शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२०

मूर्ती छोटी किर्ती मोठी

 मूर्ती छोटी किर्ती मोठी 

राजस्थान :आपल्याकडे समाजात असे बरेच वर्ग आहेत जे मुलींना कमकुवत मानतात आणि शारीरिकरित्या अपंग राहिल्यास त्यांना तिरस्काराने पाहण्यास सुरुवात करतात.  मी तुम्हाला अशाच एका मुलीची कहाणी सांगणार आहे, जिने शारीरिक आव्हान असताना समाजातील टोमणे खाल्ले, पचवले आणि एक दिवस इतकी मोठी झाली की तिने सर्वांचे तोंड बंद केले. ही त्या 3 फूट मुलीची कहाणी आहे जी समाजाचे टोमणे खाऊन आयएएस अधिकारी झाली. आज तिची राजस्थान मध्ये अजमेर ची नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
तिचे नाव आहे आरती डोगरा....! जिची उंची फक्त 3 फूट 6 इंच आहे. समाजाचं टोमणे खाऊन आयएएस अधिकारी बनलेल्या त्या 3 फूट मुलीची कहाणी जाणून घ्या.
    आरती डोगरा आज राजस्थान केडरची आयएएस अधिकारी आहे. आरती जरी शरीराने लहान असू शकते परंतु आज ती देशभरातील महिला आयएएसच्या प्रशासकीय वर्गामध्ये एक उदाहरण म्हणून उदयास आली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही आवडलेल्या समाजिक परिवर्तनासाठी त्यांनी अनेक मॉडेल्स सादर केल्या आहेत .
 आरती मूळची उत्तराखंडची.त्यांचा जन्म उत्तराखंडच्या देहराडून येथे झाला. आरती 2006 बॅचची आयएएस अधिकारी आहे. त्यांची उंची फक्त 3 फूट 6 इंच आहे, ज्यामुळे त्याला लहानपणापासूनच शारीरिक भेदभावाशी सामना करावा लागला. लोक तिच्या आईवडिलांना म्हणायाचे की अशी मुलगी एक ओझे आहे, आपण तिला का ठार मारून टाकत नाही?
तुम्ही समाजात अशी माणसे पाहिली असतील जे स्वत: काहीही करण्यास सक्षम नाहीत परंतु जर इतरांना हसण्याची गोष्ट असेल तर त्यामध्ये काही कमी पडत नाहीत. आरती बाबतही असेच घडले. समाजातील लोक तीच्यावर हसले, तीची खिल्ली उडवली आणि अगदी काही लोकांनी आई-वडिलांना सांगितले की ही मुलगी एक ओझे आहे, आपण तिला मारण्यापेक्षा तिची काळजी का घेत आहात, परंतु या सर्व गोष्टींपेक्षा आरतीचे पालक आपल्या बाळाची खूप काळजी घेत. त्यानी आपल्या मुलीला शिकवले आणि सक्षम केले की ती आज आयएएस अधिकारी बनली आहे.
आरतीने आपल्या कार्यकाळात उत्तम कामगिरी केली आहे. सध्या त्यांची राजस्थानमधील अजमेरच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. या अगोदर तिने एसडीएम अजमेर या पदावरही पोस्ट केले गेले आहे.
  आरतीने बुन्को बिकानो नावाची मोहीम सुरू केली.
याच बरोबर राजस्थानच्या बीकानेर आणि बूंदी जिल्ह्यातही त्यांनी जिल्हाधिकारीपदाची धुरा सांभाळली आहे. याआधीही तिने डिस्कॉमच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची धुरा सांभाळली आहे. बीकानेरचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी बँको बिकानो नावाची मोहीम सुरू केली. यामध्ये लोकांना उघड्यावर शौच करू नये यासाठी प्रेरित केले गेले. यासाठी प्रशासन सकाळी गावात जायचे आणि लोकांना उघड्यावर शौच करण्यापासून रोखत असे. गावातून पक्की शौचालये बांधली गेली.
मोबाईल सॉफ्टवेअरद्वारे त्याचे परीक्षण केले गेले. 195 ग्रामपंचायतीपर्यंत ही मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली. बुन्को बिकानोच्या यशानंतर जवळपासच्या भागातील जिल्ह्यांनीही ही पद्धत अवलंबली.
आरती डोगरा यांना अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.जोधपूर डिस्कॉमच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्त होणारी आरती ही पहिली महिला आयएएस अधिकारी होती.जोधपूर डिस्कॉममध्ये कचरा, वीज वाया जाणार्या कामकाज खर्चासाठी आरती डोगरा यांनी हे कार्यभार स्वीकारल्यानंतर सांगितले. दुर्गम भागात जिथे वीज नाही. तेथे वीज पुरवण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात आले. त्याशिवाय त्यांनी वीज बचत संदर्भात जोधपूर डिस्कॉममध्ये एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिस लिमिटेड (ईईएसएल) कडून 3 लाख 27 हजार 819 एलईडी बल्बचे वितरणही केले होते. ज्याने बर्‍याच प्रमाणात वीज वापरावर नियंत्रण ठेवले. त्यांचे बालपण स्वप्न होते की युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC) पास व्हायचेच. त्याचे वडील कर्नल राजेंद्र डोगरा सैन्यात अधिकारी आहेत आणि आई कुमकुम शाळेत प्राचार्य आहेत.
आरतीच्या जन्माच्या वेळी डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले की त्यांची मुलगी सामान्य शाळेत शिकू शकणार नाही. मग काय होतं? सोसायटीत राहणारे लोकही म्हणायला लागले की बाळ मुलगी असामान्य आहे. पण त्याच्या पालकांनी त्याला सामान्य शाळेत ठेवले. लोकांनी काय म्हटले तरीही त्यांच्या पालकांनी दुसर्‍या मुलाचा विचारही केला नाही.
ते म्हणाले की माझी एकुलती एक मुलगी आमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पुरेशी आहे. देहराडूनच्या वेलहॅम गर्ल्स स्कूलमध्ये आरतीचे शिक्षण झाले होते. त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्री राम कॉलेजमधून अर्थशास्त्र विषयात पदवी संपादन केली. यानंतर, यूपीएससी भारतीय प्रशासकीय सेवा केली.
डीएम आयएएस मनीषा यांनी प्रेरित केलेली आरती आयएएस अधिकारी झाली.त्यानंतर ती पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी पुन्हा देहराडूनला आली. येथे त्यांनी देहराडूनच्या डीएम आयएएस मनीषाची भेट घेतली. ज्याने त्यांची विचारसरणी पूर्णपणे बदलली. आरती त्यांच्याकडून इतकी प्रेरित झाली की त्यांच्यात आयएएसची आवड देखील वाढली. त्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम केले आणि आपल्या पहिल्या प्रयत्नात लेखी परीक्षा व मुलाखतीत ही तिने सर्वांना मागे टाकले. आरतीने हे सिद्ध केले की जग जे काही बोलते, काहीही विचार करते, आपण प्रत्येकाच्या विचारांना क्षमतेच्या किंमतीने बदलू शकतो.म्हणूनच म्हणतात मूर्ती छोटी पण किर्ती मोठी.
Attachments area

गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२०

निळ्या आकाशातील लाल तारा

 निळ्या आकाशातील लाल तारा

भारतीय स्वातंत्र्य चळवळीसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीत, तसेच गोवा मुक्ती संग्रामाच्या लढाईत त्यांनी जनजागृतीचे प्रचंड काम केले. एक कलाकार म्हणून आणि एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनही ते प्रत्येक आंदोलनात सहभागी होत असत. चलेजाव चळवळीच्या काळात वटेगावातही बर्डे गुरुजींच्या नेतृत्वाखाली अनेक घडामोडी सुरू होत्या. अण्णा भाऊ त्यात सामील असल्याने त्यांच्यावर वॉरंट निघाले. परिणामी त्यांनी कायमचे घर सोडले. पुढे त्यांना तत्त्वज्ञानाची, विचारांची एक दिशा मिळत गेली आणि त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ काम करायला सुरुवात केली. पक्ष कार्यासाठी झोकून दिलेले असतानाच १९४४ साली त्यांनी ’लाल बावटा’ या कला पथकाची स्थापना केली. या वेळी शाहीर अमर शेख,शाहीर गव्हाणकर हे देखील त्यांच्या सोबत असत. लोकगायनातून लोकप्रबोधन करीत असताना त्यांनी त्यांच्या अनुभव लिहायला सुरुवात केली. आणि अजरामर साहित्य निर्माण झाले.लावण्या, पोवाडे, पथनाट्ये म्हणजे त्यांच्या ललित साहित्याची पूर्वतयारी होती. त्यांनी एकूण सुमारे १५ वगनाट्ये लिहिली व त्यातूनच त्यांना देशभर प्रसिद्धी मिळत गेली.असंघटीत समाजाला आपल्या शाहिरीतून जागृत करणारा लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णभाऊ साठे म्हणजे निळ्या आकाशातील चमकता लाल तारा होता .
मुंबईत अण्णांच्या आयुष्याला १९४५ साली कलाटणी मिळाली. लोकयुद्ध साप्ताहिकात वार्ताहराचे काम करीत असताना त्यांनी अकलेची गोष्ट, खापर्या चोर, माझी मुंबई अशी गाजलेली लोकनाट्ये लिहिली.या काळातच संत साहित्यासह अनेक प्रतिभावंतांच्या अभिजात कलाकृती त्यांनी वाचून काढल्या. वैचारिक आणि कलाविषयक वाचनाची आवड असल्यामुळे त्यांना लेखन करायला खूप मेहनत करण्याची गरज पडली नाही. अण्णांभाऊचे लिखाण नेहमी कष्टकरी कामगार मजूर डोळ्या समोर ठेऊन होत होते.त्यातील नायक हा अन्याय अत्याचारा विरोध लढणार आणि जातिव्यवस्थे विरोधी बंड करून उठनाराच होता. त्याच्या प्रत्येक कथा,कांदबरया,वगनाट्य चा नायक हा सर्व सामान्य कुटुंबातून आलेला असल्यामुळे लोकंच्या,वाचकाच्या गळ्यातील ताईत बनत होता. 

भारत देश स्वतंत्र  झाल्याच्या १९५० ते १९६२ साल म्हणजे अण्णभाऊच्या साहित्य क्षेत्रातील सुवर्णकाळ होता. याच काळात त्यांच्या पुस्तकांच्या अनेक आवृत्ती निघाल्या. प्रचंड यशस्वी होत असताना त्यांचे स्वत:चे जीवन मात्र धकाधकीचे होत गेले. मुंबई सरकारने ’लाल बावटा’ या कला पथकावर बंदी घातली होती. पुढे तमाशावरही बंदी आली. त्यामुळे तमाशातील कलाकारांचे संसार देशोधडीला लागला. अण्णांभाऊनी तमाशाचे लोकनाट्यात रूपांतर करून तमाशा कलेचा उद्धार केला. तमाशाला लोकनाट्याचे वैभव मिळवून दिल्याने सरकारची बंदी कुचकामी ठरली.या सुवर्णकाळातच त्यांनी वैजयंता, माकडीचा माळ, चिखलातील कमळ, वारणेचा वाघ ,फकिरा अशा अनेक कादंबरया लिहिल्या. ३५ कांदंबरया लिहल्या त्यात ८ कांदबरीवर चित्रपट निर्माण झाले ते तुफान लोकप्रिर्य  झाले  १२ च्यावर कथासंग्रह लिहले त्यांनी स्टॅलिनग्राडचा पोवडा, महाराष्ट्राची परंपरा, मुंबईचा कामगार असे पोवाडेही लिहिले. निवडणुकीत घोटाळे, दुष्काळात तेरावा, अकलेची गोष्ट ही त्यांची वगनाट्ये प्रसिद्ध आहेत. दोनशे-अडीचशे गाणी, लावण्या त्यांनी लिहिल्या आहेत. कामगारांमध्ये त्यांची गाणी आणि लावण्या लोकप्रिय आहेत. मराठीतील ग्रामीण, प्रादेशिक, दलित साहित्यावर अण्णा भाऊंचे प्रभुत्व होते. अण्णा भाऊंच्या साहित्याचे हिंदी,गुजराती, उडीया, बंगाली, तमीळ, मल्याळी,अनेक भारतीय भाषांबरोबरच रशियन, झेक, पोलिश, इंग्रजी, फ्रेंच अशा जगातील २७ भाषांमधे भाषांतर झाले आहे. लेखणीचे हत्यार बनवून त्यांनी पुरोगामी, विज्ञाननिष्ठ, स्त्रीवादी, लढाऊ अविष्काराचा दीपस्तंभ मराठी साहित्याच्या क्षेत्रात उभा केला. एवढ्या मोठ्या कर्तृत्वामुळे त्यांना प्रसिद्धी मिळत होती. 
अण्णाभाऊ साठे जेव्हा मुंबईच्या ‘माटुंगा लेबर कॅम्प’ या मागासवर्गीय-शोषितांच्या वस्तीत कम्युनिस्ट चळवळीत कार्य करू लागले तेव्हा खर्‍या अर्थाने त्यांचे विचार क्रांतिकारक होऊ लागले. तत्कालीन लेबर कॅम्पमधील प्रमुख कम्युनिस्ट नेते/कार्यकर्ते आर.बी. मोरे, के.एम. साळवी, शंकर नारायण पगारे यांच्या सोबत ते कम्युनिस्ट पक्षाचे काम करू लागले. मार्क्‍सवादी विचारांच्या अभ्यासवर्गाला हजेरी लावू लागले. याच लेबर कॅम्पमध्ये ते पुन्हा धुळाक्षरे गिरवू लागले व लिहावयास लागले. त्यांनी पहिले गाणे लेबर कॅम्पमधील मच्छरावर लिहिले. याच लेबर कॅम्पमध्ये अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख व शाहीर द.ना. गव्हाणकर या त्रयींनी कम्युनिस्ट पक्षाच्या मार्गदर्शनाखाली लाल बावटा कलापथकाची १९४४ साली स्थापना केली आणि क्रांतिकारक शाहिरीचा बुलंद आवाज महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर पसरला होता.
अण्णाभाऊ च्या क्रांतिकारी विचारा पासुन मातंग समाज लांब आहे.उभे आयुष्य त्यांनी कम्यूनिस्ट चळवळीत घातले पण उच्च वर्णीय वर्गीय नेतृत्व करणाऱ्या या डाव्या कामगार चळवळी ने त्यांना मना पासून कधीच स्वीकारले नाही.शेवटी शेवटी अण्णाभाऊ नी भिमराव( बाबासाहेब )सांगितला पण त्यांच्या समाजाने आजही तो स्वीकारला नाही मातंग समाजाने कांग्रेस राष्टवादी नेतृत्व स्वीकारले पण आंबेडकरी नेतृत्व नाही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या स्थापने पासुन इतिहास तपासला तर कोणाचा विकास झाला.हे दिसून येईल. महामंडळाचा अध्यक्ष जेलची शिक्षा भोगणारा झाला. अनेक कार्यकर्ते त्याचं वाटेवर आहेत.ज्याने अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराची चळवळ उभी केली पाहिजे होती त्याने समाजाचे शोषण करणारी फळी उभी केली आणि समाजाला विकलांग बनविले अण्णाभाऊच्या जयंती दिनी व स्मुर्ती दिनी पूर्ण पण जाहिराती देवून राष्ट्रवादी ला मोठे केले. मातंग समाजाच्या तरुणांना आकर्षित केले. समाजाचा विकास व कल्याण करण्यासाठी असलेल्या महामंडळाचा राजकीय अड्डा बनविला.अण्णाभाऊ साठेचा वैचारिक वारसा सांगणारा तरुण घडविन्या ऐवजी राष्ट्रवादी मातंग कार्यकर्त्ता घडला.त्यामुळे आज सर्वच पक्षात मातंग आघाडी निर्माण झाली. तेच नेते समाजाला आंबेडकरी चळवळी पासुन चार हात लांब राहण्याचा सतत मार्ग दाखवितात.आणि स्वतःच्या जाती पुरते वेगळे आरक्षण मांगतात त्याकरिता आता आंदोलन तीव्र करून ते कोणा विरोधात कोणासाठी लढतात हाच मोठा प्रश्न त्यांच्या व इतर समाजा समोर आहे. त्यामुळे खेड्या पाड्यातील मातंग समाज शोषण मुक्त झाला नाही.गावांत किंवा शहरातील आण्णा भाऊसाठे नगरातील तरुण शिक्षण,आरोग्य आणि रोजगार या पासुन वंचित आहे.तो मोठ्या प्रमाणात देव,देवी,मरीआईच्या चक्रात अडकलेला असुन अज्ञान अंधश्रद्धा यातून तो मुक्त नाही. 

   पुर्थ्वीशेष नागाच्या फण्यावर नसुन असंघटीत कष्टकरी कामगारांच्या तळ हातावर तरळी आहे. हे आण्णाभाऊ साठे यांनी छातीठोक पणे सांगितले,लिहिले आणि गायिले. हे त्यांचा समाजच आज ही मान्य करीत नाही.म्हणुन अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्याचा अधिकार तो समाज गमावुन बसला. त्यांच्या विचारांची जयंती जो पर्यन्त होत नाही तो प्रयन्त मातंग समाजाचा शैक्षणिक,सामाजिक, आर्थिक विकास होणार नाही.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्य त्यांच्या क्रांतिकारी विचारांना आणि प्रतिमेला कोटी कोटी प्रणाम!. सर्व वाचकाना हार्दिक शुभेच्छा 

सागर रामभाऊ  तायडे~भांडुप मुंबई,9920403859.

असंघटित कामगारांचा नायक - अण्णाभाऊ साठे

 असंघटित कामगारांचा नायक - अण्णाभाऊ साठे 

अण्णाभाऊ साठे हे क्रांतिकारी विचार व व्यवहार आत्मसात केलेले महान साहित्यिक होते.त्यांची बांधिलकी या देशातील असंघटित कष्टकरी समाजाची जातीव्यवस्था व भांडवलशाहीने चालविलेल्या अमानुष शोषण विचारा विरोधी होती.म्हणून त्यांची लेखणी असंघटित कामगार वरील अन्याय करणाऱ्या सावकार,शेटजी,भटजी वर तलवारी सारखी चालायची. गोरगरीब वंचित मागासवर्गीय शोषित कष्टकरी कामगार मजुरांना कथा, कादंबऱ्यात नायक बनविण्याची त्यांची जाणीव आजच्या असंघटित कामगारांना व मातंग समाजाला त्यांचे शोषण करणाऱ्या नेत्यांना नाही.
अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी साजरी करतांना भांडवलदार विरोधात सतत लेखणीची तोप चालविणारा गोरगरीब वंचित मागासवर्गीय शोषित कष्टकरी कामगार मजुरांच्या शोषणा विरोधात प्राणपणाने लढणारा कॉम्रेड अण्णाभाऊ साठे गेल्या साठ वर्षात कॉग्रेस राष्ट्रवादी, भाजप शिवसेना यांनी मातंग समाजातील सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे सदस्य, नगरसेवक,आमदार आणि खासदार बनवून अण्णाभाऊ साठेचे क्रांतिकारी विचार गाडून त्यांच्या पुतळ्यात उभा केला आहे. ज्या भांडवलदारांच्या हितसंबंधावर अण्णाभाऊ आसूड ओडत होते तेच भांडवलंदारांचे चमचे,दलाल आणि एजंट असंघटित कामगार,मजूर मातंग समाजांचे मेळावे भरविण्यासाठी पैसा पुरवू लागले. नेते असंघटित कामगार मजुरांच्या अज्ञानाचा फायदा घेत आहेत. मातंग समाजातील असंघटित कामगार मजुरांची व्होट बँक बनविण्यासाठी स्वार्थी पुढारी नेते अण्णाभाऊ साठे यांचे क्रांतिकारी विचार ,प्रतिक विकृतीकरण करून वापरत आहेत.
अण्णाभाऊ तुम्ही डफावर थाप मारली आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे मानकरी ठरतात. लाल बावटा कला पथकातून गोरगरीब वंचित मागासवर्गीय शोषित कष्टकरी कामगार मजुरांच्या श्रमावर अनेक कवने लिहली.त्यां कष्टकरी समाजाला स्वाभिमानाने लढण्याची प्रेरणा दिली. आज मातंग समाजातील अनेक नेते काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप शिवसेना यांचे प्रतिनिधी म्हणून सरपंच ,पंचायत समिती, जिल्हा परिषद, सदस्य, नगरसेवक, आमदार आणि मंत्री झाले पण त्यांची लायकी फक्त मुजरा घालण्या एवढीच राहिली. काँग्रेस पक्षाच्या राजपुत्रांचे जोडे उचलणारा गृहमंत्री गेल्या पन्नास वर्षात झाला नसेल.कॅबिनेट मंत्री असुनही त्यांच्या खात्याचा पैसा वापरण्याचा अधिकार ज्यांना नाही त्या विरोधात पक्षाच्या बैठकीत किंवा मंत्रिमंडळाच्या मिटिंग मध्ये बोलण्याची हिंमत त्यांच्यात नाही त्यांना आपण अण्णाभाऊचे अनुयायी, शिष्य कसे म्हणायचे?. हे सांगण्याचे लिहण्याचे धाडस त्यांच्यात नाही ते बेशरम पणे आंबेडकरी चळवळीतील विचारपीठा वर सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आपल्याला कशी वागणुक ते जाहीरपणे मांडतात.हे अण्णाभाऊ साठे यांचे क्रांतिकारी विचार समाजाला कसे सांगतील?.
   डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणा नंतर अण्णाभाऊ साठेनी आंबेडकरी चळवळीतील कष्टकरी समाजाचे नेतृत्व आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट चळवळीचे नेतृत्व करणाऱ्यांचा समनव्य घडवून आणण्यासाठी व ब्राम्हणी शक्तीला उलथवून टाकण्यासाठी गोरगरीब वंचित मागासवर्गीय शोषित कष्टकरी कामगार मजुरांना हाक देतात.  "एकजुटीच्या ह्या रथावरती !. आरूढ होऊन चल बा पुढती!. मिळून महाराष्ट्र बा जगती!. करी प्रकाश निजनांव!. जग बदल घालुनी घाव!. सांगुनी गेले मज भिमराव!."  हे आजही मातंग समाजाला एकूण गोरगरीब वंचित मागासवर्गीय शोषित कष्टकरी कामगार मजुरांना माहिती नाही.
मातंग समाजाच्या सुशिक्षित लोकांना कार्यकर्ते,नेते यांना माहिती नसेल असे समजणे चुकीचे ठरेल. अन्यता हे हा सर्व समाज मोठ्या संख्येने अण्णाभाऊच्या विचारांची प्रेरणा घेऊन कम्युनिस्टाकडे गेला असता.किंवा आंबेडकरी विचारांच्या चळवळीत विलीन झाला असता. पण ज्या अर्थी मातंग समाज मोठ्या संख्येने कॉग्रेस, राष्ट्रवादी, भाजप शिवसेनेकडे गेला त्या अर्थी त्यांचा मानसिक लाचार गुलामांची फौज झाला असे म्हणतात.कारण क्रांतिकारी विचारांच्या नेत्यांचे अनुयायी शिष्य क्रांतिकारी विचारांच्या संघटना चळवळीत सहभागी होत असतात. सर्वच गोरगरीब वंचित मागासवर्गीय शोषित कष्टकरी कामगार मजुरांचे नेतृत्व करणारे कार्यकर्ते नेते लाचार,दलाल,एजंट झाले आहेत. जे स्वाभिमानी आहेत ते स्वबळावर आज ही मनुवादी हिंदुत्ववादी ब्राम्हणशाही भांडवलशाही विरोधात  वैचारिक आणि रस्त्यावर संघर्ष करतात. 
 कारण बळी शेळ्या,मेंढ्या कोंबड्याचा दिला जातो वाघाचा नाही.मातंग समाज आंबेडकरी विचारांच्या चळवळीकडे वळला असता तर तो बौद्ध धम्मात जुळल्या गेला असता. त्यांचे जगाशी नाते जुळले असते.तो कम्युनिस्ट विचारांकडे झुकला असतात तर कष्टकरी कामगार म्हणुन जागतिक पातळीवर नोंद झाली असते.कारण अण्णाभाऊ साठे जागतिक पातळीवर कष्टकरी कामगारांना जागरूक, प्रबोधन करणारा कुशल नेता लोकशाहीर म्हणून ओळख निर्माण झाली होती.
भाजप सेने कडे गेलेला मातंग चर्मकार समाज आंबेडकरी विचारांचा व बौद्ध धम्माचा विरोधक कट्टरपंथी हिंदुत्ववादी झाला.त्यांना सरपंच ,पंचायत समिती, जिल्हा परिषद, सदस्य, नगरसेवक, आमदार आणि मंत्री बनविले,काहींना महामंडळाचे अध्यक्ष पद दिले. दुसरीकडे जातीव्यवस्था वर्णव्यवस्था नुसार त्यांना ब्राम्हणांच्या पुढे मंत्री असूनही लोटांगण घालण्यास भाग पाडले.(माजी सर संघचालक बाळासाहेब देवरस समोर कांबळे नांवाच्या राज्यमंत्र्यांना धर्मानुसार लोटांगण घालावं लागले हा इतिहास वाचा) 
      मातंग चर्मकार नेत्यांनी जातीची व्होट बँक बनवून कधी सेनेला तर कधी भाजपला सत्ताधारी बनविले त्यामुळे काही बोटावर मोजता येतील एवढ्या नेत्यांचा आर्थिक विकास झाला असेल.तरी त्यांची जात व लायकी कोणताही समाज विसरत नाही. शिवसेनेचे आमदार उपनेते माजी सामाजिक न्याय मंत्री बबनराव घोलप यांच्या गांवात त्यांना कशी शिवीगाळ मारहाण झाली हे गेल्या महिन्यातले ताजे उदाहरण आहे. 
महाराष्ट्रातील मांगवाडे आज ही भकास आहेत तर शहरातील अण्णाभाऊ साठे, लहुजी नगर मध्ये राहणारा समाज लसुण विकणारा,प्लास्टिक,जुने कपडे गोळा करून विकण्याचे काम करून पोट भरतो आहे.काही सफाई कामगार म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कामे करतात. ग्रामीण भागात आठवडी बाजारात म्हातारे माणसं दोरखंड, सूप,टारले, विकत आहेत,मांगवाड्यात अंधार आहे,पोरं फाटक्या कपड्यात शाळा सोडून येत आहेत. तरुण डफली वाजविण्यात त्यांच्या बेंजो पार्ट्या बनवुन लग्नात राजे,प्रधानाचा पोशाख घालून मिरवीत आहेत.जुगार व दारू हे मांग महारांच्या (सॉरी राजवाडे,बौद्ध वाड्या) पाचवीलाच पुजले आहे.हे भीषण सत्य अण्णाभाऊ साठेनी त्यांच्या कथा, कादंबऱ्यात प्रखरपणे मांडले.हे सत्य आज समाज स्वीकारण्यास तयार नाही. सुधारण्यासाठी प्रयन करणे आवश्यक असतांना राजकिय पक्षांची पोट भरण्यासाठी लाचारी कार्यकर्त्यांनी नेत्यांनी पत्करली असल्यामुळे समाज सुद्धा अपंग बनत चालला आहे. समजाचा विकास आणि कल्याण करण्यासाठी अण्णाभाऊ साठे महामंडळ स्थापन झाले होते. आज पर्यंत किती निधी आला आणि कोणाचा विकास,समाज कल्याण झाले.कोणताही पक्ष हिशेब मागू शकत नाही.एक रमेश कदम एक संचालक जेल मध्ये गेला बाकीच्यांचे काय?.
अण्णाभाऊ साठे यांचे विपुल साहित्य आहे. ३२  कादंबऱ्या,३५ कथा संग्रह मी वाचल्या आहेत. कॉम्रेड शरद पाटील,विजय सातपुते यांनी वाचण्यास भाग पाडले.असंघटीत कष्टकरी कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढायचे असेल तर अभ्यास वाचन खूप महत्वाचे आहे.त्यामुळे चिराग नगरची भुते माझा मनावर कोरली आहेत.कारण चर्चगेट ते विरार आणि कुलाबा गीता नगर ते कर्जत,कसारा रेल्वे स्टेशन जवळचे नाके व नाक्यावर उभा राहणारा असंघटित कामगार आणि प्रत्येक शहरातील चौकात कामाच्या शोधात उभा राहणार असंघटित कामगार हा चिराग नगरांच्या भुता पेक्षा सुतभर ही वेगळा नाही.
अण्णाभाऊ साठे हे मार्क्सवादी कम्युनिस्ट विचारांचे शाहीर होते.तसेच ते लोकशाहीर म्हणूनही जग प्रसिद्ध होते.अण्णाभाऊ जातीने मांग असल्यामुळे त्यांच्या साहित्याची दखल घेतल्या गेली नाही.कामगार मजुरांच्या प्रत्येक जन आंदोलनात,संघर्षात त्यांचे गाणे कवने,वगनाट्य,लावणी होत असल्यामुळे त्यांना लोकशाहीर म्हणून विशेष महत्व होते.
कम्युनिस्ट चळवळी ते वाढले व त्यांच्या सोबत लढले ते ब्राम्हणी जातिव्यवस्था वर्णव्यवस्था मानणारे होते.त्यांनी अण्णाभाऊ साठेनां विमानाने रशियाला नेले परंतु उच्च जाती वर्चस्व असलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात आल्या नंतर अण्णाभाऊ नां अन्नाला मोहताज केले.एवढा मोठा महान क्रांतिकारक साहित्यिक शेवटी भाकर भाकर करून बाजेवर मुत्यु मुखी पडला असा इतिहास वाचून जातीव्यवस्थेची प्रचंड चीड येते.
ब्राम्हणी लावणीला ज्यांनी ज्यांनी तडा देऊन विद्या विशेष कौशल्य संपादन केली त्या सर्वांचा मुत्यु अटळ होता.शंभूक,एकलव्य आणि अण्णाभाऊ (म्हणजेच महार,आदिवासी, मांग) यांच्या मुत्युचा इतिहास भूगोल प्रत्येक जातीच्या माणसांना माहिती असला पाहिजे. मातंग समाजाचे राजकीय मेळावे भरवत असतांना स्मृतिदिन,जयंतीनिमित्त कार्यक्रम घेतांना त्यांनी जातीव्यवस्थे विरोधात जो संघर्ष केला त्यांचे प्रबोधन आजच्या पिढीला करून देणे ही काळाची गरज आहे.
   अण्णाभाऊ साहित्यिक व कॉम्रेड म्हणून प्रसिद्ध होते, पण त्यांनी जातीअंताची लढाई करून जातिव्यवस्थेचे डोकेच कायमचे कापुन काढलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकरापुढे नतमस्तक झाले. जातिव्यवस्था विरोधी प्रबोधनाच्या आघाडीत पुढे आले. अण्णाभाऊ च्या प्रत्येक कथा, कादंबऱ्यात हा संघर्ष त्यांनी जिवंत पणे मांडला आहे. ते वाचून माणूस पेटून उठलाच पाहिजे.एवढे प्रचंड शब्द भंडार त्यांच्या साहित्यात आहे. मातंग समाजातील तरुणांनी कार्यकर्त्यांनी नेत्यांनी ते वाचून त्या पासून प्रेरणा घ्यावी, म्हणून आम्ही म्हणतो अण्णाभाऊ साठे म्हणजे असंघटित कष्टकरी कामगार मजुरांचा खरा नायक. ज्यांनी जगातील विचारवंतांना (विशेष मनुवाद्यांना ) ठासून सांगितले की पुथ्वी शेष नागाच्या फण्यावर तरली नसुन कष्टकरी कामगारांच्या तळहातावर तरली आहे.त्यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० ला, आणि मुत्यु १८ जुलै १९६९ ला झाला.१ ऑगस्ट २०२० एक शतक पूर्ण होत आहे. या शताब्दी वर्षात आपण काय प्रेरणा घेतली. यांचे वस्तीपातळीवर आत्मपरीक्षण झाले पाहिजे, कारण निसर्गाचा नियम जे पेरले तेच उगवणार,आणि विहिरीत नसेल तर पोहऱ्यात कुठं येईल.अण्णाभाऊ साठे यांच्या क्रांतिकारी विचारांना व प्रतिमेला त्रिवार वंदन 
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९, भांडुप मुंबई,
(अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना)
संलग्न स्वतंत्र मजदूर युनियन (ILU)

कोरोना सकारात्मक विचाराने मन प्रसन्न ठेवा.

 कोरोना सकारात्मक विचाराने मन प्रसन्न ठेवा.

कोरोनाने माणसांच्या मनावर आघात केला, माणसांचे मन अस्वस्थ झाले की ते लवकर स्थिर होत नाही. लॉक डाऊन मुळे सर्व कामधंदे सर्वच कार्यालय बंद असल्यामुळे कोणीच समाधानी नाही. माणूस हा कधीच समाधानी नसतो. चांगल्या पगाराची उच्च पदस्थ नोकरी, कार्यालयात मान सन्मान नेहमीच आदेश देण्याची सवय मी दिलेला निर्णय सर्वांनी मान्य केलाच पाहिजे असे वागणे. अधिकारी असल्यामुळे सर्व कार्यालयीन कामगार कर्मचारी माझ्या शब्दाच्या बाहेर नाहीत यांचा कायम त्याला गर्व असतो.त्यामुळेच माझे मन कार्यालयात प्रसन्न असते.त्यांचे समाधान घरी गेल्यावर संपते.कारण मी घरात प्रवेश केला की मी आदेश देणारा अधिकारी नसतो. कुटुंबातील एक सदस्य होतो. हा सकारात्मक विचार केल्यामुळेच आनंदीत असतो.तसेच प्रत्येक माणसाने कामगार, कर्मचारी अधिकारी यांनी सकारात्मक विचाराने मन प्रसन्न  ठेवले तर सर्वच कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाल्या शिवाय राहणार नाही.
आज काल घरी प्रसन्न मनाने घरी जाणार कामगार, कर्मचारी ,अधिकारी जातांना दिसत नाही. कारण गेली चार महिने तो घराच्या बाहेर गेलाच नाही, बाहेर फिरण्यास बंदी घातली आहे. बिनकामाचे जाऊ शकत नाही.गेलाच तर पोलीस प्रसाद देण्यासाठी तयार आहेत. चार महिन्या अगोदर लवकर घरी जाण्याची इच्छा मेलेली होती.चांगला टू बी एच के प्लॉट आहे,टू व्हीलर, फोर व्हीलर गाडी आहे.आर्थिक परिस्थिती उत्तम आहे. तरी घरी जाऊन बायको मुलामुलींच्या सहवासात राहण्याची व्यवस्था राहिली नव्हती. घरात कोणीच पाहिजे त्याप्रमाणात सुखी नव्हते. दुःख,वेदना, चिंता काही प्रमाणात मनात घर करून ठेवल्या होत्या. त्या दूर करण्यासाठी सकारात्मक विचारांचा स्वीकार केल्यास नव्यान्नव टक्के चिंता पळुन जातात.
शारीरिक वेदनांना विचारांपासुन तोडलं की चिंता पळुन जाते! मानसिकता वेदना देणाऱ्या घटना मनातुन काढून टाकल्या तर चिंता पाठलाग करत नाही. त्यासाठी भुतकाळात घुटमळणे बंद केले पाहिजे. माणसात,समाजात वावरताना कोणत्याही प्रकारच्या घटना डोक्यात येणार नाहीत. आणि रिकामे बसले तर आपल्या डोक्यात उगाच चक्र सुरु असते, ते एक नसते त्यांची मोठी लिंक लागते.मग त्यातुन बाहेर येणे अशक्य होते. दहा वर्षांपुर्वी मी चांगला अभ्यास केला असता, तर आज मी ही खुप मोठ्ठा ऑफीसर राहीलो असतो. चांगली बायको मिळाली असती तर सात वर्षांपुर्वी मी प्लॉट घेतला असता.आईवडीलांचे ऐकले असते तर तेव्हाच प्लॉट घ्यायला हवा होता, तेव्हा मी सुवर्णसंधी सोडली. त्यावेळी मी त्यांच्याशी आईवडीलांशी असे वागायला नको होते! खुप वाईट आहे मी!.कोरोनाने सर्वांना जवळ आणले.
आज मी चांगल्या पगारावर काम करतो, पण मनाला समाधान नाही, तेव्हा कमी पगारात कुटुंबात सुखी समाधानी होतो.मी असे नव्हते करायला पाहीजे. व्हायच्या त्या घटना घडुन गेल्या, टाईममशीनमध्ये जाऊन ते काही बदलता येणार नाही, तेव्हा आता त्यावर विचार करुन फक्त आणि फक्त, आपली बहुमुल्य उर्जा, फालतुमध्ये खर्च करतो, त्यापेक्षा भुतकाळातल्या त्या सर्व चांगल्या वाईट घटना विसरुन गेले पाहिजे. त्यासाठी सकारात्मक ऊर्जा देणारे विचार करणे आवश्यक आहे. 
कोरोनाने सर्वांना विचार करण्यास भाग पाडले. नकारात्मक विचार पळविले तर सकारत्मक विचार येतात आणि जगण्याची प्रेरणा देतात.
कोरोनानेच दुःखी आहेत काय?. महागाई, बेरोजगारी,भ्रष्टाचार,नोटबंदी हे ही करणे होतीच नां!.
इथे प्रत्येक जण दुःखी आहे.आणि बहुतेक दुःखांच मुळ हे तुलनेत असते.प्रत्येकाशी तुलना करीत राहिलो तर हया जगात प्रत्येक गोष्ट,घटना वेगवेगळी असते. त्यांची तुलना सकारात्मक विचाराने केली तर पुढच्या घटना घडनार नाहीत.आणि नकारात्मक विचाराने विचार केला तर न घडणाऱ्या घटना घडविल्या जातील. घरात कार्यालयात किंवा एसटी, रेल्वे प्रवासात धक्का लागला, बसायला जागा उपलब्ध नाही.त्यामुळे होणारी चिडचिड घरातुन कार्यालया पर्यत कार्यालयातुन घरा पर्यत मनातील भावना वेदनेत रूपांतर होते. प्रत्येक वस्तू कडे पाहण्याचा दृष्टीकोन बदली होतो. जे जिथे घडले तिथेच सोडून आले तर निश्चितच आनंदी वातावरणात आपण राहू शकतो आणि दुसऱ्याला ठेऊ शकतो. प्रत्येक व्यक्तीचा चेहरा एक दुसर्‍यापासुन वेगळा आहे, म्हणुन ह्या जगातली प्रत्येक व्यक्ती सर्वच बाबतीने वेगळा असु शकतो. कोरोनाने कोण सुखी व कोण दुःखी आहे.नोकरी करणारा,व्यवसाय करणारा,सोने चांदीचे दुकान असणारा आणि केस कापणारा नाव्ही सलून,ब्युटी पॉलर वाले दुकानदार,रेल्वे बंद असल्यामुळे स्टेशनवर बूट पॉलिश व हमाली करून जगणारे कसे असतील. सकारत्मक विचार केला तर आपण खुप सुखी आहोत,आणि नकारात्मक विचार केला तर त्यांच्या पेक्षा ही दुःखी...????.
   आयुष्य कशासाठी आहे यांचे प्रत्येकांनी उत्तर शोधले पाहिजे. आयुष्य निसर्गाने आपल्याला दिलेली अनमोल भेट आहे, आयुष्य सतत आनंदी राहण्यासाठी आहे, आयुष्य उत्साहाने भरभरुन जगण्यासाठी आहे, आयुष्य भव्यदिव्य स्वप्नं बघण्यासाठी आणि ती स्वप्ने मनमुरादपणे जगण्यासाठी आहे, आयुष्य आपल्या आणि इतरांच्या चेहर्‍यावर हसु फुलवण्यासाठी आहे. जीवनाचा प्रत्येक क्षण निष्पापपणे बागडण्यासाठी आहे, मनातले सर्व अपराधी भाव, भुतकाळ-भविष्यकाळ, काल्पनिक जबाबदार्‍यांचे ओझे, सगळे सगळे फेकुन द्या, मनमोकळे व्हा, प्रत्येक क्षणाला, निरापराध वृत्तीने, निरागसपणे निःपक्षपातीपणे सामोरे जा!. कधी होईल हे ?. सकारात्मक विचाराने मन प्रसन्न ठेवले तर. कोरोना आला नी गेला आपण जगलो तर भरपुर काही तरी करू शकतो. नकारात्मक विचार केला तर दुःख आणि दुःखी मागे मागेच फिरेल.
      माणसाला तीन गोष्टी जास्त त्रास देतात, प्रत्येक दुःखाच्या मुळाशी ह्या तीन गोष्टी सापडतील, अपेक्षा, अपुर्ण स्वप्ने, ध्येयप्राप्ती नंतर येणारा रिक्तपणा!
खुप वेळा आपण ऊसकी कमीज मेरे कमीजसे सफेद कैसी ! याच विचारात असतो. तो कसा सुखी आहे, ती कशी मस्त जगते, त्याच आयुष्य आरामशीर आहे, माझ्याकडे हे का नाही, या अपेक्षेने, तुलनेने दु:खी होत राहतो. तारक मेहता का उलटा चष्मा संपूर्ण कुटुंब एकत्र बसुन पाहत असते. पोपटलालचे पात्र किती गंमतीशीर आहे. समजा,एखाद्याचे लग्न होत नाही, तेव्हा तो किती परेशान असतो, उठता-बसताना, जेवताना, झोपताना एकच ध्यास असतो, लग्न-लग्न-लग्न! नकळत हाच विचार, चिंता बनुन, त्याच्या आत्म्याला डाचु लागतो, त्याच्या दुःखाचं कारण बनतं, मग हास्य गायब होतं, चित्त थार्‍यावर राहत नाही, चिडचिड वाढते. स्वप्नप्राप्तीकडे रोज वाटचाल करायची पण मनावर जखम न होवु देता!, ह्याला म्हणतात, सुखी जीवन! म्हणूनच सकारात्मक विचाराने मन प्रसन्न ठेवा.संकट 
येतात आणि जातात.धरून बसु नका!.
माणसाचा स्वभाव आहे जे मिळते त्यात तो समाधान मानत नाही.जे मिळत नाही त्यांची नेहमी अपेक्षा करत असतो. तेव्हा तो समाधानी नसतो पण जेव्हा मिळतो तेव्हा समाधानी असतो काय?. आणि समजा, एके दिवशी लग्न झालेच, प्रत्येकाचे होतच असते, मग अचानक आयुष्यातले थ्रील खतम! पुन्हा सप्पक आयुष्य सुरु, जॉब लागु दे, जॉब लागु दे म्हणुन तळमळलो, आणि जॉब लागला, आता थोड्याच वर्षात त्या जॉबचा कंटाळा यायला लागतो, एक प्रकारचा रिक्तपणा येतो.आयुष्य कशासाठी? जीवनाचा निर्भेळ आनंद घेण्यासाठी, मनाच्या आकाशात हे उत्तर जेव्हा गवसेल, तेव्हा नैराश्य, उदासीनता जवळपास फटकणार पण नाहीत!.तेव्हा सकारात्मक विचाराने मन प्रसन्न ठेवा.
 सेवा करणार्‍याला आत्मिक समाधान मिळते. बघा! किती मजेशीर आहे हे,अगरबत्ती स्वतः हवेत विरुन जाते, पण वातावरणात एक प्रसन्न सुगंध पसरवते, दिव्याची वात स्वतः नष्ट होते, पण तेजाने घर उजळुन टाकते.काहीतरी बनण्यासाठी, काहीतरी प्राप्त करण्यासाठी आपण सकाळ संध्याकाळ धावत असतो, पण खरे समाधान कुठे आहे? 
आपल्यात असलेल्या गुणांचा, शक्तीचा वापर आजुबाजुच्यांना, नातेवाईकांना, मित्रांना, अगदी अनोळखी लोकांना सुखी, आनंदी बनवण्यासाठी प्रयत्न करणार्‍यांचं जीवन खरं सार्थ झाले असं म्हणता येईल. म्हणूनच सकारात्मक विचाराने मन प्रसन्न ठेवा.
सकारत्मक विचारांची ऊर्जा आणि नकारात्मक विचारांची ऊर्जा कशी निर्माण होते यांची माहिती मला रविंद्र सूर्यवंशी यांनी प्राणिक हेअलिंग मिशन 
ची माहिती दिल्यामुळे माझावर मोठा परिणाम झाला. सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार त्यांच्यातून होणारी ऊर्जा कुटुंबावर समाजावर कसा 
परिणाम करते यांची गांभीर्याने चर्चा केली. तेव्हा पासुन माझ्यात खुप बदल झाला. एक तर नकारात्मक विचार करणे,लिहणे सोडून दिले. आपण ही प्राणिक हेअलिंग मिशन समजून घ्यावी. प्रत्येकाने सकारात्मक विचाराने मन प्रसन्न ठेवावे.कोरोना कोरोना आला आणि गेला.आता पुढे काय?.

सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९.भांडुप मुंबई

आईबापाची लाडकी लेक!.

 आईबापाची लाडकी लेक!.

जग झपाट्याने बदलत आहे.विज्ञानाच्या प्रगतीने माणसाची प्रगती होत आहे.पण नीतिमत्ता म्हणजे काय ?. हे आजच्या तरुण तरुणीनी स्मार्टफोन किंवा गुगल वर सर्च केल्यास त्यांना ती मिळणार नाही. सुशिक्षित तरुण तरुणीची इच्छा मना सारखा जोडीदार नवरा मिळावा हीच अपेक्षा असते. पण त्यात इतर पात्र नसावे.ज्या आई वडिलांनी मुलांना लहानाचे मोठे केले ते प्रथम दोघांच्या जीवनातून हद्दपार झाले पाहिजे.ही आईबापाची लाडकी लेक म्हणते!.
मानवतावादी धर्म संस्कार आता कुठे राहिले नाहीत. घोर कलियुग आला, 
मुलगा बापाला संपत्तीत वाटा मागतो.नाही दिला तर कोर्टात खेचतो.
लोकशाहीर दादा कोंडके यांची आठवण येते. 
त्यांचे
 प्रत्येक चित्रपट आणि त्यातील गाणे समाजाचे प्रबोधन करणारे.जनजागृती करून मोठा संदेश देणारे होते. गेल्या वर्षात सुशिक्षित व सुरक्षित नोकरी करणाऱ्या मुलाने प्लॉट साठी आईवडीलाचा नारळ पाण्यात विष घालून मारल्याची घटना घडली होती.
मातृसत्ताक व्यवस्था संपली आणि पुरुषसत्ताक व्यवस्था आली.त्यामुळे एकत्र कुटुंब व्यवस्था संपली,आणि विभक्त कुटुंब व्यवस्था आली.पूर्वी पाचभाऊ लग्न झाल्या वर भी नातवाचे लग्न होई पर्यंत एकत्र राहत होती. पण कधीच भावा भावांचे किंवा जाऊ जाऊचे, देराणी,जेठाणीचे कधी भांडण होत नव्हती. बोलचाल झाली तरी दोनतासानी सर्व विसरून सर्व कुटुंबातील लोक एकत्र येत असत, अबोला कधी कोणीच धरत नसत. पुरुषांचा महिलांवर आणि महिलांचा पुरुषावर शंभर टक्के विश्वास होता. आर्थिक व्यवहारात महिला कधीच बोलत नसत.त्यामुळे महिला मध्ये आपल्या कुटुंबातील सर्व बद्दल सारखे प्रेम, आदर आणि जिव्हाळा होता.आताच्या मुली सुशिक्षित झाल्या पण कुटुंबातील नवरा सोडून कोणा बद्दल प्रेम,आदर जिव्हाळा राहिला नाही, कारण ती आईबापाची लाडकी लेक असते.
   आजच्या दूरदर्शन वाहिन्या वरील उच्चभु वर्गातील घरातील घडणाऱ्या घटना म्हणजे आजच्या सिरीयल त्याला जबाबदार आहेत. त्यांचा गंभीर परिणाम मध्यमवर्गीय मागासवर्गीय समाजावर मोठ्या प्रमाणात होत आहे. असे म्हटल्यास चुक ठरणार नाही.मागासवर्गीय समाजातील बहुसंख्य लोक ग्रामीण भाग सोडुन शहरी भागात आले चांगली नोकरी मिळाली त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारली म्हणूनच ते मध्यमवर्गीय झाले.
शिक्षण आणि विज्ञान यांच्यामुळे सर्वाचाच विकास होत असतांना काही लोक अजूनही देवा देविकाच्या उपास, तापास, नवस याला महत्व देतात.एकच वेळी विज्ञानाचा भरपूर वापर करून फायदा घायचा आणि अज्ञान अंधश्रद्धा याला चिटकून राहायचे त्यामुळे ते खुप पुढे गेले असे म्हणता येत नाही आणि खुप मागे राहिले असे ही म्हणता येत नाही.
  गांव असो अथवा शहर बहुसंख्य कुटुंबात मुलामुलीचा संसार सुखात नाही.मुला मुलीच्या लग्न झाल्यावर अनेक तक्रारी वाढत चालल्यामुळे एकत्र कुटुंब पद्धत नष्ट होत चालली आहे. मुलीला नवरा हवा पण सासु सासरे नको !. हे एकमेव कारण अनेक कुटुंबात ठरत आहे.
मुलगी वयात आली तर मुलीचे योग्य त्यावेळात लग्न न होणे ही गंभीर समस्या निर्माण होते.मुलींच्या योग्य त्या वयात लग्न न करण्याची कारण शोधली तर आई वडिलांचा एकत्र कुटुंब पद्धतीला असलेला विरोध.आईबापाची लाडकी लेक मग तेच डोक्यात घेऊन बसते. 
आम्ही कसे सर्व पासुन वेगळे राहतो असेच मुलीने राहिले पाहिजे त्यातूनच मुलांना विचारले जाणारे प्रश्न मुलीच्या डोक्यात बसतात. यातच मग मुलीच्या भावना व तारुण्य जळत राहते.मुलाची योग्य तपासणी करून चौकशी करा. मुलाचे शिक्षण किती?.नोकरी कोणती करतो, कुठे कामावर आहे?. किती रुपये पगार आहे?. रहायला स्वतःचा प्लॉट आहे का?. कार आहे का?. बॅक बॅलन्स किती आहे?. मुलगा एकुलता एक आहे का?. ही माहिती मिळायलाच हवी.पण सरकारी नोकरी पाहिजेच?. मग बीजनेस वाले काय करणार?. कंपनीच्या बॉसची मुलगी नाही देणार?. कारण त्याला नोकरी नसते. पण त्यांचं कंपनीत नोकरी करणाऱ्या सोबत मुलगीच लग्न लावून देनार!. कारण त्याला नोकरी असते.
आई वडिलांच्या या अपेक्षा पूर्ण होत नाही.त्यामुळे मुलीचे लग्न जुळत नाही,दरवर्षी त्या मुलीच वय वाढत जाते. शरीरात मोठा किंवा वेगळा बदल होतो.तुमच्या अपेक्षा पूर्ण होईनात म्हणून मुलींच बावीसव्या वर्षी सुरू केलेलं वर संशोधन आठ दहा वर्षे चालते.अति अपेक्षा ठेवून मुलींच्या आयुष्याचे वाटोळे अनेक पालका कडून होत आहे. आई वडिलांवर विश्वास ठेवला तर लग्न होऊ शकतात. मुलाला सुरवातीला जरी कमी पगार वाटत असला तरी लग्न झाल्यावर मुलामुलींना नवीन उमेद येते. परिस्थिती सुधारण्यासाठी दोघे मिळुन जीवतोड मेहनत करू शकतात. त्यासाठी सरकारी नोकरी असलीच पाहिजे असे नाही.तर एकमेकांच्या साथीने आर्थिक अडचणींवर मात करू शकतात. मुलांचे आई-वडिलही त्यांच्या पाठीशी असतातच. मुला-मुलींना कुणी त्रास सहन करण्यासाठी वाऱ्यावर सोडलेले नसते, याची जाणीव मुलींच्या आई-वडिलांनाही असने आवश्यक आहे. मुलगा मुलगी समानतेच्या युगात तुम्हीही थोडे जावई व मुलीच्या पाठीशी राहिले पाहिजे. म्हणुन मुलामुलींची लग्ने योग्य वयातच झाली पाहिजेत.हा भावनांचा,तारुण्याचा विचार प्रत्येक आई वडिलांनी केला पाहिजे. आयुष्यभर पैसा येईल पण एकदा गेलेले वय व तारुण्य पुन्हा येणार नाही.
वधु वर सुचक मंडळ चालविणाऱ्या मित्रांनी सांगितलेल्या अनुभवाच्या हया कथा आहेत. 
एक सेवानिवृत्त झालेल्या मुलीचा बाप बायोडाटा दाखवीत होता त्याच्या मुलीच वय ३४ होते. निवृत्ती आगोदर लग्न का नाही झाले?. आता तुम्ही सांगा का थांबलाय होता हा बाप?. कसला वर पाहत होता हा बाप.आपल्या सारखी नोकरीवालाच मुलगा पाहिजे,जर तुम्ही अभिषेक बच्चन सारखा वर शोधत असाल तर तुमची मुलगी ऐश्वर्य रॉय हवीच नां?.
सिनेमा व टीव्ही चॅनल वरील सरीयल यांच्या खूपच कुप्रबोधनामुळे मुलीचे योग्य वेळेत लग्न होत नाही. आणि झालेच तर तिच्या शारीरिक,मानसिक स्वभावात फरक पडतो.ती चिडखोर व बंडखोर बनते मुलगी लग्न झाल्यावर पूर्ण स्त्री बनते.मग अश्या स्रिया एकत्र कुटुंबातील सर्वाना शत्रु समजतात, छोट्या छोट्या कारण वरून वाद विविध, अबोला,भांडण होतात.त्यामुळे एकत्र कुटुंब विभक्त होते. रक्ताची नाते असले लहानाचे मोठे एकत्र झालेले भाऊ एकमेकांना शत्रु समजतात. एका स्त्री मुळेच रामायण आणि महाभारत घडले हा ऐतिहासिक इतिहास आहे.
म्हणुन अविचारी,स्वार्थी 
स्त्रियांना आळ घालून आपली कुटुंब व्यवस्था वाचवायची असेल तर
 लग्न जुळवतांना ज्या प्रमाणे सर्व नातलगांना एकत्र बसून दोन कुटुंबाचे मन जुळवून सर्वांच्या साक्षीने लग्न लावले जाते.त्याच पद्धतीने नवरा बायकोत किंवा कुटुंबात वाद विवाद झाला असेल तर तेच लग्न जुळवतांना असलेल्या नातलगांनी समोरा समोर बसून चर्चा करून वाद मिटविण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे. असे न झाल्यास काय होते.
 
कोर्ट कचेरीत हे प्रकरणे जातात. त्यातून काहीच निष्पन होत नाही. समाजात कोणाचीच बदनामी होत नाही.होतो तो फक्त मानसिक शारीरिक आणि आर्थिक त्रास म्हणून सर्वानीच यांचा गंभीरपणे विचार केला पाहिजे.
     आई वडिलांचा त्याग आणि मुलांचे लग्न हे प्रत्येक घरात होत असते.त्या घरात आईबापाची लाडकी लेक सून म्हणून आली तर तिला आईबापाच्या घरी जशी वागत असे तसे वागत येणार नाही. सर्वच वागणुकीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते.घरातील सर्व प्रकारची कामे करून वडील धाऱ्यांचा मान सन्मान ठेवून बोलणे आणि वागणे ही आईबापाच्या लाडक्या लेकीला सहन होत नाही. सहा महिने वर्ष सहन कर नंतर वेगळे निघण्याची अट घालू अशी आईबापाची शिकवण असते.त्यामुळेच सहा महिने वर्षांनी आईबापाची लाडकी लेक नवऱ्याला हे सांगते.प्रथम ते नवरा नांवाचा मुलगा ते नाकारतो. शांततेत सर्व एकत्र राहणाऱ्या कुटुंबात हा सुरुंग लागतो. मग सुरू होते आईबापाच्या लाडक्या लेकीचे वागणूक नवऱ्याला प्रथम उलट बोलणे,सासूबाई सासऱ्याचे न ऐकणे काम न करणे,यांची तक्रार लाडक्या लेकीच्या आईबापाला सांगितले तर कोणतीही चर्चा न होता बाप मुलीला घरी घेऊन जातो. दोन कुटुंब ज्या मुलीमुळे एकत्र आले असते तेच कुटुंब त्याच मुली मुळे विभक्त होते. यावर उपाय म्हणजे एकत्र बसून चर्चा करून मार्ग काढणे महत्वाचे असते. पण लाडकी लेक व तिचा बाप चर्चा करण्यासाठी तयार होत नाही. मग ज्यांनी ज्या नातलगांनी हा संबंध जुळविला त्यांची मध्यस्थी असली पाहिजे लाडक्या लेकीचा बाप त्यांच्याशी चर्चा करण्यास स्पष्ट नकार देतो. लग्न जुळविणाऱ्या 
मध्यस्थ नातलग, हितचिंतक यांच्या वर विश्वास नसेल तर पोलीस ठाण्यात तक्रार करून गुन्हा दाखल केला पाहिजे की नाही. लेकीच्या बापाने नवरा,सासू,सासरे,नणंद दीर सासरच्या कुटुंबा वर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रितसर गुन्हा दाखल केला पाहिजे की नाही?. पण पोलीस व कोर्टवर ही या बापाचा विश्वास नाही. गेली पांच वर्ष लाडक्या लेकीचे आईबाप लेकीला घरी ठेऊन आहेत. काय करावे असा माणसांचे?. 
  संबंधित नातलग,समाजातील समाज बांधव,समाजसेवक यांच्या मार्फत वाद विवाद मिटवून टाकण्याचे अनेक मार्ग असतांना कोणत्या ही मार्गाचा अवलंब न करता शांत बसणाऱ्या लाडक्या लेकीच्या आईबापाला काय समजून सांगणार?.ही घटना सत्य आहे. परंतु समस्या अगदी गंभिर आहे आणि खरोखरच अशा संयमी आणि गंभिर मुलांची समाजास अत्यंत आवश्यकता आहे.मातापित्याचे ऊपकार कधीच फिटणार नाही
.ज्या आई वडिलांनी ज्या अपेक्षेने मुलांचे लग्न करून दिले असते.त्याच आई वडिलांना म्हणजेच सासू सासऱ्यांना बाहेरून आलेली मुलगी अशी वागणूक देत असेल तर त्या जन्मदात्या आई वडिलांनी काय केले पाहिजे?. ही आजच्या सर्व जातीच्या समाजातील कुटुंबातील गंभीर समस्या झाली आहे.
कौटुंबिक न्यायालयात हजोरो केसेस चालू आहेत.वर्षांनी वर्ष तारिख पे तारीख केस चालतात.त्यात मुलामुलीचे आणि त्यांच्या कुटुंबाचे मानसिक शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रचंड नुकसान होते. जे कधी भरून निघत नाही.ही समस्या एका कुटुंबाची नाही तर सर्व समाजाची आहे.धर्माची आहे.राज्याची आणि देशाची आहे. 
पोलीस आणि न्यायालयीन यंत्रणा खरेच न्याय देण्याचे प्रामाणिक काम करते काय?. पैसा असेल तर सर्व मिळेल.पैसा नसेल तर काय भोगावे लागते यांची माहिती घेण्यासाठी चारपाच दिवस कोर्टाच्या आवारात थांबा व पहा,
स्री पुरुष समानता च्या गप्पा मारणाऱ्या या राज्यात,देशात महिलांच्या बाजूने भरपूर कायदे आहेत.पण ते महिलांना न्याय देण्यास असमर्थ आहेत. बेचा
रे 
पुरुष 
महिलांच्या मानसिक त्रासामुळे व्यसनाधीन होत आहेत असे म्हटल्यास चूक ठरणार नाही. मग ती महिला कोणी असू शकते.बायको,आई,बहिण, वाहिनी, सासु नणंद,देवरांनी,जेठानी हे सर्व पात्र आपण नियमित पणे वाहिन्यावर पाहत आहोत.कळी खुलता खुलेना.तू तिथे मी,तुज्यात जीव रंगला, काहे दिया परदेश,अधुरी ही कहाणी,सास भी बहु थी,सिरीयल मागे पडली असली तरी तिची जागा अनेक सिरीयल वेगवेगळ्या नावाने घेत आहेत. 

रंग माझा वेगळा, आई कुठे काय करते.मोलकरीण, मोठी तिची सावली,
 मागासवर्गीय मध्यमवर्गीय महिला टिव्ही सिरीयल पाहण्यात गुंतले आहेत.आज घडीला सर्व टिव्हीच्या चँनलवर ज्या मालिका चालु आहेत त्यामध्ये एकीचा नवरा दुसरयाच्या बायको बरोबर फिरत असतो (माझ्या नवरयाची बायको ) लग्न झालेल्या मुलाची आई दुसरयाबरोबर लग्न करते (अग्गबाई सासुबाई)  प्रेम करणे आणि तीला सोडुन देणे किंवा त्याला सोडुन देणे ( तुझ माझ ब्रेकअप)  तर सिरीयल मध्ये प्रेम,घटस्फोट,अनैतिक सबंध, देव आणि अंधश्रध्दा पसरवणारे असेच दाखवले जाते आणि हे दररोज संध्याकाळी सहा सात ला सुरु झाले की रात्री अकरा बारा वाजे पर्यत हे चालु असते, लहान मुलासमोर आणि तरुण मुलामुली सोबत बसून काय पाहिले पाहिजे,याचे भान ही कोणालाच नसते. आणि याचाच
 परिणाम कुटुंबव्यवस्थेवर होत आहे.असे म्हटल्यास लिहल्यास चूक ठरणार नाही.
   पुरुष जीवन भर संसार करण्यासाठी त्याग व संघर्ष करीत असतो. समाज काय म्हणेल या भीती पोटी सतत समझोता करीत राहतो. दुःख विसरण्यासाठी तो दररोज नशा करतो म्हणजे दारू पितो. सर्वच दुःखावर दारू हेच प्रभावी औषध आहे असे लोकांना वाटतेपण आज पर्यंत कोणाचे दुःख नष्ट झाल्याचे उदाहरण नाही,पण त्यामुळे आरोग्य धोक्यात येऊन कायमची बिमारी मागे लागल्याचे एक नाही हजारो उदाहरणे आहेत. म्हणुन प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या मागे एक स्त्रीचा हात असतो, तसाच प्रत्येक व्यसनाधीन,अपयशी पुरुषांच्या मागे एका स्त्रीचाच हात असतो.म्हणुन प्रत्येक पुरुष हा स्त्रीयांचा बाप,पती,नवरा, मुलगा, भाऊ, जावई,सासरा,दीर,मामा,काका कोणी ना कोणी असतोच. म्हणुन एकत्र कुटुंबातील पुरुषांना नेहमी स्त्रीयांनी मानसन्मान दिलाच पाहिजे. तसाच पुरुषांनी स्त्रीयांना योग्य तो मानसन्मान दिला पाहिजे. हा संस्कार घरा घरातुन मुलामुलींवर झाला पाहिजे,तरच मुलगा आणि मुलगी लग्न करतांना म्हणेल मला एकत्र कुटुंबातील नवरा,किंवा बायको पाहिजे. आईबापाची लाडकी लेक असे म्हणता कामा नये की नवरा हवा!.पण सासु सासरे नको.

सागर रामभाऊ तायडे,भांडुप,मुंबई,९९२०४०३८५९,

आपण कोणत्या परिवाराचे सभासद आहात ?.

 आपण कोणत्या परिवाराचे सभासद आहात ?.

दुःखाचा डोंगर चढून उतरल्यावर सुखाचा महासागर लागतो.डोंगरातील दऱ्या खोऱ्यातून नदी नाल्यातून पाणी खाली आलेल्या त्या पाण्यापासून महासागर निर्माण होतो. त्यांची लांबी रुंदी, खोली मोजता येत नाही. तथागत गौतम बुद्ध म्हणतात मानव प्राण्यांच्या डोळ्यातील अश्रू एकत्र केल्यास महासागर तयार होतो.एवढे सुख दुःख मानव प्राण्यांच्या जीवनात असते.मनाची कायमस्वरूपी शांतता ठेवली तर दुःखाचे अश्रू येणार नाहीत, तर आनंदाचेच अश्रू येत राहणार.दुःख होणार नाही असे कामे आपल्या हातुन घडले नाही तर आनंद मिळतो. त्यामुळेच शांतमनाचा विचारांचा परिवार तयार होते.त्या परिवाराची चांगली नोंद केली जाते.
मानव प्राण्यामध्ये काम,क्रोध,लोभ,मत्सर निर्माण होत असतो.मग त्यांचा ही एक परिवार निर्माण होत राहतो. तो मनाची शांतता भंग होऊ न देता तो एक शांत परिवार तयार होतो. त्यातील एका परिवाराची निर्मिती सुरू झाली की त्यात एक एक करून सर्व जवळपास येतात. मग ठरवायचे आपण कोणत्या परिवाराचे सभासद आहात ?.
दुसरा असतो राग तो कुठे कधी भेटेल हे सांगता येत नाही. म्हणूनच 
क्रोधाचा म्हणजेच रागाचा पण स्वत:चा एक पूर्ण परिवार असतो.क्रोधाची म्हणजे रागाची एक लाडकी बहिण भाऊ आहे "हट्टी" व "हट्ट" ही सदैव रागा बरोबर असतात.
रागाची पत्नी आहे "हिंसा" हि मागे लपलेली असते, कधी कधी आवाज ऐकुन बाहेर येत असते.रागाच्या मोठ्या भावाचे नाव आहे "अहंकार" रागाचा पिता आहे तो या दोघानाही घाबरतो त्याचे नाव "भय" (भिती) आणि त्याला दोन मुली सुद्धा आहेत "निंदा" व "चुगली", एक सतत तोंडा जवळ असते, तर दूसरी काना जवळ असते. "वैर" हा रागाचा मुलगा आहे. "इर्षा" ही या परिवाराची सुन आहे. या रागाची नात सुद्धा आहे तिचे नाव "घृणा", ही नेहमी नाका जवळच असते, नाक मुरडने एवढेच हिचे काम. "उपेक्षा" ही रागाची आई आहे.असा हा "रागा" चा छोटासा परिवार आहे.हा प्रत्येक मानव प्राण्यांच्या आजूबाजूला असतोच.हा छोटासा पण माणसाच्या संपुर्ण आयुष्याची वाट लावण्याचे सामर्थ्य असणारा परिवार आहे. मग आपण कोणत्या परिवाराचे सभासद आहात ?.
    तथागत बुद्ध मनाला शांती लाभण्यासाठी त्रिसरण पंचशिलेचे पालन करण्यास सांगतात. जो मानव प्राणी यांचे पालन करतो तो राग या परिवारा पासून दूर राहतो, त्यामुळेच त्यांच्या घरात सर्व मंगल मांगल्य, सुख, सम्पत्ती, समाधान व मुख्य म्हणजे शांती राहते.कुटुंबात कितीही सभासदाची संख्या वाढली तरी ते कुटुंब एकत्रित राहते.आजच्या जमान्यात पांच भाऊ लग्न झाल्यावर आईवडीलानां सांभाळू शकत नाही. तेव्हाचे पांच भाऊ आपल्या नातवाच्या मुलाला आणि पणजोबाला वयाच्या शंभर वर्षा नंतर ही एकत्रीत कुटुंबात सांभाळून घेतात.हे संस्कार त्यांना लहानपणापासून केले असतात. आज बहुसंख्य उच्च सुशिक्षित सुरक्षित नोकरी करणाऱ्या वर्गाचे आईवडील वृद्धाश्रमात जीवन जगत आहेत. म्हणजे हे शांतमनाचा व रागाचा परिवार या दोन पैकी एका परिवारातील लोक आहेत. मग आपण कोणत्या परिवाराचे सभासद आहात ?.
    माणूस कृती कधी करतो?. जेव्हा गरज असते तेव्हा माणूस कृती करतो. ही गरज आर्थिक व शारिरिक स्वरूपाची असते.आर्थिक म्हणजे पैसा गोळा करणे व शारिरिक म्हणजे शरीराची काम तृष्णा भागविणे.माणूस चांगल्या व वाईट या दोन्ही कृत्या करू शकतो. पैसा गोळा करण्याचा चांगला मार्ग म्हणजे दिलेले काम चोख करून पैसा मिळविणे. तर वाईट मार्ग म्हणजे खोटे बोलून, फसवणूक करून,किंवा चोरी करुन पैसा मिळविणे. शारिरिक व्यभिचार न करणे हा चांगला मार्ग असेल, तर शारिरिक व्यभिचार करणे हा वाईट मार्ग असतो. आपल्यापुढे चांगले व वाईट हे दोन्ही प्रसंग येतात. ज्याचा मनावर ताबा असतो ते वाईट कृती करीत नाही. पण ज्याचा मनावर ताबा नसतो ते वाईट कृती करतात. मनावर ताबा ठेवण्याच्या अभ्यासाला धम्मात आनापानसती व विपश्यना हे नांव आहे. तर धर्मात व्रत,उपास, पूजापाठ, यज्ञ होम करावे लागतात. अग्नी मध्ये तुप जाळले आणि काही मंत्र म्हटले तर पाप नष्ट होते व पुण्य लाभते. त्यांचा उद्देश एकच असतो मनाची शुद्धता व शांती राखणे.ते सत्य किती आणि असत्य किती हा श्रद्धेचा भाग असल्यामुळे यांची चिकित्सा कोणी करू शकत नाही. ती केली तर शांतमनाचा व रागाचा परिवार आपल्या समोर उभा आहेच. आपणच ठरवायचे आहे. कोणत्या परिवाराचे सभासद आहात ?.
 शांतमनाचा व रागाचा परिवारा पासून लांब राहण्यासाठी काय दक्षता घ्यावी?. जिथं आपली कदर नाही, तिथं कधीही जाऊच नका. ज्यांना खर सांगितल्यावर राग येतो,त्यांना समजवून सांगण्याच्या भानगडीत पडू नये.जे नजरेतून उतरलेत त्यांच्या बाबत विचार करून मनस्ताप करून घेऊ नये. आपल्या हातून एखाद्याचे चांगले काम होत असेल तर ते निःस्वार्थ बुद्धीने आणि निःसंकोचपणे करावे. नेहमी दुसऱ्याला मदत करावी दुसऱ्याला आपल्या मुळे त्रास होईल असे कदापि वागू नये. नेहमी स्वतःसोबत स्पर्धा लावा, जिंकलात तर आत्मविश्वास जिंकेल आणि हारलात तर अहंकार हारेल. एखाद्या व्यक्तीजवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याच्या जवळ आपला विषय जरी निघाला तर, त्याच्या ओठांवर थोडसं हसू आणि डोळ्यात थोडसं पाणी नक्कीच आलं पाहिजे.असंघटित कष्टकरी कामगार मजुरांना न्याय हक्क व प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी संघटनेचे काम करीत असतांना हा अनुभव मी खूप वेळ घेतला. रेल्वे स्टेशन वर बूट पॉलिश काम करणाऱ्यांना कामगारांनी मान सन्मानाची अपेक्षा करावी काय?.ती आम्ही मिळवून दिली. मुंबई ते दिल्ली पर्यत कोणत्याही स्टेशनवरचा बूट पॉलिशवाला आमचे नांव गर्वाने सांगुन आपली समस्या ताबडतोब सोडवून घेतो.आयुष्यात तुम्ही किती मालमत्ता,सोने,चांदी, जमीन कमावली याला समाजात काही किंमत नाही.पण समाजासाठी गोरगरीब लोकांसाठी काय केले याला आयुष्यात खुप महत्व आहे.हे काम कोण करू शकतो?. शांतमनाचा परिवार की रागाचा परिवार?.आपण कोणत्या परिवाराचे सभासद आहात ?. 
 माणसाचे शिक्षण,आरोग्य आणि रोजगारांच्या नांवावर शोषण करणाऱ्या संस्था, संघटना माणसंच चालवितात. त्यांची नोंद शांतमनाच्या परिवार घेतो. क्रोधाचा परिवार कधीच घेणार नाही. त्यामुळेच जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते आणि ते कोठे जमिनीवर नाही तर आपल्या मनात रुजवावे लागते.भारतीय माणसांच्या मनात कोणावरही कोणाचा विश्वास नाही.तेहतीस कोटी देवावर ही नाही.म्हणूनच ते मनाला सुख शांती समाधान मिळावे म्हणून सर्वांवर श्रध्दा ठेऊन पूजा अर्चना करतात.जगात एकमेव तथागत गौतम बुद्ध महामानव आहेत त्यावर सर्वच माणसं शंभर टक्के विश्वास ठेवतात.बुद्धाचे नांव घेणाऱ्या कोणत्याही देशात माणूस माणसाला फसवीत नाही.180 देशात शांतमनाचा परिवार जोडला आहे. रागाचा परिवार जोडलेला एकही माणूस शोधून सापडणार नाही. शांतमनाचा परिवार सांगतो जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक रहा. जेंव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेंव्हा साधे रहा. जेव्हा एखादे पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील रहा. जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा शांत रहा. तुम्ही कोणासाठी कितीही केले, तरी ते कोठेतरी कमीच पडते. पण सत्य हे सत्यच असत ते सहा महिने,वर्ष भर लपवून ठेवले तरी ते सत्यच राहते.उलट असत्य गांवभर देश भरात शंभर तोंडातुन फिरले तरी ते असत्य असते. बुद्ध पंचशिलेचे पालन करण्यास सांगतात.ते जगातील कटू सत्य हेच आहे की, माणसं त्यांचे खूप कमी प्रमाणात आचरणार आणतात.पंचशिलेचे पालन केल्यास जगात शांतता निर्माण होते तेव्हाच आपण समाजात व देशातील वातावरणात, दळणवळणात शांतमनाचा परिवार तयार करू शकतो. भारतात गर्वसे कहो हम हिंदू है म्हणणारे खूप संस्था संघटना आहेत.त्या समाजात देशात शांतता निर्माण होण्यासाठी कोणते काम करतात?. देशात दहशतीचे  वातावरण कायमस्वरूपी राहावे असेच शिक्षण प्रशिक्षण संस्कार हा परिवार रागाचा परिवार देत राहतो. यातूनच आपले,समाजाचे देशाचे न भरून येणारे नुकसान होत आहे.कोरोना थाळी वाजवून,दिवा बत्ती करून गेला नाही.पण राम मंदिरामुळे लॉकडाऊन कोरोना कुठे आहे?.प्रत्येक माणसाला प्रश्न पडला असेल तर?. माणसाने कोणत्या परिवाराचे सभासद असावे ते ठरवावे. शांतमनाचे की क्रोधाचे. मग आपण कोणत्या परिवाराचे सभासद आहात ?.
सागर रामभाऊ तायडे,9920403859,भांडुप,मुंबई 

कोरोनातील भ्रष्टाचार आणि मोदींची भाईगिरी

 कोरोनातील भ्रष्टाचार आणि मोदींची भाईगिरी 

 कोरोना ने जगावर संकट आणले त्यांनी ताबडतोब त्यांची दखल घेतली आणि लॉक डाऊन इतर उपाय योजना आखणी करून नियोजन केले. भारताचे प्रधानमंत्री (मालक) यांनी कोणते नियोजन करून उपाय योजना करून लॉक डाऊन जाहीर केला?. देश कोरोनाच्या विळख्यात असतांना राम मंदिर शिलापूजन आयोजन आणि त्यामागचे नियोजन आयोजन किती योजनाबद्ध होते हे आता अनेकांना समजले असेल, लोक फक्त कोरोनाचाच विचार करत होते. मरतो की वाचतो?. त्यात भ्रष्टाचार किती झाला आणि मोदीची भाईगिरी बहुमत असल्यामुळे ती किती वाढली. मान्यवर भारतीय संविधानच मानत नाही.
 भारतात मनुष्य जन्मच जो इतरांना संपविण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही हीच नियती आहे. संकटकाळात माणसाला मदत करणे आवश्यक असते.तेव्हा त्याची जात,धर्म,प्रांत गरीब,श्रीमंत, किंवा जाडा, कडक्या पाहिले जाऊ नये. फक्त मदत केली जावी.हीच अपेक्षा माणुसकी असणाऱ्या माणसा कडून असते.काही माणसं दुसऱ्याची वाट लावता-लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे त्यांनाही कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा,
  माणसाचा दर्जा हा मिळकती वरून ठरत नसतो तर तो विचारांवरून ठरत असतो. कारण चांगला माणूस बना.शेवटी हिशोब हा कुशल कर्माचाच होतो धर्माचा नाही.मेलेल्या माणसाला खांदा देण्याचे काम कितीही पवित्र आणि परोपकारी असले तरी जो मेलेला आहे त्याला त्याचा काहीच उपयोग नसतो.पण किती मेलेल्या माणसांना खांदा दिला यापेक्षा किती जीवंत माणसांना मदतीचा हात दिला यावर आपली माणूसकी ठरत असते. धर्माचे गोडवे गातांना देवांचे महत्व पटवून देतात. माणूस मेलेला कळताच धाऊन जाणारी माणसे,तो जिवंत असताना, आर्थिक अडचणीत असतानाच का बरं धाऊन जात नाहीत?.
खरे तर माणूस मेल्यानंतर धावणाऱ्या माणसांची धावपळ व्यर्थ असते, कारण तुम्ही नाही गेला तरी माणसे त्याला जाळल्या शिवाय राहणार नाहीतपण ही व्यर्थ धावपळ करणारेच खूप आहेत जीवंतपणी,जीवंत माणसासाठी,जीवनात असणाऱ्या शारीरिक,आर्थिक,आणि मानसिक समस्या अडचणीत सापडलेल्या एकाला तरी आयुष्यात खरा प्रामाणिक हात दिला काय?. हा प्रश्न प्रत्येकांनी स्वताला विचारला पाहिजे. 
कोरोनाच्या महामारीत सुरवातीला सरकारी हॉस्पिटल आणि डॉक्टर नर्स देव दूत वाटत होते. त्यावेळी खासगी हॉस्पिटलमध्ये जाण्यास लोक घाबरत होते. कारण खाजगी हॉस्पिटल हा कॉर्पोरेट बिझनेस झालेला आहे.हे सर्वांनाच माहिती आहे. सर्वसामान्यांनी सरकारी रुग्णालयातुन उपचार घ्यायचे आणि उच्च मध्यमवर्गीय व श्रीमंतांनी फक्त खाजगीतून उपचार घ्यायचे असा अलिखित नियम झाला आहे, सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर खाजगीतील उपचार पद्धती गेली आहे, सरकार ने या महामारीच्या माध्यमातून काही तरी बंधने कायदेशीररीत्या आणले पाहिजे होते.आरोग्य विषयी कायदे कलम खूप आहेत. पण त्यांची अंमलबजावणी काटेकोरपणे होत नाही.कॉर्पोरेट बिझनेस वाले पक्षाला आणि अधिकृत अधिकाऱ्यांना योग्य तो मलिदा दान दक्षिणा देत असतात.त्यामुळेच सरकार कोणाचे ही असो,कडक कारवाई होत नाही.
 हॉस्पिटल सरकारच्या कंट्रोलमध्ये नाहीत म्हणूनच तर एवढा बिले आकारली जातात. PPE किट,गरम पाणी,जेवण, खाट,टेबलचा सात आठ लाख रुपये बिल येते. त्यात अजूनही कोरोना वर मेडिसिन ली नाही.त्याचा खर्च नाही. सरकारी सार्वजनिक हॉस्पिटल फुल झाले आहे का?.म्हणूनच लोक खाजगी हॉस्पिटलमध्ये जातात.कोरोनाचा धंदा सुरु झाला आहे.जे लोक सरकारी डॉक्टरांना देवदूत म्हणत होते.तेच आता कमिशन टक्केवारी वर मध्यमवर्गीय नोकरदारांना खासगी हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगतात.प्रथम त्याची पूर्ण माहिती काढल्या जाते.कुठे नोकरी करोत.मेडीकिम,एल आय सी,मेडिकल पॉलीशी असेल त्यांनाच पाठविल्या जाते.असंघटीत कामगार असला तर घरी जाण्याचा सल्ला दिला जातो.काळजी कशी घ्यावी ते सांगितल्या जाते. उच्चशिक्षित लोक नेहमीच पैसे कसे कमवायचे यांचे निर्दयी पणे नियोजन करतात.सुशिक्षित लोक कोणत्या धंद्यात असो ते  कॉर्पोरेट बिझनेसचाच विचार करतात.
 इमारती बांधणारे बिल्डर घराचे दर वाढत असतात कोटीच्या कोटी, खाजगी क्लासेस वाले पालकांना लाखो रुपयाने लूटत असतात. आणि आजारी पडल्या वर हॉस्पिटलवाले लूटत आहे. माणसांच्या देशाच्या संकटाशी त्यांना काही घेणे देणे नाही.कुठल्याही मेडिकल वाल्याचा नातेवाईक ह्या हॉस्पिटल मधे दाखल होत नाही. आणि खाजगी लेबोरेटरीज आहेतच रक्त प्यायला हॉस्पिटल,मेडिकल आणि खाजगी लेबोरेटरीज यांची अखंड साखळी आहे.
राजकीय नेता कोणत्याही हाॅस्पिटल मध्ये जाऊन बिल कसे आकारण्यात येते याची माहिती घेऊन बोलण्याची हिंमत दाखवीत नाही.काही शिवसैनिक,मनसैनिक ठरविक ठिकाणी राडे करण्याचे धाडस करतांना दिसतात ते च धाडस ते त्यांच्या नेत्याच्या गांडूगिरी विरोधात का करीत नाही. आता ते सत्ताधारी आहेत ना, त्यांच्या विरोधात का बोलत नाही. 
मध्यमवर्गीय नोकरदार लोकांच्या आयुष्याची संपूर्ण कमाई कोरोना झाला की खासगी हॉस्पिटलमध्ये अवघ्या 10 ते 15 दिवसात संपवतात. महाराष्ट्र ने राजीव गांधीं आरोग्य योजना ( सध्याचे नाव महात्मा जोतिबा फुले) काही खाजगी हॉस्पिटलमध्ये लागू केल्या आहेत. योजनेत आधी पासुन पॅनलवर असणारे डॉक्टर लाभ देखील घेतात.आज बऱ्याच राजकीय पुढाऱ्यांची हाॅस्पिटल मध्ये छुपी भागीदारी असते किंवा मॅनेजमेंटचे लोक त्यांचे मित्र/ व्यवसायीक मित्र असतात. त्यामुळे खुप थोडे राजकीय पुढाऱ्यांना ही गोष्ट लक्षात येते. बाकी लोकांना माहीत असूनही ते बोलत नाहीत याचे कारण तुम्ही समजू शकतात. आजच्या घडीला सर्वात चांगला व्यवसाय म्हणजे हाॅस्पिटल व शिक्षण हे दोन्ही व्यवसाय आहेत. त्यासाठी राजकीय आशीर्वाद लागतो.
नानावटी हॉस्पिटलमध्ये कोरोनावर काही रुग्णावर उपचार केले गेले असतांना दहा पैकी सात रुग्णांनी हॉस्पिटलने प्रचंड बिलाची आकारणी केली होती. म्हणून त्यांनी लेखी तक्रार केली असता हॉस्पिटलची प्रतिमा खराब झाली होती व सर्वदूर हॉस्पिटल व त्यांच्या डॉक्टरवर मीडिया, वृत्तपत्र व जनमानसात एकूणच रोषाचे वातावरण झाले होते, हे वाचकांना चांगले माहिती असेलच असे नाही कारण वाचक नेहमीच वाचतात आणि विसरून जातात.नोंद कोण ठेवते.उच्चवर्णीय उच्चशिक्षित कॉर्पोरेट बिझनेसचाच विचार करणारे.कुठे कशी काडी लावतील सांगता येत नाही. 
अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन हे दोघेही नानावटी हॉस्पिटलमध्ये कोरोना झाल्यामुळे ऍडमिट झाल्यामुळे देशातील सर्व समस्या सुटलाय सर्वत्र एकच बातमी चर्चा चोवीस तास सुरु होती. खरे तर त्यांना कोरोनाची फारसी लक्षणे नसून (Asymptomatic) ते एकदम फाईन (Fine) आहेत.त्यांच्याकडे जुहू येथे तीन बंगले असून एकूण अठरा रूम्स आहेत आणि त्या रूम्स मिनी आय सी यु (ICU) असून त्यांचे 24 तास काळजी घेणारे फर्स्ट क्लास 2 पगारी डॉक्टर्स असतात. असे असतांना दोघेही पिता-पुत्रांनी होम क्वारांटाइन (Home Quarantine) होऊन कोरोनाची खास लक्षणे नसतांना आपल्या बंगल्यावरच इलाज करायला काही हरकत नव्हती.अनेक सोसायटी तसे होम क्वारांटाइन केल्याची महानगरपालिका सरकारकडे नोंदी आहेत.
उच्चवर्णीय उच्चशिक्षित कॉर्पोरेट बिझनेसचाच विचार करणारे. ते दोघेही नानावटी हॉस्पिटलमध्ये भरती (ऍडमिट) झालेत एव्हढेच नाही तर बिग बी (अमिताभ) ट्विट्स (tweets) करून आपल्या खास शब्दात हॉस्पिटलची तारीफ करून आभार सुद्धा मानले. राजकारणात आणि धंद्यात ग्यानबाची मेख अशी असते कि ते मोठ मोठ्यांना समजत नाही. ज्या रेडिअंट ग्रुप (Radiant Group) च्या मालकीचे नानावटी हॉस्पिटल आहे त्यात स्वतः अमिताभ बच्चन भागीदार असून सन्माननीय बोर्ड मेम्बर सुद्धा आहेत. (मालकानेच मालकाचे आभार मानणे !) यावरून आपल्या लक्षात आले असेलच की, पहिल्या पॅरिग्राफमध्ये जो मुद्धा आहे त्यावर सुंदर स्क्रिप्ट लिहून आपल्या बेहतरीन अदाकारीने अमिताभने आपल्या हॉस्पिटलची खराब झालेली प्रतिमा सावरण्याचा एक हिट शो केला असे असे तज्ञ सांगतात.आणि हे तज्ञ कोण?.उच्चवर्णीय उच्चशिक्षित कॉर्पोरेट बिझनेसचाच विचार करणारेचना म्हणजेच दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहीये.कोरोनातील भ्रष्टाचार आणि मोदीची भाईगिरी कुठे कुठे जुळली आहे. ते आता राम नाम सत्य आहे.हेच सांगेल.
 सुख आणि दुःख हे पाहुणे आहेत वारंवार येतील आणि जातील.जर ते आलेच् नाहीत तर आपल्याला अनुभव कुठून येणार जीवन खुश राहून जगायला शिकाकारण रोज सायंकाळी फक्त सूर्यच् मावळत नाही तर आपले मौल्यवान जीवन सुद्धा कणा कणाने कमी होत जाते.माणूस जसा बदलत चालला आहे,तसा निसर्ग देखील बदलत चालला आहे.निसर्गाची ताकद किती आहे बघा निसर्गातील एक विषाणू सांगून गेला, पैसा,संपत्ती,गाडी,बंगला,सोने, श्रीमंती याहीपेक्षा आपला जीव महत्त्वाचा आहे.आपल्या वाईट काळात आपली किंमत कमी करण्याचा प्रयत्न अनेकदा केला जातो.मात्र संयम राखला तर आपल अस्तित्व कुणीच संपवू शकत नाही.फक्त स्वत:चा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात.पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते.
आता भारत प्रगती पथावर आहे कि अधोगतीच्या कोणत्या पथावर आहे. राजकारणातील भ्रष्टाचार संपला असे समजून प्रधानमंत्री सार्वजनिक उद्योग धंदे बिधास्त विकत आहे.त्यांची भाईगिरी वाढत आहे.असे लिहले तर वाचका अगोदर संपादक संपादकीय मंडळाच्या पत्रकारांना वाईट वाटेल लेख प्रसिद्ध होईल यांची हमी नाही.कारण यांचे ही भष्ट्राचार आणि मोदीच्या भाईगिरीशी वैचारिक आर्थिक हितसंबध असतात. त्यामुळे आज देशातील सर्व समाजाला सत्य परिस्थिती सांगण्या ऐवजी असत्य सांगत आहेत.कोरोना लॉक डाऊन आणि भष्ट्राचार मोठ्या संख्याने होत असतांना राजकारणातील लोक गप्प आहेत.साहित्यिक,विचारवंत पत्रकार आप आपल्या सोयीने लिहतात.कोरोना संकट आले आणि गेले.पण भविष्यात काय काय शिकवून गेले.आता सर्वच समाजातील जागरूक नागरिकांनी घेतली पाहिजे. तरच चार आणि भाई गिरी मोडता येईल 
सागर रामभाऊ तायडे९९२०४०३८५९,भांडूप मुंबई.
Attachments area