मूर्ती छोटी किर्ती मोठी
शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२०
मूर्ती छोटी किर्ती मोठी
गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२०
निळ्या आकाशातील लाल तारा
निळ्या आकाशातील लाल तारा
भारतीय स्वातंत्र्य चळवळीसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीत, तसेच गोवा मुक्ती संग्रामाच्या लढाईत त्यांनी जनजागृतीचे प्रचंड काम केले. एक कलाकार म्हणून आणि एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनही ते प्रत्येक आंदोलनात सहभागी होत असत. चलेजाव चळवळीच्या काळात वटेगावातही बर्डे गुरुजींच्या नेतृत्वाखाली अनेक घडामोडी सुरू होत्या. अण्णा भाऊ त्यात सामील असल्याने त्यांच्यावर वॉरंट निघाले. परिणामी त्यांनी कायमचे घर सोडले. पुढे त्यांना तत्त्वज्ञानाची, विचारांची एक दिशा मिळत गेली आणि त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ काम करायला सुरुवात केली. पक्ष कार्यासाठी झोकून दिलेले असतानाच १९४४ साली त्यांनी ’लाल बावटा’ या कला पथकाची स्थापना केली. या वेळी शाहीर अमर शेख,शाहीर गव्हाणकर हे देखील त्यांच्या सोबत असत. लोकगायनातून लोकप्रबोधन करीत असताना त्यांनी त्यांच्या अनुभव लिहायला सुरुवात केली. आणि अजरामर साहित्य निर्माण झाले.लावण्या, पोवाडे, पथनाट्ये म्हणजे त्यांच्या ललित साहित्याची पूर्वतयारी होती. त्यांनी एकूण सुमारे १५ वगनाट्ये लिहिली व त्यातूनच त्यांना देशभर प्रसिद्धी मिळत गेली.असंघटीत समाजाला आपल्या शाहिरीतून जागृत करणारा लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णभाऊ साठे म्हणजे निळ्या आकाशातील चमकता लाल तारा होता .
मुंबईत अण्णांच्या आयुष्याला १९४५ साली कलाटणी मिळाली. लोकयुद्ध साप्ताहिकात वार्ताहराचे काम करीत असताना त्यांनी अकलेची गोष्ट, खापर्या चोर, माझी मुंबई अशी गाजलेली लोकनाट्ये लिहिली.या काळातच संत साहित्यासह अनेक प्रतिभावंतांच्या अभिजात कलाकृती त्यांनी वाचून काढल्या. वैचारिक आणि कलाविषयक वाचनाची आवड असल्यामुळे त्यांना लेखन करायला खूप मेहनत करण्याची गरज पडली नाही. अण्णांभाऊचे लिखाण नेहमी कष्टकरी कामगार मजूर डोळ्या समोर ठेऊन होत होते.त्यातील नायक हा अन्याय अत्याचारा विरोध लढणार आणि जातिव्यवस्थे विरोधी बंड करून उठनाराच होता. त्याच्या प्रत्येक कथा,कांदबरया,वगनाट्य चा नायक हा सर्व सामान्य कुटुंबातून आलेला असल्यामुळे लोकंच्या,वाचकाच्या गळ्यातील ताईत बनत होता.
भारत देश स्वतंत्र झाल्याच्या १९५० ते १९६२ साल म्हणजे अण्णभाऊच्या साहित्य क्षेत्रातील सुवर्णकाळ होता. याच काळात त्यांच्या पुस्तकांच्या अनेक आवृत्ती निघाल्या. प्रचंड यशस्वी होत असताना त्यांचे स्वत:चे जीवन मात्र धकाधकीचे होत गेले. मुंबई सरकारने ’लाल बावटा’ या कला पथकावर बंदी घातली होती. पुढे तमाशावरही बंदी आली. त्यामुळे तमाशातील कलाकारांचे संसार देशोधडीला लागला. अण्णांभाऊनी तमाशाचे लोकनाट्यात रूपांतर करून तमाशा कलेचा उद्धार केला. तमाशाला लोकनाट्याचे वैभव मिळवून दिल्याने सरकारची बंदी कुचकामी ठरली.या सुवर्णकाळातच त्यांनी वैजयंता, माकडीचा माळ, चिखलातील कमळ, वारणेचा वाघ ,फकिरा अशा अनेक कादंबरया लिहिल्या. ३५ कांदंबरया लिहल्या त्यात ८ कांदबरीवर चित्रपट निर्माण झाले ते तुफान लोकप्रिर्य झाले १२ च्यावर कथासंग्रह लिहले त्यांनी स्टॅलिनग्राडचा पोवडा, महाराष्ट्राची परंपरा, मुंबईचा कामगार असे पोवाडेही लिहिले. निवडणुकीत घोटाळे, दुष्काळात तेरावा, अकलेची गोष्ट ही त्यांची वगनाट्ये प्रसिद्ध आहेत. दोनशे-अडीचशे गाणी, लावण्या त्यांनी लिहिल्या आहेत. कामगारांमध्ये त्यांची गाणी आणि लावण्या लोकप्रिय आहेत. मराठीतील ग्रामीण, प्रादेशिक, दलित साहित्यावर अण्णा भाऊंचे प्रभुत्व होते. अण्णा भाऊंच्या साहित्याचे हिंदी,गुजराती, उडीया, बंगाली, तमीळ, मल्याळी,अनेक भारतीय भाषांबरोबरच रशियन, झेक, पोलिश, इंग्रजी, फ्रेंच अशा जगातील २७ भाषांमधे भाषांतर झाले आहे. लेखणीचे हत्यार बनवून त्यांनी पुरोगामी, विज्ञाननिष्ठ, स्त्रीवादी, लढाऊ अविष्काराचा दीपस्तंभ मराठी साहित्याच्या क्षेत्रात उभा केला. एवढ्या मोठ्या कर्तृत्वामुळे त्यांना प्रसिद्धी मिळत होती.
अण्णाभाऊ साठे जेव्हा मुंबईच्या ‘माटुंगा लेबर कॅम्प’ या मागासवर्गीय-शोषितांच्या वस्तीत कम्युनिस्ट चळवळीत कार्य करू लागले तेव्हा खर्या अर्थाने त्यांचे विचार क्रांतिकारक होऊ लागले. तत्कालीन लेबर कॅम्पमधील प्रमुख कम्युनिस्ट नेते/कार्यकर्ते आर.बी. मोरे, के.एम. साळवी, शंकर नारायण पगारे यांच्या सोबत ते कम्युनिस्ट पक्षाचे काम करू लागले. मार्क्सवादी विचारांच्या अभ्यासवर्गाला हजेरी लावू लागले. याच लेबर कॅम्पमध्ये ते पुन्हा धुळाक्षरे गिरवू लागले व लिहावयास लागले. त्यांनी पहिले गाणे लेबर कॅम्पमधील मच्छरावर लिहिले. याच लेबर कॅम्पमध्ये अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख व शाहीर द.ना. गव्हाणकर या त्रयींनी कम्युनिस्ट पक्षाच्या मार्गदर्शनाखाली लाल बावटा कलापथकाची १९४४ साली स्थापना केली आणि क्रांतिकारक शाहिरीचा बुलंद आवाज महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर पसरला होता.
अण्णाभाऊ च्या क्रांतिकारी विचारा पासुन मातंग समाज लांब आहे.उभे आयुष्य त्यांनी कम्यूनिस्ट चळवळीत घातले पण उच्च वर्णीय वर्गीय नेतृत्व करणाऱ्या या डाव्या कामगार चळवळी ने त्यांना मना पासून कधीच स्वीकारले नाही.शेवटी शेवटी अण्णाभाऊ नी भिमराव( बाबासाहेब )सांगितला पण त्यांच्या समाजाने आजही तो स्वीकारला नाही मातंग समाजाने कांग्रेस राष्टवादी नेतृत्व स्वीकारले पण आंबेडकरी नेतृत्व नाही अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या स्थापने पासुन इतिहास तपासला तर कोणाचा विकास झाला.हे दिसून येईल. महामंडळाचा अध्यक्ष जेलची शिक्षा भोगणारा झाला. अनेक कार्यकर्ते त्याचं वाटेवर आहेत.ज्याने अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराची चळवळ उभी केली पाहिजे होती त्याने समाजाचे शोषण करणारी फळी उभी केली आणि समाजाला विकलांग बनविले अण्णाभाऊच्या जयंती दिनी व स्मुर्ती दिनी पूर्ण पण जाहिराती देवून राष्ट्रवादी ला मोठे केले. मातंग समाजाच्या तरुणांना आकर्षित केले. समाजाचा विकास व कल्याण करण्यासाठी असलेल्या महामंडळाचा राजकीय अड्डा बनविला.अण्णाभाऊ साठेचा वैचारिक वारसा सांगणारा तरुण घडविन्या ऐवजी राष्ट्रवादी मातंग कार्यकर्त्ता घडला.त्यामुळे आज सर्वच पक्षात मातंग आघाडी निर्माण झाली. तेच नेते समाजाला आंबेडकरी चळवळी पासुन चार हात लांब राहण्याचा सतत मार्ग दाखवितात.आणि स्वतःच्या जाती पुरते वेगळे आरक्षण मांगतात त्याकरिता आता आंदोलन तीव्र करून ते कोणा विरोधात कोणासाठी लढतात हाच मोठा प्रश्न त्यांच्या व इतर समाजा समोर आहे. त्यामुळे खेड्या पाड्यातील मातंग समाज शोषण मुक्त झाला नाही.गावांत किंवा शहरातील आण्णा भाऊसाठे नगरातील तरुण शिक्षण,आरोग्य आणि रोजगार या पासुन वंचित आहे.तो मोठ्या प्रमाणात देव,देवी,मरीआईच्या चक्रात अडकलेला असुन अज्ञान अंधश्रद्धा यातून तो मुक्त नाही.
पुर्थ्वीशेष नागाच्या फण्यावर नसुन असंघटीत कष्टकरी कामगारांच्या तळ हातावर तरळी आहे. हे आण्णाभाऊ साठे यांनी छातीठोक पणे सांगितले,लिहिले आणि गायिले. हे त्यांचा समाजच आज ही मान्य करीत नाही.म्हणुन अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्याचा अधिकार तो समाज गमावुन बसला. त्यांच्या विचारांची जयंती जो पर्यन्त होत नाही तो प्रयन्त मातंग समाजाचा शैक्षणिक,सामाजिक, आर्थिक विकास होणार नाही.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्य त्यांच्या क्रांतिकारी विचारांना आणि प्रतिमेला कोटी कोटी प्रणाम!. सर्व वाचकाना हार्दिक शुभेच्छा
सागर रामभाऊ तायडे~भांडुप मुंबई,9920403859.
असंघटित कामगारांचा नायक - अण्णाभाऊ साठे
असंघटित कामगारांचा नायक - अण्णाभाऊ साठे
कोरोना सकारात्मक विचाराने मन प्रसन्न ठेवा.
कोरोना सकारात्मक विचाराने मन प्रसन्न ठेवा.
आज मी चांगल्या पगारावर काम करतो, पण मनाला समाधान नाही, तेव्हा कमी पगारात कुटुंबात सुखी समाधानी होतो.मी असे नव्हते करायला पाहीजे. व्हायच्या त्या घटना घडुन गेल्या, टाईममशीनमध्ये जाऊन ते काही बदलता येणार नाही, तेव्हा आता त्यावर विचार करुन फक्त आणि फक्त, आपली बहुमुल्य उर्जा, फालतुमध्ये खर्च करतो, त्यापेक्षा भुतकाळातल्या त्या सर्व चांगल्या वाईट घटना विसरुन गेले पाहिजे. त्यासाठी सकारात्मक ऊर्जा देणारे विचार करणे आवश्यक आहे. कोरोनाने सर्वांना विचार करण्यास भाग पाडले. नकारात्मक विचार पळविले तर सकारत्मक विचार येतात आणि जगण्याची प्रेरणा देतात.
माणसाला तीन गोष्टी जास्त त्रास देतात, प्रत्येक दुःखाच्या मुळाशी ह्या तीन गोष्टी सापडतील, अपेक्षा, अपुर्ण स्वप्ने, ध्येयप्राप्ती नंतर येणारा रिक्तपणा!
खुप वेळा आपण ऊसकी कमीज मेरे कमीजसे सफेद कैसी ! याच विचारात असतो. तो कसा सुखी आहे, ती कशी मस्त जगते, त्याच आयुष्य आरामशीर आहे, माझ्याकडे हे का नाही, या अपेक्षेने, तुलनेने दु:खी होत राहतो. तारक मेहता का उलटा चष्मा संपूर्ण कुटुंब एकत्र बसुन पाहत असते. पोपटलालचे पात्र किती गंमतीशीर आहे. समजा,एखाद्याचे लग्न होत नाही, तेव्हा तो किती परेशान असतो, उठता-बसताना, जेवताना, झोपताना एकच ध्यास असतो, लग्न-लग्न-लग्न! नकळत हाच विचार, चिंता बनुन, त्याच्या आत्म्याला डाचु लागतो, त्याच्या दुःखाचं कारण बनतं, मग हास्य गायब होतं, चित्त थार्यावर राहत नाही, चिडचिड वाढते. स्वप्नप्राप्तीकडे रोज वाटचाल करायची पण मनावर जखम न होवु देता!, ह्याला म्हणतात, सुखी जीवन! म्हणूनच सकारात्मक विचाराने मन प्रसन्न ठेवा.संकट येतात आणि जातात.धरून बसु नका!.
सेवा करणार्याला आत्मिक समाधान मिळते. बघा! किती मजेशीर आहे हे,अगरबत्ती स्वतः हवेत विरुन जाते, पण वातावरणात एक प्रसन्न सुगंध पसरवते, दिव्याची वात स्वतः नष्ट होते, पण तेजाने घर उजळुन टाकते.काहीतरी बनण्यासाठी, काहीतरी प्राप्त करण्यासाठी आपण सकाळ संध्याकाळ धावत असतो, पण खरे समाधान कुठे आहे?
आपल्यात असलेल्या गुणांचा, शक्तीचा वापर आजुबाजुच्यांना, नातेवाईकांना, मित्रांना, अगदी अनोळखी लोकांना सुखी, आनंदी बनवण्यासाठी प्रयत्न करणार्यांचं जीवन खरं सार्थ झाले असं म्हणता येईल. म्हणूनच सकारात्मक विचाराने मन प्रसन्न ठेवा.
सकारत्मक विचारांची ऊर्जा आणि नकारात्मक विचारांची ऊर्जा कशी निर्माण होते यांची माहिती मला रविंद्र सूर्यवंशी यांनी प्राणिक हेअलिंग मिशन
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९.भांडुप मुंबई
आईबापाची लाडकी लेक!.
आईबापाची लाडकी लेक!.
आपण कोणत्या परिवाराचे सभासद आहात ?.
आपण कोणत्या परिवाराचे सभासद आहात ?.
कोरोनातील भ्रष्टाचार आणि मोदींची भाईगिरी
कोरोनातील भ्रष्टाचार आणि मोदींची भाईगिरी
