बुधवार, २२ जून, २०१६

शेतमजुर जगला तर शेतकरी जगेल


शेतकरी जगला तर देश जगेल असे सांगणारे विचारवंत खुप आहेत. पण शेतकरयाची दुःख वाताकुल रूम मध्ये बसुन कशी कळतील त्या करीता त्यांच्या शेतात जावुन प्रत्येक्ष पाहिले पाहिजे. खरच शेतकरी शेतात उन्हा तान्हात किती राबतो?.ते पाहिले तर आचार्य वाटेल शेतकरी उन्हा तान्हात राबत नाही तर शेत मजुर खरया अर्थाने राबत असतो. पण त्यांची नोंद कोणा कडेच नसते.कोणाला घ्यावीशी वाटत पण नाही. कारण त्यांची दखल घेण्या लायक ते नसतात.शेतमजुरी करणे हा त्यांचा धर्मच असतो.शेतकरयाला जात आणि धर्म दोन्ही असतात.म्हणुन शासन प्रशासन व समाज त्यांच्या कडे वाकडया नजर ने पाहण्याची हिंमत करीत नाही.आता शेतकरी आत्महत्या करता म्हणुन त्यांची दखल सर्वच प्रसार माध्यम घेतात.पण शेतमजुरा कडे कोण
लक्ष देते काय ? शेतकरयां विषयी दिवस रात्र गप्पा करणारयांनो कधी तरी शेत मजुरांच्या हत्या कडे पाहिले काय?.
शेतकरयांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे ?
व्याज माफी मिळालीच पाहिजे ? अवेळी पडणारया पावसामुळे शेतीचे नूकसान झाले तर त्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे.?  हो मिळुदया आमचेच शेतकरी बांधवासाठी आहेत ते. पण ज्यांच्या शेतीवर शेतमजुर काम करतो, ज्याच्याकडे शेतमजुर काही पैश्याच्या मोबदल्यात वर्षेभर दावणीला बांधल्या सारखे काम करतो ( सालगड्या सारखे ) तो शेतमजुर कधी सरकारला आणि शेतकरयाला बोलतोय काय माझी शेतमजुर म्हणुन नांव नोंदणी झालीच पाहिजे म्हणुन.
काय होत असेल शेतमजुरांच्या कुटुंबाचे ?
कसे जगत असतील शेतमजुर आणि त्यांचे  हजारो लाखो कुटुंबातील बाई मानस ?
सरकार ने शेतकरयांची कधी कर्जमाफी केली तरी ही त्याचा काहीच फायदा शेतमजूरानां मिळत नसतो ?. कारण शेतीच नाही तर कर्जमाफी तरी कशी मिळणार ?.
आणि जर त्या शेतकरयालाच जर त्याच्या शेतीतुन पुरेसे उत्पन्न झाले नाही तर
तो शेतकरी तरी आपल्या शेतीवर काम करणारया शेतमजुराला किमान रोजंदारीचे पैसे तरी देईल का वेळेवर ?.पण जे काही कधी सरकार शेतकरी कुंटुंबासाठी करते त्यासारखे काही तरी कधी तरी शेतमजूरा पर्यत येऊ दया.कारण सरकार असो वा बँका शेतकरयाला कर्ज देतात.किंवा सरकारी मदत देतात.ते शेतकरयांचा सातबाराचा उतारा  पाहुनच कर्ज देत असतात.
तसेच जर कर्जमाफी ही सरकारी यंत्रणेनुसार शेतकरयांची कर्जमाफी ही सातबारा नुसारच केली जाते. पण शेतकरयाकडे शेती, सात बाराच नाही.शेतमजुर बेघर असतात.किंवा शेतात राहतात.त्यांना रेशन कार्ड सुधा नसते.ते फक्त शेतमजुरच असतात. शेतमजुर ज्या शेतकरया करीता काम करतात.म्हणुन शेतकरयांनी शेतमजुरा करीता काही तरी केलेच पाहिजे. सरकारी नियमानुसार आमच्याकडे शेती नाही जागा,जमीन नाही.म्हणुन सातबारा नाही आणि 
मग आम्ही करायचे तरी काय ?
ज्या शेतकरयांनी आत्महत्या केल्या त्या करीता जशी समिती नेमली. आणि शेतकरयांच्या समस्या आणि त्यावरील उपाय तयार झाले. तसेच महाराष्ट्रातील शेतमजुरांची ही एकदा मोजणी झाली पाहिजे शेतमजुरांची आवस्था ही काय आहे ? शेतमजुर आणि त्यांचे कुटुंब कसे जगत असेल यावर ही सरकार ने सामाजिक संस्थेने मिडीयाने राजकीय नेत्याने शेतमजुराची  हकीकत समजुन घ्यावी. सालगडी ही काय प्रथा होती.ती खरच बंद झाली काय?. ते ही समजुन घ्या म्हणजे समजेल शेतमजुर कसे जगत आहेत. शेतमजुर विचार करु शकत नाही.असे समजू नका. लक्षात ठेवा ज्या गरज नसलेल्या शेतकरयांना ही तुम्ही कर्जमाफी, व्याजमाफी देता .
त्या ऐवजी शेतमजुराचाही विचार करा ?
कारण जर त्या मोठमोठ्या शेतकरयाकडे शेतमजुर कामालाच गेले नाही ना तर?. त्यांना ही शेती करणे अवघड होऊन बसेल ? मग इंडियात राहणारे शहरवाशीय खाणार काय ?
इंडियातील सुशिक्षित शहरवाशीयानो शेतमजुराचा सामाजिक दुष्टया विचार करा. तुमचा महिन्याचा चहापाण्याचा खर्चच 3000 ते 4000 हजार पर्यत असेल तुम्ही सुशिक्षित लोकांनी जर मनात आणले तर सरकार, राजकारण्या पर्यत शेतमजुरांचा विषय किमान तुम्ही तुमच्या पध्दतीने सांगावा,मंडावा आणि  शेतमजुर न्याय मिळवुन दयावा.शेतमजूर ते ही करु शकत नाही. कारण कधी राजकीय नेते मंत्री आलेच शेतकरयाकडे तर त्या वेळेस तो शेतकरीच त्यांचे दुःख सांगत असतो.आणि शेतमजुर शेतात काम करीत असतो.
आता शेतकरयासाठी आंदोलन,कर्जमाफी , व्याजमाफी होईल. पण या मध्ये थोडा  शेतमजुराचा विचार करा आणि जर विचार केला नाही तर सर्वच शेतमजुर खेडे सोडुन शहराकडे गेले.शेतकरी काय करतील?.
करा ज्यांच्या नावावर शेती आहे त्यांनी खुशाल शेती करा मग चला तर सर्व शेतमजुरांनो आपण सारे एक होऊ आणि शहराकडे जाऊ असे अभियान राबविले तर काय होईल?.नको आता आम्हाला ती शेतमजुरी त्यापेक्षा शहरात जाऊन कोठे तरी कामधंदा करुन चांगले पैसे मिळतील.बिहार ,उत्तर प्रदेश,कर्नाटक,आंद्रप्रदेश,आसाम येथील  बहुसंख्य लोक हे शेतमजुर असतात.
म्हणुन तर बाबासाहेबांनी सांगितले होते ना "खेडे सोडा शहराकडे चला" म्हणुन.
आता पर्यत फक्त एकच नेता शेतमजूरा करीता लढला ते म्हणजे कर्मवीर दादासाहेब गायकवाड त्यांनी कसेल त्यांची जमीन नसेल त्यांचे काय ?. असा प्रश्न उपस्थित केला होता तेव्हा मोठे आंदोलन उभे केले होते तेव्हा महाराष्ट्रात शेती नसलेली लाखो शेतमजुर कुटुंबे आहेत हे थोडेसे सरकारला समजले .
आणि शहाण्या सरकारने तेव्हा दादासाहेबांच्या नावाने एक योजना काढली होती भुमिहीन शेतकरयांना दोन एकर पर्यत शेती देता येईल पण त्या शेतीच्या सरकारी बाजारभावानुसार 50% रक्कम आधी भरावी लागेल.पण कोणता शेतमजुर जर 50 % पैसे भरु शकेल?. ज्याला दोन वेळेचे पोटभर जेवन मिळु शकत नाही.तो पैसे कुठून भरेल?.यालाच म्हणतात सरकारी योजना.असा अनेक योजना गोरगरिबा करीता आहेत.पण त्यांचा फायदा त्यांच्या प्रयन्त पोचत नाही.त्यातील हा शेतमजुर हा देशातील सर्वात मोठा घटक आहे.म्हणुन शेतमजुर जगला तर शेतकरी जगेल आणि शेतकरी जगला तर देश जगेल.

पंकजा बाई तुमचे काय चुकल?.


देशात महापुरुष साधु संत,महंत महाराज आणि राजकीय सोम्या गोम्या यांच्या जयंती दिनी व स्मुर्तीदिनी हार्दिक शुभेच्छा किंवा विनम्र अभिवादन करण्याची जाहिरात देण्याची राजकीय परंपरा आहे,ते देण्या मागे मोठा उदेश असतो तो त्या जाती धर्माच्या लोकांच्या मतदारानां आकर्षित करणे. त्यामुळेच भाजपच्या संस्कारात वाढलेल्या पंकजा बाई मुंडे यांनी बुद्ध पोर्णिमेला म्हणजे बुद्ध जयंतीला विष्णुचा नववा अवतार बुद्ध यांच्या जयंतीला हार्दिक शुभेच्छा देऊन एका दगडात अनेक पक्षाचे खूंटे ढीले केले. राज्यातील बौद्ध समाज आणि आंबेडकारी चळवळीच्या लोकांना स्वताच्या असा कोणताही कृती कार्यकर्म नसतोच त्यांना ही दर दोन महिन्याने कार्यक्रम लागतो.तो पंकजा बाईनी दिला आणि आपल्या बरोबर किती मागासवर्गीय (ओ.बी.सी) पोटभरे आहेत ते पण तपासून पाहता आले.कारण राजकारणात नेहमी दक्ष राहावे लागते.पंकजा बाई  लोकशाही पध्दतीने निवडुन येऊन घटनेची शपथ घेतली आहे.म्हणुन घटनेनुसार त्या राज्याचे मंत्री आहेत.तुम्ही बुध्द हा विष्णुचा नववा अवतार आहे " असे म्हणणे चुकीचे आहे, यामुळे तुम्ही तमाम भारतातील बौध्द लोकांच्या धार्मिक भावना तर दुखावल्याच 
पण त्याच बरोबर बाबासाहेबांनी जे सांगितले आहे त्यांचा ही आपमानच केला आहे. असे बौध्द समाजाला वाटने साहजिक आहे. 
बापाच्या पुण्याईने जी आमदारकी आणि  मंत्रिपद मिळाले ते नीट सांभाळा. बुध्द नववे अवतार आहे कि दहावे हे येथील बौध्द समाज कधीच समजला आहे, कारण भटा ब्राम्हणा पेक्षा जास्त त्याचा अभ्यास झाला आहे.आपण आपल्या वडीलाच्या मृत्यु विषयी चौकशी व्हावी या करीता थोडी हिंमत करुण बोला.चिक्की घोटाळा लोक विसरले म्हणुन तुम्हाला असे वाटते की लोक मला पण विसरतील असल्या भीती पोटी आपण काही करून प्रसिद्धी झोतात राहण्या करीता हे अवतार वगैरे काढता की आपला इतिहास भूगोल कच्चा आहे?. शौचालय बंधण्यासाठी एका महिलेने स्वतःचे मंगळसुत्र विकुन शौचालय बांधले त्यावेळी तुम्ही तीला मंत्रालयात बोलाऊन तिचा सत्कार केला.तेव्हा राज्यातील जनतेला वाटले मुंडे साहेबांची मुलगी साहेबांचा वारसा पुढे चालवते की काय?.आपण बुद्धाला विष्णुचा अवतार बनवून साहेबांच्या पुरोगामी पणाचा बुरखा फाडला. मुंडे साहेब हप्प चडडी वाल्या सोबत राहून ही कधीच आपण शाहु,फुले आंबेडकर विचारांचे समर्थक आहोत हे विसरत नव्हते, संपूर्ण देशातील लोकनी सांगितले गणपती दूध पिला !.पण एकमेव मुंडे साहेब होते त्यांनी सांगितले नाही गणपती मूर्ति दगडाची धातुची आहे ती दूध पित नाही. नामांतर, मंडलच्या आंदोलनात त्यांनी कधीच स्वतःचा तोल जाऊ दिला नाही.ते राजकारण आणि वैचारिक समाजकारण योग्य पद्धतीने हाताळत असत, ते बुद्धिचा वापर करीत असत.आपण ही तो करावा दुसऱ्याच्या सांगण्या, लिहण्या वरुन अवतार खरा होत नाही. दारु कारखान्याला पाणी दिले पाहिजे या करिता जेव्हा आपला आग्रह होता. तेव्हा गोर गरीबाला पिण्याच्या पाण्याची गरज असतांना आपण दारु कारखान्यांची बाजु मांडली. तेव्हा मात्र याच गोर गरिबाच्या अंगाचा तिळपापड झाला होता. हे असे कष्टकरी शेतकरी,शेतमजुर, ऊसतोड कामगारा करिता आंदोलन करणाऱ्या नेत्यांचे वारसदार कसे होऊ शकतात. नक्कीच काय तरी गडबड आहे . 
दुष्काळात पाण्यावाचुन लोक मरतात. महिला पाच पाच किलोमीटर वरुन पाणी आणतात. आणि तुम्ही त्याच भागातील असुनही असे बोलु शकतात. डोक्यावर एक दोन पाण्यानी भरलेले हंडे घेऊन चालत जा दोन ते तीन किलोमीटर मग कळेल. आणि काढा त्या वेळेस सेल्फी, नाहीतर व्हिडीओ शुटींग मग खारच अभिमान वाटला असता आम्हाला, सांगा तुम्हाला दारु कारखान्यासाठी पाणी दिले पाहिजे कि पिण्यासाठी पाणी दिले पाहिजे. मुंढे साहेबाचा पक्ष जरी वेगवेगळा असला आणि त्या पक्षाच्या विचारधारे मध्ये जरी बसले नाही ओबीसीची जनगणना करणे तरी ही मुंढे साहेब ओबीसी जनगणने साठी वेगवेगळ्या विचारमंचावर एकत्र येत फक्त आणि फक्त समाज्याच्या कल्याणासाठी . पण तुम्ही तर ओबीसी करीता जनगणनेचे सोडाच दारु कारखान्यासाठी अग्रही असतात. बौध्द धर्मियांच्या धार्मिक भावनाच दुखवता. 
भारतातली कोणतीही महिला दारु कारखान्यासाठी आग्रही नसतात, तुम्ही विचारा कधी गावाकडील महिलांना , 
तुमची सध्याची शहराची परिस्थिती वेगळी असेल. तुमच्या सारख्याना त्याने काही फरक पडत नसेल तुमच्या घरातील वातावराण वेगळे असेल. चुलत भाऊ तुमचे चुलते, मामा  या सर्वाची ख्याती खुप आहे, याचा विचार करा आधी. बुध्द नववा अवतार आहे असे तुम्हाला कोणी बोलायला सांगितले कि तुम्ही स्वतः तुमच्या डोक्याचा वापर करुन बोलला आहात.ते ही कळले पाहिजे तुम्हाला बळीचा बकरा बनवत तर नाही ना?.आणि जर तुम्ही तुमच्या डोक्याने विचार करुन बोलत असाल तर समरसता साहित्य सोडुन समतेचे विचारांनी लिहिलेल्या लेखकांचा साहित्य वाचा मग थोडे तरी कळेल.
गौतम बुध्द हे विज्ञानवादी होते, 
ते अंद्धश्रध्दा, पुर्नजन्म, भुत, अवतार , या गोष्टींना मानत नव्हते.जर वेळ मिळालाच तर एकदा बुध्द आणि त्याचा धम्म वाचा आणि आपले अदनयांन दूर करा.पंकजा बाई तुमचे काय चुकल ते मान्य करा,

मुला मुलीनां आणि पालकांना सैराटची बाधा


जगात सायन्स ने खुप प्रगती केली. त्यामुळे शहरातून खेडयाकडे टीव्ही मुळे सिनेमा आणि सीरियल घराघरत पोचले त्यात चांगले आणि वाईट दाखविल्या मुळे मुलामुलीवर चांगलाच परिणाम होत आहे.त्यात स्मार्ट मोबाईल आणि नेटने मुलामुलीना याड लावले.
प्रेम आणि सेक्स हया वेगवेगळ्या पण खुप महत्वाच्या गोष्टी आहेत.त्यातुन होणाऱ्या परिणामाला अनेक पालकांना तोंड द्यावे लागते. त्यात अत्यंत महत्वाची भूमिका पोलिसांना निभवावी लागते, म्हणून पोलिसां कडून सर्व पालकांसाठी नेहमी सूचना दिली जाते.शाळा कॉलेजेस संपत आले आहेत. मागील कांही दिवसा पासुन वयात आलेल्या तरुण मुली निघुन जाण्याच्या तक्रारीमध्ये व प्रकरणा मध्ये शहरा पेक्षा ग्रामीण भागातील भागात वाढ झाली आहे.मुलींनी शैक्षणिक वर्षात केलेले प्लॅनिंग प्रत्यक्षात उतरवतना दिसुन येत आहे.दहावी बारावीत मुलीची टक्केवारी लक्षवेधी असते. त्यात अशा घडलेल्या घटना मुळे काही गंभीर सामाजिक प्रश्न देखील निर्माण होतात.आणि तशातच हिंदी मराठी फिल्म इंडस्ट्रिकडून दाखविण्यात येणारे कामुक व अश्लील चिञपट, काल्पनिक लव्हस्टोरी याचा पगडा भारतातील तरुण तरूणींवर पडत असलेमुळे मुला मुलींवरील संस्कार ढासळले आहेत.या अनुषंगाने पालकांनी आपल्या पाल्यांची (मुलगा/मुलगी) खालील प्रकारे काळजी घेणे आवश्यक आहे.
मुले-मुली एकांतामध्ये फोन वरुन जेंव्हा बोलत असतात त्या वेळी त्या/ते कोणाशी आणी काय बोलत असतात हे पहावे.
मी मैत्रणी/नाते वाईकाकड़े चालली आहे अस मुली पालकाना सांगुन घरातून जातात, परत येत नाहीत. अशा वेळी मुलीला एकटी न-पाठवता इत्तर नातेवाईका सोबत पाठवावे.
मुलगी/मुलगा घरातुन शाळा कॉलेजला जातात त्या वेळी ते घरातुन किती वाजता निघाले शाळा कॉलेज मध्येच गेले का ? किती वाजता पोहचले ? पिरेडला बसले का ? शाळा कॉलेज मधुन बाहेर कधी पडले ? सरळ घरी आले का ? किती वाजता आले ? या कड़े लक्ष देणे आवश्यक आहे. बहुतांशी मुला-मुलींनी निघुन जाण्या आगोदर मोबाइल फोनचाच वापर/आधार घेतल्याचे दिसुन येत आहे.
चैनल मिडिया आणि प्रिंट मिडिया बातम्या तुम्ही जरूर पाहली,वाचली असेल. परंतु या गोष्टीची ज्या पालकाना काळजी घेणे आवश्यक आहे.दुर्दैवाने अशा पालकाकडे सोशल मीडियाचा अभाव असतो. त्यामुळे ही बाब कृपया आपण आपला भाऊ, बहिण, मामा, मामी, मावशी, मित्र, चुलते, पुतने, शेजारी यांना अवगत करून सतर्क करावे.धक्का धक्कीच्या व धाव-पळीच्या दुनियेत पालकाना कुटुंब चालवण्यासाठी खुप आटा-पिटा करावा लागतो त्यामुळे पाल्याकड़े पुरेसे लक्ष देवु शकत नाही. परंतु लक्ष देणे आवश्यक आहे.
घटना घडल्या नंतर माता-पित्यानी अश्रु ढाळण्यापेक्षा त्या आधीच काळजी घ्यावी म्हणजे समाजात (नसलेली )इज्जत जात नाही, आणि जात किती ही लपविली तरी ती जात नाही. मुलींनीही विचार करावा की ज्या माता पित्याने जन्म देऊन लहानाचे मोठे करताना मुलीचा तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळ केला.तो त्यांना उतारवयात डोळ्यात पाणी आणून रडवण्यासाठी आणि मानसिक त्रास देण्या साठी करू नये.मुलीच्या  परपुरुषा बरोबर पळून जाण्याने तीच्या मागे तीच्या भावाला कुटुंबाला समाजात आत बाहेर तोंड दाखविणे अवघड होऊन जाते. त्यांच्या संपूर्ण घरावर चारिञ्यहिन घराने म्हणून ठपका बसतो.व नंतर त्या पळून गेलेल्या मुलीच्या भावाचेही लग्न ठरतच नाही.त्यामुळे पालकांनो सावधान तुमची मुलगी तुम्हाला काॅलेज एक्झाम व क्लासच्या बाहाण्याने केव्हा ही फसवू शकते हे शंभर टक्के लक्षात घ्या.एक सैराट सिनेमा पाहिल्याने रातोरात मुलमुली बिगडत नाही, त्यावर आजु बाजूच्या सामाजिक,शैक्षणिक,आर्थिक, सायन्स आणि सोशल मिडियाचा परिणाम होतो म्हणुन मुलमुली प्रेम करतांना जात धर्म पाहत नाही. म्हणुन पालकांनो मुला मुलींनी आपली सत्य संस्कृती सांगा, जात धर्म माणसाने स्वार्था करीता निर्माण केलेले आहेत.त्यामुळेच संस्कार धर्म आणि शरीर धर्म केव्हाच बिघडून टाकल्या गेला आहे.केवळ शरीराची वासना शांत करणे म्हणजे प्रेम हेच उद्धीष्ट मुला मुलींचे झाले आहे.म्हणूनच सर्वच पालकांनी सतर्क राहिले पाहिजे. मुलामुलीच्या प्रेम प्रकरणाने एक सामाजीक जबाबदारी मोठया प्रमाणात वाढते आहे, ती योग्य वेळी समजून घेतली तर देशातील जाती जातीतील प्रेम प्रकरनातुन होणारे भीषण हत्याकांड थांबविता येतील. 

शुभ मुहूर्ताचे अंकगणित


गात एकमेव भारत असा देश आहे की जो प्रत्येक कामाची सुरवात शुभ मुहूर्त ब्राम्हणा कडे पहिल्या शिवाय करीत नाही.जन्म आणि मुर्त्यु झाल्यावर ही पुढील विधिवत पूजा अर्चा ठरविण्याचा अधिकार कुटुंबा तील प्रमुखाला नाही. खरे म्हणजे ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस, तीच वेळ आपल्यासाठी शुभ! आई बाळाला जन्म देतांना कधीच मुहूर्त पाहत नाही.आणि कोणी मरताना ही पाहत नाही. तरी बहुसंख्य लोकांची जिंदगी मुहूर्त पाहण्यात जाते. सगळेच दिवस, सर्वच वेळ शुभ आहेत. फक्त इच्छाशक्ती प्रबळ असावी. आपल्यासाठी सर्वच दिवस सर्वच वेळ शुभ आहे!. वेळेच महत्व जाणले आणि योग्य वेळी काम, कार्य केले तर लाभदायक शुभ होते, अनेक लोक कुंडल्या पाहून लग्नांचे मुहूर्त काढतात, तरी अनेक स्त्रीया विधवा व पुरूष विधूर का होतात? पत्रिका व कुंडली जुळवून लग्न झालेल्या जोडप्यांचे घटस्फोट का होतात?. तर काही अकाली मृत्यू होतात असे का होते ?
देशातील 95% विवाह हे मुहूर्तानुसार वेळेवर लागत नाहीत तरी मुहूर्ताचा आग्रह का धरला जातो ? यांचा कोणी विचारच करीत नाही, राजकीय लोक मुहूर्त पाहून निवडणुक अर्ज भरतात,आणि प्रचार करतात,सर्वच पक्षाचे उमेदवार देवा धर्माची विधिवत पूजा करून निवडणूक लढतात तरी सर्व उमेदवारां पैकी एकच उमेदवार निवडून येतो आणि बाकीचे आपटतात. असे का घडते? एकाचाच मुहूर्त शुभ होता काय ?
मंत्रीपद मिळाल्यानंतर मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी व खुर्चीवर बसण्यासाठी शुभ मुहूर्त शोधतात तरी त्यांच्या योजना अयशस्वी का होतात?. मंत्रीपद अल्प कालावधीत का जाते?.शुभ मुहूर्तावर मूल जन्माला घातल्यास वैज्ञानिक, राष्ट्रपती, पंतप्रधान होईल काय?. अंबानीच्या जन्म मुहूर्ताला जन्माला आलेल्या इतर व्यक्ती पण अंबानी झाल्या का? उच्च शिक्षित डॉक्टर, इंजिनियर, उद्योजक, आपल्या कार्यालयाचे बांधकाम करतांना, व्यवसायास प्रारंभ करतांना मूहूर्त पाहूनच सर्व करतात.तरी सुद्धा कित्येकांना अपयश येते असे का?.महाराष्ट्रात घराघरत पोचलेले प्रसिद्ध भविष्यकार कालनिर्णयवाले र्ज्योतिभास्कर जयंत साळगावकर यांनी शुभ मुहूर्तावर सुरू केलेले मराठी दैनिक का आपटला ?
कारण शुभमुहूर्त हे थोतांड आहे.सत्य नाही ज्यांचा स्वतः वर विश्वास नसतो,तेच लोकं अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात.मुहूर्त पाहणारी पेशवाई नष्ट झाली आणि कधीही मुहूर्त न पाहणारी ब्रिटिशशाही अख्खा भारत देश गिळून बसली. स्वतःवर व स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवा. चांगले काम हेच कुशल कर्म माना. जर कोणता पंडित, ज्योतिषी, बुवा, बापू, कापु, झापु महाराज,साधू ,साध्वी तथा वास्तूशास्त्र विशारद शुभमुहूर्तावरच सर्व काही केल्यास तथा वास्तूशास्त्राप्रमाणेच बांधकाम केल्यास यश येईल असे सांगत असतील तर स्टँम्प पेपरवर लिहून देण्यास सांगा. यश न आल्यास नुकसान भरपाईचा दावा ठोकेन असे सांगा. ते तुमच्या जवळही फिरकणार नाहीत.कारण त्यांनाही माहित असते हे सर्व थोतांड आहे.जर तुमचं मन साफ असेल व तुमच्यात प्रयत्न करण्याची क्षमता असेल.तर तुमच्यासाठी कोणतीही वेळ ही ' शुभ मुहूर्तच ' असते " चला तर आजपासून शुभ-अशुभ या चक्रात न पडता विज्ञानवादी होऊ या.चला..जगण्याची दिशा बदलूया..!! सुरुवात स्वतःपासून..!!
आता तुम्ही पण कुणाचही भविष्य सांगू शकता.त्याकरिता थोडा मानसिक,भौतिक अभ्यास करा.फक्त एवढे पाठ करून ठेवा, भाऊ..लई मोठं मन हाय तुमचं भाऊ,
लोकं फायदा घेतात तुमचा भाऊ, आयुष्यात लई कष्ट केले तुम्ही भाऊ,
कुणा बद्दल  वाईट चिंतीत नाय तुम्ही भाऊ...पण तुमचे विषयी वाईट करतेत लोक भाऊ, पैसा लई कमवते तुम्ही भाऊ,पण पैसा टिकत नाही भाऊ, लई मेहनत करूनबी काम होत नाही भाऊ, तोंडापशी आलेला घास निघून जातो ना भाऊ, देवावर लई श्रद्धा आहे तुमची भाऊ, पण देवाबद्दल तक्रार बी हाय तुमची भाऊ, पन येचात देवाचा दोष नसतंय भाऊ,
नशिब लई जोरात हाय तुमचं भाऊ, सुख, समाधान आणि बक्कळ पैसा लिहून ठेवलाय देवानी भाऊ, लाथ मारीन तीथं पाणी काढनार तुम्ही भाऊ, फक्त एक नड हाय तुम्हाला भाऊ, तुमच्या जवळच्यांनीच आडून धरलंय तुम्हाला भाऊ, तुमच्या पायाखालची माती नेउन करनी केली तुमच्यावर भाऊ, तुमची परगतीच आडून धरली भाऊ, पण काळजी करायची नाय भाऊ, XYZ चे आशिर्वादानी तुमची सगळी नड काढून टाकतंय भाऊ, फक्त दिड हजार रूपंय खर्च करावं लागन भाऊ..हे सांगणारे ब्राम्हण नाहीत तर पोट भरणारी भटक्या समाजाची माणस असतात,🏽त्यांचे विशेष कौशल संभाषणाचे असते.
भटा ब्राम्हणानी देशातील सर्वच समाजाला शुभ मुहूर्त,भविष्य आणि त्या वरील उपाय सांगून ठेवले, घराच्या दरवाजात आणि गाड़ीला कोळसा,नींबू आणि सात मिर्चया  लावल्या की साडे साती, शनी लागत नाही म्हणुन बहुसंख्य लोक शनिवारी न चुकता त्या लावतात.कोणाची साडेसाती गेली माहित नाही पण पारदी समाजाची रोजी रोटी मात्र यावर चालते,भटा ब्राम्हणानी सर्व समाजाला मानसिक गुलाम बनवून ठेवले त्यामुळे शुभ मुहूर्त पाहण्याचा हा धंदा आहे,त्यामुळे काही समाजाचे आर्थिक अंकगणिते यावर अवलंबून होती आणि आहे, आता मोबाईल पिसी नेटच्या वर अवलंबून आहे,नेट वर्क नसेल तर शुभ मुहूर्ताचे काय होणार हा मोठा प्रश्न सर्वच लोकां समोर असला पाहिजे.यातुन काय घ्यावे आणि काय नाही,ते ठरविण्याचा  अधिकार कुणाचा???

माझे अज्ञान दूर करा


गात ज्यांनी मानव जाती साठी ऐतिहासिक कार्य केले.त्यांना एक तर महापुरुष महामानव,संत,महंत,महाराज,राजे महाराजे,सम्राट असा अनेक नांवाने ओळखल्या जाते.त्यांचा जन्म,आई,वडील, त्यांची जन्मभूमी कर्मभूमी,शिक्षण आणि मूत्यू याची नोंद असते.यासर्वाची माहिती मानव कल्याण करणाऱ्या माणसा करिता आणि संस्था करिता प्रेरणादायी असावी या करिता त्यांची माहिती विविध भाषे मध्ये इतिहासात उपलब्द असते. या महापुरुषांची माहिती आजच्या तरुण तरुणीला व्हावी म्हणून काही स्वाभिमानी लोक त्यांच्या विचाराची प्रेरणा घेऊन त्यांच्यावर कथा,कांदबरी,नाटक, सिनेमा,तयार करून त्यांना सर्व समाजा पर्यंत पोचवितात.सध्या जमाना सोशल मिडीयाचा नेट गुगलचा आहे, सैराट सिनेमाने 100 कोटी चा धंदा केला. त्या सिनेमात एक ही प्रसिद्ध कलावंत नाही पण सत्य परिस्थीवर आधारित सिनेमा असल्या मुळे तो देशा विदेशात गाजतोय, 
देऊळ बंद ',शिर्डी के साईबाबा,जय गजानन हा दिग्गज कलावंत असलेला चित्रपट कधी आला आणि गेला जनतेला कळला नाही. त्यावर चॅनल पिंट मिडियाने तोंड भरून लिहले,दाखविले.पण स्वामी समर्थ,साईबाबा व गजानन महाराज हया सर्व पात्राचा उल्लेख आला आहे.यांची इतिहासकारांनी इतिहासाची सर्व पुस्तके पालथी घातली तरी या तिघांचा साधा उल्लेखही कुठेच आढळला नाही?. देशाच्या इतिहासात सम्राट अशोक,छत्रपती शिवाजी महाराज,गौतम बुद्ध, कबीर, संत तुकाराम महाराज, संत गाडगेबाबा या सर्व संत-महात्म्यांचा जन्म,शिक्षण,कार्य,मृत्यु आई वडीलाचे नांव,गांव,तालुखा, जिल्हा या सर्वाची माहिती मिळते.पण स्वामी समर्थ,साईबाबा व गजानन महाराज यांचा इतिहास भूगोल का सापडत नाही ?.
सम्राट अशोक हयांचा जन्म इसवीसन पूर्व 304 व मृत्यु 232 चा आहे. असा इतिहासात स्पष्ट उल्लेख आहे. शिवाजी महाराजांचा कार्यकाळ इ . स . १९ फेब्रुवारी. १६३० - इ .स. ३ एप्रिल १६८० .तथागत भगवान बुद्ध ह्यांचा कार्यकाळ - इ . स. पूर्व ५६३ ते इ.स. पूर्व ४८३ हा आहे .संत कबीर हयांचा जन्म ईसवी सन 1455 आणि मृत्यु 1575 चा आहे.
संत ज्ञानेश्वरांचा कार्यकाळ इस . १२७५ - इस . १२९६.संत तुकाराम महाराज १६०८ - १६५० दरम्यान या जगात अस्तित्वात होते.(शिवाजी राजांचे समकालीन व गुरु होते).गाडगे बाबा २३ फेब्रु . १८७६ ते २० डिसे . १९५६ हा गाडगे बाबा अस्तित्वात असल्याचा कालखंड आहे.आणि या सर्वांची नावे सुद्धा भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासाला ज्ञात आहेत .
एवढेच नव्हे तर त्यांचा जन्म कोणाच्या पोटी , कोठे आणि केव्हा झाला हे सुद्धा इतिहासाच्या अनेक अभ्यासकांनी कथा,कांदबरी, ग्रंथात नमूद आहे . या सर्व महान माणसांनी आणि संत पुरषांनी केलेले कार्य, गाजवलेले शौर्य आणि माणुसकीची दिलेली शिकवण इतिहासाला साक्षी आहे. ज्या प्रमाणे- भगवान गौतम बुद्ध ह्यांचा जन्म लुंबिनी वनात कपिलवस्तू ( नेपाळ ) येथे राजा शुद्धोधन आणि आई महामाया प्रजापतीच्या पोटी झाला. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रु . १६३० ला मा साहेब जिजाऊ आणि शहाजीराजे भोसले यांच्या पोटी किल्ले शिवनेरी ( जुन्नर ) जिल्हा - पुणे, (  महाराष्ट्र ,भारत ) येथे झाला. तर तुकाराम महाराजांचे संपूर्ण नाव - तुकाराम बोल्होबा आंबिले त्यांचा जन्म-देहू जिल्हा पुणे (महाराष्ट्र,भारत) येथे झाला.गाडगे बाबांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव (महाराष्ट्र,भारत) येथे झाला.आणि त्यांचे संपूर्ण नाव - डेबुजी झिंगरोजी जानोरकर म्हणजेच संत गाडगे बाबा.या सर्व महान शूर वीर विवेकी सत्पुरुषांचा आणि विश्वकल्याणाचा विचार करणाऱ्या थोर व्यक्तीमत्वांच्या कार्याच्या आणि अस्तित्वाच्या पाऊलखुणा आपणास मिळतात.
स्वामी समर्थ,साईबाबा व गजानन महाराज हया माणसांचा (देवाचा) जन्म कोठे झाला ?. हया तिघांचे संपूर्णपूर्ण नाव काय होते?.त्यांचा कार्यकाळ कोणता इ स पूर्व कि शतक ?.त्यांचे आई-वडिल नेमके कोण होते ?.आणि ते महान व्यक्तिमत्व आहेत तर इतिहासाच्या पुस्तकां मध्ये किंवा संत साहित्यामध्ये त्यांच्या जन्म मृत्यु आणि कार्याची नोंद का नाही ?.हया प्रश्नांची उत्तर आजच्या तरुण पिढीला मिळाली पाहिजे,कोणाच्या धार्मिक भावना दुःखविन्या साठी हा लेख प्रपंच नाही, माझ्या सारख्या लाखो अज्ञाननी लोकांचे अज्ञान दूर होईल आणि सत्य इतिहास माहिती करीता हा पत्र प्रपंच 

ओबीसीचा खरा वैचारिक मित्र कोण?.


देशातील बहुसंख्य बहुजन समाजाला,ओ बी सी नां आपला खरा मित्र कोण आणि शत्रु कोण हे आज पर्यन्त ओळखता आले नाही.महाराष्ट्राच्या राजकारणात प्रस्थापितांच्या राजकिय व्यवस्थेत सरकारी पैशाचा गैरवापर करुन सर्वोच्च सत्ता पदे मिळविण्याच्या स्पर्धेत टिकण्यासाठी बहुजन समाजाच्या नेत्याचा पूर्ण वापर होतो.जेव्हा तो बहुजन नेता डोइजड होतो तेव्हा तो भ्रष्टाचार प्रकरणात नेमका अटकेत असल्यामुळे बहुजन समाजा तुन आणि राजकरणातून नेता म्हणुन हद्दपार होतो.
महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेसचा एकछञी अंमल असल्यामुळे ६० वर्षात शरद पवार,देशमुख,पाटिल,निंबाळकर,मोहिते,राणे,खडसे सारखे अनेक प्रसिद्ध मराठा समाजाच्या राजकीय नेत्यांनी पैसा व मिडियाचा राजकारणासाठी वापर केला. त्यांची पद्धत सांघिक स्वरुपाची राहीली. त्यांनी प्रत्येक विभाग, जिल्ह्यात अशी माणसे तयार केली. पवारांनी कधी सहकारातील कारखाना काढला नाही.परंतु भ्रष्ट व सरकारी अनुदान,सरकारी ठेकेदारी, शैक्षणिक संस्थांना कवडीमोल दामाने सरकारी भुखंडाचे श्रीखंड आपल्या माणसांना दिले, त्यातुन संस्थाने उभे करुन त्यांच्या पैशावर चेअरमन, आमदार व खासदार या लोकशाहीतील पदांना कुशल,साधन शेतकरी बनविले.
आपल्या संस्थांना (ट्रस्टला) पैसे जमा केला,त्यात भ्रष्टाचार केल्याचा कांगावा मिडिया मधून करुन पहीला मोठा बळी मुख्यमंत्री पदी असलेल्या बहुजन नेते मा. बँरीस्टर अंतुलें यांचा घेतला होता.एकनाथ राव खडसे प्रयन्त किती बहुजन ओबीसी नेत्याचा बळी या मनुवादी व्यवस्थेने घेतला आहे, हे बहुजन समाजाने हे विसरता कामा नये. पुढे भाजपाने या देशातील लोकसंख्येने ५२ % उपेक्षित ओबीसींचा "माधव" पँटर्न वापरुन सत्ता हस्तगत करण्याचा प्लँन बनविला. तो फक्त मुखवटे वापरुन पेशवाईचे पुर्ननिर्मान करण्यासाठी होता. त्याला ओबीसी समाज मोठया संख्येने बळी पडून गर्व से कहो म्हणायला लागला, कांग्रेस, भाजपा यांनी ओबीसी मधील आर्थिक दृष्टीने सक्षम असलेल्यांना पक्षात घेऊन त्यांना आपापल्या जातीचे सेल बनायला लावून त्यांना सेल (विक्री) करण्याची व्यवस्था निर्माण करुन जातीचे मेळावे घेण्याची परंपरा सुरु केली. तेव्हा पासूनच जातीच्या संघटना बनवुन समाजकारणाच्या नावाखाली राजकारण करणारे ओबीसीत जाती जातीचे ठेकेदार तयार झाले. त्यांचाच उपयोग करुन दोन्हीही व्यवस्थेने बहुजनांची तिसरी राजकिय व्यवस्था (पक्ष) महाराष्ट्रात शेकाप, रिपाई,भारिप बहुजन महासंघ, जनता दल, कमुनिस्ट पक्ष,राष्ट्रीय समाज पक्ष इत्यादींना अन्याय,अत्याचार,हत्याकांड यावरील आंदोलनात गुंतवून त्यांच्या मतभेदानां योग्य प्रसिद्धी देऊन मिडियाने खुबीने वापर करुन वाढूच दिले नाही. शिवसेना त्यापेक्षा वेगळी नव्हती ते मराठी माणसाचे राजकारण करता करता मुंबईतील मालक वर्गासाठी कामगार संघटना संपवून हिन्दुत्वाच्या वाटेवर भाजपाचा ३० वर्षे भागिदार राहीली. मंडल आयोग संपुर्ण पणे लागू झाल्यास आपली दुकानदारी बंद होण्याच्या भितीने रामाला पुढे करुन देशात आगी लावणाऱ्यांना कुणी साथ दिली हा इतिहास लिहला गेला आहे. छगन भुजबळांनी मंडल आयोगाच्या मुद्दावरुन सेना सोडून खरोखर बहादुरी दाखवली असती, तर ते आज जेल मध्ये नसते.त्यांनी बहुजनाचा पक्ष स्थापन केला असता तर राज्याचाच नव्हे तर देशाच्या राजकारणाची दिशा बदललेली दिसली असती. जड होणाऱ्या कर्ण,घटोच,एकलव्य ला कुठे कधी मारायचे हे श्रीकृष्णने बरोबर सांगून ठेवले. बहुजन नेत्याला कसे संपविले जाते हे सर्वांना माहीत झाले असावे.सत्तेतुन कमावलेल्या पैशावर राजकारणातील सर्वोच्च पदे मिळविण्याची स्पर्धा आपल्या गटाचे आमदार ,खासदार निवडून आणण्यासाठी महाराष्ट्रात सुरु आहे. हे सर्व जवळून अनुभवलेल्या ओबीसी नेत्यांनीही त्या त्या पक्षात पैशाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी तोच मार्ग अवलंबाला असल्यामुळे त्यांना जेलची हवा खावीच लागेल. त्यावर उपाय म्हणुन सध्याचे पेशवाई सरकार राजेशाही प्रमाणे प्रशासनातील अष्टप्रधान मंडळ (सेक्रेटरी ) मार्फत चालवितात. प्रस्थापित पक्षाचे मालक ओबीसीच्या असलेल्या प्रचंड संखेमुळे व ओबीसीतील होत असलेल्या जागरुकतेमुळे अशा नेत्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराकडे डोळे झाक केल्यासारखे करतात. परंतु त्यांचा आर्थिक उलाढालीचा तालेबंद बनवुन संपूर्ण बंदोबस्त करुन ठेवतात, आणि योग्यवेळी त्यांचा काटयाने काटा काढतानां दिसतात.बलाढ्य असेल तर त्यांचा संत तुकाराम महाराजांप्रमाणे आधुनिक काळातील अपघातातुन वैकुंठाला पाठवले जाते. काहींना जेलमधे , काहींची आरोपाच्या चौकशीच्या नावाखाली बोलती बंद करतात तर काहींना दम देऊन व्यवस्थेचे गुलाम बनवितात. तेव्हाच यांना जातीची ,बहुजन असल्याची जाणीव होते. तो पर्यंत खुप वेळ झालेला असतो. तेव्हा बहुजनांतील नव्या खेळाडूला संघात स्थान मिळते. पुढे त्याचीही तसीच वाट लागते.प्रस्थापित व्यवस्थेला यामुळे काहीच फरक पडत नाही. हे दुष्ट चक्र अगदी कृषि उत्पन्न समितिच्या एजंटप्रमाणे चालते. बहुजनाची मते कधी नेत्यासाठी, कधी हिन्दुत्वासाठी त्यांना मिळत राहतात.थोड्या फार फरकाने सत्ता गेलीच तर विरोधी पक्ष म्हनून हे आपली पोळी भाजून घेत असतात.म्हणुन कांग्रेस,भाजपा हे एकच नान्याच्या दोन बाजु आहेत,हे बहुजन समाज ओ बी सी समाज विसरतो, त्यामुळे ओबीसी जनता माञ आगीतुन उठून फुपाट्यात काँग्रेस राष्ट्रवादी च्या जाळ्यात अडकते तिथेही तेच वाटयाला येते.अशा प्रकारे सर्वच प्रस्थापितांच्या पक्षातील बहुजन ओबीसी नेतृत्वाची पर्यायाने ओबीसींची राजकारणातील पिछेहाट चालू आहे .हे समजत असूनही त्याच व्यवस्थेत राहून बदलाची अपेक्षा करणे गैर आहे .अशा वेळी अन्याय झाल्यास एक दोन दिवस मोर्चे काढणे या पलीकडे बहुजन जनतेच्या हातात काहीच राहत नाही. हे अन्याय करणारांनी ओळखलेले आहे तेव्हा कितीही मोठ्या बहुजन नेत्याची आम्ही भ्रष्टाचाराला थारा देत नाही हे सांगून शिकार करायला घाबरत नाही. मुंढे साहेबांना ज्या पदापासून वंचित ठेवण्यासाठी संपविले. व त्यांचे वंशज जर त्याच व्यवस्थेत तेच पद मिळविण्यासाठी बहुजनांना त्यांच्या दावणीला बांधत असेल.व ते सर्वोच्च पद चिक्कीत माती घालून मिळूच देणार नसतील तर त्यांच्या अनुययांनी कुणाला धडा शिकवयाचा ? व कसा ? वरील सर्व प्रकरणात महाराष्ट्रातील मनुवादी चैनल,प्रिंट मिडियात एका विशिष्ट वर्गाकडे संपादक,मुख्य वार्ताहर मक्तेदारी असल्यामुळे त्यांना जे हवे आहे तेच ते दाखवितात आणि लिहतात. त्याच बरोबर  शिक्षण संस्था,साहित्य,प्रकाशन हया सर्व जबाबदारया त्यांच्याच कडे आहे. त्यामुळे कारणांना बगल देऊन ओबीसी नेते समाजाशी हरामखोरी करतानां दिसतात, लायकी नसतानां ही जातीच्या बुरख्या आड ते लपतात अशी गरळ स्वता मीडिया सद्या ओकत आहे . सेना भाजपाची सत्ता आल्यावर कमी अनुभव असलेले जोशी,फडणवीसच मुख्यमंत्री का बनतात ? गृहमंञालयातील अधिकारया कडून वसूल केलेला जिजिया कर कुणाकडे जातो.? गृहमंत्री मीच होणार म्हणनारया विनोद तावडेंचा अवाज कसा दाबला जातो?. गिरीष बापटांनी केलेल्या दाळीच्या पापामुळे महाराष्ट्र भोगत असल्याचे सोयर सुतक यांना का नाही ? 
लोकशाहीचा एक खांब प्रस्थापितांच्या मदतीने इतका सडला असेल तर ही व्यवस्था कधी बदलणार ? ही दिवसा ढवळ्या चाललेली दरोडेखोरी, राजकारणात पैशाच्या स्पर्धेमुळे बहुजन सत्तेपासून पर्यायाने इतर हक्कापासून वंचित ठेवणे , ५२% ओबीसींना श्रद्धेपोटी अंध बनवून त्यांच्या मतावर राजपाट मिळविणारे त्यांच्या विद्यार्थ्यांना असलेली स्काँलरशिप जर तीन तीन वर्षे देत नसतील व केंद्र शासनाकडून ओबीसींच्या स्काँलरशिपला निधी मिळवण्यासाठी त्या पक्षातील ओबीसी नेते पदांसाठी तोंड उघडत नसतील तर अन्याय झाल्यावर बहुजनाचे नाव घेण्याचा त्यांना हक्कच पोहचत नाही. तेव्हा यांचा माज उतरविण्यासाठी सद्या उपल्बध असलेला ओबीसी नेत्याचा पक्ष बहुजनाचा पक्ष असला पाहिजे. अता रडायचे नाही, लढायचे नुसतेच  बहुजन ओबीसींची सत्ता या महाराष्ट्रात येणार नाही व दुसर्याच्या घराला रंगरंगोटी करुन आम्हाला हक्काची सावली मिळणार नाही. प्रस्थापित पक्षातील नेते तुम्हाला दुर्लक्षित ठेवणारच असलेल्या बहुजन नेत्यांसाठी किती दिवस आपण भाड्याच्या घरात राहणार ? केव्हा आपल्या हक्काची झोपडी (पक्ष) मोठी करणार ? इतरांच्या झोपडीचा महाल बनविण्या करीता बहुजन ओ बी सी समाजाने सोडून द्यावे आणि स्वयंम प्रकाशित होऊन. आपला खरा मित्र कोण आणि शत्रु कोण हे समजून घ्यावे.म्हणुन च एक जग प्रसिद्ध म्हण आहे,कपटी मित्रा पेक्षा दिलदार शत्रु बरा!.
विचार करा काँग्रेस, भाजपा कोणत्या वैचारीक दुष्टया बहुजनाचा ओ बी सी चा खरा मित्र किंवा पक्ष आहे?.

डोंगरची काळी मैना


देशात प्रत्येक ऋतु मध्ये काही नैसर्गिक फळाचा, फुलांचा सुगंध आणि चव माणसाला बेचैन करून टाकते. त्यात आंबा हा तर फळाचा राजाच त्यांचे प्रकार अनेक असतात, बाजारात जाऊन त्यांच्या भाव काढला तर तोंडाचे पाणी व चव कुठच्या कुठे पळून जाते, कारण आंबा हा जरी नैसर्गिक असला तरी त्यांचे मालक खुप असतात,त्यामुळे त्यांची किंमत बाजार मध्ये ये पर्यन्त अवाच्या सवा होऊन जाते.पण त्या मानाने इतर फळाचे तसे नाही, कळवंद, जांभूल,यांना लोक डोंगरची काळी मैना म्हणुन ओळखतात. यांची कोणाची मालकी हक्काची झाडे नसल्यामुळे ते तोडून किंवा खाली पडलेले जमा करून विकणारे आदिवाशी किंवा इतर मागासवर्गीय समाजाची लोक असतात.
याबाबत एका प्रसिध्द विचारवंताची एक सुंदर पोस्ट सोशल मिडिया वर फिरतांना पाहली.माझ्या एका मित्राने विचारले, बाजारात गेल्यावर तुम्ही कधीच घासाघीस (bargaining त्याने वापरलेला शब्द ) करत नाही ?
नाही. मी उत्तर दिलं ,जे लोक स्वतःच्या जगण्यासाठी व्यवसाय करतात त्यांच्याशी कसली घासाघीस करायची ?.माझ्याबरोबर कधी मंडईत आलात तर तुम्हांला कळेल.
मी भाजी विक्रेत्यापुढे जाऊन उभा राहतो आणि म्हणतो, मावशी एक किलो वांगी द्या ,किंवा मामा दोन किलो टोमॅटो द्या.मी कधीही त्यांना मावशी,वांगी कशी दिली ? किंवा मामा टोमॅटो काय भावाने दिली ?.असं विचारत नाही.मुळात आपल्याकडे शेतीमालाचे भाव हे बऱ्याचदा उत्पादन किंमती पेक्षाही कमी असतात.उदाहरण द्यायचं तर एक किलो टोमॅटो पिकवण्यासाठी शेतकऱ्याला दहा रुपये खर्च येत असेल तर बऱ्याचदा तीच टोमॅटो आपल्याला बाजारात दहा रुपये दराने मिळतात.म्हणजे शेतकऱ्याला ती पाच रूपयांनाच विकावी लागतात.व्यापाऱ्याचे पाच रूपये आणि शेतकऱ्याचे पाच रूपये म्हणजे दर एक किलोमागे शेतकरी पाच रूपये नुकसान सोसत असतो.मागणी पेक्षा पुरवठा जास्त झाला की हे असं होणारच,मागणी पेक्षा उत्पादन कमी झालं की उलटी परिस्थिती निर्माण होते.वस्तूच्या किंमती वाढत जातात.अशावेळी मात्र आपण लगेच दोन्ही हातांनी बोंबलायला लागतो.आपल्याला एवढीही अक्कल नसते की आपल्यासाठी शेतकरी नेहमीच नुकसान सोसत असतो, तर कधी तरी आपण स्वतःसाठी नुकसान सोसायला काय हरकत आहे?. आपलं सरकारही नालायक आहे.ते कोणत्याही पक्षाचं असू दे. इथं शेतीमालाचे दर वाढू लागले की सरकार निर्यातबंदी करून त्याचे दर पाडत असतं.शेतकरी मेला तर मरु दे पण आयते खाणारे पांढरपेशी वळू फुकटाफुकटी जगले पाहिजेत.आता कांद्याच्या बाबतीत असं घडलेलं आहे. लोक एवढे हलकट की अर्धा कांदा घातलेली भजी तीस रुपयांना घेऊन खातील पण तीस रूपयांना अर्धा किलो कांदा घेणार नाहीत.माझी बायको पूर्वी बाज़ारात अशी घासाघीस करायची मग मी तिच्याशी दोन दोन दिवस बोलणंच बंद करे.एवढ्या एवढ्या गोष्टीसाठी तुम्ही माझा अपमान करताय. ती म्हणायची.एवढ्या एवढ्या चार पैशांसाठी तू त्या गरीबांचा अपमान करतेस ते ?. मी म्हणायचो. एखादी वस्तू अतिशय पाडून मागणं हा अपमानच की !.आपण लोक किती हलकट असतो त्याचं एक उदाहरण सांगतो.आम्ही दोस्त दोस्त परवा असंच फिरायला गेलो.पिझ्झा ,बर्गर ,कोल्ड्रिन्क तुडुंब खाल्लं, प्रत्येकी तीनशे बिल झालं.सर्वांनी ते आनंदानं दिलं.पोट हलकं करण्यासाठी आम्ही मग रस्त्याने फिरू लागलो.एके ठिकाणी एकदम फ्रेश करवंदे दिसली.टपोरी ,काळीभोर.आमचा एक मित्र पुढं झाला आणि त्यानं पहिला प्रश्न विचारला करवंदे कशी दिली ?"
दहा रुपयाला एक द्रोण ! म्हातारी बोलली.पाच रुपयांना एक देणार काय ?. देत असशील तर पाच घेतो बघ.आमचा दोस्त बोलला....करपलेला, आंबवलेला मैदा पिज़्ज़ा नावानं दीडशे रुपयांना खायचा आणि एवढं डोंगरात जाऊन वेचून आणलेली करवंदे पाच रुपयांना मागायची हा आपला दरिद्रीपणाच नाही काय ? याला हलकटपणाही म्हणता येईल ! 
एवढं शिकून सावरून आपण असे हलकटच राहणार असू तर त्या 
शिक्षणाचा उपयोगच काय?. शहरात राहणारी आणि नोकरी करणारी बहुसंख्य माणसं ही शेतकऱ्याची,शेतमजूरांची मूल मुलीच असतात,पण शेतकऱ्यांनी उत्पादन केलेला कोणतीही वस्तू अन्न धान्य,भाजीपाला खरीदी 
करतांना नेहमी विचार करावा की ही लोक श्रीमंत होण्यासाठी हे भाजीपाला, करवंडे,जांभूळ विकत नाही तर पोट भरण्यासाठी उन्हा तान्हाची परवा न करता रोड च्या कड्यावर बसून विक्री करतात.जंगलातील प्रत्येक ऋतूत तयार होणाऱ्या फळे,फुले यांच्या वर पोट भरतात जेव्हा काहीच नसते तेव्हा जंगलातील 
सुखी लाकडे त्याची मोळी विकून पोट भरून जगतात. असे पोट भरण्यासाठी कोणती ही वस्तू विक्री करीत असतील तर त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून वस्तूचा भाव करावा आणि आपण पण खेड्यातुन शहरात आलो आहोत यांची 
जाणीव ठेवून वागावे हीच डोंगराच्या काळी मैना विकणाऱ्या 
म्हातारीच्या व भाजीपाला विकणाऱ्या म्हाताऱ्याच्या दुःखातून सुचलेला,लिहलेला छोटासा लेख आहे.
,