गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२

अण्णाजी पंत-फडणवीस महाराष्ट्राचे मित्र की शत्रु ?.

 अण्णाजी पंत-फडणवीस महाराष्ट्राचे मित्र की शत्रु ?.


वर्णव्यवस्था निर्माण करणाऱ्या समाजाला बुद्धाच्या काळा पासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळा पर्यंत थारा नव्हता.तरी ते तीन टक्के शेंडी वाल्यांनी समाजात कटकारस्थान,षंढयंत्र निर्माण करून सत्ताधारी वर्गाच्या राजाच्या विरोधात असंतोष निर्माण करून समाजात दंगली घडविल्या आहेत.त्यात बहुसंख्य लोकांचा रोजगार देणारे उद्योग बुडविला जातो. हीच परंपरा वेगवेगळ्या राज्यात राबविली जाते.त्यासाठी अण्णाजी पंत निर्माण केले जातात. महारष्ट्रात असा अण्णाजी पंत निर्माण झाला आहे.म्हणूनच हा अण्णाजी पंत-फडणवीस महाराष्ट्राचे मित्र की शत्रु ?.असा प्रश्न पडतो.

    अण्णाजी पंत-फडणवीस महाराष्ट्राचा सत्ताधारी झाल्या नंतर या उद्योगांनी महाराष्ट्र सोडला रायगडमधील बल्क ड्रग पार्क,महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र,नागपूर इथलं राष्ट्रीय कामगार शिक्षण मंडळ,जहाज तोडणी उद्योग,पालघरमधील सागरी पोलीस अकादमी,एअर इंडिया मुख्यालय,ट्रेडमार्क पेटंट कार्यालय असे अनेक उद्योग आणि कार्यालयं राज्याबाहेर गेली आहेत.एखादा उद्योग,कार्यालय राज्यातून स्थलांतरित होणं म्हणजे भूमीपुत्रांच्या रोजगारावर गदा येण्यासारखंच आहे. आधीच महागाई आणि बेरोजगारीनं जनता त्रासलीय त्यात उद्योग स्थलांतरित होत राहिले तर याचा थेट परिणाम राज्याच्या विकासावर होऊ शकतो.हिंदुत्वाचा मुखवटा धरण करून मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन सांगणारे अण्णाजी पंत-देवेंद्र फडणवीस रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र केली.ज्या प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात मराठा सरदारांना अण्णाजी पंतानी फितूर केले त्याच पद्धतीने मराठी हिंदू हृद्य सम्राट शिवसेनाप्रमुख यांच्या शिवसेना मधील मराठा आमदारांना इडी इन्कमटॅक्सची भिती दाखवून फितूर केले. मुंबई ते सुरत प्रवास करतांना हिंदुत्वासाठी हा मुख्य मुद्धा होता.सुरत ते गुवाहाटी प्रवास करतांना मुद्धा आमदार निधी कडे वळला,गुवाहाटी ते गोवा प्रवासात मुद्धा पन्नास खोके सर्व ओके कडे वळला.अण्णाजी पंत माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असणार हे जवळ जवळ निश्चित असतांना गोवा ते मुंबई राजभवन प्रवासात काही तरी वेगळे घडले दिल्लीश्वरांनी मी पुन्हा येईन म्हणणाऱ्यांना एक नंबर वरून दोन नंबर वर राहण्यास सांगितले.आणि धोबी का कुत्ता घरका ना घटका झाला.असे चित्र निर्माण केले गेले.पण सत्य चित्र तसे नाही,तर एकनाथाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन सर्व मराठी माणसांची महाराष्ट्राची शिकार हे आण्णाजी पंत देवेंद्र फडणवीस करीत आहेत.हे पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे.त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे वीस दिवसात महा राष्ट्रातून गुजरात मध्ये गेलेला वेदांता-फॉकस्कॉन प्रकल्प होय.

        कोणतीही पूर्व सूचना न देता आदरणीय नरेंद्र मोदींनी २४ मार्च २०२१ देशात सुरु झालेला लॉक डाऊन नंतर चा इतिहास डोळ्या समोर आणा.असंघटीत कामगारांची झालेली दैना विसरू नका.जगात सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजवला होता. जगात ज्या ज्या देशात कोरोना आहे त्या देशातील सत्ताधारी पक्ष,विरोधी पक्ष,नागरिक,डॉक्टर,परिचारिका,पोलिस यंत्रणा,मिडिया,इतर सेवेकरी हे एकत्र येऊन कोरोनाशी लढा देत होते.आणि आमच्या देशात कोरोना विरूद्ध लढा यांची तुलना केली.तर भाजपा प्रणित राज्यात अण्णाजी पंतांचे अष्टमंत्री मंडळ सत्ताधारी नागरिकांना सेवा देतांना उघड उघड पक्षभेद जातीभेदाच्या नांवावर भेदभाव दाखवीत होते. विशेष महाराष्ट्र राज्यातील विरोधी पक्ष फक्त आणि फक्त असहकार आणि सरकार विरोधात आंदोलन करत होता. देश,राज्य जेव्हा संकटात असतो तेव्हा सारे मतभेद विसरून आलेल्या संकटाला एकत्रीत येऊन लढा द्यायचा असतो. हे साधं गणित तेव्हाच्या सुजाण विरोधी पक्षनेत्यानां कळत नव्हते. हे महाराष्ट्राचे व महाराष्ट्रातील जनतेचे दुर्दैव होते.राजकारणात नवखा असलेला मुख्यमंत्री मोठ्या गांभीर्याने परिस्तिथी हाताळत होता.तेच शल्य अण्णाजी पंतांना झोंबत होते.त्यामुळेच त्यांनी शिवसेनेच्या कावळ्यांना पितर घालायला लावले.कारण हिंदू धर्मात रीतीरिवाज परंपरा आहे कि बाप मेला कि पितर म्हणजे श्रध्द घालावे लागते.ज्या बापाने जन्म दिला लहानचे मोठे केले शिक्षण दिले ओळख निर्माण करून दिली त्याच बापाशी जिवंत पणी बेईमानगिरी करणारी मुळे बाप मेल्यावर त्यांच्या नावाचा सातबारा कोरा करून न घेता स्वताच्या नांवे करतात.एकनाथ शिंदे आणि एकोणचाळीस शिवसेना आमदार आज तेच करीत आहे.शिवसेना पक्ष त्यांचे चिन्ह आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अधिकार सांगत आहेत.सातबारा मागत आहेत.हे फक्त अण्णाजी पंत आणि त्यांच्या अष्ट मंडळाच्या सल्ल्याने होत आहे. हे उघड आहे.आजच्या न्यायालयात संविधाना च्या चौकटीत शिवसेनेला योग्य न्याय मिळेल ही अपेक्षा करणे मूर्खपणा ठरेल,

          अण्णाजी पंत देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातील मराठी माणसांची एकच नम्र विनंती आहे. तुर्तास तरी राजकारण बाजूला ठेवून राज्यातील जनतेसाठी नितीमत्ता सामाजिक बांधिलकी ठेऊन काम करा.महाराष्ट्राचे आपण मित्र आहात कि शत्रू हे आपल्या आचरणातून दाखवून देऊ नका. राज्याची जनता तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचते.असेच राजकारण करत बसाल तर हिच जनता तुम्हाला पायदळी तुडविल्या शिवाय राहणार नाही.आज तुम्ही जे जे काम कराल त्यांचा इतिहास लिहला जाणार आहे. अण्णाजी पंत-फडणवीस महाराष्ट्राचे मित्र की शत्रु ?. हे जगातील विचारवंत त्यांची बारकाईने नोंदी करून ठेवतील.
            छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा महाराष्ट्राचा इतिहास मराठा,ओबीसी, मागासवर्गीय,आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाने वाचला नाही.आणि ज्यांनी वाचला त्यांनी सांगितला नाही.शिवसेना प्रमुखांनी तो शिवसैनिकांना वाचायला सांगितला नाही. राजकारणासाठी जय शिवाजी जय भवानी ही घोषणा वापरली.पण इतिहास सांगितला नाही. या बाबत मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड यांच्या कडून खूप मोठ्या प्रमाणात प्रबोधन होत आहे. पण हजारो वर्षाची मानसिकता बदलायला वेळ लागणार आहेच.म्हणूनच पेशव्यांचे वारसदार अण्णाजी पंत-फडणवीस डोके वर काढत आहेत.महाराष्ट्रातील मराठा,ओबीसी, मागासवर्गीय,आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाच्या खांद्यावर उभा राहून भाजपा मोठा झाला.भाजपानी फडणवीस मोठा केला. आज त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अभिमान राहिला नाही.त्याचं बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील मराठा,ओबीसी,मागासवर्गीय,आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाला ही राहिला नाही.असे लिहले तर चुकीचे ठरणार नाही.म्हणून कोरोनाच्या महामारीत नागरिकांना विविध प्रकारच्या सोयी सुविधा,सहकार्य मदतीची गरज असतांना वैचारिक,सामाजिक,राजकीय पक्षभेद,जातीभेद,प्रांतभेद निर्माण करण्याचे काम विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी केले होते.आणि सत्तेवर आल्यावर महाराष्ट्रा पेक्षा गुजरात राज्याची काळजी करणारे अण्णाजी पंत-फडणवीस महाराष्ट्राचे मित्र की शत्रु ?. हा प्रश्न निर्माण होतो.यांचा विचार महाराष्ट्रातील मराठी माणसांनी,पत्रकार,संपादक,साहित्यिक आणि विचारवंतांनी गांभीर्याने केला पाहिजे.
 सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.

ओबीसी चळवळ ही मागासवर्गीय भारताची राष्ट्रीय चळवळ आहे.(आंबेडकरी)

 ओबीसी चळवळ ही मागासवर्गीय भारताची राष्ट्रीय चळवळ आहे.(आंबेडकरी)



दि 18 सप्टेंबर 2022 रोजी लोकशाहीर संभाजी भगत यांनी लोकनेते दि.बा.पाटील यांच्या कुटूंबियांची,पनवेल येथील,"संग्राम" या निवासस्थानी ऐतिहासिक भेट दिली.मागील दोन वर्षे सातत्यपूर्ण चाललेल्या लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण चळवळीत,लोकांना माहीत नसलेले दि बांच्या विचारांचे मूळ सत्य विचार या भेटीतून जगासमोर आले.कालपासून "सत्यमेव जयते वार्ता "या युट्युब चॅनलवर शाहीर संभाजी भगत यांनी दि बांचे चिरंजीव मा.अतुल.दि.पाटील आणि दि बांच्या सुनबाई सौ मनीषा अतुल पाटील यांची मुलाखत क्रमशः तीन भागांमध्ये प्रसिद्ध होत आहे.जिज्ञासू अभ्यासकांनी ती मुद्दामहून पहावी.
   सत्यमेव जयते वार्ता चे संपादक मा अमोल मडामे दैनिक जनतेचा महानायक चे संपादक मा सुनील खोब्रागडे, आगरी कोळी साहित्यिक गजानन म्हात्रे,सुप्रसिद्ध कवी अमोल सोनवले कामोठे,त्याचप्रमाणे आगरी कोळी कराडी संघटनेचे युवा नेतृत्व,ज्यांनी लोकनेते दि बा पाटील नामकरण आंदोलनात समस्त ओबीसी तरुणाईचे संघटन केले असे चेतन डाउर,प्रेम पाटील,किरण पवार हे यावेळी उपस्थित होते.याच वेळी दि बांच्या आंदोलनात सर्वात अग्रेसर असलेले प्रभात पर्व चँनलचे सागर राजे,कैलास गायकवाड,यासिन खान हे उपस्थित होते.ही मुलाखत जशी जशी लोक पाहतील तशी दि बा पाटील यांची वैचारिक ओळख साऱ्या महाराष्ट्राला नव्याने होणार आहे.यात शाहीर संभाजी भगत यांच्या पत्रकारितेचे प्रगल्भ रूप लोकांना पहायला मिळणार आहे.
     आतापर्यंत सिडकोने जबरदस्तीने भूसंपादन करताना इंग्रज मोघल या परकीय शत्रूंपेक्षा जास्त भयानक अत्याचार इथल्या ओबीसी आगरी कोळी कराडी शेतकऱ्यांवर केला होता. त्या लढ्याचे नेतृत्व करणारे दि बा पाटील हे लढाऊ संघर्षशील व्यक्तिमत्व सर्व पत्रकार आणि वृत्तपत्रे यांनी दाखविले होते.देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इथले उच्चवर्णीय क्षत्रिय मराठा मुख्यमंत्री वसंत दादा पाटील विकासाच्या नावे,सिडकोसाठी भूसंपादन करताना,आमचे पाच हुतात्मे घेतील? शेकडोंच्या रक्ताचे पाट वाहतील? हे महाराष्ट्राला अजूनही कळले नसावे.अर्थात मागासवर्गीय ओबीसी शेतकऱ्यांशी स्वतंत्र भारतातील मराठा क्षत्रिय ब्राह्मण वैश्य यांचे देशी सरकार मनुस्मृतीच्या विचारानेच राज्य करते, शोषण करते हे मी अनुभवाने महाराष्ट्रासमोर बोलतो आहे.
    वर्तमानात मराठे हे मागासवर्गीय आहेत? असे सत्याचा विपर्यास करणारे,अनैसर्गिक शोध बामसेफ सारख्या स्वतःस आंबेडकरी म्हणविणार्या संघटनांचे,राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम व इतर विद्वान पुस्तके लिहून सांगत आहेत.त्याचा फायदा घेऊन सरंजामी राजकीय मराठा क्षत्रिय नेते "आम्ही ओबीसी आहोत" म्हणून आता "आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण ध्या" अशी मागणी करत आहेत.आर्थिक निकषानुसार ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या उच्चवर्णीय जातीतील गरिबांना आर्थिक निकषानुसार आरक्षण ध्या,ही मागणी असंविधानिक होती.सामाजिक समतेच्या न्याय तत्वाला विरोध करणारी होती .अर्थात देशातील शोषित ओबीसी एससी एसटी स्त्रिया यांच्या प्रतिनिधींत्वाच्या तत्वाला नाकारणारी होती.ओबीसी मंडल आयोग समजविणारे ओबीसी नेते दि बा पाटील होते.
     डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील विषमता जी हिंदू वैदिक ब्राह्मणी धर्माचा अविभाज्य भाग होती आणि आहे, हे कटू सत्य देशाला सांगून हा विषमतावादी हिंदू धर्म सोडून बौद्ध धम्म स्वीकारण्याचा प्रामाणिकपणा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी स्वीकारला होता.या वाटेवरील बुद्ध मूर्ती घरात ठेऊन त्या विचारांच्या मार्गाने प्रामाणिक नेतृत्व करणारे दीबा याच मुलाखतीत भगवान बुद्ध,छत्रपती शिवराय,महात्मा जोतिबा फुले,क्रांतीज्योती सावित्री माई फुले राजर्षी शाहू महाराज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा घरात ठेवणारे दुर्मिळ आगरी ओबीसी नेते आहेत.हे करीत असताना 1984 च्या आंदोलनात मराठा मुख्यमंत्री वसंत दादा पाटील यांनी केलेल्या गोळीबारात मृत्यमुखी पडलेल्या पाच हुतात्म्यांच्या फोटोना सन्मानित करताना, आगरी कोळी कराडी ओबीसीच्या घरांना,आमच्या साठी मरणारे कार्यकर्तेच पूजेस प्राप्त देव ईश्वर आहेत.हे नवे मानवतावादी तत्वज्ञान देणारे आमचे सद्गुरू दि बा पाटील साहेबच आहेत."हुतात्म्यांचे रक्त वाया जात नाही,वाया जाऊ देणार नाही" ही काळावर विजय मिळविणारी भाषा दि बांसारखे काळजयी नेतृत्व ओबीसी मध्ये आहे हे दाखविण्याचे काम शाहीर संभाजी भगत यांनी केले आहे.
    महाराष्ट्रात आतापर्यंत झालेल्या शिवशाहीर देशमुख देशपांडे पुरंदरे यांनी आपल्या उच्चवर्णीय सडक्या मेंदूतून केवळ आरमारी आगरी कोळी भंडारी या ओबीसींना छत्रपती शिवरायांच्या इतिहासात अस्पृश्य ठेवले नाही?.तर छत्रपती शिवरायांचे रयतेचे मागासवर्गीय भूमिहीन यांचे स्वराज्य आणि सागरी आरमाराचा विचारही मनुस्मृतीच्या तत्वाने नाकारला आहे.हे महापाप करीत असताना हिंदू मुस्लिम द्वेष नवं भारतात पेरला आहे.छत्रपतींच्या आरमारात 50 टक्के सागरी सैनिक मुस्लिम होते.तर 50 टक्के आगरी कोळी भंडारी गबित कराडीओबीसी होते. दर्यासारंग दौलतखान हे आरमाराचे प्रमुख होते हे सांगताना मराठा ब्राह्मण शाहिरीची दातखिळी मनुस्मृतीच्या अर्धांगवायू मुळे बसली होती. हे सत्य सांगणारा प्रबोधनकार आज महाराष्ट्राला हवा आहे."शिवाजी अंडर ग्राउंड इन भीम नगर मोहल्ला" ही शाहीर संभाजी भगत यांनी महाराष्ट्राला दिलेली वैचारिक समतेची देणगी भारताच्या संविधानिक जगण्याची पहाट आहे.शोषितांच्या बाजूने लढणाऱ्या अशा शाहिरीच्या रत्नाना कधी सरकारी "महाराष्ट्र भूषण" पद्मश्री पुरस्कार मिळणार नाही?
त्यासाठी आमचे सरकार म्हणजे संविधानिक सरकारच हवे.तरीही दि बांचे शेतकरी पुनर्वसनातील राष्ट्रीय कार्य नाकारणाऱ्या महाराष्ट्रातील शिवसेना महाविकास आघाडी सरकार आणि केंद्रातील भाजप सरकार खूर्चीसह गदागदा हलविण्याचा पराक्रम दि बांच्या प्रकल्पग्रस्त आगरी कोळी कराडी बौद्ध बारा बलुतेदार यांनी केला.
    हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव महाराष्ट्र सरकारला मागे घेऊन दि बा पाटील यांचे नाव द्यावे लागले.हिंदुत्वाचा पराभव करून पुढे आलेले ओबीसी नेतृत्व दि बा पाटील यांचे नाव यापेक्षा ओबीसींचा दुसरा आणखी कोणता विजय असू शकतो.ओबीसी चळवळीवर रोज व्याख्याने देणाऱ्या नेत्यांना रायगड जिल्ह्यातील हे नामकरण आंदोलन अजूनही कळले नाही ?याचे मूळ हे कृतिशून्य बोलघेवडे पणात दडले आहे.याच मुलाखतीत सहभागी पनवेलचे पत्रकार सागर राजे हे नेहमी एक मुस्लिम कॅमेरामन एक बौद्ध बातमीदार घेऊन पत्रकारिता करतात.येथल्या आगरी कोळी कराडी ओबीसी माणसाच्या घरात वावरणाऱ्या या बौद्ध मुस्लिम बंधुत्वाचे तत्वज्ञान हे दि बांचे सर्वसमावेशक विचार आहेत.शाहीर संभाजी भगत यांचाईतकेच पत्रकार सागर राजे हे मला संविधानिक अभिमानाचे भाऊ वाटतात.
    सिडको विरोधातल्या लढ्यात समस्त ओबीसी एससी एसटी स्त्रिया मुस्लिम बौद्ध या देशातील शोषित मागासवर्गीय लोकांचे संघटन बांधून त्यांना म्हणजे आगरी कोळी कराडी या ओबीसी बांधवाना कुळ कायद्याने प्राप्त जमिनीच विकसित सिडको पुनर्वसन भूखंड देणारे दि बा पाटील हे तुम्हास माहीत असतील.परंतु भूमिहीन शेतमजूर स्थलांतरित बारा बलुतेदार मुस्लिम ईस्ट इंडियन बौद्ध यानाही चाळीस चौरस मीटरचा सिडको भूखंड देणारे दि बा पाटील हे वैदिक हिंदुत्व ब्राह्मण्यवादी मनुवादी विचारांचा भाग असतील का?.तसे असते तर महाराष्ट्रात आणि देशात जे हिंदुत्व वाढते आहे त्यात समस्त मागासवर्गीयावर अल्पसंख्याक यांच्यावर अन्याय अत्याचार वाढलाच नसता.दि बांच्या नामकरण आंदोलनात एमएमआरडीए क्षेत्र ठाणे पालघर मुंबई नवी मुंबई रायगड येथून लाखो आगरी कोळी कराडी भंडारी कार्यकर्ते स्त्री पुरुष तरुण मुले यांचा पाठींबा मिळाला.सर्वपक्षातले लोक एकत्र आले.ही किमया दि बा पाटील यांच्या स्वच्छ प्रामाणिक चारित्र्य शील प्रज्ञा करुणेची आहे.असे शाहीर संभाजी भगत म्हणतात.तर साडे बारा टक्के भूखंड योजना हीच पुढे नव्या भूसंपादन कायदा 2013 या केंद्रीय राष्ट्रीय कायद्यांची निर्मिती आहे.म्हणूनच देशातील समस्त प्रकल्पग्रस्तांना न्याय देणारे दि बा पाटील हे राष्ट्रीय नेते आहेत असे दैनिक महानायकाचे संपादक सुनील खोब्रागडे म्हणतात.असे असले तरीही वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष माजी खासदार आदरणीय बाळासाहेब आबेडकर आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांचा जाहीर पाठींबा दि बांच्या आंदोलनास मिळाला. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आगरी नेते नारायण नागू पाटील यांच्या अलिबागच्या घरी जिताडा बोबिल मासळी भाकरी खात ,ती अस्सल आगरी कोळी भंडारी बंधुता नव्या आंबेडकरी कार्यकर्त्यांनी जपावी असे मला वाटते.दापोली पारगाव पनवेल येथील युवा कार्यकर्ते चेतन डाऊर यांच्या घरी शाहीर संभाजी भगत आणि आम्ही जेवलो यात दि बा पाटील यांच्या घरचा पाहुणचार हा मला खूप जास्त महत्वाचा वाटतो.
  प्रत्यक्ष मुलाखत आणि दि बांचे चारित्र्य विचार हे अस्सल आंबेडकरी आहेत.आज वाढते हिंदुत्व म्हणजेच आमच्यावरील अन्यायच आहे.दि बांच्या सिडको पुनर्वसन योजनेला त्यांच्या मृत्यू नंतरही 100 टक्के पुनर्वसन नाही.मच्छीमार लोकांना 2013 चा कायदा असूनही एक रुपयाचे पुनर्वसन नाही.कोळीवाडा गावठाण यांचा विस्तार आणि विकास नाही.
शेती मासेमारी रेती वीटभट्टी जलवाहतूक हे व्यवसाय उध्वस्त करण्यासच मोदी शिंदे सरकार विकास म्हणत आहेत.आरोग्य शिक्षण आरक्षण नोकऱ्या संपत आहेत.पुनः मनुस्मृतीचेच राज्य सुरू झाले आहे.
   लोकशाहीत सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध करणे हे विरोधी पक्ष म्हणून दि बा पाटील यांनी आम्हाला दिलेला आदर्श आहे.म्हणूनच कामोठे येथील प्रकल्पग्रस्त लोकांनी बांधून दिलेल्या घरातच साधेपणाने त्यांचे चिरंजीव अतुल दि पाटील आणि त्यांच्या पत्नी मनीषा ताई नातवंडे राहतात.अर्थात दि बा पाटील यांच्या घरातील स्त्रिया यांचे योगदान हा खरोखरच आंदोलनातील मोठा आदर्श ठरावा.तो स्वतंत्र मुलाखतीचा मातृसत्ताक विचार आहे.दि बां पाटील यांचा हा संग्राम बंगला हे आम्हा समस्त मागासवर्गीय लोकांसाठी नवे प्रेरणाकेंद्र (तीर्थक्षेत्र) ठरेल,यात कुणाला शंका नको.कुळ कायद्यांचे निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर अप्पासाहेब ना ना पाटील यांनी सुरू केलेली खोती विरोधी चळवळ हीच दि बा पाटील यांची सिडको विरुद्ध आणि ऍड दत्ता पाटील यांची सेझ विरोधातली चळवळ ही आधुनिक शेटजी भटजी याच्याविरोधातली समस्त मागास वर्गीयांची चळवळ आहे.जमीन जंगल समुद्र शिक्षण आरक्षण धर्म चिकित्सा यांची चळवळ आहे.आगरी कोळी भंडारी कराडी ओबीसी यांच्या ओबीसी चळवळीचा धर्म हा संविधानिक राष्ट्रधर्म आहे.
      मोदी फडणवीस पवार अदानी अंबानी या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या मनुवादी विषमता वादी सरंजामी सत्ताधारी उच्चवर्णीयांनी लादलेल्या गुलामगिरी विरोधात आमचे संघर्षनायक लोकनेते दि बा पाटील नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मानकरी आहेतच.
समस्त मागासवर्गीय संविधानिक विचारमध्यमानी त्यांना जगासमोर आणले पाहिजे ही माझी नम्र विनंती आहे.आंबेडकरी कार्यकर्त्यानी अशा ओबीसी कार्यकर्त्यांच्या घरी यावे ही डॉ बाबासाहेब आबेडकर यांनी दिलेली ऐतिहासिक परंपरा संभाजी भगत यांनी जपली.म्हणूनच मी या चळवळीचा भाग आहे.ही कृतज्ञता जपण्यासाठी यापुढे ओबीसी नेतृत्वाने आपले एससी एसटी अल्पसंख्यांक बांधवांना आणि एकविरा मातृसत्ताक तत्वाने समस्त स्त्रियांच्या रक्षणासाठी नवी राजकीय सामाजिक आर्थिक न्यायाची लढाई सुरु करावी, यासाठी मी महाराष्ट्र आणि देशात फिरणार आहे.कारण ओबीसी चळवळ ही हिंदुत्वाची वैदिक मनुवदाची परंपरा नाही तर भारतीय संविधानाची,समतेची खरी खुरी आंबेडकरी चळवळच आहे.जय भीम 

 राजाराम पाटील 8286031463.
केगाव खारखंड उरण जिल्हा रायगड.

वृत्तपत्रांची विचारसरणी आणि अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू

 वृत्तपत्रांची विचारसरणी आणि अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू



        वृत्तपत्रांची कामगिरी ही लक्षवेधी असते,त्यातून ते समाजातील चांगल्या वाईट प्रवृत्तीवर प्रहार करतात,कधी सामाजिक बांधिलकी म्हणून प्रबोधन करतात.समाजात जे दिसते ते तशेच मांडण्याची जबाबदारी ही पत्रकारांची असायला पाहिजे,त्यात सत्यनिष्ठा असली तर माणसं अहिंसा पाळतील आणि तिरस्कार निर्माण करणारी बातमी लेख दिले तर निश्चितच हिंसा झाल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच अज्ञानी माणसांना सज्ञानी करण्याची जबाबदारी ही वृत्तपत्रांची असते,वृत्तपत्र जर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अंधश्रद्धा अज्ञान वाढविण्यासाठी कोरे कागद काळे करत असतील तर माणसं विज्ञानवादी न होता पारंपरिक रीतिरिवाजांचे आंधळेपणाने पालन करणारे मानसिक गुलाम बनत राहतील.हेच काम काही वृत्तपत्र इमानदारीने धंदा न करता.पैशासाठी बुद्धी गहाण ठेवून वृत्तपत्र चालवतात.आणि समाजाला प्रकाशातून अंधाराकडे घेऊन जातात.आधुनिक तंत्रज्ञान वापरून सामाजिक,शैक्षणिक आर्थिक प्रगती करण्याकडे वाटचाल केली पाहिजे कि अधोगतीकडे हे श्रद्धावान बुद्धीजीवी माणसांनी ठरविले पाहिजे.निसर्गाचा नियम आहे जे पेराल तेच उगवते.
           जन्मपासून मुलगा बुद्धीवादी नसतो,पण काही कला कौशल्य जन्मजात आत्मसात करूनच तो मोठा होतो.नंतर तो जशा मोठा होत जातो तसा तो बुद्धीवादी बनतो.आणि निसर्गाच्या नियमानुसार विवेकवादी विचासारणी माणसाला उपजत बुद्धी असते.कोणत्याही गोष्टीचे कुतूहल असते.घडलेल्या घटनांचे निरीक्षण करण्याची आवड असते.त्यातून अनुभव मिळतोत्यावर तर्क बुद्धीने विचार करून ज्ञान मिळते.पत्रकार,संपादक बनतात.संपादक साहित्यिक विचारवंत बुद्धीजीवी म्हणून ओळखले जातात.त्यांनी प्रिंट मिडिया वृत्तवाहिन्या अज्ञान अंधश्रद्धा दूर करणारे लिहले पाहिजे,बोलले पाहिजे,चर्चा संवाद घडवून आणले पाहिजे.कोणाचे ही महत्व जरूर सांगा पटवून द्या पण त्यांचा जन्म कुठे,कधी झाला.आई वडिलांचे नांव गांव,तालुख,जिल्हा राज्य देश.शिक्षण,लग्न झाले असेल तर पतीचे नांव गांव,तालुख,जिल्हा राज्य देश.त्यांचे लग्न झाले म्हणजेच मुल,मुली आलीच मग त्यांची माहिती आलीच पाहिजे.हे सर्व बाजूला ठेऊन त्यांचे महत्व सांगत असाल तर तुम्ही  आधुनिक तंत्रज्ञान वापरून जनतेची वाचकांची उघड उघड फसवणूक करता हे वृत्तपत्रांचे काम नाही सिद्ध होते.हा तर वृत्तपत्रांची विचारसरणी आणि अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू आहे.
          विवेकवाद वस्तुनिष्ठ आहे.विवेवादी तत्त्वे कोणालाही तपासता येतात.प्रत्येक विधानामागे पुरेसा तर्क असतो.म्हणजेच ही तर्कशुद्ध विचारसरणी आहे.विवेकवादी विचार पूर्णतया इहलौकिक असतात.विवेकवाद परलोक मानत नाही.मरणापूर्वी जे घडते तेच अर्थपूर्ण असू शकते.मरणा नंतर जीवन नसतेच.असा हा अनुभवाधारित विचार आहे.धर्म,राष्ट्र,वंश,जात,भेदांवर माणसा माणसात भिंती उभ्या करणाऱ्या भावूक कोत्या निष्ठा विवेकवादाला मान्य नाहीत.मारण्या-मरण्याचे उदात्तीकरण विवेकवादी व्यक्तीला प्रभावित करू शकत नाही.त्यापेक्षा एकमेकांशी संवाद करत समाजात सुधारणा घडवून गुण्यागोविंदाने राहायला जीवन जगायला सांगणारा विवेकवाद्याचा आणि भारतीय संविधानाचा भर असतो. अज्ञान अंधश्रद्धा,पूर्वग्रह,हेकट मनोवृत्ती,अनाठायी आत्मगौरव या प्रवृत्ती विवेकवादात संविधानात बसत नाहीत.त्यालाच खतपाणी घालण्याचे काम वृतपत्र करीत असतील तर वृत्तपत्रांची विचारसरणी आणि अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू जागरूक वाचकांनी लक्षात घेतला पाहिजे.विश्व,निसर्ग नियमांनी मानव प्राणी,पक्षी बांधलेला आहे.माणसाला हे नियम शोधता येतात.वैज्ञानिक पद्धतीने मिळवलेले ज्ञान हे सर्वात विश्वसनीय ज्ञान असते.अशी विवेकवाद्याची धारणा असते.विवेकवाद हा माणसाला स्वतःशी प्रामाणिक राहायला आणि समाजात सामाजिक बांधिलकी ठेऊन जबाबदारीने वागायला शिकवतो. तसेच घेतलेल्या निर्णयावर ठाम राहून त्यामुळे होणाऱ्या परिणामांना धाडसाने सामोरे जाण्याची शक्ती अंगी भिनवतो.त्यातूनच संघशक्ती निर्माण होते.मग ती कुटुंबातील असो,कि राज्यातील देशातील मानवांची,प्राण्यांची पक्षांची असो.
         वर्तमानपात्राशी संबंधित लोकांना एक प्रश्न.जसं सिगारेटच्या जाहिरातीवर "धूम्रपान आरोग्याला हानिकारक आहे" असं लिहावं लागतं तसं काही लेखांखाली "अंधश्रद्धा पसरवायचा हेतू नाही" असं (इशारा कम पळवाट) लिहिण्याचा काही नियम,कायदा,संकेत असतो का?.किंवा लेखकांच्या मताशी संपादक व संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.ते लेखकाचे व्यक्तिगत मत आहे.अनेक लोकप्रिय दैनिकात ऑनलाईन आवृत्तीत नियमित पणे राशी भविष्य असते.पण त्यातून कोणाला किती फायदा झाला किती तोटा झाला कोणी कधीच सांगत नाही.पण काही सरकारी नोकरी करणारे लोक हे राशी भविष्य वाचल्यावर दिवस भराचे काम कसे करावे ते ठरवितात. वृत्तपत्रांत छापून आलेल्या अशा अनेक गोष्टीवर नियमितपणे विश्वास ठेवून कार्यालायचे काम करतातराज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार का होत नाही तर पितृपक्ष सुरु आहे.सध्या पितृपक्षाबद्दल "माहितीचा" मारा अनेक दैनिकात चालू आहे. काय केले तर पितर खुश किंवा नाराज होतील याबद्दल 'मार्गदर्शन' चालू आहे.जिवंतपणी वयोवृद्ध आई वडिलांना चांगले जेवण देऊन सेवा न करणारे सुशिक्षित मुल मेल्यानंतर इमानदारीने विविध स्वादिष्ट पदार्थ बनवून कावळ्याला पात्र भरवतात. कावळ्याची संख्या लक्षात घेऊन पितर हे केवळ कावळा नाही तर गाय,कुत्रा या रूपांमध्येही येऊ शकतात असे संदर्भ देऊन सांगितल्या जाते.अर्थातच हे "मागणी तसा पुरवठा" यानुसार चालू असेलच.पण मग याच्या खाली नेहमी विशेष टीप- सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही असं का छापल्या जाते. म्हणजेच एकावेळी इतक्या अज्ञान अंधश्रद्धा रीतीरिवाज परंपरा वापरून ही आधुनिक तंत्रज्ञान वापरून विज्ञानावर विश्वास का ठेवला जातो.म्हणूनच वृत्तपत्रांची विचारसरणी आणि अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू जागरूक वाचकांनी लक्षात घेतला पाहिजे.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.

मराठी हिंदू ह्र्दय सम्राटाची दहशत कोणी संपली???.

 मराठी हिंदू ह्र्दय सम्राटाची दहशत कोणी संपली???.



     मराठी माणसांच्या न्याय हक्कसाठी स्थापन झालेली शिवसेना आणि तिचे संस्थापक शिवसेना प्रमुख यांनी मुंबई ठाण्यातील मराठी तरुणांना प्रस्थापित राजकीय पक्षाच्या विरोधात मूलभूत समस्यावर हल्ला बोल करून स्थानिक नगरसेवक,आमदार,खासदारांना जेरीस आणले होते,कायदेशीर कायदेकानुन सनदशीर मार्गाचा अवलंब न करता तोडफोड करून दंगली घडवून दहशत निर्माण केली होती. स्थानिक मराठी लोकाधिकार समितीच्या नांवाने सर्व ठिकाणी परप्रांतीय कामगारंची होणारी भारती याविरोधात प्रस्थापित कामगार संघटना,युनियनच्या विरोधात संघर्ष करून मराठी तरुणांना नोकरीत घेण्यास भाग पाडले होते. कंपनीचा मालक असो की व्यापारी, बिल्डर,बँक मॅनेजर यांच्या घरात कार्यालयात घुसून तोडफोड करून तोंडाला काळे फासून दहशत निर्माण केली होती.त्याविरोधात पोलीस स्टेशन मध्ये तक्रारी नोंदी झाल्या पण ठोस कारवाई झाल्याची नोंद नाही.त्यावर उपाय योजना करण्यास सत्ताधारी राजकीय पक्ष अपयशी ठरले. त्यामुळेच स्थानिक पातळीवर दहशत निर्माण करणारी शिवसेना मुंबई ठाणे महानगरपालिका मध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यास यशस्वी झाली. त्यांचे शाखा प्रमुख नगरसेवक झाले,नगरसेवकांचे आमदार झाले.त्यांनी दलित मुस्लिम समाजा विरोधात सतत गळल ओकली त्यामुळे मराठी हिंदू ह्र्दय सम्राटावर अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले.त्यावेळी शिवसेना प्रमुखांची जाहीर धमकी होती माझ्या केसाला हात लावला तर उभा महाराष्ट्र पेटेल!.किंवा पेटून टाकील आणि त्यांचे परिणाम वाईट होती.या वक्तव्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था कायमस्वरूपी धोक्यात आली होती.पोलीस अधिकारी प्रत्येक वेळी कारवाई करण्यात मोठा धोका आहे असे रिपोर्ट सत्ताधारी पक्षाच्या गृहमंत्री,मुख्यमंत्री यांना सादर करीत होते.यामुळेच मराठी हिंदू ह्र्दय सम्राटाची दहशत राज्यात होती ती आता संपली.ती एवढा लवकर संपेल ही मराठी माणसांना अपेक्षा नव्हती.
        सहा डिसेंबर 1956 पासून दादरच्या चैत्यभूमी शिवाजी पार्क परिसर दरवर्षी पंचवीस तीस लाख लोक विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनाला वंदन करण्यासाठी येतात.त्यांचे रिकार्ड मराठी हिंदू ह्र्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर संपून जाईल असे अनेक मराठा समाजाचे स्वताला सुवर्ण समजणारे कट्टरपंथीय शिवसैनिक म्हणत होते.कारण स्वताला सुवर्ण समजणाऱ्या मराठा समाजाच्या रक्तात दलित मुस्लीम समाजा विरोधात जहर पेरण्याचे काम मराठी हिंदू ह्र्दय सम्राट बाळ ठाकरे यांनी केले होते.जे बाळ कडू पाजले होते ते आज ही कायम आहे.त्याला निमित्य होते २७ जुलै१९७८ ला मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ हे नांव देण्याचा विधानसभा विधानपरिषद मध्ये एकमताने मंजूर झालेला ठराव.त्यामुळेच मुंबई ठाण्यापुरती मर्यादित असलेली शिवसेना ग्रामीण भागातील खेड्या पाड्यात "जय शिवाजी जय भवानी" घोषणा घेऊन पोचली.त्यात मराठा ओबीसी समाजाचे गांवगुंड असलेले पोर शिवसैनिक झाले.त्याची सुरवात ठाण्यातून झाली.सध्या गाजत असलेल्या धर्मवीर सिनेमात पोलीस अधिकाऱ्यांनी पकडलेल्या गुंडांना सोडविण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे साहेब येतात आणि सांगतात हे तुमच्या रिकार्ड मध्ये गुंड असतील पण ते माझे कट्टर शिवसैनिक कार्यकर्ते आहेत.तोच रिक्षावाला वाहन चालक,नगरसेवक आमदार शिवसैनिक आज मराठी हिंदू ह्र्दय सम्राटाची दहशत संपविण्याचे काम आर एस एस प्रणित भाजपच्या आशीर्वादाने शहरातून ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील शिवसैनिकांना भष्टाचारी गुन्हेगारीतुन जमा केलेल्या बेहिशेबी मालमत्तेतुन पाप मुक्त करण्याचे पुण्यकर्म करीत आहेत.आणि देशभरात शिवसेनाप्रमुख नावाची साठ वर्षाच्या मराठी हिंदू ह्र्दय सम्राटाची दहशत संपविण्याचे काम करीत आहे.
          प्रिय मराठी वाचक बांधवांनो,अनेक कामगार,कर्मचारी अधिकारी वाट्साप ग्रुपवर कृपया राजकीय पोस्ट टाकणे बंद करा असे म्हणतात.ते सर्वच मराठी आहेत,त्यात मराठा ओबीसी जास्त असतांना ही ते शिवसेनेच्या राजकीय कुरघोडीवर घरफोडीवर चर्चा करण्यास मनाई करतात. त्यामुळे आपल्यात कामगार,कर्मचारी अधिकारी वर्गात मतभेद होऊन संबंध गढूळ होणार अशी शंका घेतात.त्यासाठी राजकीय पोस्ट टाकून चर्चा करू नये असे म्हणतात. कंपनीत कार्यालयात आपण कामगार कर्मचारी अधिकारी आहोत पण बाहेर तर आपण मतदार,नागरिक,कोणत्या तरी समाजाचे आणि वैचारिक पक्षाचे समर्थक असतोच नां?.मग त्यावर मत व्यक्त करण्यात काय वाईट आहे,शेवटी प्रत्येकाचे विचार स्वातंत्र्य अबाधित आहेच,इतरांनी व्यक्त केलेले मत पटलं पाहिजेच ही अपेक्षा नसावी.विज्ञानवादी कंपनीतील कामगार,कर्मचारी अधिकारी वर्गाने अज्ञानी असता कामा नये,सद्विवेकबुध्दी सर्वच ठिकाणी वापरी पाहिजे,कोणतेही इलेक्ट्रॉनिक मशीन कॉम्पुटर,पी सी ओ,झेरोक्स मशीन,प्रिंटर,स्मार्ट मोबाईल,देशातील आणि जगातील नामांकित तंत्रज्ञान कंपन्या बाजारात एकापेक्षा एक लॅपटॉप ऑफर करत असतात. आजकाल लॅपटॉप गरजेचा झाला आहे. शाळा-कॉलेजचे क्लासेससाठी लॅपटॉप अत्यावश्यक बनला आहे.आणि यामुळेच गेल्या काही दिवसात लॅपटॉप्सची मागणी देखील प्रचंड वाढल्याचे पाहायला मिळत आहे. तुम्ही जर नवीन लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला बाजारात उपलब्ध काही चांगल्या लॅपटॉप्सबद्दल माहिती देत असली पाहिजे.आपण वापरण्यापूर्वी त्यांची टेस्टिंग करतो.त्यातील प्रत्येक भागाची क्षमता,चेकिंग करून पाहतो. नंतर त्यांची सर्विस कशी आहे हे पाहतो.मग विकत घेतो की नाही. मग आपण आपले कुटुंब,जिथे राहते ते नगर सोसायटी,विभाग तेथील सामाजिक,शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय परिस्थिती यावर चर्चा केली आणि अज्ञान दूर करून सज्ञान झाले तर काय वाईट आहे?.
      मित्रांनो सोशल मिडिया हा फक्त मित्राचा ग्रुप नसतो.तर एक खुले व्यासपीठ असते. त्यात आपल्याला माहिती असलेली माहिती मित्रांना देऊन सावध करता येते.मित्रांचे त्याच्या कुटुंबाचे रक्षण स्वरक्षण करता येऊ शकते. जर रेल्वे स्टेशन बाहेर राजकीय कार्यकर्त्यांनी तोडफोड केली,जाळपोळ केली त्यामुळे वाहतूक ठप्प झाली तर आपण काय केले पाहिजे?. ही विचारांची देवाणघेवाण आहे,चर्चा आहे त्यात व्यक्तिगत पातळीवर घेऊ नये,तुम्ही तुमचे कुटुंबातील सदस्या काँग्रेस,शिवसेना,भाजपा,राष्ट्रवादी काँग्रेस,मनसे किंवा अन्य कुठल्याही पक्षात असतील.जात धर्म भाषा प्रांत म्हणून कोण्या एका पक्षाचे समर्थन करत असाल त्यात काहीच गैर नाही.तो तुमचा अधिकार आहे.ती तुमची पसंती आहे.त्या बद्दल कोणाचे काहीही म्हणणे नाही.परंतु माझ्या मराठी बांधवांनो अहो ज्या मातीत तुम्ही जन्मले आहात. त्या महाराष्ट्राच्या मातीत तुमच्या आजोबा पणजोबांनी राख मिसळली आहे.ती तुमची महानगरी महा राष्ट्र आहे.छत्रपती शिवाजी महाराजांची मातृभुमी आहे.ज्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी आपले रक्त या मातीत सांडले आहे.त्याच मराठी भाषिक राज्याचे कोणी तुकडे पडण्याचे स्वप्न पाहत असेल तर?. आपण शांत बसून राजकारण पाहत राहणार काय?.त्यासाठीच महाराष्ट्राच्या नकाशात डळकारी फोडणारा वाघ आणि मराठी हिंदू ह्र्दय सम्राटाची दहशत राज्यात हवी होती. ती आता पोलीस रिकार्ड मध्ये गुंड असलेले कट्टर शिवसैनिक म्हणणारे रिक्षावाला वाहन चालक,टपरीवाले,नगरसेवक आमदार शिवसैनिक आज मराठी हिंदू ह्र्दय सम्राटाची दहशत संपविण्याचे काम भष्टाचारी गुन्हेगारीतुन जमा केलेल्या बेहिशेबी मालमत्तेतुन पापमुक्त होण्यासाठी करीत आहेत.आणि देशभरात शिवसेनाप्रमुख नावाची साठ वर्षाच्या मराठी हिंदू ह्र्दय सम्राटाची दहशत संपविण्याचे काम करीत आहे.ती ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणारी बलाढ्य शिवसैनिकांची शिवसेना एवढा लवकर संपेल ही मराठी माणसांना अपेक्षा नव्हती.आम्ही शिवसेनेच्या हिंदुत्वादी विचारांचे विरोधक होतो.आणि आज ही आहोत.पण मराठी माणसांच्या स्वाभिमानी जगण्यासाठी महाराष्ट्रात प्रबोधनकार ठाकरेंनी स्थापना केलेली शिवसेना आज ही हवी आहे.अन्यता हे ब्राम्हण बनिया जातभाई मुंबई सह महाराष्ट्र गिळकृत कारणासाठी १९६० साला पासून टपून बसले आहेत.पोलीस रिकार्ड मध्ये गुंड असलेले कट्टर शिवसैनिक म्हणणारे आमदार खासदारांनी स्वार्थासाठी शिवसेनेच्या अस्तित्वाला सुरुंग लावत आहेत. हे मराठी माणसांसाठी महाराष्ट्रासाठी खूप वेदनादायक आणि भविष्यासाठी प्रचंड नुकसान करणारे आहे.
           मुरारजी देसाई चे स्वप्न मराठी माणसांनी प्रचंड जनांदोलन करून १०६ हुतात्मानी उधळून लावले.तेव्हा पासून गुजरातचे गुजर मारवाडी बनिया ब्राह्मण आपल्या राज्यातील उद्योग धंदे गुजरात कडे घेऊन जाण्याचे प्रयत्न करीत होते. त्याला मराठी हिंदू ह्र्दय सम्राटाची दहशत होती.तीच आमदार कट्टर शिवसैनिक आज मराठी हिंदू ह्र्दय सम्राटाची दहशत संपविण्याचे काम आर एस एस प्रणित भाजपच्या आशीर्वादाने करीत आहेत.देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदीच्या नियोजनबद्ध योजनेनुसार राज्यातील उद्योग धंदे गुजरातला  पळवत असतील तर त्या कृतीचा मराठी माणसांनी पक्ष संघटना विसरून विरोध केलाच पाहिजे.आर एस एस प्रणित संस्था संघटना आणि भाजप पक्ष यांच्या हिंदुत्वादी मराठी माणसांना मोदीच्या निर्णयाचा विरोध करायचा नसेल तर तो त्यांनी करू नये.पण महाराष्ट्रात त्यांना भविष्यात राजकारणात किर्याशील राहायाचे आहे हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. आज मराठी हिंदू ह्र्दय सम्राट जिवत असते तर त्यांनी कट्टर शिवसैनिकांना आदेश दिला असता "जिथे दिसतील तिथे तुडवा" त्यांची अंमलबजावणी शिवसैनिकांनी ताबडतोब केली असती.महाराष्ट्राच्या नकाशात डळकारी फोडणारा वाघ हिंसक झाला असता. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिगाडली असती आणि हे शिवसेनेशी गद्दारी करणारे घराच्या बाहेर पडले नसते त्याच बरोबर यांना फितूर करणारे रात्री तोंड लपूनछपून फिरणारे सुद्धा दिवसा फिरण्याची हिंमत करू शकले नसते.याचा भाजपा समर्थक मराठी माणसांनी मतदारांनी विचार केला पाहिजे.
        भाजपा समर्थक मराठी मतदारांनी आज लक्षात घ्यावे की आज त्यांचे समर्थन करत असाल तर उद्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही ते गुजरातला घेऊन जातील.कारण त्यांना माहीती आहे.आपण कीतीही चुकीचे केले तरी आपले भक्त आपले समर्थनच करतील.माणुस किती ही वाईट आणि किती ही निच मनोवृत्तीचा असला तरी काही ही झालं तरी तो आपल्या घराचा राज्याचा देशाचा चांगलाच विचार करतो.परंतु आपल्या महाराष्ट्रातील नेत्यांनी तर लोकलज्जा शर्मच सोडली आहे. ज्या भाजपाला महाराष्ट्राने १०५ आमदार व २२ खासदार दिलेत ते १०५ आमदार व २२ खासदार सुध्दा आपल्या राज्याचा विचार करत नसतील तर यांना मतदारांनी धडा शिकविला पाहिजे. 
वेदांत फॉक्सकॉर्न प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरात मध्ये गेल्याने आपल्या राज्याचे १,५४.००० कोटी रुपयांचे नुकसान झाले.महाविकास आघाडी सरकारने हा प्रकल्प राज्यात यावा यासठी अनेक प्रयत्न केले.उद्योग मंत्री सुभाष देसाई,अतिरिक्त मुख्य सचिव (उद्योग) बलदेव सिंग आणि एम.आय.डी.सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पी. अनबलगन यांच्यासह मंत्र्यांनी खूप वेळा कंपनीच्या अधिकाऱ्या भेटा घेऊन सोबत बैठका घेतल्या होत्या. वेदांत फॉक्सकॉर्न कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तळेगाव दाभाडे पुणे येथे जमिनीचे सर्वेक्षण सुद्धा केले होते. हीच जागा संपूर्ण देशातील सर्वाधिक कशी उपयुक्त आहे हे म्हटले होते.२१ जून २०२२ रोजी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या सत्ता बदल घडविण्याच्या घडामोडी झाला नंतर विधानसभेच्या अधिवेशनात तशी अभिमानाने घोषणा केली होती.वेदांत फॉक्सकॉर्न प्रकल्प महाराष्ट्रात होणार निश्चित असतांना अचानक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ५ सप्टेबर २०२२ रोजी वेदांत समूहाच्या अध्यक्षांची भेट घेतली आणि ८ दिवसाच्या आत १३ सप्टेंबर २०२२ रोजी हा प्रकल्प गुजरातला मिळाला.त्यामुळेच महाराष्ट्रावर झालेल्या अन्यायामुळे महाराष्ट्रातील सर्व पक्षीय कार्यकर्ता,नेता आणि मराठी माणूस पेटून उटला पाहिजे होता.पण तो कुठे ही तो दिसत नाही.त्यामुळेच महाराष्ट्राच्या नकाशात डळकारी फोडणारा वाघ आणि मराठी हिंदू ह्र्दय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज क्षणा क्षणाला आठवण येते. मराठी हिंदू ह्र्दय सम्राटाची दहशत राज्यात होती ती आता संपली.ती एवढा लवकर संपेल ही मराठी माणसांना अपेक्षा नव्हती. शेवटी इतिहासात मराठी हिंदू ह्र्दय सम्राटाची दहशत कोणी संपली???. असा प्रश्न विचारला जाईल.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.

खरे शिक्षण सम्राट कर्मवीर भाऊराव पाटील

 कर्मवीर भाऊराव पाटील जन्म २२ सप्टेंबर १३५ व्या जयंतीनिमित्त 

खरे शिक्षण सम्राट कर्मवीर भाऊराव पाटील


            गात शिक्षण देणारया संस्था खुप आहेत.आणि त्या संस्थाचे उदिष्ट पैसा कमविणे हाच असतो.ह्या सर्व खाजगी कंपन्या झाल्या आहेत.सुजाण नागरिक घडविणे आणि देशाचा विकास करण्याचा उदेश या शिक्षण संस्थाच्या संचालकाचा प्राध्यापक, शिक्षकांचा नाही.विद्यार्थी दसे पासूनच जर विद्यार्थांना प्रवेश घेताना भष्ट्राचार करून शिक्षण घेत असतील तर पुढे कोणत्याही पदव्या त्यांनी घेतल्या तर त्याचा उदेश फक्त पैसा कमविणे हाच असणार आहे.त्यांना देशाच्या विकासाशी कोणते ही देणेघेणे नाही. दिनाक ४ ऑक्टोबर १९१९ ला कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील काले या गावी केली. त्यावेळी १९१९ ला त्यांचे उदिष्ट लक्षवेधी होते. १) शैक्षणिक दुष्ट्या गोरगरीब मागासवर्गीय समाजात शिक्षणाची आवड निर्माण करणे आणि ते वाढविण्यास मदत करणे.२) मागासलेल्या समाजात गरीब मुलांना मोफत शिक्षण देणे.३) निरनिराळ्या जाती धर्मातील विद्यार्थ्यांत बंधुभाव निर्माण करणे. ४) अयोग्य रूढींना फाटा देऊन खर्‍या विकासाचे वळण लावणे.५ ) संघशक्तीचे महत्त्व जरूर तर कृतीने पटवून देणे.६ ) सर्व मुले काटकसरी, स्वावलंबी,शीलवान व उत्साही बनवण्याचा प्रयत्न करणे.७ ) बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी जरूर पडेल तसे संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे, तर समता, बंधुता,श्रमप्रतिष्ठा,सामाजिक बांधिलकी आदि मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली. असे शिक्षण देणारे संस्था संचालक शोधून हि सापडणार नाहीत..रयत शिक्षण संस्था ही भी आज सत्यशोधक महात्मा फुलेच्या वैचारिक वारसदार भाऊराव पाटील यांच्या धेय्य धोरणा नुसार चालत नाही या संस्थेत पूर्ण चातुर्वर्ण आणि गर्वसे कहोचा चा बोलबाला आहे.
            कर्मवीर भाऊराव पाटील जन्म २२ सप्टेंबर १८८७; कुंभोज,जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र येथे झाला.ते मराठी समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापली.भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून 'कमवा व शिका' हे कल्पना स्वीकारून मोठे काम केले. ते महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते.आणि त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग घेतला होता. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर  जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला. सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक हे त्यांचे मूळ गाव होय.लहानपणा पासूनच भाऊराव बंडखोर वृत्तीचे होते. अन्याय अत्याचाराची त्यांना प्रचंड चीड होती.अस्पृश्यता पाळणाऱ्या बद्दल त्यांच्या मनात प्रचंड राग होता. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता.त्यांचे  प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा या गावी झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूल मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला होता.पुढील काळात भाऊराव पाटील साताऱ्यात  जाऊन शिकवण्या घेऊ लागले. याच काळात त्यांनी मदवानमास्तर,भाऊसाहेब कुदळे,नानासाहेब येडेकर आदि मंडळीं बरोबर दुधगावात ‘दुधगाव शिक्षण मंडळ’ स्थापन केले होते. याच संस्थेमार्फत सर्व जाती धर्मांच्या मुलांसाठी एक वस्तीगृह त्यांनी सुरू केले होते. रयत शिक्षण संस्थेचे बीज येथेच रोवले गेले.पुढे त्यांनी  ओगल्यांच्या काच कारखान्यात व किर्लोस्करांच्या नांगराच्या कारखान्यात काही काळ काम केले.याच काळात त्यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्याशी जवळून संबंध आला होता.त्यामुळे त्यात त्यांनी समाजात परिवर्तन घडविण्या साठी प्रथम शिक्षण संस्थाची सुरवात केली.त्याच्या कार्याला डॉ नागनाथअण्णा नायकवडी यांनी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाची प्रथम देणगी देऊन मोलाचे सहकार्य केले.आणि इतिहास लिहला गेला.
            मागासवर्गीय समाजाच्या मुलामुलीला शिक्षण घेण्या साठी साताऱ्यात भाऊराव पाटील यांनी एक मोठे वसतिगृह स्थापन केले. हे वसतिगृह चालवण्यासाठी त्यांच्या पत्नीस स्वतःचे मंगळसूत्र व दागिनेही विकावे लागले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी वसतिगृहे व शिक्षण संस्था चालविण्याचा यशस्वी प्रयोग केला होता. या कार्यात त्यांना त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांची अतिशय मोलाची साथ लाभली होती. २५ फेब्रुवारी,इ.स. १९२७ रोजी महात्मा गांधींच्या हस्ते या वसतिगृहाचे "श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस" असे नामाभिधान केले गेले. महात्माजींनी संस्थेला आपल्या हरिजन सेवक फंडातून वार्षिक ५०० रुपयांची मदत सुरू केली.जून १६,इ.स.१९३५रोजी रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत (रजिस्टर) झाली. याच साली साताऱ्यात भाऊरावांनी 'सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज' सुरू केले.करवीर नगरीत सत्यशोधक समाजाचे आधारस्तंभ राजर्षी शाहू महाराज होते. त्यांनी आपल्या  संस्थानात प्रजेचा कायापालट घडवून आणण्‍यासाठी सत्यशोधक  चळवळीच्या विचाराचे लोक खेडोपाडी पसरवले होते. कर्मवीर अण्णा तर राजर्षी  शाहू महाराजांच्या तालमीतच तयार झाले होते त्यांनी सातारा या क्रांतीकारकांच्या जिल्ह्यात  सत्यशोधक चळवळीचा प्रसार आणि प्रचार केला. सत्यशोधक समाजाच्या विचाराने भारावलेली एक पिढी त्यांनी घडविली.जेव्हा  सातारा जिल्ह्यात सत्यशोधक  समाजाने लोक जागृतीसाठी  जलसे काढले तेव्हा भाऊरावांनी डफ वाजवण्यासाठी मागेपुढेही  पाहिले नाही.सन १९१९ साली सातारा जिल्ह्यातील काले नावाच्या एका खेडयात सत्यशोधक समाजाचे अधि‍वेशन घेतले होते. या अधिवेशनाच्या विचारपीठावर  कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ग्रामीण जनतेच्या शिक्षणासाठी एक खास  संस्था काढण्याची कल्पना  मांडली आणि ठराव रुपाने त्या अधिवेशनात त्यास मान्यता मिळाली. अशा रितीने रयत शिक्षण संस्थेचे बीज सत्यशोधक समाजाच्या विचारपीठावर रोवले गेले.  वृक्षाखाली गौतम बुध्‍दांना  ज्ञान प्राप्त झाले.बहुजन  हिताय ! बहुजन सुखाय !! हे गौतम बुध्‍दांचे संदेश आहे म्हणून संस्थचे बोधि‍चिन्ह वटवृक्ष आहे.
           देशातील भाऊरावांनी देशातले "कमवा आणि शिका" या पद्धतीने चालणारे पहिले 'फ्री अन्ड रेसिडेन्शियल हायस्कूल' सातारा येथेच सुरू केले आणि त्याला नाव दिले 'महाराजा सयाजीराव हायस्कूल.' यानंतर शाळांची मालिकाच महाराष्ट्रभर सुरू झाली. १९४७ साली भाऊराव पाटलांनी साताऱ्यात 'छत्रपती शिवाजी कॉलेज' ची, तर १९५४ साली कराड येथे '(संत )सदगुरू गाडगे महाराज कॉलेज' ची स्थापना केली. शाळा व महाविद्यालयांसाठी प्रशिक्षित शिक्षकांची उणीव जाणवू लागली म्हणून त्यांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक विद्यालय व पुढे १९५५ मध्ये सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावाने 'आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन' सुरू केले. या सर्व शाळांच्या, महाविद्यालयांच्या व वसतिगृहांच्या स्थापने मागे शिक्षणाचा प्रसार व त्यातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हीच उद्दिष्टे कर्मवीर भाऊरावांच्या डोळ्यासमोर होती. त्यांच्या एकूण कार्याचा आढावा घेतला असता त्यांच्यावरील महात्मा ज्योतीराव फुले यांच्या विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. महात्मा ज्योतीराव फुले यांना गुरू मानूनच त्यांनी शैक्षणिक प्रसाराचे कार्य केले. "प्रत्येक गावात शाळा"; 'बहुजन समाजातील शिक्षक' व शिक्षक प्रशिक्षण - या सूत्रांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.हाच आदर्श मराठा समाजा ने कायम डोळ्या समोर ठेवला असतात तर आज राज्यात मराठा समाजाला आरक्षण मागण्याची वेळ आली नसती. कारण आज राज्यात नव्हे तर देशात शाळा महाविद्यालय जरी मराठा समाजाच्या असल्या तरी त्याची शिक्षण देणारी यंत्रणा भटा ब्राम्हणाच्या हाती आहेत. त्यांना बहुजन हिताय बहुजन सुखाय नको आहे.
           महाराष्टाच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला.तसेच केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले.पुणे विद्यापीठाने त्यांचा १९५९ मध्ये सन्माननीय  डी.लिट.ही पदवी दिली होती.हा ऐतिहासिक इतिहास बहुजन समाजातील लोक विशेष मराठा समाजातील तरुण वाचत नाही.म्हणून त्यांना सांगावे वाटते जो इतिहास वाचतो तोच इतिहास घडविण्यासाठी झटतो. मागासवर्गीय समाजाची शिक्षण आणि नोकरीतील प्रगती पाहून त्याचे आरक्षण बंद करण्या करिता नाना प्रकारे जनांदोलन उभारल्या जाते.त्यांनी मागासवर्गीय समाजात सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक बदल घडविण्या साठी फुले,शाहू,आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचा ऐतिहासिक त्याग आणि संघर्ष आहे हे कोणी विसरू नये. खरे शिक्षण सम्राट कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या २२ सप्टेंबर जयंती असते.पण मुंबईसह राज्यातील मराठी वृतपत्र कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती दिनाची साधी दखल घेत नाही.यांची खंत वाटते.म्हणजे किती मराठी पत्रकार संपादक कोणत्या संताची महापुरुषांची दाखल घेवावी या बाबत दक्ष आहेत हे दिसून येते हा लेख जयंतीनिमित्त दरवर्षी लिहतो असतो. त्यांची दखल काही वृतपत्र घेऊन लेख प्रसिद्ध करतात.त्यांचे हार्दिक अभिनंदन.जे करीत नाही त्यांचं बद्दल खंत वाटते. इतिहास लपविला म्हणजे तो खोटा ठरत नाही किंवा त्याचे महत्व कमी होत नाही.मंदिरावर लिहणारे पत्रकार,साहित्यिक,विचारवंत खूप आहेत.पण शाळा कॉलेजची आजची परिस्थिती तिची दिशा आणि दशा यावर लिहतांना फारसे कोणी दिसत नाही.म्हणूनच आजच्या परिस्थितीत कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षण क्षेत्रांतील कार्य अजरामर आहे. आणि राहणार आहे. आजच्या शिक्षण क्षेत्रातील संस्था संचालकांनी,प्राध्यापक,शिक्षक यांनी प्रेरणा घेऊन प्रबोधन करावे. कर्मवीर भाऊराव पाटील त्यांच्या क्रांतिकारी विचारांतून आजच्या विध्यार्थांना प्रेरणा मिळू शकते आणि तेच देशाचे सुजान नागरिक घडू शकतात. अशा खऱ्या शिक्षण सम्राटांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या क्रांतिकारी विचारांना व प्रतिमेला त्रिवार अभिवादन, वाचकांना हार्दिक शुभेच्छा.

बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२

गणपती बाटवणाऱ्या महारांना धडा शिकवा.

 गणपती बाटवणाऱ्या महारांना धडा शिकवा.



चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..!.म्हणून गणपती बुडवायची पद्धत सुरु झाली...! प्रिय वाचक मित्रांनो,शिवजयंती बंद पडणारे व गणेश उत्सव सुरु करण्याचे जनक बाळ गंगाधर टिळक.यांनी गणपती बसविला.दहा दिवसांपर्यंत सभा - सम्मेलने घेतली.दहाव्या दिवशी बसवलेल्या गणपतीची पुण्यातून वाजत गाजत मिरवणुक निघाली. त्यात दर्शन खुले होते.एका चर्मकाराने (चांभार) गणपती जवळ जाऊन चक्क मुर्तिला स्पर्श करुन दर्शन घेतले..!.मिरवणुकीतील सर्व ब्राम्हणांनी एकच बोभाटा केला.गणपती बाटला,गणपति बाटला म्हणुन सर्वजन टिळकांवर खेकसायाला लागले."हे पहा, सर्वाना दर्शन खुले केले तर हे असे होते. धर्म बुडाला,चांभाराने धर्म बुडविला..!" तोपर्यंत मिरवणुक पुण्याबाहेर आली होती.टिळक म्हणाले - "ओरडु नका. धर्म कशाला बुडु द्यायचा. त्यापेक्षा आपण या बाटलेल्या मुर्तिलाच विसर्जित करू (म्हणजे पाण्यात फेकून बुडवून टाकू!.)" अश्याप्रकारे तो चांभाराच्या स्पर्शाने बाटलेला गणपती बुडवला गेला आणि तेंव्हापासून दरवर्षी गणपती बुडवायची पद्धत सुरु झाली..!.संदर्भ डॉ. नरेंद्र दाभोळकर.सत्य सांगतात म्हणून गोळी मारून शरीराने संपविले पण विचाराने आज ही जिवंत असलेले व्यक्तीमत्व.
    आजच्या जमान्यात सर्वात जास्त मागासवर्गीय ओबीसी,भटके विमुक्ते जाती जमातीचे,चांभार,महार,मांग,एस सी,एस टी,महाराचे बौद्ध झाले सुशिक्षित गद्दार आज घरात गणपती उत्सव पांच,दहा दिवस साजरा करतांना दिसतात.ते स्वतच्या धर्माशी गद्दारी करताचं पण ब्राम्हणाच्या प्रवित्र देवाची विटंबना करून बाटवता.असा गणपती बाटवणाऱ्या महारांना धडा शिकवला पाहिजे.
    आज आम्ही थोडे धाडस दाखविले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन मंच भांडूपच्या धम्म उपासक शिबिरातून तयार झालेल्या धम्म उपासिका,उपासक आणि बौद्धचार्य यांच्या सहकार्याने सहभागाने गणपती बसविणाऱ्या कुटुंबातील प्रमुख लोकांना भेटलो,ते त्या विभागात 5 ते 7 वर्षा पासुन घरात गणपती बसवतात,त्यांना कोणीचं रोखण्यासाठी पुढे आले नाही.किंवा कोणी हिंमत दाखवली नाही.तर आपण कोण?.हा संघर्ष उभा राहिला होता.तेव्हा स्थानिक पातळीवरील महिला आक्रमक भूमिका घेऊन एकमेकां समोर उभ्या राहिल्या.तेव्हा आम्ही दोघांना शांत करून चर्चा केली.ज्यांना वाटते आपण व्यक्तिगत प्रश्न म्हणून गणपती बसवावा तर त्याने तो बसवावे, मंडळांचे काम करावे आनंदाने सहभागी व्हावे, त्याला आमचा विरोध नाही,पण त्यांनी दोन दगडावर पाय ठेऊन एका बाजूला मागासवर्गीय ओबीसी,एस सी,एस टी,व्ही जे एन टी जाती धर्माचे सांगून शिक्षणात, नोकरीत आणि इतर सर्व ठिकाणी सवलती घ्याच्या आणि दुसरीकडे कट्टरपंथीय हिंदू म्हंणून गणपती बसवायचा त्यांच्या आशीर्वादाने आमची प्रगती झाली,मुले झाली,त्यांना नोकरी लागली असे बेशरमपणे सांगायचे हे सत्य असेल तर सरकारच्या जातीच्या कोणत्याही सवलती घेऊ नये, मागासवर्गीय ओबीसी,एस सी,एस टी,व्ही जे एन टी जाती धर्माचे सांगून शिक्षणात,नोकरीत आणि इतर सर्व ठिकाणी सवलती बंदच झाल्या पाहिजेत.विशेष स्वतःला बौद्ध किंवा जयभिमवाले समजणाऱ्या गणपती उत्सव नवरात्र उत्सव साजरा करणाऱ्या गद्दारांना घरात घुसून मारले पाहिजे.स्वताच्या धर्मचा अपमान करून हिंदू धर्माच्या प्रवित्र देवाचा उत्सव साजरा करून त्यांना अक्षरशा बाटवतात.आणि त्यांनी स्वतःला बौद्ध किंवा जयभिमवाले समजू नये,हिंदू धर्मात किड्या मुंगी सारखे जगावे की मरावे हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. म्हणूनच मी असे लिहतो अशा गणपती बाटवणाऱ्या महारांना धडा शिकवला पाहिजे.   
    लग्नात व मेल्या नंतर बौद्ध धर्माचा देखावा करू नये,तेव्हाही गणपती बाप्पा समोर ठेवून सर्व कर्मकांड करावी,हे स्वातंत्र्य त्याला भारतीय संविधानाने दिले.पण माणूस म्हणून जगण्याचा अधिकार ज्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कष्ट त्याग जिद्दीमुळे आणि अपमानास्पद वागणूक सहन करून मिळवुन दिला. त्यांच्याशी बेईमानी करून कोणी गणपती उत्सव साजरा करत असेल तर त्याला त्याची लायकी दाखवून दिली पाहिजे,हे काम आम्ही सामाजिक बांधिलकी म्हणून करतो. असे समजून सांगून प्रबोधन करून ऐकत असेल तर त्यांचे समाज स्वागत करतो,आणि ऐकत नसेल तर त्याला पाणी पिण्याचा,शिक्षण घेण्याचा आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार कोणी दिला गणपतीने कि भारतीय संविधान लिह्णाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी असा लोकांना ब्राम्हण,सुवर्ण मराठा समाजाने त्याची जात दाखवून मारहाण केली तर मोर्चा जन आंदोलन करू नये.
       हे करत असतांना माझ्या मुलाने आम्हाला विरोध केला.त्यांचे व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे त्यांना जे पसंत आहे ते करू शकतात हा त्यांना भारतीय संविधानाने अधिकार दिला आहे. त्यांना विरोध केले असता त्याला ह्र्दय विकाराच्या झटक्याने मरण आले,किंवा त्यांनी आत्महत्या केली तर समाज त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेईल काय?. असे लोक ज्या अर्थी स्वताच्या जाती धर्माशी गद्दारी करतात त्यांना ह्र्दय विकाराच्या झटक्याने कधीच मरण येत नाही. आणि ते आत्महत्या करूच शकत नाही,कारण त्यांच्या मागे गणपती बाप्पा सामर्थ पणे उभा असतो.उलट त्याला इतर समाजात खूप मोठी इज्जत मिळते. त्याला पायरीने वागण्याची जाहीरपणे समज दिली जाते,मग तो नगरसेवक,आमदार,खासदार,मंत्री, उपप्रधानमंत्री आणि राष्ट्रपती झाला तरी त्याला त्यांच्या जातीच्या समाज व्यवस्थेनुसार वागणूक दिली जाते.आणि मिळते हा इतिहास आहे.हे माहीती असूनही कोणी स्वताला समाजा पेक्षा जास्त मोठा समजून व्यक्तिगत पातळीवर त्याच्या मना सारखा वागत असेल तर तो त्यांचा व्यक्तिगत पातळीवर अधिकार आहे. हे आमचे व्यक्तिगत मत नाही, तर सामाजिक बांधिलकी म्हणून समाजातील चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या व्यक्तीला समज देऊन समाजात माणूस म्हणून जगण्यासाठी प्रबोधन आहे.
     ज्यांना वाटत असेल कि घरात गणपती बसवल्यामुळे त्यांची जात बदली झाली असेल तर त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन संघर्ष वाचवा.देश स्वातंत्र्य झाल्यावर देशाचे उपप्रधानमंत्री झालेले बाबू जगजीवनराम, रामनाथ कोविंद यांना माणूस म्हणून हिंदुच्या मंदिरात प्रवेश नव्हता.त्यांचे शिक्षण,त्यांचं पद याच हिंदू धर्माच्या समाजव्यवस्थेला मान्य नव्हते.मग मागासवर्गीय ओबीसी,एस सी,एस टी,व्ही जे एन टी जाती धर्माच्या लोकांनी घरात बसवलेला गणपती भटा,ब्राम्हणांच्या नियंत्रणा खाली असलेला सुवर्ण मराठा समाज मान्य करेल काय?.हे समजावून सांगण्यासाठी धम्म उपासक सागर तायडे धम्म प्रचारक अभ्यासक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय बौध्दमहासभेचे ज्येष्ठ बौद्धांचार्य रमेश इंगळे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली,बौद्धांचार्य दयाआनंद बडेकर गुरुजी,बौद्धांचार्य निनाजी इंगळे गुरुजी,बौद्धचार्य केंद्रीय शिक्षक,यांच्या विशेष सहकार्यने ज्येष्ठ धम्म उपासक जे टी मोरे, गौतम भिमराव मोरे,प्रविण सागर तायडे,धम्म उपासीका सुनिता उदेभान तायडे,तुळजाबाई गोविंद इंगळे,चंद्रकला सागर तायडे, विजय प्रभाकर वानखडे,वर्षा विनोद चव्हाण,रंजनाताई कांबळे यांच्या उपस्थितीत धम्म जनजागृती विशेष मोहीम यशस्वी केली.यासाठी धम्म उपासक, उपासिकांनी अनेकांना जाहीर पाठींबा दिला होता. त्या सर्वांचे आभार,तर काही राजकीय दलाली करून स्वताचे अस्तित्व टिकविणाऱ्यांनी असे खूप लोक करतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचे सांगितले होते.स्वता वैचारिक प्रबोधन करीत नाही आणि प्रबोधन करणाऱ्यांचे मानसिक दुष्ट्या खच्चीकरण करतात.अशा स्वार्थी बेईमान कार्यकर्ता नेत्यांना समाजाने योग्य वेळी त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे.काही उच्चशिक्षित उच्चपदस्थ अधिकारी कलावंत आपल्या घरात दिड दिवसाचा,पाच दिवसाचा गणपती बसवतात.त्याचे दर्शन घेण्यासाठी आंबेडकरी चळवळीचे निर्लज राजकीय नेते जातात.त्यांची समाजात चर्चा होते पण इलाज होत नाही.समाज मान्यताप्राप्त संस्था,संघटना निर्णय घेण्यास असमर्थ आहेत.म्हणूनच मी असे लिहतो की अशा गणपती बाटवणाऱ्या उच्चशिक्षित अशिक्षित महारांना धडा शिकवला पाहिजे. 
सागर रामभाऊ तायडे-९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.

सोमवार, २ मे, २०२२

भारतला हिन्दुस्थान कधीच बनु देऊ नका.

 भारतला हिन्दुस्थान कधीच बनु देऊ नका.



जगाच्या नकाशावर हिंदुस्तान कुठे आहे?.हे आर एस एस प्रणित भाजपाच्या केंद्रीय सरकारने दाखवुन द्यावे. केंद्रात भाजपा सरकार आल्या पासुन त्यांनी सर्व ठिकाणी हिंदुस्थान हिंदुस्थान हा शब्द प्रयोग करण्याचा झपाटा लावला आहे.त्यामुळे देशभरात बजरंग दल,हिंदू वाहिनी,हिंदू जनजागृती समितीचे अंधभक्त गुंडागर्दी करणारे तरुण मागासवर्गीय तरुणांना अंध भक्त बनवून मागासवर्गीय समाजावर आणि मुस्लीम समाजावर नहाक अन्याय अत्याचार करीत आहेत.तर काही ठिकाणी एकाच पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न करून जातीय दंगली घडविण्याचे षड्यंत्र करीत आहेत.ते स्वतःला किती ही हिंदू म्हणून घेत असले तरी हिंदूंचा खरा अर्थ चोर गुलाम,ही फारशी शिवी आहे हा इतिहास आहे आणि तो संशोधन करून सिद्ध झालेला आहे. त्यामुळे भारत हा कधीच हिंदुस्थान नव्हता यांचा इतिहास हिंदू म्हणून घेणाऱ्यांनी जरूर वाचावा.
आर एस एस प्रणित भाजपा केंद्रीय सरकार पुढच्या २०१९ नंतर आले तर भारतातील सर्व चित्र बदलले जाईल.ते खरे राम राज्य असेल, आणि राम राज्य निर्माण करण्यासाठी प्रथम इंग्रजांनी जे जे निर्माण केले ते नष्ट करावे लागेल. इंग्रजांनी भारतीयांना काय दिले?. इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केले आणि कायम स्वरूपी भारतीयांना उपभोगाच्या योजना सोडून गेले.इंग्रज आले नसते तर भटा ब्राम्हणांनी देशात मंदिर बांधुन दरवर्षी महाकुंभ मेळा भरविला असता. म्हणुन इंग्रजांचे राज्य चांगले होते कि साडे तीन टक्के ब्राम्हणाचे प्रशासकीय राज्य चांगले आहे.हे जरा आजच्या सुशिक्षित तरुणांनी डोळसपणे तपासुन पाहिले पाहिजे. आता प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे त्यात गूगल इंजन आहे.ते सुरू करून पहा. 
भारतात सर्व प्रथम रेल्वे इंग्रजांनी सुरु केली.भारतात टेलिफोन दुरभाष्य यंत्रणा इंग्रजांनी सुरु केली,भारतात उद्योग धंदे उभारून त्यात भारतीयांना रोजगार उपलब्द करून दिला.शिक्षण घेण्यासाठी शिक्षण संस्था निर्माण करुन सर्वाना शिक्षण घेण्याची समान संधी उपलब्ध करून दिली.वर्णव्यवस्थेत सर्वाना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता तो इंग्रजांनी भारतीय लोकांना विशेष बहुजन समाजाला दिला,(म्हणजेच मागासवर्गीय एस सी,एस टी, व्ही जे एन टी, ओ बी सी,आदिवासी, अल्पसंख्याक समाज) भारतात डाक विभाग,सार्वजनिक हॉस्पिटल,महाविद्यालय निर्माण करुन हजारो लोकांना रोजगार नोकरी दिली आणि जनतेला सेवा मिळवुन दिली. भारतात मनोरंजन आणि खेळाला प्रतिष्ठा इंग्रजांनी मिळवुन दिली.गाणे,बजावणे, नाचणे हा फक्त मागासवर्गीय समाजाचा जन्म सिद्ध अधिकार होता,तो इंग्रजांनी मोडुन त्याला कला क्रिडा कौशल्य असे गुणवत्ता असलेले नांव दिले,म्हणुन आज माधुरी,ममता,शिल्पा,सोनाली,मृणाल स्पृशा, स्मुर्ती, सुषमा,रेखा,जया,हेमा सर्व क्षेत्रात उगड्या नागड्या दिसतात. 
भारतात ''पुरातत्व विभाग'' इंग्रजांनी सुरु केला त्यामुळे भारताची प्राचीन सभ्यता और प्राचीन बौद्ध/जैन धर्म धर्माचा शोध लागला.भारतात कापसा पासुन कपडा बनविण्याचा कारखाना इंग्रजांनी सुरु केला.समुद्राच्या किनाऱ्यावर बंदरे बनवुन भारताचा मोठा विकास इंग्रजांनी केला.त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर मोठया मोठया शहराचा विकास इंग्रजांनी केला. भारतात लोकशाही पद्धतीने निवडणुका आणि समान नागरिक अधिकार इंग्रजांनी सुरु केला. बाल विवाह,सती प्रथा इंग्रजांनी कायदे करुन बंद केले आणि विधवा विवाह इंग्रजांनी सुरु केले.भारतात सावित्री बाई आणि ज्योतिराव फुले यांनी महिला आणि अस्पृश्य स्त्रीया करीता शाळा खोलून स्वता शिकविले त्याला इंग्रजांनी योग्य आर्थिक मदत केली.जाहीर सत्कार केला.
भारतात दळण वळणा करीता रोड रस्ते,ब्रिज पूल प्रथम इंग्रजांनी बनविले.ग्रामपंचायत, पंचायत समिती,जिल्हा परिषद,सह सर्व प्रशासकीय व्यवस्थेत सहभागी करुन घेण्याचे काम इंग्रजांनी केले,इंग्रज भारत सोडुन १९४७ साली गेले. तेव्हा एका डॉलर ची किंमत एक रुपया होती आज एका डॉलरची किंमत किती रुपये आहे माहिती करून घ्यावी.म्हणजे भारतात इंग्रजांनी भारताचा विकास आणि कल्याण केले.पण वर्णव्यवस्था मानणाऱ्या ब्राम्हणानी भारताची शासन प्रशासन व्यवस्था हाती घेतल्यावर देशात मंदिर निर्माण करुन देव आणि धर्माचे थोतांड मांडून स्वर्ग,नरकाचे चित्र उभे करून भारतीयांवर राज्य केले.म्हणुन त्यांना भारत नको आहे त्यांना हिंदुस्थान हवा आहे. हा धोखा घटनाकारांनी ओळखला होता म्हणून त्यांनी घटनेत तशी कायम तरतूद निर्माण करून ठेवली आहे. राज्यात,केंद्रात कोणतेही सरकार आले तरी भारत म्हणजे इंडिया हाच शब्द वापरावे लागेल.भारताला हिंदुस्तान लिहण्याचा व बोलण्याचा प्रयत्न या देशातील भट ब्राम्हण दररोज करतात.पण जागरूक अधिकारी कर्मचारीवर्ग त्याची योग्य वेळी दाखल घेतात म्हणून भारत हिंदुस्थान होत नाही आणि होणार नाही.भारतातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आपण पहिला भारतीय आहेत आणि भारतीय राहू नंतर जात,धर्मं,पंथ,राज्य येईल याची काळजी घ्यावी.भारतात जो पर्यंत भारतीय संविधान आहे तो पर्यंत सर्व जाती धर्माचे पंथाचे राज्याचे लोक, सुरक्षित राहतील जेव्हा संविधान नसेल तेव्हा हा देश हिंदुस्थान होईल त्या नंतर कोणीच सुरक्षित नसेल.म्हणून भारताला भारत इंडियाच राहू द्या हिंदुस्थान होऊ देऊ नका.तसे झाले तर पाकीस्थान,अफगाणिस्तान होण्यास वेळ लागणार नाही.
आज देशभरात जे काही चालले ते खूप भयानक आहे.आर एस एस चा प्रमुख शत्रु डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहे. त्यांनी बनविलेली राज्य घटना जो पर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत राम राज्य म्हणजेच भटा ब्राह्मणांचे वर्णव्यवस्था असलेले राज्य येणार नाही म्हणूनच देशभरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा समाज प्रत्येक राज्यात टार्गेट केला जात आहे. या समाजाला चिरडून टाकले की इतर मागासवर्गीय आपोआप गुलाम बनतील ही आजच्या हिंदुस्थान बनू पाहणाऱ्यांचे स्वप्न आहे.ते सत्य करण्यासाठी ते सर्व माफदंड वापरत आहेत.
जातीय दंगली घडविण्यासाठी,शॉट कट नेता बण्यासाठी भोंगा काढण्याची भाषा करून कायदा सुव्यवस्था बिगडविनाऱ्यांची धमकी देणाऱ्या विरोधात पोलीस कोणतीच भूमिका घेतांना दिसत नाही.पण त्या विरोधात सर्वात जास्त बोलणारे कोणत्या समाजाचे नेते आहेत. अन्याय अत्याचारा विरोधात उभा ठाकणारा,बोलणारा,लिहणारा म्हणजे आंबेडकरी विचाराचा एकमेव माणूस किंवा समाज होय यांची जाणीव भटा ब्राम्हणांना आहे.ते ओळखण्यासाठी जास्त डोके चालविण्याची गरज नाही.फक्त डोळे उघडे ठेवून पाहिल्यास लगेच दिसते. रोडवर जाणाऱ्या शंभर मोटरसायकल पहा त्यात ज्याच्या गादीवर अशोक चक्र दिसलं तर लोक लगेच म्हणतात, हा आंबेडकरी विचाराचा व बौद्ध तरुण आहे! कोणत्याही फोर व्हीलर गाडीवर अशोक चक्र दिसलं तर लोक म्हणतात,हे बौद्धाचं कुटूंब आहे! घरावर निळा झेंडा व दरवाजा वर अशोक चक्र दिसलं तर लोक म्हणतात,हे बौद्धाचं घर आहे! मग राष्ट्रध्वजावर (तीरंगा) अशोक चक्र पाहून कोणीच का म्हणत नसेल,की "हा भारत बौद्धांचा देश आहे" आणि त्याला अडीच हजार वर्षाचा तथागत गौतम बुद्धाचा जम्बु दीप प्रबुद्ध भारत यांचा ऐतिहासिक इतिहास आहे.पण हिंदुस्थान कोणाचं होता त्याला कोणता इतिहास आहे हे कोणी सांगत नाही.म्हणून भारतला हिन्दुस्थान कधीच बनु देऊ नका.आज रात्र नव्हेतर दिवस सुध्दा वैऱ्याचा आहे.तेव्हा उठा जागे व्हा भविष्यात स्वाभिमानाने जगण्यासाठी!. भारत माता की जय बोलणाऱ्यास विचारा.शिक्षण,आरोग्य आणि रोजगार महागाईचे काय?. हिंदुस्थानची माता पिता कोण?. त्यांनी या देशात काय काय निर्माण केले.ते जरूर सांगावे.तरच भारताला हिंदुस्थान बनविणे सोपी जाईल.

सागर रामभाऊ तायडे - ९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई