार,कर्मचारी संघटनेचे कार्य देशव्यापी व्हावे हीच अपेक्षा व त्यांना सत्यशोधक कामगार संघटना संलग्न स्वतंत्र मजदूर युनियन च्या वतीने हार्दिक शुभेच्छा !.
सागर रामभाऊ तायडे,भांडुप मुंबई 9920403859,

संविधान जाळणाऱ्यांचे समर्थन करणारे देशद्रोही नाहीत काय?.

संविधान जाळणाऱ्यांचे समर्थन करणारे देशद्रोही नाहीत काय?.
भारतीय स्वातंत्र्य दिनाला एकाहतर (71) वर्ष पूर्ण करून बाहहतर (72) वर्षात पदार्पण करीत असतांना भारतीय संविधान जाळणारे देशद्रोही डोके वर काढत आहेत.त्याला सरकार,न्यायालय आणि मीडिया यांचे विनाअट समर्थन आहे हे स्पष्ट दिसून येत आहे.तीन टक्के असलेला समाज ज्या संविधानामुळे सुरक्षित होता.त्या समाजाची दुसरी तिसरी पिल्लावर भारतीय संविधान जाळण्याची हिंमत करते.आणि त्यांचे छुपे समर्थन करणारी विविध समाजातील राजकीय वेश्या व्यवसाय करणारी (कार्यकर्ते नेते) मंडळी मूक होऊन बसते म्हणजेच भारताचं संविधान जाळणारे जर देशद्रोही आहेत,मग त्यांचे मूक समर्थन करणारी ही पिल्लावर देशद्रोहीच समजली पाहिजे. भारत माता की जय ,वंदे मातरम न म्हणणाऱ्यांना देशद्रोही ठरविणारे देशप्रेमी संविधान जाळणाऱ्यांना देशद्रोही का म्हणत नाही?.संविधाना मुळे सर्व जातीधर्माचा आदर करून गुण्यागोविंदाने नांदणारे सर्वधर्मसमभाव मानणारे समाज बांधव, ही घटना घडल्या नंतर कोण कोणत्या समाजातून निषेध नोंदविला जात आहे.प्रिंट मीडिया चॅनल मीडिया किती प्रभावी पणे या संविधान जाळणाऱ्यां लोकांची दखल घेत आहे.हाच का लोकशाहीचा चौथा खांब हीच का शोध पत्रकारिता ?. बाबासाहेब आंबेडकरानां यांना मानणारा विशिष्ट समाज रस्त्यावर उतरून निषेधार्थ आंदोलन करीत आहे.काही लोक निषेधाचे पत्रक कडून शांत बसले.सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यावर एका ओळीचाही विरोध न दर्शवणारे खरच देशप्रेमी आहेत काय?.हेच का गर्वसे कहो हम गांडू है म्हणणाऱ्यांचे देशप्रेम?. 
इतिहास सांगतो की हा देश हजारों वर्ष परकियांचा गुलाम का राहिला? कारण त्यांच्यासाठी धर्म महत्वाचा आहे, देश नाही.ज्या देशातील नागरीकांची राष्ट्रध्वजा,
राष्ट्रगीताबद्दल जशी आस्था आहे.तशीच देशातल्या नागरिकांना देशाच्या संविधाना बद्दल आस्था का नाही?.. संविधानाने मनुस्मृतीचे समर्थन करणाऱ्या कर्मठांचं धार्मिक वर्चस्व मोडीत काढलं आणि तथाकथित चारही वर्णांना एका पातळीवर आणलं, म्हणून त्यांच्या पोटात कायमस्वरूपी दुखतंय.त्यामुळे दर सहा महिन्यांनी, वर्षांनी त्यांच्या पोटातील मळमळ बाहेर येते आणि देशभरात असंतोष निर्माण करून जाते.डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी अहोरात्र अभ्यासातुन, कष्टातुन संविधान घडविले आहे.त्यामुळे त्यांचे नाव संविधानाशी जोडलेलं आहे.हे कोणीच नाकारू शकत नाही.धर्मसत्ता, शिक्षणसत्ता, प्रशासकीय सत्ता,आर्थिक सत्ता आणि राजकीय सत्ता यावर कायमस्वरूपी वर्चस्व या तीन टक्क्या वाल्या विशिष्ट समाजाचे आहे.जगात विज्ञानाने किती ही प्रगती केली असली तरी भारतातील एम बी बी एस डॉक्टर, पी एच डी प्राध्यापक,एम टेक,बी टेक इंजिनियर,बॉरिस्टर झालेला वकील, एम बी ए झालेला एम डी,सी ओ आणि  उच्च शिक्षित कोणत्याही अधिकारी तीन टक्क्या वाल्यांच्या हातुन पूजा,अर्चा,होम केल्याशिवाय आणि गंडा,धागा- दोरा बांधल्या शिवाय जागु शकत नाही एवढे त्यांचे भारतीय जनतेच्या मेंदूवर नियंत्रण असतांना ही ते समाधानी नाहीत. उठता बसता त्यांना संविधान आणि आंबेडकर यांना मानणारा समाज का डोळ्यात सळतो,का त्यांच्या मनात 
त्याचा आकस आहे.अगदी तो आम्ही जातपात मानत नाही असे म्हणणाऱ्यांच्या वागणुकीतूनही कळतनकळत डोकावतो. स्त्रियांना,मागासवर्गीय,अल्पसंख्यांकांनाही स्वाभिमानाने जगण्याचा हक्क संविधान देतं, त्याचा मनुवादी कर्मठांना राग आहे.हे ते बहात्तर वर्ष झाले लपवू शकले नाही.
भारताचं संविधान नागरिकांच्या श्रध्दा आणि उपासना यांचं सर्वांना समान स्वातंत्र्य देते, पण दगडांच्या मूर्तीला स्टेथोस्कोप लावून तपासणाऱ्यांना ते नाकारते, कारण हे संविधान विज्ञानवादाचा पुरस्कार करणारे आहे. अंधश्रद्धा च्या आत श्रद्धा ठेवून शोषण,अन्याय अत्याचाराला चाप लावते आणि नेमकं तेच शोषण मनुवादी मनुस्मृतीचे थोतांड करणाऱ्या कर्मठांच्या पोटापाण्याची तरतूद करते.हे त्यांना माहिती असल्याने मनुवादी कर्मठ संविधान नाकारतात. 
जात, धर्म, रंग, वर्ण, लिंग कशाच्याही आधारे नागरिकांत भेदभाव करता येणार नाही, हे संविधानाचं तत्व सांगते.तर मनुस्मृती ते भेदभाव पाळण्याचे कडक नियम सांगून कारवाई करण्यासाठी भाग पाडते. संविधान अशा प्रकारच्या भेदभावास बळकटी देणाऱ्या पारंपारिक पौराणिक धार्मिक मानसिकतेला ठोकरून लावते. याकरीता इथल्या मनुवादी कर्मठांना संविधान नकोय.म्हणूनच ते वेळ काळ पाहुन आपले नियंत्रण किती लोकांवर समाजावर आहे हे चेक करण्यासाठी संविधान आणि आंबेडकर यांच्या विरोधात गरड ओकून तपासुन पाहतात.
स्वर्ग आणि नरक, भुताप्रेतांची, आत्माबित्म्याची, अवतारांची, कर्मकांडांची, पुजा, विधी, होमहवन यांचं स्तोम माजवून लोकांना सतत भयाखाली ठेवून त्यांची लुबाडणूक करून वर्षानुवर्ष ऐतखाऊपणावर जगण्याची सवय झालेल्यांना आणि केवळ जातीच्या आधारावर गुणवत्तेचा टेंभा मिरवणाऱ्यांना संविधानाने इतरां सारखंच कामधंदा मेहनत करून पोट भरायला मजबूर केले.हे मुख्य गोष्ट आहे . त्यामुळे त्या तीन टक्के वाल्यां लोकांना संविधान मोडीत काढून पुन्हा ऐतखाऊ मनुवादी शोषणव्यवस्था प्रस्थापित करायची आहे. खरं कारण वर्चस्व प्रस्थापित करण्याचं आहे.संविधान त्यासाठी जाळलं जाते. हा विषय कोण्या आंबेडकरवाद्यांचा नाही, कोण्या पुरोगामी, धर्मनिरपेक्ष लोकांचा नाही. हा प्रश्न देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा आहे.विषय कोणताही असो, तुम्हाला समर्थनार्थ किंवा विरोधात मत मांडण्याचा पुरेपूर अधिकार आहे. आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचाही अधिकार आहे, पण संविधान जाळण्याच्या कृतीचं कदापि समर्थन होऊ शकत नाही.तरी 9 ऑगस्ट पासुन आज पर्यत सरकार, न्यायालय आणि मीडिया या घटनेवर ठोस भूमिका घेऊन बोलत नाही.म्हणजेच यांचे त्यांना उघड समर्थन आहे.म्हणून संविधान जाळणाऱ्यांचे समर्थन करणारे देशद्रोही नाहीत काय?.
भारतातील तमाम नागरिकांनी आपली जात, धर्म, भाषा, प्रांत, सामाजिक, राजकीय पक्ष, वैचारिक मतभेद बाजूला ठेवून संविधान जाळण्याचं देशद्रोही कृत्य करणाऱ्यांचा केवळ निषेध करून न थांबता प्रत्येक पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात लेखी तक्रार दाखल करण्यात यावी.कडक कारवाई होत नाही तो पर्यंत पाठपुरावा करा. आपण भारतीय नागरिक आहोत.संविधानामुळे भारत जाती धर्मा पेक्षा मोठा आहे.तो अखंड राहावा यासाठी संविधान राहिले पाहिजे. आम्ही देशद्रोही नाही. हे आपल्या आचरणातून सिद्ध करा.नाही तर आपण संविधान जाळणाऱ्यांचे समर्थन करणारे देशद्रोही आहोत हे सिद्ध होते.
सागर रामभाऊ तायडे,भांडुप मुंबई 9920403859,

रविवार, १५ जुलै, २०१८

शिक्षण मोठे की संस्कार?.

शिक्षण मोठे की संस्कार?.
जितके मोठे मन तितके सोपे जीवन.
वादाने अधोगती आणि संवादाने प्रगती, जग काय म्हणेल हा विचार करु नका.कारण लोक फार विचित्र आहेत. अपयशी लोकांची थट्टा करतात.आणि यशस्वी लोकांवर जळतात.हे हिंदू धर्माचे संस्कार गीता,रामायण महाभारतात सांगितले आहे.त्यामुळेच भारतीय जनतेला हिंदू असल्याचा खुप गर्व आहे.त्या हिंदू धर्मात सहा हजार सहाशे जाती आहेत.त्यात भी पोटजाती असंख्य आहेत. त्यांच्या सर्व सुख दुःखाचे निवारण करण्यासाठी तेहतीस कोटी देव देविका चोवीस तास जागरूक आहेत.त्यांची मंदिरे वार उपवास,नवस महापुजा ही त्याच्यावर जन्मापासुन मृत्यु पर्यंत धर्माचे  विविध संस्कार करण्यासाठी त्या तोडीचे धर्मग्रंथ आहेत. श्रीकृष्णाची गिता सर्वश्रेष्ठ आहे.ते प्रत्येक माणसाने स्वार्थासाठी अधर्माने वागले तर त्याला धर्मसंस्कार म्हणजे गिता तत्वज्ञान चुक ठरवीत नाही. धर्म की अधर्म ते समोरच्या व्यक्ती व आर्थिक व्यवहारा वरून ठरते. त्यामुळे कलियुगात त्याने कितीही उच्च शिक्षण घेतले असेल तरी ते धर्मसंस्कारा नुसार खोटे ठरते.पण भारतीय संविधाना नुसार ते गुन्हेगार ठरते. म्हणून भारतीयानां धर्माच्या संस्काराचा खूप गर्व आहे.म्हणूनच बहुसंख्येने बहुजन मागासवर्गीय समाजातील लोक गर्वसे कहो हम हिंदू है म्हणतात.

महाराष्ट्रात व देशात असा लक्षवेधी घटना खुप घडतात.त्यावर व्यापक चर्चा होत नाही.चॅनल मीडिया प्रिंड मीडिया यावर रोखठोकपणे लिहत नाही बोलत नाही.
एम एस्सी शिक्षित मुलाने निवृत्त प्राचार्य बाप- आईला दिले नारळ पाण्यातून विष दिल्याची लक्षवेधी घटना लातूर येथे घडली. सेवा निवृत्त वडील प्राचार्य व आईस,एम एस्सी (physics) मुलाने फ्लॅट नावावर वडील करत नाहीत म्हणून घुस मारण्याचे औषध नारळ पाण्यातून,ते कडू लागू नये.म्हणून साखर घालून प्रेमाने, आग्रहाने पाजले, अर्थात आपला पोर इतका का आग्रह करतोय, हे चाणाक्ष आईच्या लक्षात आले, त्या माउलीने ते नारळ पाणी अर्धे संपवत शंका मनात येई पर्यंत, प्राचार्य वडील नारळ पाणी घटाघटा पिऊन गेले.आणि काही क्षणात मृत्यू पावले.
अल्पसंख्याक समाजाचा शांतीचा संदेश देणाऱ्या ईदीच्या दिवशी ही हिंदू धर्माचे गर्व करणाऱ्या समाजाची बातमी मनाला बैचेन करून गेली साधा फ्लॅट नावावर करण्यासाठी, आई वडिलांना गावावरुन बोलवायचे आणि त्यांच्या पोटच्या पोरानं ज्यास तळ हातावरच्या फोडाप्रमाणे वाढवलं त्याने व ज्याला विज्ञानाच्या डिग्री पर्यंत शिक्षण दिले त्याने हे कृत्य करावे.तोच आईवडीलांना विषाचा घोट पाजतोय!. काय म्हणावं या शिक्षणाला? माणूस शिक्षणाने शिक्षित झाला की सुशिक्षित हा प्रश्न मात्र कायम माझ्या डोक्यात भुंगा बनून पोखरत असतो.त्यापेक्षा माझा अशिक्षित असंघटित नाका कामगार आईवडिलांना प्राणप्रणाने जपतो. शिक्षण माणसास स्वार्थी, धूर्त करते याचा हा पुरावा आहे.तो काळाच्या ओघात सिद्ध होतोय.संस्कार माणसाला मोठे बनवितात आणि शिक्षण मोठे बनवुन स्वार्थी बनवत असेल तर ?.समाजाचे देशाचे भवितव्य काय असेल?.
जे शिक्षण आपल्या आईवडिलांना पोसण्यासाठी मुलांना प्रेरीत करत नाही.जे ज्ञान देशाचे,समाजाचे, कुटूंबाचे प्रश्न सोडवू शकत नाही.आशा डिग्री वर अंत्यसंस्कार करावेत, असे वाटते. उच्चशिक्षित माणसं समाजाशी,देशाशी नेहमीच गद्दारी करीत आले आहेत.असंघटित कष्टकरी कामगार, मजुर,शेतकरी यांचे शोषण करण्यात सर्वात पुढे असनारा वर्ग हा नेहमीच सरकारचे कायदे कानून सांगुन शोषण करीत असतो.त्यात काही अपवाद असतात ते कौतुकास पात्र असतात.शेतकऱ्यांची कर्ज वसुली आणि उच्चशिक्षित, बिल्डर भांडवलदारांनी घेतलेल्या कर्जाची वसुली किती प्रामाणिक पणे करतात हे दिसुन येत आहे.त्यामुळे एकूण सुशिक्षित लोक किती संस्कारित आहेत हे सिद्ध होत आहे.
 हिमांशू रॉय सारखा आय पी एस ऑफीसर कशी काय आत्महत्या करू शकतो, जो स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण आहे, एक उच्च शिक्षित आध्यात्मिक गुरू कशी काय स्वतःस उजव्या कानशिला खाली पिस्तूलाची गोळी मारून घेतो.सारे अकालनीय आहे. नाही पटत असे शिक्षणाचे वांझोटी मंदिर बंद करावीत. कशी हिम्मत होते इतकं शिकून देखील
ह्या पेक्षा आपले अडाणी माणसं बरी होती,जे मरे पर्यंत माणसातच राहतात.
आपण लहानपणी कथा ऐकल्या असतात की, विंचूविन आपल्या पिलांना जन्म देते आणि तेच पिलं त्या विंचू आईस सर्व मिळून खाऊन जातात, फडशा पाडतात, असे तथा कथित विंचू जर तयार होत असतील तर ह्या विंचू च्या नांग्या कश्या ठेचाव्यात हे देखील काळाप्रमाणे इतिहासात सांगितले आहे. मग ती माकडीणीची गोष्ट आठवा जेव्हा स्वतःचा मृत्यू सामोरे असेल तर पिलांना देखील पायाखाली घेऊन नाका तोंडात जाणारे पाणी आडवावे लागते ही गोष्ट आहे.ती आता उलटी होतांना दिसत आहे.
 हा सारा प्रकार पाहिल्या वर ऐकल्यावर मन जे छान असतं, नितळ असतं, पावित्र्या इतकं पवित्र असतं, ते गढूळ होतं.ते जेव्हा नितळ डोहात एखादा दुसरा असा खडा पडला तर उलथापालथ घडवितो. ऊन,वारा ,पाऊस न लागावा, म्हणून आपण झाडा खाली आश्रय घ्यावा. आणि त्याच झाडाची फांदी कडकन आपल्या डोक्यात पडावी, हे दैव की दुर्दैव!
 मुलं सुशिक्षित झाल्यावर लग्न करतात.आणि दोन महिन्यातच आईवडीलांना सोडुन वेगळे राहण्याचा निर्णय घेतात.बेरोजगार मुलांचे ही आईवडील लग्न करून देतात ते ही आईवडीलांना मानसिक त्रास देतात.पहिला त्याला एकट्याला खाऊ घालावे लागत होते.लग्ना नंतर दोघांनाही खाऊ घालावे लागते.वर्षा नंतर ती संख्या वाढत जाते.पण उत्पन्नात भर पडत नाही. यावर कोणी चर्चा करीत नाही. घरात शांती नांदावी या ऐवजी अशांती नांदते.त्यामुळेच हत्या,आत्महत्या हिंसाचार वाढत आहेत असे म्हटले तर चूक ठरणार नाही. एकत्र कुटुंब आणि एकत्र गांव ही देशाची शान होती ती आता नष्ट होत आहे.एकत्र कुटुंबात सर्वांचा मानसन्मान ठेवणारे सांस्कृतिक संस्कार होते.त्यामुळेच गावातील सर्व जातीधर्माच्या वडीलधारी माणसाची आदरयुक्त भिती वाटत होती आज ती संपली म्हणूनच एक मुलगा आईवडीलांची संपत्ती साठी नारळाच्या पाण्यात विष घालून हत्या करण्याचे धाडस करीत आहे.त्याला समाजाची,कायद्याची आणि धर्माची भिती राहीली नाही. म्हणूनच संस्कार हे लहानपणापासून सत्य असत्य यातील फरक सांगितला पाहिजे.अंधश्रद्धा,अज्ञाना पासुन विज्ञानाच्या कक्षा कशा वाढत चालल्या हे सांगितल्यास मुलांच्या शिक्षणाच्या वयात योग्य संस्कार होती.मग हा प्रश्न निर्माण होणार नाही की शिक्षण मोठे की संस्कार?.

रमाबाई पुतळा विटंबना आणि हत्याकांडाचे काय झाले?.

रमाबाई पुतळा विटंबना आणि हत्याकांडाचे काय झाले?.
महाराष्ट्रसह देशभरात ऐतिहासिक आंबेडकरी चळवळीचे मुख्य केंद्र असलेल दादर येथील प्रसिद्ध आंबेडकर भवन पाडल्याचे प्रतिसाद,प्रतिवाद गाजले. त्यामुळे आम्ही मागील घडलेल्या लक्षवेधी घटना विसरून पुन्हा पुन्हा तेच तेच गल्ली बोळातील आंदोलनवर आपली पूर्ण शक्ति खर्च करतो,आणि आपली दुकानदारी कायम ठेवतो.
अहमदनगर जिल्हात दलित बौद्ध अन्याय अत्याचार च्या विरोधात आक्रोश मोर्चा काढल्यामुळे खुप गाजला होता. अहमदनगर जिल्ह्यात ज्या दलित बौद्ध तरुणाच्या हत्या झाल्या त्याबाबत जिल्ह्यातील आंबेडकरी संघटना पक्ष सोडल्यास कोणाला ही वाईट वाटले नाही.पण प्रचंड आक्रोश मोर्चा काढल्यामुळे जातीवादी मानसिकता असलेल्या त्याच्यातील सैतान (माणूस ) जागी झाला ?.देशातील कोणताही कायदा त्यांना लागू होत नसल्या सारखा रात्री मोर्चा कडून घटनाकाराला बाबत प्रचंड गरड  ओकली.नेमके सध्या महाराष्ट्रात युतीचे सरकार सत्तेवर असल्यामुळे त्यावर योग्य कडक करवाई झाली नाही. तसाच प्रकार ऐतिहासिक आंबेडकर भवन रात्री २ /३ वाजता स्वयं घोषित ट्रस्टी ने पडून त्यावर योग्य कडक कायदेशीर करवाई होत नाही. ज्या रमाबाई नगरातल्या हत्याकांडा नंतरच राज्यातल्या दलित समाजाने युती सरकारला जातीयवादी ठरवलं होत आणि पुढच्याच विधानसभा निवडणुकीत घरचा रस्ता दाखवला होता.पण युतीच्या पाठोपाठ सत्तेवर आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने ही दलितांच्या तोंडाला पानंच पुसली होती .हे विसरता येत नाही. मनोहर कदम साररखा जातीवादी अधिकारी पोलीस दलात ठेवणं धोकादायक असल्याचा अभिप्राय आपल्या चौकशी अहवालात देणाऱ्या गुंडेवार आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्याचं आश्वासन काँग्रेस आघाडीने तेव्हाच्या विधानसभा निवडणुकांपूर्वी दिलं होतं. शिवाय, मनोहर कदम याच्यामुळे रमाबाई नगरात झालेला गोळीबार आणि पोलिसांच्या बळाचा अतिरेकी वापर अनाठायी होता, असा ठपका ही आयोगाने ठेवला होता. असं असतानाही राज्य सरकारने त्याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यास तब्बल चार र्वष लावली. या संपूर्ण काळात विविध दलित संघटना आणि दलित कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीमुळे अखेर २० डिसेंबर २००२ रोजी कदम याला अटक करण्यात आली. पण कदमने मात्र कोठडी टाळण्यासाठी आजारी असल्याचं सांगत रूग्णालयात अटकेचे दिवस काढले. कारण युती असो या आघाडी दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.हे शिर्डीत विखे पाटलानी विरोधीपक्ष नेता असताना दाखवून दिले.विशेष म्हणजे,या संपूर्ण प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी कदम पोलीस गणवेषात न्यायालयात हजर होत असे. त्याच्या या कृतीमुळे साक्षीदारांवर दडपण येत असल्याचा आरोप करत त्याच्या निलंबना साठी  गजानन लासूरे आणि अनिकेत देशकर या दोघा वकिलांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. ती न्यायालयाने मंजूर केली. गंभीर गुन्ह्यचा खटला सुरु असलेला पोलीस अधिकारी गणवेषात आणि सेवेत असल्यास लोकांचा फौजदारी न्याय प्रक्रियेवरील विश्वास उडेल, हे याचिकाकर्त्यांचं म्हणणं न्यायालयाने मान्य केलं होत. पण खटल्याला होत असलेल्या विलंबामुळे रमाबाई नगरवासीयांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडाला होता.
11 जुलै 1997 ला जातीवादी हरामखोर राज्य राखीव दलाचा पोलीस फौजदार मनोहर कदम याने भ्याडपणे गोळीबार केला. या गोळीबरात सुखदेव कापडणे ,संजय निकम ,बबलू वर्मा, अनिल गरुड, किशोर कटारनवर, संजय कांबळे, विलास दोडके, मंगेश शिवसरने, अमन धनावडे, कौसल्या पाठारे असे 10 जण शहीद झाले होते तर 23 जण जखमी झाले होते.आज (11 जुलै) रमाबाई नगर, मुंबई हत्त्याकांडाचा स्मृतिदिन आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून रमाबाई नगर हत्त्याकांडाची नोंद झाली आहे. भिमसैनिकांवरील जातीवाद्यांचा व पोलिसी बळाचा वापर करून झालेला हल्ला भिमसैनिकांवरील अत्याचाराच्या घटनेत अतिशय निंदनीय होता. स्वतंत्र भारतात वावरणाऱ्या जातीयवादी षंड प्रवृतींचा आंबेडकरी समाजावरचा द्वेष जगासमोर आणणारी ही घटना होती.या हत्त्याकांडात अनेक भीमसैनिकांना, माया बहिणींना, आबाल वृद्धांना आणि लहान लहान भीमसैनिकांना पोलिसाच्या अत्याचाराचे शिकार होऊन शहीद व्हावे लागले होते. त्यामुळे भिमसैनिकांसाठी 11 जुलै हा काळा दिवस आहे.
रामबाई हत्याकांडा नंतर अनेक जनांदोलन झाली .नामांतर साठी १६ वर्ष संघर्ष झाला.खैरलांजी ते,जवखेडा, खर्डा, सोनई,शिर्डी अहमदनगर जिल्हा राज्यातील दलित बौद्ध समाजा करिता जातीवादी मानसिकता असलेल्या सैताना चा उगमस्थान झाला होता.रमाबाई हत्याकांडा पासून शिर्डीच्या हत्याकांडा पर्यंत सर्व आंबेडकरी संघटना राज्यात तालुखा जिल्ह्यात आपसातील मतभेद विसरून जनांदोलन करताना पोलीस स्टेशन वर सनद शीर मार्गाने नोंद करतात.पण न्यायलाया कडून न्याय मिले पर्यंत सर्व पुरावे नष्ट केल्या जातात.आणि मुख्य आरोपी पुराव्या अभावी सही सलामत सुटत आले आहेत.मग आमची तरुण मुले विचारतात बाबा रमाबाई नगरातील हत्याकांडाचे काय झाले?.आणि पुतळा विटंबना करणारा कोण होता तो पकडला काय?.त्याचा मुख्य सूत्रधार कोण होता?.त्यांचे काय झाले.रमाबाई हत्याकांडा करिता ज्यांनी ज्यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.तेच मुख्य आरोपी झाले.त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केली तो आणि त्याचा मुख्य सूत्रधार कधीच समोर आला नाही.जनआंदोलन करणारे कार्यकर्ते आणि नेते नंतर स्वता पोलीस कोर्टाचे चक्कर काढुन हैराण झाले मानसिक शारीरिक व आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे ढासळले आणि नाईलाजाने काँग्रेसवासी  झाले. त्यामुळे ते ना आंबेडकरी समाजाचे राहिले ना रिपाईचे. आज रमाबाई नगर घाटकोपरचा फेर फटका मारल्यास हेच का ते रमाबाई नगर असा प्रश्न पडतो .रमाबाई नगरातील ४५ मंडळा च्या तरुण कार्यकर्त्यांना भेटा आणि एकच प्रश्न विचारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणारा आणि गोळीबार करणाऱ्या मनोहर कदमचे काय झाले?.रामबाई नगरातील गोळीबारत निरपराध भिमसैनिक मारल्या गेले.त्या शहीदाना विनम्र अभिवादन करण्या शिवाय आपल्याला पर्याय नाही.कारण ज्यांनी रमाबाई हत्याकांड ज्यांच्या आशीर्वादाने मनोहर कदम यांने घडविले त्याचेच सरकार आज आहे.आणि दुखची बाब ही कि ज्या नेत्याने समाजा कडून गुरा सारखा मार खल्ला तोच मान्यताप्राप्त नेता आज त्याच्या मांडीला मांडी लावून केंद्रात सामाजिक न्याय मंत्री झाले.आजची तरुणानी व विद्यार्थ्यानी विचारले रमाबाई कॉलनी तील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची विटंबना कोणी केली होती?.त्याचा आरोपी एवढी मोठी जन आंदोलन करून पोलिस का पकडू शकले नाही. रमाबाई ते शिर्डी हत्याकाड घडविणारी आणि आता आंबेडकरी समाजाचे प्रेरणाश्रोत्र असलेल मुख्य केंद्र आंबेडकर भवन पाडनारी प्रवृत्ती गाडण्यासाठी बंद करा ती गटबाजी सर्वांनी एक व्हा भीमाचे लेक व्हा आणि शहीदाना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली व्हा.
आपला भिम सैनिक -सागर रा तायडे भांडूप मुंबई -९९२०४०३८५९ 

Attachments area

शाळा कॉलेज मध्ये गीता?.

शाळा कॉलेज मध्ये गीता?.
महाराष्ट्र राज्य सरकारने गीता हा पवित्र धर्म ग्रंथ शाळा कॉलेज महाविद्यालयात वाटप करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.त्याला पुरोगामी विचारांच्या लोकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला.पण राज्य व केंद्र सरकार हे आर एस एस प्रणित मनुवादी हिंदुत्ववादी असल्यामुळे त्यांना जे करायचे आहे ते जाहीर पणे करण्याची हिंमत करीत नाही ते त्यांच्या धर्मानुसार लपूनछपून मुखवटे धारण करून करीत आहे,भारतात हा सर्वधर्मसमभाव मानणारा देश आहे तो कधीच एका जातीचे समर्थन करून राज्य करू शकत नाही.भारतीय संविधाना मुळे हा देश सर्व जातीधर्माच्या लोकांना एकत्र घेऊन गुण्यागोविंदाने नांदत आहे.भारतीय संविधान जर संपले तर देशाचे वाटोळे होण्यास वेळ लागणार नाही.गीता हा हिंदूंचा पवित्र धर्म ग्रंथ आहे त्यात स्वतःच्या फायद्या साठी कमजोर लोकांवर अन्याय अत्याचार केला त्यांचे शोषण केले तर ते चुकीचे ठरत नाही.परंतु गोरगरीब लोकांनी उच्च वर्गीय वर्णीय लोकांच्या विरोधात संघटितपणे संघर्ष केला तर तो अधर्म समजल्या जातो.गीते मध्ये जे दिले आहे ते प्रत्येक भारतीय विद्यार्थ्यांनी स्विकारल्यास कर्ण, घटोत्क भीष्माचार्य, द्रोणाचार्य, विदुर, द्रौपदी, पाचपांडव, कौरव यांच्यातील वर्ण संघर्ष जिवंत झाल्याशिवाय राहणार नाही.धर्माचे विद्यार्थी दशेत मुलांवर संस्कार व्हावे म्हणून एका बापाने मुलांना गीता वाचण्यासाठी दिली.मुलाने काळजीपूर्वक ती वाचली तर काय घडू शकते त्यांचा हा विदर्भातील वऱ्हाडी भाषेतील संवाद सोशल मीडियावर फिरत आहे.नागपुर चे अधिवेशनात गीता वाटपाचा निर्णय झाला.त्यांचे पडसाद राज्य भरात उमटत आहेत.ग्रामीण भागातील हा एक नमुना आपल्या समोर देत आहे.विद्यार्थ्यांनी गीता वाचली तर काय होऊ शकते?. 
वडील : "ए  पोट्ट्या.. का करून रायला बे..?? मी तुले थे 'गीता' देली होती वाचाले... झाली का पुरी वाचुन??
मुलगा : (वडिलांवर बंदूक रोखून) "हो बावाजी झाली पुरी वाचून… आता तुमी मरासाठी तय्यार राहा..
वडील : "बे भैताडा.. पागल झाला का…? बाप होये न मी तुया..? 
मुलगा : चोssssप…!! कोनी कोनाचा बाप नाई अन कोनी कोनाचा पोरगा नाई राहात.. "गीता" मधी लिहून हाये असं.. मघाशीच वाचलं. 
वडील : "बे बह्याडा  मरून जाईन न मी...? 
मुलगा : "बावाजी फक्त शरीर मरन तुमचं....आत्मा नाई मरत कधी… आत्मा अमर रायते.. 
वडील : "बे पोट्ट्या मजाक नोको करू... गोळी-गीळी चालुन जाईन… तडपू-तडपू मरीन मी.. 
मुलगा : "अरे बावाजी कायले फालतू चिंता करता..आन कावून येवढे घाबरता..? आत्माले ना कोनी पेटवू शकत, न कोनती गोळी मारू शकत, न कोनती तलवार कापू शकत … सांगितलं न आत्मा अमर राहीन तुमची.. 
वडील : "अरे माया पोरा, आपल्या भावा-बहिनीचा त विचार कर…कमीतकमी आपल्या आईबद्दल त विचार कर.. माया बिना अनाथ होतीन ते.. 
मुलगा : "ओ बावाजी… फालतू Overacting नोका करू… ह्या जगात कोनीच कोनाचं नाई राहात.. सब रिश्ते मतलबा साठी रायते…सब मोहमाया हाये.. हे बी लिहलं आहे 'गीता' मधी.. 
वडील : "अरे माया लेकरा.. पन कावून असा करतं तू... मले मारुन तुले का भेटन? 
मुलगा : मले नाई तुम्हाले… या 'धर्मयुद्धा'मधी तुम्ही मेले त तुम्हाले स्वर्ग भेटन.. डायरेक…..आन मले तुमची प्रापर्टी भेटन... डायरेक..!!  
वडील : "अरे माया सोन्या… असा नोको करू न मा… 
मुलगा : "अरे बावाजी तुमी कावून अशे करता..?? जशी आत्मा जुनी वाली म्हतारी बॉडी सोडून दुसऱ्या बॉडीत घुसते, तशेच तुम्ही बी तुमची ही म्हतारी  बॉडी सोडून दुसऱ्या फ्रेश बॉडीत घुसान.. 
वडील : "आबे पन….. 
मुलगा : "हा चला लय झालं आता तुमचं नाटक.. डोळे बंद करा... 
ढिशक्याsssssssव….!!! 
या गोष्टीतुन आपण काय बोध घेणार?. तर आपल्या लेकरांना चांगलं साहित्य वाचायला द्या.गीता वाचली तर आणखी काय चांगले घडण्याची इच्छा बाळगणाऱ्या बापाला हेच मिळणार असेल त्याला गीता वाचनासाठी देणे योग्य की अयोग्य हे आईवडील यांनी ठरविले पाहिजे जर राज्य सरकार हे ठरवत असेल तर ?.त्यांचा निर्णय चांगला आहे असे समजता येईल काय?.आर एस एस प्रणित राज्य केंद्रातील सरकार अनेक समस्या सोडविण्यास असमर्थ ठरले आहे.त्यामुळे जनतेचे लक्ष दुसरी कडे वळविण्याचा हा प्रकार आहे.त्यातून समस्या सोडविण्या ऐवजी समाजा समाजात तेढ निर्माण होईल.अशी ही गीता आहे 
सागर रामभाऊ तायडे, भांडुप, मुंबई 9920403859

मंदिर नाही शाळा पाहिजे!. धर्म नाही अधिकार पाहिजे!!

मंदिर नाही शाळा पाहिजे!. धर्म नाही अधिकार पाहिजे!!.
भारतात देवा देवीकांच्या जन्म मृत्यू च्या गोष्टी कथा प्राथमिक शिक्षण घेतांना सांगितल्या व शिकविल्या जातात.त्याचं बरोबर त्यांनी अफाट चमत्कार कसे देवाला प्रसन्न केल्यामुळे केले हे आवर्जून सांगितल्या जाते. गणेशोत्सवात दररोज होणारी आरती व नवरात्रीच्या देवीच्या आरती बहुसंख्य मुलामुलींना तोंडपाठ असतात. पण त्यांचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न ते कधी करीत नाही. रामानंद सागर यांनी रामायण, महाभारत टीव्हीवर आणल्या पासुन तर विद्यार्थी शिक्षकांनाच उलट सुलट प्रश्न विचारतात. त्यात इंग्रजी माध्यमाच्या स्कुल मध्ये थोडे विज्ञान थोडे सांस्कृतिक म्हणून जनरल नॉलेज म्हणून रामायण महाभारतातील पात्रराची वेशभूषा व ठराविक डॉयलाग बोलण्याची स्पर्धा घेतली जाते.

सोशल मीडियावर सध्या एक हुशार विद्यार्थी व शिक्षक यांच्यात रामायण की कहाणी ही पोस्ट खुप फिरते आहे. आजचा विद्यार्थी हा स्मार्टफोन, कॉम्प्युटर, गुगल, यूट्यूब वर पाहिजे ते शोधणारा आहे.त्यामुळे शिक्षकांनी सांगितले तर चुपचाप ऐकून घेणारा नाही.त्याला जे पटल नाही तर प्रश्न विचारण्याचे धाडस करतोच.तर विद्यार्थी व शिक्षक यांच्यात झालेला प्रश्न उत्तर कसा घडतो वाचा.शिक्षक मुलांनो श्री रामचंद्रजी ने समुद्रात पुल बनविण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थी सर मला काही सांगायचे आहे.शिक्षक > बोल पप्पू ,पप्पू > रामचंद्र जी ने समुद्रात पुल बनविण्याचा निर्णय चुकीचा होता.शिक्षक तो कसा काय?.पप्पू > सर रामचंद्र जी कडे हनुमान होते.ते उड्डाण भरून लंकेत जाऊ शकत होते. मग पुल बांधण्याची गरज नव्हती.शिक्षक हनुमान उड्डाण घेऊ शकत होते बाकी वानर उडू शकत नव्हते. शिक्षक > फक्त हनुमान उडू शकत होते.बाकी वानर उडू शकत नव्हते.पप्पू > गुरुजी ते हनुमानाच्या पाठीवर बसुन जाऊ शकले असते.जर हनुमान पुरा पहाड हातावर उचलून आणू शकतात तर ?.शिक्षक > देवाच्या चमत्कार लिला वर प्रश्न विचारत नसतात नालायका.पप्पू >गुरुजी त्यांच्या कडे आणखी एक उपाय होता.गुरुजी > रागाने लाल होऊन काय?. पप्पू > गुरुजी हनुमान आपला आकार पाहिजे तेवढा लहान व मोठा करीत होते.जसा मगराच्या तोंडातुन लहान होऊन बाहेर निघाले होते व सूर्याला गिळण्यासाठी मोठे झाले होते.तसेच ते आपला आकार समुद्राच्या लांबी व खोली एवढा बनवुन घेऊ शकले असते त्यांच्या पाठीवरून बाकी वानर व रामचंद्रजी लंकेत जाऊ शकले असते.गुरुजी आणखी एक गोष्ट विचारू ?.शिक्षक >विचार. पप्पू >गुरुजी ऐकले आहे की समुद्रावर पुल बनवितांना वानर सेनेने दगडावर राम नांव लिहले होते?.त्यामुळे सर्व दगड पाण्यावर तरंगत होते म्हणे?.गुरुजी > हा ते सत्य आहे.पप्पू >गुरुजी मग वानर सेनेला वाचणे लिहणे कोणी शिकविले होते?.गुरुजी> हरामखोर,नालायक देवाच्या गोष्टीवर अविश्वास दाखवितो?. बंद कर तुझी बकवास व मुर्गा बनुन वर्गाच्या बाहेर उभा रहा.पप्पू > ठीक है गुरुजी, वर्षानुवर्षे आम्ही वर्गाच्याच काय गांवच्या बाहेर उभे आहोत.
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.विज्ञानाच्या चौकटीत ते घेतले तर तो श्रद्धा व अंधश्रद्धा,आणि ज्ञान व अज्ञान यातील फरक समजु शकतो.मग त्याला नेहमी प्रश्न पडतात.ते मित्रांना नेहमी विचारतो.मंदिर नाही शाळा पाहिजे!.धर्म नाही अधिकार पाहिजे!!.गावागावात शाळेच्या कामासाठी गावकरी एकत्र येऊन मदत करीत नाही.ते म्हणतात ते सरकारी काम आहे आपले नाही.पण मंदिर बांधण्यासाठी सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येऊन सढळ हस्ते मदत करतात.त्यात त्यांची चढावळ लागते.धर्मानुसार त्याचा आर्थिक फायदा कोणाला होतो.तिथे कोणी अधिकार सांगितला तर काय होते?.सुशिक्षित पदवीधर सामाजिक कार्यकर्ते यांचे उत्तर मागत आहेत.मागासवर्गीय समाजाची शिक्षणामुळे प्रगती झाली, देव दर्शन, उपवास पकडून नवस फेडला म्हणून नाही.म्हणूनच मागासवर्गीय समाजाला रोखण्यासाठी मराठ्यासह सर्वाना आरक्षण पाहिजे. त्यासाठी आज देशभरात ब्राम्हणी प्रिंट,चॅनल मीडिया जाती जातीत भांडणे लावत आहे.धर्मा नुसार सर्व हिंदू आहेत.मग मंदिराच्या उत्पन्ना वर सर्वच समान अधिकार का नाही?. राज्य व केंद्रातील सरकार यावर ठोस निर्णय का घेऊ शकत नाही?.शाळा,कॉलेज काढले तर मुलामुलींना लहान पणापासून अज्ञान व विज्ञान कळेल,आज पर्यत धर्माने सांगितले ते मुलामुलींनी ऐकले तेच शाळा कॉलेज मध्ये शिकविल्या गेले.रावणाला दहा तोंड होती,पण तो आईच्या पोटातुन कसा बाहेर आला यांचे शाळा कॉलेज मध्ये उत्तर मिळत नाही.पुढे असे सांगितल्या जाते रावण महापंडित होता!.मग आज पर्यत एकही पंडितांच्या मुलाचे नांव रावण का नाही?.शाळा कॉलेज मध्ये मुलामुलींना गणेशोत्सव साजरा करण्यात येतो त्यात नियमितपणे आरती म्हटली जाते.बुद्ध हा विष्णुचा अवतार आहे.मग कोणत्या शाळा कॉलेज, व हिंदूंच्या मंदिरात बुद्ध मूर्ती का नाही लावल्या जात नाही?.कोणत्याही भटा ब्राम्हणाने स्वतःचा मुलाचे किंवा इतर हिंदू धर्मातील लोकांच्या मुलाचे नांव गौतम ,सिद्धार्थ,तथागत का ठेवले नाही. वाल्मिकी ऋषी सर्वात श्रेष्ठ होते त्यांनी रामायण/महाभारत लिहले.मग कोणीच हिंदू धर्मातील आपल्या मुलांचे नांव वाल्मिकी का ठेवत नाही.असे प्रश्न सोडविण्यासाठी मंदिर नाही शाळा पाहिजे!. धर्म नाही अधिकार पाहिजे!!.
ब्राम्हण किती ही उच्च शिक्षित असु द्या.तो कोणत्याही मोठया पदावर विराजमान झाला तरी आपली ब्राम्हणवादी,असमानतावादी भूमिका जबाबदारी कधीच विसरत नाही.आपण हिंदू म्हटले की सर्व जाती पाती विसरून त्यांच्या आदेशाचे पालन करतो. पण शाळा कॉलेज आणि मंदिर, व धर्म आणि अधिकार यातील फरक आपल्याला कळत नाही.मग स्मार्टफोन, कॉम्प्युटर, नेटवर्क, गुगल यूट्यूब यासाठी 3G,4G पाहिजे हे कसे कळते ?.हा अज्ञान व विज्ञान यातील फरक आहे.म्हणूनच सर्व भारतीय नागरिकांनी गांभीर्याने विचार करून मांगणी करावी  की मंदिर नाही शाळा पाहिजे!. धर्म नाही अधिकार पाहिजे!!!.
सागर रामभाऊ तायडे, भांडुप मुंबई 9920403859,