माणसांनी प्रत्येक कामांची पोच पावती घ्यावी दयावी.
रविवार, ६ नोव्हेंबर, २०२२
माणसांनी प्रत्येक कामांची पोच पावती घ्यावी दयावी.
माणसांनी काय बनावे बदक की गरुड?,निर्णय तुमचा आहे.
माणसांनी काय बनावे बदक की गरुड?,निर्णय तुमचा आहे.
मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०२२
दिवाळी असंघटीत शेतकरी शेतमजुरांची आणि कामगारांची
दिवाळी असंघटीत शेतकरी शेतमजुरांची आणि कामगारांची
देशातील सर्वात मोठा सण दिवाळी काही दिवसावर आला.प्रत्येक माणसांना दिवाळीत काही तरी कोणा कडून बक्षीस बोनस मिळावे अशी अपेक्षा असते. ग्राहकाला दुकानदार कडून,दुकानदाराला होलसेल विक्रेत्या,विक्रेत्याला कंपनी कडून,वाहन चालकाला गाडी मालका कडून,घर कामगार महिलेला घर मालका कडून,ग्रस सिलेंडर घरोघरी पोचविणाऱ्या त्या माणसाला प्रत्येक घरी दिवाळी बक्षीस वीसतीस रुपये मिळावे असे एकूण ९४ प्रकारच्या असंघटीत कामगारांना दिवाळीला काही रोख रक्कम,मिठाई पुढा मिळावा ही अपेक्षा असते. अनेक ठिकाणी दिवाळीला काही द्यावे लागेल.या भिती मुळे आठ,दहा महिने झालेल्या कामगारांना काही भांडण तंटा शाब्दिक तक्रार करून कामावरून काढले जाते.त्यामुळे नवीन कामगार कमी पगार मिळतो.आणि त्याला पाहिजे त्या पद्धतीने राबवून घेता येते.अशा अनेक तक्रारी या महिन्यात माझ्याकडे आल्या आहेत.त्या विरोधात काहीच करता येत नाही.त्यांना कोणतेही कायदेशीर स्वरक्षण नाही.म्हणूनच ते असंघटीत कामगार म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण होत असते.
सुरक्षित ठिकाणी सुरक्षित काम करणारा कामगार,कर्मचारी,अधिकारी दिवाळी बोनस सानुग्रह मिळण्यासाठी धमक्या इशारे द्याला लागला.त्याच बरोबर देशातील ९३ टक्के असंघटीत कामगार ही बोनस ची मागणी करायला लागला. विशेष राज्यातील महानगरपालिका,नगर पालिका,नगर परिषद,नगर पंचायत आणि पंचायत मध्ये काम करणारा कामगार बहुसंख्याने कंत्राटी,रोजंदारी कामगार असतो.ज्या कंत्राटी कामगारांना नियमित काम नाही,वेळेवर पगार नाही.किमान वेतन सुविधा नाही.ज्यांची एक मजबूत विचारांची संघटना,युनियन नाही.ज्यांचा जिल्ह्यात,राज्यात एक नेता एक विचारधारा नाही ते ही कामगार नगर परिषद,नगर पंचायत मध्ये आंदोलने करीत आहेत.काही ठिकाणी बोनस मागण्यासाठी युनियन बनवली म्हणून मारहाण करून कामावरून काढून टाकले. त्याच ठिकाणी दुसऱ्या कामगारांना कामावर घेतले.अशा अनेक समस्या असंघटीत कामगारांच्या असतांना काही नेते त्यांना दहा हजर,पंधरा हजार रुपये बोनस मिळावे यासाठी पत्रकाद्वारे सरकारला,प्रशासनाला धमक्या इशारे देतात.शेतकऱ्यांचा कष्टकरी कामगार,कर्मचारी अधिकारी यांचा दिपावली एकच सण मोठ्या उत्सवात साजरा होतो,शेतकऱ्यांच्या घरात विविध प्रकारचे अन्न धान्य फळ फराळ येतात त्यामुळे घरात आनंद असतो,तसाच कामगार कर्मचारी अधिकारी यांना दिवाळीला बोनस सानुग्रह,बक्षीस मिळतात.यांचा पगार,वेतनवाढ हे दरवर्षीप्रमाणे निश्चितपणे ठरलेले असते.शेतकऱ्यांना मात्र दरवर्षी कधी निसर्गाकडून तर कधी सरकार कडून तोंड बांधून मार खावा लागतो. शेतकऱ्यांच्या घरात शेतीतील माल येतो तेव्हा नेमका बाजारभाव पाडला जातो.कारण येथे ब्राह्मण वैश्य क्षत्रियांची दोस्ती युती आघाडी शेतकऱ्यांचे योग्य वेळी शोषण करण्याचे काम कृषिउत्पन्न समिती द्वारे चोख केले जाते. देशभरात दिवाळी कामगार,कर्मचारी अधिकारी आणि असंघटीत शेतकरी, शेतमजूर इमारत बांधकाम कामगार,फेरीवाले सर्व समाजाच्या लोकांची कशी साजरी होत असते.याबाबत विचार मंथन आपल्या देशात होत नाही.पण इतर देशात होते असे मला वाटते.मी अनेक देशाचे वर्ड सोशल फोरम मध्ये भाग घेऊन अनुभवला.म्हणूनच मी यावर नियमितपणे लिहत असतो.
दिवाळीत दरवर्षी दारात कंदील आणि दिव्याची माळ लावुन कोणता उत्सव साजरा करतो.हे कोणत्याही जाती धर्माचा माणूस शंभर टक्के सत्य सांगु शकत नाही. प्रत्येकांचे उत्तर एकच वाड वडिलोपार्जित परंपरा रितीरिवाज आहे.त्यांचे पालन केले पाहिजे.ती संघटित असंघटित कामगार,कर्मचारी अधिकारी करतात तसेच मजूर,शेतमजूर कष्टकरी गोरगरीब आपल्या परीने दिवाळी साजरी करतात. दिवाळी सण एक आहे,बाकी उत्सव पर्व समता स्वातंत्र्य बंधुभाव कुठेही दिसत नाही.प्रचंड प्रमाणात विषमता घराघरात भरली आहे.म्हणजेच एकत्र आनंद उत्सव नाहीच.महागाई,बेरोजगारी,भ्रष्टा
भारतातील दिवाळी हा मोठा उत्सव उत्स्पुर्तपणे साजरा होतो.तिला महागाई, बेरोजगारी,भ्रष्टाचार,अतिरेकी कारवाई कोणीच रोखी शकत नाही. दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओहाळी हे बळीराजा म्हणजे शेतकऱ्यांच्या घराघरात म्हटले जाते. म्हणूनच दिवाळी खऱ्या अर्थाने शेतमजूर आणि शेतकऱ्यांची असते त्यावर अवलंबून असलेल्या उद्योग धंद्याची वर्ष भराची कमाई दिवाळीच्या दिवशी मोजल्या जाते.तोच खरा आनंद सर्व समाजातील कुटुंबात उत्स्फूर्तपणे साजरा केला जातो. म्हणूनच सर्वच सर्वांना म्हणतात दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!.ही दिवाळी तुम्हाला तुमच्या कुटुंबाला सुखाची समृद्धी ची जावो.
सागर रामभाऊ तायडे,9920403859,भांडुप मुंबई,
दिवाळीत इमारत कामगार उपासी,अधिकारी दलाल तुपाशी
दिवाळीत इमारत कामगार उपासी,अधिकारी दलाल तुपाशी
सोमवार, १७ ऑक्टोबर, २०२२
इतिहास घडविणारे कामगार नेते रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे
इतिहास घडविणारे कामगार नेते रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे
रावबहाद्दुर नारायण मेघाजी लोखंडे (जन्म १३ ऑगस्ट,१८४८, मूत्यू ९ फेब्रुवारी,१८९७ ) हे एक भारतीय कामगार पुढारी होते.नारायण मेघाजीं लोखंडे यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील खेड (राजगुरुनगर) जवळचे कन्हेरसर होते. ते माळी समाजाचे शेतकरी कुटुंबात जन्मले होते. त्यांनी गरीब परिस्थितीतून माध्यमिक शिक्षण पुरे केले. सुरुवातीस रेल्वे खात्यात कारकून म्हणून व पुढे पोस्ट खात्यात काही काळ नोकरी केल्यावर, लोखंडे यांना मुंबईच्या मांडवी भागात एका कापड गिरणीत भांडारपालाची नोकरी मिळाली होती. तेथे त्यांना कामगार दहशतीच्या वातावरणात काम करतांना दिसले.दिवसातून १३-१४ तास काम करीत असलेले गिरणी कामगार पाहिले. त्यांना आठवडयाची सुटीही मिळत नसे,वेळेवर पगार मिळत नव्हता तेव्हा त्यांनी नोकरी सोडून स्वतःस कामगार चळवळीस वाहून घेण्याचे ठरविले. त्यांनी बॉबे मिल हंड्स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना २३ सप्टेंबर १८८४ रोजी स्थापन केली. ही कामगार संघटना भारतातील संघटित कामगार चळवळीची सुरुवात मानली जाते. भारतातील स्वाभिमानी कामगार चळवळीचे जनक म्हणून नारायण मेघाजी लोखंडे ओळखले जातात. ते महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजा मुंबई शाखेचे अध्यक्षही होते. तसेच सत्यशोधक चळवळीतली त्यांची कामगिरीही लक्षवेधी व महत्त्वपूर्ण मानली जाते. मुंबईत १८९६ मध्ये प्लेगची मोठी साथ उसळली. या साथीत अनेक लोक मृत्युमुखी पडले. त्यावेळी नारायण मेंघाजी लोखंडे पुढाकार घेऊन सरकारी मदतीने प्लेगग्रस्तांसाठी एक ‘मराठा इस्पितळ’ काढले होते. परंतु दुर्देवाने लोखंडे यांनाच प्लेगने पछाडले व त्यातच त्यांचा ९ फेब्रुवारी,१८९७ अंत झाला. असे इतिहास घडविणारे कामगार नेते रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे होते. त्यावेळची कामगार चळवळ आणि आजची कामगार चळवळ मोठा फरक आहे.
भारतात आज कामगार संघटना ट्रेड युनियन राजकीय पक्षाच्या बटीक झाल्या आहेत. त्यामुळे भांडवलदार मालक वर्ग राजकीय पक्षाला भरपूर निवडणूक निधी देऊन नेत्यांनाच विकत घेत आहेत.म्हणुन सर्वच क्षेत्रातील संघटीत कामगारांचे जिंवन उध्वस्त झाले आणि होत आहे. भांडवलदार आणि उच्चवर्णीयांच्या गुलामगिरीतून असंघटीत कष्टकरी कामगार,मजुर,शेतमजुरनां मुक्त व्हायचे असेल तर त्यांनी सर्व प्रथम स्वबळावर संघटीत झाले पाहिजे.राजकीय पक्षाच्या नेतृत्वाखाली संघटीत झाल्यामुळे आज कामगार,कर्मचारी देशोधडीला लागले आहेत.हे कोणी नाकारू शकत नाही.सेवा निवृत्त झालेल्या कामगारांच्या रिकाम्या जागा न भरता ठेकेदारी पद्धत सुरु होण्यास संघटीत कामगारांच्या ट्रेड युनियन जबाबदार आहेत.म्हणुन सर्वच क्षेत्रात ठेकेदारी पद्धतीने असंघटीत कामगारांचे शोषण मोठया प्रमाणात होत आहे.जे काम कायम स्वरूपी चालते,असते त्या कामासाठी ठेकेदारी देण्याचा प्रश्नच येत नाही.ते काम ठेकेदारी वर देणे म्हणजे भांडवलशाही आणि ब्राह्मणशाहीचे उघड समर्थन करणे होय!.यालाच महात्मा फुले यांच्या नेतृत्वाखाली रावबहादुर नारायण मेंघाजी लोखंडे यांनी विरोध करून देशव्यापी संप घडवुन आणला होता.हे आजच्या सर्व ट्रेड युनियन चालविणारे नेते विसरले आहेत.कारण आजच्या ट्रेड युनियन मनुवादी,हिंदुत्ववादी विचाराचे खंबीर समर्थक आहेत.त्यांना कामगार कर्मचाऱ्यात समानता नको आहे.तर मनुवादी जातीची विषमता म्हणजेच जातीव्यवस्थाच हवी आहे.यालाच बहुसंख्य पुरोगामी समाजवादी, आंबेडकरवादी कामगार कर्मचारी साथ देतात.यांचे जिवंत उदाहरण म्हणजे सर्वात मोठे कामगार कर्मचारी असलेलं सार्वजनिक क्षेत्र रेल्वे उधोग धंद्यामधील नॅशनल रेल्वे मजदूर युनियन (NRMU )आणि सेंट्रल रेल्वे मजदूर संघ (CRMS). यात बहुसंख्य बहुजन मागासवर्गीय कामगार कर्मचारी अधिकृत सभासद आहेत.त्यांना १२ व १३ फेब्रुवारी १९३८ मनमाड येथे रेल्वे गॅंगमन कामगारांच्या दोनदिवशीय कामगार परिषद मध्ये डॉ बाबासाहेबांनी सांगितलेले आजही त्यांना मान्य नाही.मग कामगार कर्मचाऱ्यांवर अन्याय अत्याचार होणारच !.
सुशिक्षीत व सुरक्षित नोकरी करणारे संघटीत असतात. म्हणून त्याच्या वर कोणी कधीच अन्याय, अत्याचार करीत नाही. तशी हिंम्मत कोणी ही करीत नाही.कुटूंबातील एक व्यक्ती सुशिक्षीत झाला तर त्याला सुरक्षीत नोकरी मिळते. नोकरी मिळाली की आर्थिक प्रश्न सुटतो. त्यामुळे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक समस्यावर मात करता येते. असंघटित कष्टकरी गिरणी कामगारांना कामाचे तास नव्हते, आठवडयाची साप्ताहिक सुट्टी नव्हती. गिरणीत काम करताना गंभीर दुखापत झाली तर दवाखाण्याचा खर्च मिळत नव्हता.कामावर नाही तर पगार नाही. काम करून महिना झाला तरी कोणत्या तारखेला पगार मिळेल याची हमी नाही.या सर्व समस्यांवर असंघटित कष्टकरी गिरणी कामगाराचे नेते नारायण मेंघाजी लोखंडे यांनी गिरणी कामगारांना संघटीत करून गिरणी मालक संघा विरोधी संघर्ष करीत होते. मालक दाद देत नव्हते.तेव्हा त्यांनी ५५०० गिरणी कामगारांच्या सहया घेऊन फँकटरी कमीशनचे अध्यक्ष डब्ल्यु.बी. मुलक यांच्याकडे १५ ऑक्टोबर १८८४ रोजी पिटीशन दाखल केले होते.त्याचे फळ सहा सात वर्षाच्या संघर्षा नंतर १० जून १८९० ला मिळाले. त्यावेळी गिरणी मालक संघाने जाहीर सभा घेऊन त्यात नारायण मेघाजी लोखंडे यांनी सुचविलेल्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून मान्य केल्या.तेव्हा पासून म्हणजे १० जून १८९० पासून सर्व सार्वजनिक सरकारी कार्यालयांना कंपन्यांना उपक्रमांना रविवार ही साप्ताहिक हक्काची सुट्टी मिळत आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगार मंत्री असताना कामगार कायदयात तशी कायमची तरतुद करून ठेवली. पण त्याची अंमलबजावणी आजही कुठेच होताना दिसत नाही.मग इंटक,आयटक,सिटू,बीएमएस,एच एम पी,सारख्या राष्ट्रीय ट्रेड युनियन काय करतात?.आजच्या अनेक सुशिक्षित व सुरक्षित नोकरी करणार्यांना नोकरदारांना याची माहिती नसेल?. असे म्हणता येईल काय?. त्यांनाच काय त्यांच्या कामगार संघटना, युनियन चालविणाऱ्या नेत्यांना सुध्दा रविवारची सुटटीचे जनक हे असंघटित कष्टकरी गिरणी कामगारांना संघटीत करणारे सत्यशोधक चळवळीचे माळी समाजाचे कुशल संघटक व कुशल वक्ते रावबहादुर नारायण मेंघाजी लोखंडे होते हे माहित नसावे?. असले तरी त्यांची कधीच वाच्यता करायची नाही.म्हणजे नोंद न घेता कमी लेखने नाही काय?.
आज देशातील अंसघटीत कष्टकरी कामगार, मजूरांनी त्यांच्या संस्था संघटना, चालविणार्यांनी नारायण मेघाजी लोखंडे यांच्यापासून प्रेरणा घेवून संघटीत शक्ती निर्माण करण्याकरिता प्रयत्न केले पाहिजे.कामगाराच्या एकजुटीमुळे देशातील मोठयातमोठा भांडवलदार व उच्चवर्गीय प्रशासकीय अधिकारी संघटित शक्तीपुढेही झुकतो.हा इतिहास विशेष करून असंघटित कष्टकरी कामगार,शेतमजूर,नाका कामगार,घरकामगार व सर्व क्षेत्रातील कामगारांनी वाचला पाहिजे.
कारण देशात सर्वांत जास्त देशात ९३ टक्के असंघटीत कष्टकरी कामगार आहेत. त्यांनी १० जून १८९० हा असंघटित कष्टकरी कामगाराचा पहिला विजय दिवस म्हणून साजरा केला पाहिजे. महात्मा ज्योतीराव फुले यांची सत्यशोधक चळवळ ही देशातील तमाम ब्राम्हणेत्तर म्हणजे आजचे बहुजन,आदिवासी,मागासवर्गीय जाती जमातीतील कष्टकरी समाजाकरीता होती सर्व समाजाचे नेते विसरले आहेत.विशेष आंबेडकरी चळवळीतील बुध्दीजीवी साहित्यिक, कामगार नेते बहुजन, आदिवासी, भटक्यांना मागासवर्गीयांना कामगार मानत नाही. फक्त त्याची जात पाहतात.कामगार संघटना बांधताना त्यांना विशिष्ट विचारधारा पाहिजे. त्या शिवाय कामगारांना संघटीत करता येत नाही. कामगार म्हणून त्यांचे प्रश्न,समस्या, जाणून न घेता त्याची जात पाहून संघटना बांधू पाहणारे नेते न्याय मिळवून देतील काय? म्हणून आंबेडकरी चळवळीची विचारांची केंद्रस्थानी एकही संघटना मान्यताप्राप्त होऊ शकली नाही. ज्या असोसिएशन आहेत त्याचेही वैचारीक पातळीवर एकमत नाही.सर्व क्षेत्रातील संघटीत कामगारांची ही स्थिती असेल तर असंघटीत कामगारांची काय परिस्थिती असेल?. आज पर्यंत संघटीत कामगरांनी असंघटीत कामगारांना कामगार म्हणून पाहिले नाही. जो असंघटित कामगार नेहमीत काम नसल्यामुळे वार्षिक वर्गणी भरू शकत नाही तो आपली संघटना कसा चालवत असतील ?. त्याचे नेते बनण्याचे कोण धाडस करले? हे आज आपण पाहतो. ते धाडस नारायण मेंघाजी लोखंडे यांनी त्याकाळी केले.आज कष्टकरी कामगारांना अन्न,वस्त्र,निवारा,रोजगार,शिक्
गिरणी कामगारांना रविवार सुट्टी मिळू नये यासाठी गिरणी मालकांनी या देशातील भटा ब्राम्हणंना उच्चवर्णीयातील बुध्दीजींवीना कामगारात बुध्दीभेद करण्याच्या कामावर लावले होते.त्यानुसार गिरणी कामगारांना रविवार हा ख्रिश्चन धर्मियांचा दिवस आहे. त्यामुळे हिंदू असलेल्या गिरणी कामगारात चुकीचा प्रचार व प्रसार चालला होता. तेव्हा सरकार पुढे मोठा पेच निर्माण झाला होता.तेव्हा सरकारने बॉम्बे मिल हँडस मिल असोशिएनचे अध्यक्ष नारायण मेघाजी लोखंडे यांना रविवार हा सुट्टीचा दिवस ठेवण्यामागची भक्कम कारणे व आवश्यकता याबाबत मत विचारले होते.सत्यशोधक चळवळीत काम करणारे लढाऊ नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी रविवार हा केवळ ख्रिश्चन धर्मियाचा दिवस नाही तर तो हिंदूचा ही धार्मिक दिवस आहे याचे ठोस पुरावे म्हणजे बहुजन समाजातील प्रसिध्द कुळ दैवत खंडोबा व कुलस्वामिनी या देवताचा रविवार हाच दिवस मानला जातो.बहुसंख्य गिरणी कामगार हे खंडोबाचे भक्त आहेत. परंतु केवळ या कारणाकरीता म्हणून रविवार संबध नाही. कारण भारतात ही चाल फार पुर्वी पासून आहे.ब्रिटीश प्रशासनाने सुरवातीपासून सर्व समाजाला सर्व वर्गाना, सर्व धर्मिंयाना सोयीचा सुट्टीचा दिवस म्हणून रविवार मानला असल्याने तोच दिवस कामगाराना सुट्टीचा दिवस असावा असे ठासून सांगितले.कार्यालयीन काम करणाऱ्या कर्मचार्यांना रविवार सुट्टी तर कष्टकरी कामगारांना वेगवेगळया दिवशी सुट्टी.आजही आपल्या देशातील कंपन्या कारखाने व इंडस्ट्रीयल इस्टेट मधील गाला खात्याचे मालक आपल्या सोईने कामगार मजुरांना सुट्टी देतात.असंघटीत कष्टकरी कामगारांना तर हक्कांची सुट्टी नाही. ज्या दिवशी काम नसेल तोच त्याचा सुट्टीचा दिवस.आता पुन्हा १८८० सारखी परिस्थिती संघटीत असंघटीत कामगारांची होत आहे.याला केवळ राष्ट्रीय ट्रेड युनियन जबाबदार नाहीत. तर तो सर्व जाती धर्माचा कामगार कर्मचारी जो स्वतःला बहुजन,मागासवर्गीय समाज म्हणुन फक्त राजकीय आरक्षण घेण्यासाठी राजकीय पक्षाची गुलामी पत्करतो. पण पक्षाची ट्रेड युनियनची वैचारिक मांडणी, विचारधारा पाहत नाही. म्हणुन महात्मा फुले, राजर्षी शाहु महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्य शोधणारी,सांगणारी व अंमलबजावणी करण्या करीता संघर्ष करणारी चळवळ उभी केली होती तीच स्विकारली पाहिजे होती.पण ती विस्कळीत का झाली.त्यांचे आत्मचिंतन करून काम केले.तर भारतातील बहुसंख्य बहुजन मागासवर्गीय कामगार कर्मचारी यांचे भविष्य उज्वल राहील.ज्यानी भारतात पहिली असंघटीत संघटीत कामगारांची संघटना काढून संघर्ष केला. इतिहास घडविणारे कामगार नेते भारतीय कामगार चळवळीचे जनक रावबहादुर "नारायण मेघाजी लोखंडे" या थोर कामगार नेत्याच्या महान कार्यास, आजच्या (९ फेब्रुवारी) स्मृतिदिनी कोटी कोटी प्रणाम !!!.
आपला
सागर रामभाऊ तायडे..९९२०४०३८५९.
निसर्ग कोणालाच माफ करत नाही सर्वांना समान न्याय देतो.
निसर्ग कोणालाच माफ करत नाही सर्वांना समान न्याय देतो.
चिंतनशील दिपोत्सव
भारत हा कृषिप्रधान देश आहे, शेती आणि शेतीशी संबंधित सर्व आर्थिक उलाढाली त्यानाचं डोळ्यासमोर ठेवून पार पडला जातात. तरी मग देशातील शेतकरी आत्महत्या का करतो. सर्व शेतकऱ्यांचा धर्म हिंदूच आहे. सर्वांचे सण उत्सव एकच असतात. त्यात जात कधी आडवी येत नाही. शेतकऱ्यांचा कष्टकरी कामगार,कर्मचारी अधिकारी यांचा दिपावली एकच सण मोठ्या उत्सवात साजरा होतो,शेतकऱ्यांच्या घरात विविध प्रकारचे अन्न धान्य फळ फराळ येतात त्यामुळे घरात आनंद असतो,तसाच कामगार कर्मचारी अधिकारी यांना दिवाळीला बोनस सानुग्रह,बक्षीस मिळतात.देश किती ही संकटात असला तरी आमदार खासदार आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार,वेतनवाढ कधीच थांबत नाही.आणखी एक अजब प्रकार मान्यताप्राप्त आहे तो म्हणजे कांदा बाजार भावांवर ठरत असतो,कांदा महाग झाला तर वेतनवाढ मिळते,कांदा भाव कमी झाला तर वेतनवाढ कमी होत नाही तर तो स्थिर राहते.
त्यांचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना भेटतो.कारण येथे ब्राह्मण वैश्य क्षत्रियांची दोस्ती युती आघाडी शेतकऱ्यांचे योग्य शोषण करण्याचे काम कृषिउत्पन्न समिती द्वारे चोख करते.देशभरात शेतकरी आत्महत्या का करतात त्यांचे चिंतनशील दिपोत्सव निमित्याने झाले पाहिजे.पण ते होत नाही.कारण लिहणारे साहित्यिक विचारवंत संपादक पत्रकार यांच्या वर्ण व्यवस्थेत शेतकरी व शेतकऱ्यांची जात बसत नाही.आणि माझ्या सारख्याने लिहले तरी त्याला प्रसिद्धी देणे हे त्यांच्या वैचारिकतेत बसत नाही.त्यामुळे आर्थिक वैचारिक हितसंबंधात बाधा येऊ शकते म्हणून ते प्रसिद्ध होत नाही.काही संपादक प्रसिद्धी देतात पण लगेच लेखाच्या शेवटी टीप देतात लेखकांचे हे व्यक्तिगत मत आहे त्याला संपादक सहमत नाहीत.तरी लेख प्रसिद्धीस दिला म्हणून त्याबद्ल त्यांचे हार्दिक अभिनंदन केलेच पाहिजे.
भारतातील दिपावलीचा सबंध हिंदू धर्माच्या अनेक भाकड कथेशी जोडला जातो.कधी तो रामायण महाभारतातील वर्णसंघर्षाशी जोडला जातो तर कधी मनुस्मृती नुसार बळी राजा वामनाच्या तीन पावलाने आकाश,पातळ व्यापुन टाकतो.कधी तो संभाजी महाराजांना मनुस्मृती नुसार हलाहल करून मारतो आणि त्यांचे मुडके काठीला बांधून गांवभर मिरवणुकीत मिरवून घराघरावर आनंद उत्सव म्हणून गुढी उभारतो.दारात कंदील आणि दिव्याची माळ लावुन कोणता उत्सव साजरा करतो.हे कोणत्याही जाती धर्माचा माणूस शंभर टक्के सत्य सांगु शकत नाही.प्रत्येकांचे उत्तर एकच वाड वडिलोपार्जित परंपरा रितीरिवाज आहे,त्यांचे पालन केले पाहिजे.बाकी उत्सव पर्व समता स्वातंत्र्य बंधुभाव कुठेही दिसत नाही. प्रचंड प्रमाणात विषमता घराघरात भरली आहे.म्हणजेच एकत्र आनंद उत्सव नाहीच. चिंतनशील दिपोत्सवची ही झाली एक बाजू तर दुसरी बाजू
भारत देश हा फक्त आणि फक्त बौद्ध संस्कृतीचा देश होता.येथे ज्याही गोष्टी पर्वाच्या रुपात दिसतात ती फक्त बौद्ध संस्कृती आहे.हिंदू धर्मात कोणताही पर्व साजरा केलाच जाऊ शकत नाही,कारण ज्या समुहात विषमता आणि दु:ख;असते तिथे आनंद साजरा होत नसतो.पर्व तिथेच साजरे होतात जिथे समता असते.आणि समता फक्त बौद्ध धम्मात आहे. अन्य कोणत्याही धर्मात समता नाही.दिप फक्त बुद्धासमोर लावतात.मुळात दिपावली हा सण दिव्याच्या आनंदत्सोवचा आहे.हा हिंदूंचा सण नसून तो बौद्धांचा सण आहे.हिंदू धर्मात कोणताच सणच नाही.कारण हिंदु हा धर्मच नाही.हिंदू धर्मातील सण बौद्ध धर्मातील कॉपी पेस्ट आहे.हिंदू धर्मानुसार दिवाळीचे जे पाच दिवस कथा स्वरुपात दिले आहेत.त्या पूर्णत: काल्पनिक भाकड कथा आहेत.त्यातील कोणतीच गोष्ट सिद्ध करता येत नाही.लक्ष्मीपूजन, विष्णू,देव,नरकासुर या हास्यास्पद भाकड कथा आहेत.यांचा विज्ञानाशी तर्कसंगत तिळ मात्रही संबंध नाही.या भाकड कथानाच हिंदुनी त्यांचे सण मानून घेतलय. कोणतेही तर्कसंगत कारण नसतांना मराठा मागासवर्गीय ओबीसी स्वतःला हिंदू समजून हिदू धर्मीय सण साजरे करीत असतात. तिथे बौद्ध धम्मात सणांना कारण असते. विनाकारण कोणतीही गोष्ट घडत नाही. हाच बुद्धाचा प्रतीत्यसमुद्पाद सिद्धांत आहे.
सणांची सुरवात भारतात बौद्ध संस्कृतीतून झाली आहे.सण तेव्हा साजरे केले जातात जेव्हा आनंद होत असतो आणि आनंद तिथे साजरा होत असतो जिथे सर्व बाबतीत समानता असते.हिंदू समाजात जोगोजागी विषमता असल्यामुळे तिथे सर्वानुमते आनंदोत्सव सणाच्या स्वरुपात साजरा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.म्हणूनच चिंतनशील दिपोत्सव हा सण साजरा करण्याचा उत्साहात कमी दिसत नाही. वाड वडिलोपार्जित परंपरा रितीरिवाज म्हणूनच तो पाळल्या जात असतो.आणि आहे.दिपावलीचे महत्व बौद्ध धम्मात आहे.अडीच हजार वर्षापूर्वी बुद्धाला ज्ञान प्राप्त झाल्यामुळे याच दिवसात तथागताच्या स्वागतासाठी जोगोजागी बुद्धाच्या अनुयायांनी लाखो दिवे लावून जनतेने आनंद साजरा केला होता.भारत हा शेतकऱ्यांचा देश आहे. इथला प्रमुख व्यवसाय शेती आहे. ग्रिष्म ऋतू नंतर शेतकरी,शेतीवर काम करणारे मजूर हे त्यांच्या पिकांना भाव देतात. तो महिना अश्विन महिना असतो. त्यामुळे शेतकरी व त्यावर अवलंबून असणाऱ्या मजुरांजवळ जवळ अन्न धान्य पैसा येतो. त्यामुळे हे लोक दीप लावून,गोडधोड करुन,घरे सारवून उत्सव साजरा करतात त्याचे नांव दिवाळी. हे हजारो वर्षापासून सुरु आहे. भारताचे बहुतेक सण हे जमिन मालक आणि मजुरांवर वर आधारीत आहेत.या बाबतीत चिंतनशील दिपोत्सव हा सण साजरा केला जातो.
बुद्ध काळात हा सन प्रज्ञावली म्हणुन साजरा केला जात होता. ही प्रथा राजा सम्राट अशोकानी तशीच पुढे चालू ठेवली.पुढे अशोकानंतर या पर्वावर प्रतिक्रांती झाली. या सणाची सुरवात अशोकाने इ.स. पुर्व २५७ ला केली होती. बुद्धाने ८४००० वचने प्रस्तुत केलीत म्हणुन सम्राट अशोकाने ८४००० हजार बौद्ध स्तूप बांधले असे दिपवंश म्हणतो हेच औचित्य लक्षात घेउन अशोकाने कार्तिक अमावस्येला जागोजागी दिपमाला आणि पुष्पमाला अलंकृत केले होते. रस्ते दिवे लाऊन सजविण्यात आले होते. ८४००० हजार स्तुपाप्रमाणे अशोकाने ८४००० दिप प्रज्वलीत केलेत. हा पर्व सतत सात दिवस चालला होता. भिक्कू आणि उपासकाना दान स्वरुपात धन देण्यात आले होते. म्हणुन तो दिवस दीपावलीचा धनोत्रय दिवस म्हणून साजरा केला गेला. कारण अशोकाने आपला संपूर्ण खजिना धम्मासाठी दान केला होता. (अधिक वर्णनासाठी पहा महावंश पान न. ४९) यामित्ताने प्रत्येक घर आणि विहार स्वच्छ करुन वंदना घेण्यात येत होत्या. या पर्वाच्या निमित्ताने प्रत्येक घराच्या आंगणात एक छोटे छोटे स्तुप बनविण्यात आलेत. आज आपण बहुसंख्य मराठा ओबीसी मागासवर्गीय समाजाच्या अंगणात जे वृंदावन,किल्ला,कुंडी हिंदूंच्या अंगनात पाहतो त्याचा इतिहास तोच आहे. या उत्सवाला देश विदेशची ८० करोड जनसंख्या आणि सोबत भिक्कू उपस्थित होते असे प्राचिन दिपवंश या ग्रंथात लिहिल्या गेले आहे.चिंतनशील दिपोत्सव केवळ कंदील दिवा लाऊन फटाके फोडण्यासाठी नसावा. त्यामागील सत्य इतिहास जाणून घेण्यासाठी असावा.
श्रीलंका येथे आजही बौद्ध धम्माच्या मतानुसार दीपावली साजरी केली जाते. राजा तिष्यने याच कार्तिक अमावस्याच्या दिवसात बौद्ध धम्म दिक्षा घेतली होती आणि श्रीलंकेत आनंदोत्सव साजरा केला होता. चिंतनशील दिपोत्सव हा लेख लिहतांना खूप संदर्भ पाहिले वाचले.प्रत्येकात काळानुसार बदल जाणवला त्यातील मला जे योग्य वाटले तेच मी केला. दिवाळी म्हणजे चिंतनशील दिपोत्सव सर्व जाती धर्माच्या गरीब श्रीमंत माणसांच्या आनंदाचा सण असतो.तो निसर्गाने सर्वांना आपल्या परीने उत्सवात साजरा करण्याचा समान अधिकार दिला आहे.शेती करणारा शेत मजूर आणि शेतीचा मालक शेतकरी त्यांच्या उत्पनावर आधारित एकूण सर्व बाजार पेठ त्यातील दुकानदार कामगार मालक गिऱ्हाईक सर्वांचे हितसंबंध एकमेकात गुंतलेले असतात.त्यामुळेच प्रत्येक माणूस एकमेकाला ही दिवाळी सर्वांना आनंदाची सुख समृद्धीची जावे असे म्हणतो.म्हणजेच अज्ञान अंधश्रद्धा अंधार दिप प्रकशित करून नष्ट हो हीच कामना करून घरात दारात पणत्या लावतो.आणि उंच जागेवर कंदील लावतो.त्याचा उद्देश चिंतनशील दिपोत्सवाने प्रकाशमय हो हा असतो.असा सर्वाना समान न्याय समान अधिकार देणाऱ्या चिंतनशील दिपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप मुंबई.

.jpg)


.png)

